Author: editor desk

नवी दिल्ली : वृत्तसंस्था  देशभर पहिल्याच दिवशी आपल्या डायलॉगबाजीमुळे चर्चेत आलेला पुष्पा चित्रपटाने प्रेक्षकांना वेड लावलं. झुकेगा नही साला म्हणत अल्लू अर्जुनने केलेली हटके भूमिका पाहून तर चाहते त्याच्या प्रेमात पडले. आता हाच ‘पुष्पा’ पुन्हा प्रेक्षकांच्या भेटीला कधी येतो, याची चाहते आतुरतेने वाट पाहत होते. मात्र आता फार वाट पाहावी लागणार नाहीये. कारण ‘पुष्पा २’ चा पहिले पोस्टर समोर आले आहे. अल्लू अर्जुनच्या अभिनयाने सजलेला ‘पुष्पा २’ म्हणजेच ‘पुष्पा: द रुल’ डिसेंबर महिन्यात धमाका करायला सज्ज आहे. पुन्हा एकदा अल्लू अर्जुनचा दबदबा यामुळे अनुभवायला मिळणार आहे. पुष्पाभाऊच्या नव्या अवतारात नेमकं काय पाहायला मिळणार याची प्रेक्षकांना उत्सुकता आहे. चाहते पुढची कथा…

Read More

अमळनेर : प्रतिनिधी  पिस्तूल दाखवून डांगर शिवारातील पेट्रोल पंपासह तिघांना लुटणाऱ्या आरोपीचा बुटावरून शोध लावण्यात पोलिसांना यश आले आहे. रईस शेख उस्मान (४०) आणि आरिफ अहमद शेख (३५, दोघे रा. आळंद, ता. फुलंब्री, जि. संभाजीनगर) अशी अटक करण्यात आलेल्या आरोपींची नावे आहेत. मिळालेली माहिती अशी कि, २४ रोजी मध्यरात्री शिवारातील पांडुरंग पेट्रोल पंपावर एकाने पिस्तूल दाखवत पंपावरील कर्मचारी व पेट्रोल भरण्यासाठी आलेल्या एक अशांकडून ३६ हजार रुपये लुटले होते. त्याच्याकडील पांढऱ्या रंगाच्या बुटावरून पोलिसांनी त्याला शोधून काढले. रईस शेख हा बंगाली फाइलमध्ये राहत होता. गल्लीत वाहनचालक असल्याचे त्याने सांगितले. न्या. स्वाती जोंधळे यांनी आरोपींना दोन दिवसांची पोलिस कोठडी सुनावली आहे.…

Read More

जळगाव : प्रतिनिधी  एमआयडीसी परिसरामध्ये चोरीच्या उद्देशाने फिरणाऱ्या चार जणांना एमआयडीसी पोलिसांनी रविवारी रात्री ताब्यात घेतले आहे. पोलिसांचे पथक रविवारी रात्री एमआयडीसी परिसरामध्ये गस्त घालत होते. त्यावेळी चार लोकांच्या हालचाली संशयास्पद दिसून आल्या. सविस्तर वृत्त असे कि,  चौघांना पकडून विचारपूस केल्यानंतर त्यांनी अकबर दगडू पटेल (३५, रा. हरिविठ्ठलनगर), ऋषिकेश कैलास पाटील (२२), अमोल संजय पाटील (२३, दोन्ही रा. एमआयडीसी) अशी त्यांची नावे सांगितली तर त्यांच्यासोबत असलेल्या एका अल्पवयीन मुलालाही पोलिसांनी ताब्यात घेतले. चौकशीअंती चौघे चोरीच्या उद्देशाने फिरत असल्याचे समोर आल्यानंतर त्यांच्याजवळून चोरी करण्याचे साहित्य जप्त करण्यात आले. पोलिस निरीक्षक जयपाल हिरे यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक फौजदार अतुल वंजारी, अल्ताफ पठाण, चेतन…

