मुंबई : वृत्तसंस्था राज्यात गेल्या ७ दिवसांपासून चालू असलेला लाखो शासकीय, निमशासकीय कर्मचाऱ्यांचा संप अखेर मागे घेण्यात आला आहे. सरकारशी संपकरी कर्मचाऱ्यांच्या संघटनांची मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंसमवेत चर्चा झाली असून ती यशस्वी झाल्याचं संघटनेच्या समन्वयकांकडून जाहीर करण्यात आलं आहे. कर्मचाऱ्यांना जुनी पेन्शन योजना पूर्वलक्ष्यी प्रभावाने लागू करण्याच्या मागणीचा प्राथमिक स्तरावर स्वीकार केल्याचं आश्वासन सरकारने दिल्याचंही आंदोलकांच्या समन्वयकांकडून सांगण्यात आलं आहे. “राज्यातील सर्व कर्मचारी बंधू-भगिनींनी अभेद्य एकजूट दाखवली. या आंदोलनात कोणतीही हिंसा नव्हती. हा संप त्या सगळ्यांनी यशस्वी करून दाखवला. मुख्यमंत्र्यांबरोबर आज सविस्तर चर्चा झाली. ही चर्चा यशस्वी झाली. कारण आमची मूळ मागणी सर्व कर्मचाऱ्यांना जुनी पेन्शन योजना पूर्वलक्ष्यी प्रभावाने लागू करा…
Author: editor desk
सोलापूर : वृत्तसंस्था ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांच्याविरोधात सोलापूरमधील बार्शीत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अल्पवयीन अत्याचार पीडित मुलीची ओळख जाहीर केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पॉक्सो कलम 23, ज्युवेनाईल जस्टिस अॅक्ट कलम 74 आणि IPC 228 A नुसार बार्शी शहर पोलीस ठाण्यात हा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. काय आहे प्रकरण? बार्शीत 5 मार्च रोजी एका अल्पवयीन मुलीवर अत्याचार झाला होता. धक्कादायक बाब म्हणजे दुसऱ्या दिवशी दोन आरोपींनी अल्पवयीन मुलीच्या घरात घुसून तिच्यावर हल्ला केला. या हल्ल्यात पीडित मुलगी ही गंभीर जखमी झाली. त्यानंतर पोलिसांनी अक्षय माने, नामदेव दळवी या दोन्ही आरोपींना अटक केली. मात्र या संदर्भात…
जळगाव : प्रतिनिधी जिल्ह्यातील अमळनेर येथून दुचाकी चोरनाऱ्या चोरट्यास जळगाव जिल्हा स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने दुचाकी चोरट्यास ताब्यात घेतले आहे. मिळालेली माहिती अशी कि, अट्टल दुचाकी चोरट्याच्या जळगाव गुन्हे शाखेने मुसक्या बांधत जळगाव जिल्ह्यातील अमळनेरसह मध्यप्रदेशातील चोरलेल्या तब्बल 14 दुचाकी जप्त केल्या आहेत. अजय अंबालाल पावरा (27, वकवड, बोराड, ता.शिरपूर, जि.धुळे) असे अटक केलेल्या दुचाकी चोरट्याचे नाव आहे. अमळनेर शहरात चोरीची दुचाकी घेवून संशयित अजय पावरा हा फिरत असल्याची गोपनिय माहिती जळगाव स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक किसनराव नजन पाटील यांना मिळाल्यानंतर त्यांनी कारवाईचे आदेश दिल्यानंतर पथकातील सहाय्यक फौजदार रवी नरवाडे, पोलीस हेड कॉन्स्टेबल राजेश मेढे, संजय हिवरकर, गोरख बागुल,…
जळगाव : प्रतिनिधी शहरातील शिवाजी महाराज नगर परिसरात एका घरात चोरी झाल्याची घटना उघकीस आली आहे. या प्रकरणी जळगाव शहर पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मिळालेली माहिती अशी कि, शहरातील छत्रपती शिवाजी महाराज नगर परिसरातील मिर्झा चौकातील रहिवासी शेख अकीकल शेख सलीम (वय २८) हे वास्तव्यास आहे. दि १९ रोजी दुपारच्या सुमारास अनोळखी चोरट्यांनी घरात प्रवेश करीत घरातील गोदरेज कपाटात ठेवलेले ७० हजाराची रोकड लंपास केल्याची घटना सायंकाळी उघडकीस आल्याने तरुणाने लागलीच जळगाव शहर पोलीस स्थानक गाठत अनोळखी चोरट्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोहेकॉ.भास्कर ठाकरे हे करीत आहेत.
