जळगाव : प्रतिनिधी रावेर शहरासह परिसरामध्ये दहशत माजविणाऱ्या तीन गुन्हेगारांना जिल्हा पोलिस अधीक्षक एम. राजकुमार यांनी दोन वर्षांसाठी जिल्ह्यातून हद्दपार केले आहे. टोळी प्रमुख इरफान हबीब तडवी (२१), जमील उर्फ गोलू बिस्मिल्ला तडवी (२०) व शब्बीर रमजान तडवी (२२, तिन्ही रा. पिंप्री, ता. रावेर) असे हद्दपार केलेल्या गुन्हेगारांची नावे आहेत. तिन्ही गुन्हेगार हे टोळीने राहून रावेर शहरासह परिसरामध्ये दहशत पसरवीत होते. टोळीची नागरिकांमध्ये भीती निर्माण होऊन नागरिकांचे जीवितास व जंगम मालमत्तेस धोका निर्माण झाला होता. त्यांच्याविरुद्ध वेळोवेळी प्रतिबंधक कारवाई करून सुद्धा त्यांच्यामध्ये सुधारणा झालेली नव्हती. त्यामुळे तिघांचा हद्दपार प्रस्ताव पोलिस अधीक्षक यांच्याकडे पाठविण्यात आला होता. या प्रस्तावाची उपविभागीय पोलिस अधिकारी…
Author: editor desk
मुंबई : वृत्तसंस्था राज्यात गेल्या आठ महिन्यापासून सुरु असलेल्या सत्तासंघर्षाच्या निकाल उद्या ११ मे रोजी सुप्रीम कोर्टानं राखून ठेवलेला असल्याने तो जाहीर होणार आहे, सरन्यायाधीश डी. वाय. चंद्रचूड यांनी ही माहिती दिली आहे. महाराष्ट्रातील शिवसेनेच्या १६ आमदारांच्या अपात्रतेच्या मुद्द्यावर सुप्रीम कोर्टाच्या घटनापीठाकडून निर्णय जाहीर केला जाणार आहे. यामुळं आता राज्यात पुन्हा मोठी राजकीय उलथापालथ होण्याची शक्यता निर्माण झाली आहे. सरन्यायाधीश चंद्रचूड म्हणाले, “उद्या घटनापीठाकडून दोन प्रकरणांवर निकाल दिला जाणार आहे” यामध्ये महाराष्ट्रातील सत्तासंघर्षाचा निकाल तसेच दिल्ली सरकार आणि नायब राज्यपाल यांच्यातील खटल्यावरही अंतिम निकाल दिला जाणार आहे. दिल्लीच्या राज्यपालांकडून वारंवार प्रशासकीय कामात हस्तक्षेप केला जात असल्याचं हे प्रकरण आहे, असं…
मुंबई : वृत्तसंस्था भाजप नेते नितेश राणे यांनी पुन्हा एकदा ठाकरे गटाचे नेते खासदार संजय राऊत आणि माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावर जोरदार हल्लाबोल केला आहे. त्यांनी संजय राऊत यांचा एकेरी उल्लेख करत हि टीका केली आहे. यावेळी नितेश राणे यांनी टीका करताना संजय राऊत यांना धमकी दिली.’तू आमच्या नेत्यांवर टीका कर मी तुझ्या उद्धव ठाकरे आणि आदित्य ठाकरे यांचे कपडे फाडणार’ असा इशारा नितेश राणे यांनी संजय राऊतांना दिला आहे. तसेच उद्धव ठाकरे आणि आदित्य ठाकरे यांचे कपडे फाडावेत अशी संजय राऊत यांची इच्छा दिसते असा उपरोधिक टोलादेखील नितेश राणे यांनी लगावला आहे. नितेश राणे नेमके काय म्हणाले? ‘तू…