Read More

जळगाव : प्रतिनिधी  शहरातील नेहरू चौकात सोमवारी सायंकाळी ५.४५ वाजेच्या सुमारास रेल्वे स्थानकावर आलेल्या पक्षकाराकडे कागदपत्र घेण्यासाठी निघालेल्या अॅड. योगेश जालमसिंग पाटील (४५, रा. दादावाडी) यांच्या वाहनाला भरधाव कंटेनरने समोरून धडक दिल्याने त्यांचा जागीच मृत्यू झाल्याची घटना घडली आहे. याप्रकरणी कंटेनर चालकाविरुध्द गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मिळालेली माहिती अशी कि, चाळीसगाव तालुक्यातील मुळचे तमगव्हाण येथील अॅड. योगेश पाटील हे कुटूंबासह दादावाडीत वास्तव्यास होते. सायंकाळी ते त्यांच्या शाहु महाराज कार्यालयात कॉम्प्लेक्समधील असताना रेल्वे स्थानकावर आलेल्या एका पक्षकाराचा त्यांना फोन आला म्हणून ते पक्षकाराकडील कागदपत्र घेण्यासाठी रेल्वे स्थानकाकडे दुचाकीने (एमएच. १९. सीई. ६५११) निघाले होते. कोर्ट चौकाकडून रेल्वे स्थानकाकडे जात असताना…

Read More

जळगाव  : प्रतिनिधी  प्रत्येक घरात नळाचे पाणी पोहचवण्याचा संकल्प केंद्र व राज्य शासनाच्या जलजीवन मिशनच्या माध्यमातून घेण्यात आलेला असून प्रत्येक घरापर्यंत पाणी हेच आमचे मिशन आहे. आज विरोधकांकडे मुद्दे नसल्यामुळे ते त्यांच्या वायफळ बडबडीपेक्षा प्रत्यक्ष आम्ही विकास कामांवर भर देत आहोत.सबका साथ ; सबका विकास या प्रमाणे सर्व समाजाभिमुख काम करण्याचा प्रयत्न आहे. भागपूर उपसा सिंचन योजनेसाठी 75 कोटींची तरतूद करण्यात आल्यामुल्ले सदर योजनेला चालना मिळाली आहे. त्यामुळे भागापुर वावडदा व परिसरात सिंचन क्षेत्र वाढणार आहे. कोणतेही निवडणूक किंवा प्रचार नसतांना सभांना येणारी गर्दी ही विकास कामांची पावती आहे. वावडंदा व तांड्या- वस्ती च्या जनतेचा सत्काराने मला अधिक कामे करण्याची…

Read More

नवी दिल्ली : वृत्तसंस्था  आयुष्यात कधी काय होईल हे सांगणं खूप अवघड आहे. अनेकवेळा आपण विचारही न केलेलं अचानकपणे घडून जातं. असंच काहीसं एका महिलेसोबत घडलं. महिलेची गोष्ट सध्या सोशल मीडियावर चांगलीच चर्चेत आली आहे. चढ-उतारांनी भरलेल्या महिलेच्या जीवनात अनेक आश्चर्यचकित करणाऱ्या घटना घडल्या. नवऱ्याच्या मृत्यूनंतर ती आपल्या दीराच्या प्रेमात पडली. हे प्रकरण नेमकं काय आहे याविषयी जाणून घेऊया. न्यू हॅम्पशायरमधील रहिवासी असलेल्या कॅटलिन नॉर्टनने आरोन स्मिथशी लग्न केलं. दोघांनाही अंमली पदार्थांचे व्यसन होतं आणि त्यांच्या लग्नाला 4 वर्षे लोटली. त्यानंतर कॅटलिन रिहॅबमध्ये गेली आणि पतीसोबत घटस्फोट घेण्याचा निर्णय घेतला. कॅटलिनने फोनवर अॅरॉनला सांगितले की तिला घटस्फोट घ्यायचा आहे. कॅटलिनने…

Read More

जळगाव : प्रतिनिधी  जळगाव शहरातील गोलाणी मार्केटमध्ये हरिविठ्ठल नगरात राहणाऱ्या एका तरुणाची दुचाकीच्या वादातून चॉपरने भोसकून हत्या केल्याची घटना रविवारी रात्री घडली होती. या हत्येप्रकरणी पोलिसांनी चार जणांना अवघ्या काही तासांतच अटक केली आहे. सोपान गोविंदा हटकर (वय-२५) रा. हरीविठ्ठल नगर, जळगाव असे मयत तरूणाचे नाव असून गोविंदा शांतीलाल झांबरे रा. नाथवाडा, ज्ञानेश्वर दयाराम लोंढे उर्फ नानु रा. कंजरवाडा, राहूल भरत भट रा. खोटे नगर आणि करण सुभाष सकट रा. बी.जे.मार्केट कोंडवार जळगाव या चौघांना अटक केली. मिळालेली माहिती अशी कि, हरिविठ्ठल नगरात सोपान हा आपल्या आई सोबत राहत असून तयाची आई धुणीभांडीचे काम करतात सोपानने दुचाकी हप्त्याने घेतली होती.…