जळगाव : प्रतिनिधी जळगाव शहरातील एका परिसरात असलेल्या १९ वर्षीय तरुणीला माझ्यासोबत प्रेमसंबंध ठेव नाही तर मी आत्महत्या करुन घेईल आणि तुझ्या घरच्यांना देखील जीवंत ठेवणार नाही अशी धमकी तरुण देत होता. तरुणाकडून वारंवार दिल्या जाणार्या धमक्यांमूळे तणावात असलेल्या तरुणीने गळफास घेवून आत्महत्या केल्याची घटना घडली होती. याप्रकरणी त्रास देणार्या पिंप्राळा येथील अक्षय रामचंद्र सुरवाडे याच्याविरुद्ध आत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी रामानंद नगर पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. शहरातील एका भागात मयत तरुणी आपल्या कुटुंबियांसोबत वास्तव्यास होती. त्या तरुणीला अक्षय सुरवाडे हा तरुण तरुणीला फोन करुन माझ्यासोबत प्रेमसंबंध ठेवावेच लागेल नाही तर मी आत्महत्या करुन टाकेल आणि तुझ्या घरच्या लोकांना सुद्धा…
चोपडा : प्रतिनिधी कुरिअर ऑनलाइन ट्रॅक करताना अज्ञाताने पाठविलेल्या लिंकवरून दोन रूपये पाठविण्यास सांगितल्यावर चोपडा शहरातील रामकुवर नगरातील रहिवासी असलेले खंडेराव पाटील यांनी दोन रूपये पाठविले. काही वेळाने खात्यातून ९८ हजार ६९८ रुपये परस्पर काढून त्यांची फसवणूक करण्यात आली. खंडेराव पाटील यांनी आपल्या मुलीसाठी शहरातील तिरुपती कुरिअर येथून मोबाइल पाठविला होता. मुलीला पाठवलेला मोबाइल पार्सल ऑनलाइन ट्रॅक करीत असताना त्यांना एक मोबाइल क्रमांक मिळाला. त्यावर त्यांनी संपर्क केला असता व्यक्तीने लिंक पाठवून पाटील यांना दोन रूपये पाठविण्यासा सांगितले. त्यांनी दोन रूपये पाठवताच काही वेळाने त्यांच्या खात्यावरून ९८ हजार ६९८ रुपये परस्पर वर्ग होऊन फसवणूक केल्याची घटना दि. ११ रोजी संध्याकाळी…
एरंडोल : प्रतिनिधी जळगाव जिल्ह्यात अवैध वाळू वाहतुकीच्या वादातून अनेक हाणामारीसह खुनाच्या घटना आता नवीन राहिलेल्या नाही. अशीच घटना पुन्हा एकदा जिल्ह्यात घडली आहे. अवैध वाळू वाहतुकीच्या वादातून धारदार शस्त्रांनी सपासप वार करीत एकाचा खून करण्यात आला. ही थरारक घटना रविवारी सकाळी एरंडोल तालुक्यातील भातखंडे उत्राण दरम्यान घडली आहे. यामध्ये सचिन उर्फ सोन्या देवीदास पाटील (३९, रा. अंतुर्ली, ता. पाचोरा) असे या खून झालेल्या व्यक्तीचे नाव आहे. मिळालेली माहिती अशी की, सचिन पाटील हा रविवारी सकाळी ७.३० वाजेच्या सुमारास दुचाकीने भातखंडे गावाहून उत्राणकडे जात होता. त्याचवेळी मागून आलेल्या चारचाकी वाहनाने त्याच्या दुचाकीला धडक देत फरफटत नेले. त्यावेळी वाहनातून आलेल्यांनी त्याच्यावर…