मुंबई : वृत्तसंस्था राज्यातील पत्राचाळ घोटाळा प्रकरणी ठाकरे गटाचे नेते संजय राऊत यांना देखील मोठा दिलासा मिळाला आहे. पत्राचाळ घोटाळा प्रकरणातील सुनावणी 20 जूनपर्यंत तहकूब करण्यात आली आहे. पत्राचाळ घोटाळा प्रकरणी आरोप असलेले खासदार संजय राऊत हे सध्या जामिनावर बाहेर आहेत. त्यांच्या जमीनला ईडीने विरोध केला होता. त्यानंतर आज (10 मे) खासदार संजय राऊत मुंबई सत्र न्यायालयात हजर झाले होते. मात्र आरोपी सारंग आणि राकेश वाधवान आजही कोर्टात गैरहजर राहिले. गुरूआशिष कंपनी ही दिवाळखोर घोषित झाल्यानं प्रकरण एनसीएलटी प्रलंबित असल्याचं आज कोर्टात स्पष्ट करण्यात आलं. त्यामुळे गुरूआशिषला आरोपी बनवण्यात आल्यानं त्यांची कोण जबाबदारी घेणार?, हे अद्याप स्पष्ट नाही. सारंग आणि…
राज्यातील प्रसिद्ध धामिक स्थळ असलेल्या शेगाववरून पुण्याच्या दिशेने निघालेल्या बसचा भीषण अपघात झाल्याची बातमी समोर आली आहे. हा अपघात बुलडाण्याजवळ झाल्याचे कळते. पुण्याच्या दिशेनं निघालेली बस पैनगंगा नदीत कोसळून भीषण अपघात झाला आहे. यामध्ये १ महिलेचा मृत्यू झाला आहे. मिळालेल्या माहितीनुसार, शेगाववरून पुण्याच्या दिशेला बस निघालेली होती. या अपघातामध्ये बसमधील १७ जन गभीर जखमी असून त्यातील एक महिलेचा दुर्देवी मृत्यू झाला आहे. या अपघाताचा तपास बुलडाणा पोलिस करत आहेत. बुलडाण्याच्या शेगाववरुन पुण्याला जाण्यासाठी निघालेल्या प्रवासी बसला मंगळवारी रात्री 11:30 वाजताच्या सुमारास अपघात झाला. स्वरा ट्रॅव्हल्सच्या खासगी लक्झरी बसला हा अपघात झाला आहे. चिखली रोडवरील पेठजवळ ही घटना घडली. पेठ या…
जळगाव : प्रतिनिधी आव्हाने गावातून चोरटी वाळूची वाहतूक करणारे ट्रॅक्टर कोतवाल यांनी पकडले असता त्यांच्या हातावर तुरी देत चालकाने वाहन पळवून नेल्या प्रकरणी जळगाव तालुका पोलिसात दोन जणाविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मिळालेल्या माहितीनुसार, शहरापासून जवळ असलेल्या आव्हाने परिसरातील गिरणा नदीपात्रातून चोरटी वाळूची वाहतूक करणारे ट्रॅक्टर दि ९ रोजी १२.३० वाजेच्या सुमारास आव्हाने शिवारातील स्मशानभूमी जवळ आले असता कोतवाल किशोर चौधरी यांनी वाहतूक करणाऱ्यास थांबविले असता. त्याने ट्रॅक्टर पळवून नेल्याची घटना घडली आहे. या प्रकरणी कोतवाल किशोर चौधरी यांनी दिलेल्या फिर्यादीवरून ट्रॅक्टर मालकासह एका विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
अमळनेर : प्रतिनिधी शहरातील एका परिसरातून ३२ वर्षीय तरुणाची दुचाकी लांबविल्याची घटना उघडकीस आली आहे. या प्रकरणी तरुणाच्या फिर्यादीवरून अमळनेर पोलिसात अनोळखी चोरट्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मिळालेल्या माहितीनुसार, शहरातील स्टेट बँक कॉलनी परिसरातील रहिवासी असलेले राहुल राजेंद्र पाटील(वय ३२) हे दि ७ मे २०२३ बाहेरगावाहून येत आपली दुचाकी क्र.एम.एच.१९.बी.डब्लू,.६०८९ हि अंगणात लावलेली असतांना अनोळखी चोरट्यांनी चोरून नेल्याची खात्री झाल्यावर अमळनेर पोलिसात धाव घेत गुन्हा दाखल केला असून पुढील तपास पोहेकॉ.चंद्रकांत पाटील हे करीत आहेत.