Read More

मुंबई : वृत्तसंस्था  ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांनी काल मालेगाव येथील जाहीर सभेत शिंदे गटावर घणाघाती टीका केली होती. गद्दारांच्या हातात भगवा शेभत नाही. हे गद्दार म्हणजे खंडोजी खोपडेची औलाद आहे. या ढेकूणांचा पराभव करण्यासाठी तोफेची गरज नाही, उद्धव ठाकरेंनी सुनावले आहे. त्याला आता शिवसेना नेते संजय शिरसाट यांनी प्रत्युत्तर दिले आहे. आमदार संजय शिरसाट म्हणाले, गद्दारी आम्ही नव्हे तर उद्धव ठाकरेंनीच केली आहे. उद्धव ठाकरे यांनी हिंदुत्वाशी गद्दारी केली आहे. 2019 मध्ये आम्ही भाजपसोबत ज्या हिंदुत्वाच्या विचारांवर निवडणूक लढवली त्या विचारांचा धागा पकडून आम्ही आता काम करत आहोत. उद्धव ठाकरे आम्हाला गद्दार म्हणतात. मात्र, 2019च्या विधानसभा निवडणुकीनंतर उद्धव…

Read More

मुंबई : वृत्तसंस्था  गेल्या काही दिवसांत अवकाळी पावसाने धुमाकूळ घातल्याने शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. परंतु, विदर्भातील चार जिल्हे वगळता कोकण, मराठवाडा, उत्तर महाराष्ट्र, पश्चिम महाराष्ट्रातील पावसाळी वातावरण निवळले असून कमाल तापमानात ३ ते ४ अंशाने वाढ होण्याचा अंदाज आहे. जिल्ह्यांत ३० मार्चपर्यंत ढगाळ वातावरण व किरकोळ पावसाची शक्यता असून राज्याच्या उर्वरित भागात उन्हाचा चटका हळूहळू वाढणार असल्याचा अंदाज हवामानतज्ज्ञ माणिकराव खुळे यांनी वर्तवला आहे. ताजा पश्चिमी विक्षोभ ३० मार्चपर्यंत हिमालयापर्यंत पोहोचेल. पंजाब, राजस्थान, दिल्ली, हरियाणा, उत्तर प्रदेश, मध्य प्रदेश, छत्तीसगड, ओडिशा, पश्चिम बंगाल आणि देशातील अनेक भागांत मेघगर्जनेसह पावसाची शक्यता आहे. पुढील २४ तासांत पश्चिम हिमाचल आणि अरुणाचल प्रदेशात…

Read More

नवी दिल्ली : वृतसंस्था  सध्याच्या युगात प्रेमप्रकरणातून अनेक धक्कादायक खुलासे काही दिवसात बाहेर येताना दिसत आहे. एका महिलेचे २० वर्षापूर्वी लग्न झाले होते. त्यांना एक मुलगी व एक मुलगा असे अपत्य देखील असतांना तिने आता जे केले ते धक्कादायक केले. लग्नाच्या पतीकडून दोन मुल असतांना महिलेने अचानक घरातून बाहेर निघून दुसऱ्या तरुणाशी लग्न करीत पतीला लग्नाचे फोटो पाठविल्याने पतीच्या पायाखालची जमीनच हादरली आहे. हे प्रकरण हिमाचल प्रदेशातील उना जिल्ह्यातील आहे. महिलेचा शोध घेण्यासाठी पतीने पोलिसांत तक्रार दिली आहे. याप्रकरणी गगरेट पोलीस तपास करत आहेत. मिळालेल्या माहितीनुसार, उना जिल्ह्यातील गगरेट येथील रहिवासी असलेल्या घनारी यांनी पोलिसांत तक्रार दिली आहे. त्यांनी सांगितले…

Read More