जळगाव : प्रतिनिधी जळगाव जिल्ह्यात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेत येणाऱ्याची संख्या दिवसेदिवस मोठ्या प्रमाणात वाढ होत असतांना दिसत आहे. नुकतेच १९ मार्च रोजी जळगाव शहरातील ठाकरे गटातील अनेक पदाधिकारी ना.गुलाबराव पाटील यांच्या कार्यावर विश्वास ठेवत शिंदे गटात दाखल झाले आहे. ठाकरे गटाचे जळगांव शहरातील माजी उपमहानगरप्रमुख, विभाग प्रमुख, शाखाप्रमुख, निष्ठावंत कार्यकर्तेसह दि.१९ रोजी अजिंठा विश्रामगृहात संध्याकाळी ६ वाजता राज्याचे पाणीपुरवठा तथा स्वच्छता मंत्री जळगांव जिल्हा पालकमंत्री गुलाबरावजी पाटील यांच्या उपस्थित शिववसेनेत प्रवेश केला. यामध्ये माजी उपमहानगप्रमुख सोहम विसपुते, राहुल नेतलेकर विलास भदाणे, फेरीवाला महानगरप्रमुख बाळू बाविस्कर, विभागप्रमुख नितीन तामयचे, बॉबी चांगरे, वकील आघाडी शिवसेना जिल्हा प्रमुख ऍड राजेश पावसे…
जळगाव : प्रतिनिधी शहरासह ग्रामीण भागात मोठ्या प्रमाणात अवैध वाळू वाहतूक सुरु आहे. त्याबाबतचे अनेक नागरिकांच्या तक्रारी वाढू लागल्या असतांना जळगाव तालुका पोलिसांनी एका अवैध वाळू वाहतूक करताना ट्रॅक्टर आव्हाणे येथील गिरणा नदीपात्राजवळून एक ब्रास वाळू तालुका पोलिसांनी जप्त करीत गुन्हा दाखल करण्यात आला. हि कारवाई १८ रोजी दुपारी तीन वाजेच्या सुमारास ही कारवाई करण्यात आली. मिळालेली माहिती अशी कि, तालुका पोलीस स्थानकाचे पोलिस निरीक्षक रामकृष्ण कुंभार यांना माहिती मिळाल्यानंतर त्यांनी पोलिस उपनिरीक्षक गणेश सायकर, पोहेकॉ विश्वनाथ गायकवाड, हरिलाल पाटील, अनिल मोरे, संदीप पाटील व रामकृष्ण इंगळे हे आव्हाणे गावातील नदी किनाऱ्याजवळ पोहचले. त्या ठिकाणी विनाक्रमांकाचे एक निळ्या रंगाचे ट्रॅक्टर…
नवी दिल्ली : वृत्तसंस्था राज्यातील अवकाळी पावसाने शेतकरीचे हाल केले असतांना एक आनंदाची बातमी समोर आली आहे. पीएम किसान योजनेचा तेरावा हप्ता 27 फेब्रुवारी रोजी शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा झाला आहे. मात्र अजूनही काही शेतकरी असे आहेत ज्यांच्या खात्यावर पैसे जमा झाले नाहीत. तुम्ही EKYC केलं असेल आणि तुम्ही लाभार्थी असाल तर चिंता करण्याचं कारण नाही.तुमच्या खात्यावर सरकारकडून हे पैसे जमा केले जाणार आहेत. तुम्ही नोंदणी करताना जर काही चुका केल्या असतील किंवा चुकीचं बँक खातं निवडलं असेल तरी सुद्धा तुमचा हप्ता येणार नाही किंवा थांबवला जाण्याची शक्यता आहे. pmkisan.gov.in या वेबसाईटवर जाऊन याबाबत तपासणी करू शकता. याशिवाय तिथे टोलफ्री क्रमांक दिला…