रावेर : प्रतिनिधी तालुक्यातील एका गावातील अल्पवयीन मुलीला एकाने जून २०२२ मध्ये तिच्यासोबत चुकीचे कृत्य केल्यानंतर हि अल्पवयीन मुलीस गर्भवती केल्याबाबत एका विरोधात रावेर पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मिळालेल्या माहितीनुसार, रावेर तालुक्यातील एका गावातील ऊस तोडणीसाठी नेहमी प्रवासात असलेले कुटुंब हे आपल्या परिवाराच्या उदरनिर्वाहासाठी नेहमीच बाहेरगावी असते. याच काळात दि १४ जून २०२२ च्या दिवशी बारामती परिसरातील फलटण या गावी असतांना याठिकाणी रावेर तालुक्यातीलच एका इसमाने संबधित परिवारातील सदस्य ऊस तोडणीसाठी गेले असता. त्यांच्या झोपडीत जावून त्यांच्या अल्पवयीन मुलीवर जबरदस्ती करीत तिच्यासोबत शरीरसंबध ठेवले असता तीस गर्भवती करून अशा अवस्थेत आणले. त्यामुळे अल्पवयीन मुलीच्या आईने दिलेल्या फिर्यादीवरून रावेर…
जामनेर : प्रतिनिधी तालुक्यातील एका गावातील दोन तरूण कामानिमित मुक्ताईनगर – मलकापूर दरम्यान घोडसगाव गावाजवळ अज्ञात वाहनाच्या धडकेत दुचाकीस्वार ठार झाल्याची घटना सोमवारी रात्री सव्वाअकरा वाजता घडली. मिळालेल्या माहितीनुसार, जामनेर तालुक्यातील कापूसवाडी येथील पृथ्वीराज चव्हाण आणि सागर गोपाळ अशी मयतांची नावे आहेत. अज्ञात वाहनाने मोटारसायकलला (एम.एच.१९ / सीएस ६९६८) जोरदार धडक दिली. दोन्ही तरुणांच्या मृतदेहाचे विच्छेदन करून त्यांच्यावर मंगळवारी शोकाकुल वातावरणात अंत्यसंस्कार करण्यात आले. यासंदर्भात चरणसिंग सावजी चव्हाण (कापूसवाडी, ता. जामनेर) यांनी दिलेल्या फिर्यादीवरून मुक्ताईनगर पोलिस स्थानकात अज्ञात वाहन चालकाविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
मुंबई : वृत्तसंस्था बॉलीवूड क्षेत्रात नेहमीच या ना त्या कारणाने चर्चेत असलेली अभिनेत्री राखी सावंत हिचा भाऊ राकेश अनंत सावंत याला ओशिवरा पोलीसांनी अटक केली आहे. चेक बाऊन्स प्रकरणी त्याला हि अटक करण्यात आली आहे. 3 वर्षांपूर्वी एका व्यावसायिकाच्या तक्रारीवरून कोर्ट केस क्रमांक 96/ss/2021 कलम 138 अ जामीन पात्र वॉरंट वरती राकेशला ही अटक करण्यात आलेली आहे. न्यायालयाने राकेश सावंत यास पैसे परत करण्याच्या अटीवर जामीन मंजूर केला होता. मात्र राकेश सावंत याने पैसे परत न केल्यामुळे न्यायालयाने त्याच्या विरुद्ध अटक वॉरंट काढले. यानंतर ओशिवरा पोलिसांनी राकेश सावंत याला अटक करून न्यायालयात हजर केले असता न्यायालयाने त्याला 22 मे पर्यंत…

