पुणे : वृत्तसंस्था कोकण, उत्तर महाराष्ट्र, मराठवाडा, विदर्भासह राज्यातील सर्वच भागात पावसाने हजेरी लावल्याने फळबागा आणि अन्य शेती पिकांचे अतोनात नुकसान झाले आहे. राज्यात पुन्हा एकदा अवकाळी पावसाने धिंगाणा घातला असून शेतकऱ्यांची झोप उडवली आहे. सिंधुदुर्ग आणि मराठवाडय़ातील काही गावांत गारांचा वर्षाव झाला. दरम्यान, 10 एप्रिलपर्यंत पावसाळी वातावरण राहणार असल्याचे हवामान खात्याने सांगितल्याने शेतकऱ्यांची चिंता वाढली आहे. शुक्रवारी रात्रीपासून राज्यातील बहुतांश भागांत अवकाळी पावसाने हजेरी लावली. शनिवारीही काही भागांत पावसाचा जोर होता. सिंधुदुर्ग जिह्यातील कुडाळ, सावंतवाडी, वेंगुर्ला तालुक्यात ठिकठिकाणी पाऊस कोसळला. कुडाळ तालुक्यातील काही भागांत सोसाटय़ाच्या वाऱ्यासह गारांचा वर्षाव झाला. यामुळे रब्बी हंगामातील आंबा, काजू, कोकम, सुपारी आदी फळबागांचे मोठे…
Author: editor desk
लखनऊ : वृत्तसंस्था आयोध्येतील प्रभू श्री रामांचे दर्शन घेण्यासाठी जाणार त्यांनी हेच दर्शन आज घेणार आहे. त्यांच्या समवेत ४० आमदार व भाजपचे काही मंत्रीसह आमदार देखील असल्याचे समजते. शनिवारी रात्री लखनऊ विमानतळावर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे आपल्या ४० आमदारांसह लखनऊत पोहोचताच ‘जय श्रीराम’चा जयघोष आणि ढोल-ताशांच्या गजरात शिंदेसेनेचे जंगी स्वागत करण्यात आले. एकनाथ शिंदेंसह शिवसेनेचे सर्व आमदार आज अयोध्येसाठी लखनऊ विमानतळावरुन 9.30 वाजेच्या सुमारास निघतील. प्रथम हनुमान गढीवर पूजा करतील. दुपारी राम मंदिरात महाआरती करतील. देवेंद्र फडणवीस, महसूलमंत्री राधाकृष्ण विखे पाटील, वैद्यकीय शिक्षणमंत्री गिरीश महाजन हे भाजप नेतेही आज अयोध्येत दाखल होणार आहेत. शिंदेसेनेसह ते राम मंदिरातील महाआरतीत सहभागी होतील. एकनाथ…
जामनेर : प्रतिनिधी तालुक्यातील एका गावात २३ वर्षीय तरुणाकडून अल्पवयीन युवतीला प्रेमसंबंध तोडले तर फोटो व्हायरल करेन, अशी धमकी देत होता. अखेर युवतीने बदनामीच्या भीतीपोटी दि. २९ मार्च रोजी टोकाचे पाऊल उचलून आत्महत्या केली. याप्रकरणी पहूर पोलिसात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली होती. शुक्रवारी संध्याकाळी संबंधित युवकाविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला. मिळालेली माहिती अशी कि, पोलिस स्टेशन हद्दीतील एका गावात १७ वर्षीय अल्पवयीन युवती व २३ वर्षीय तरुण यांच्यात प्रेमसंबंध जुळले. एकेदिवशी दोन्हींचे मोबाईलवरील संभाषण युवतीच्या नातेवाइकांच्या निदर्शनास आले. युवतीला बदनामीची भीती निर्माण झाली. नातेवाइकांनी युवतीला विश्वासात घेऊन प्रकार काय आहे? अशी विचारणा केली. यानंतर दोन्हींमधील प्रेमप्रकरण संपुष्टात आले. मात्र…
जळगाव : प्रतिनिधी शहरापासून जवळ असलेल्या ममुराबाद येथे एका ३३ वर्षीय तरुणाने आपल्या राहत्या घरात शनिवारी त्याने टोकाचे पाऊल उचलत आपली जीवनयात्रा संपविल्याची धक्कादायक घटना घडली आहे. मिळालेली माहिती अशी कि, तालुक्यातील ममुराबाद येथे जगदीश लक्ष्मण पाटील (३३) या तरुणाने राहत्या घरामध्ये गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना शनिवारी सायंकाळी ५ वाजेच्या सुमारास उघडकीस आली. दरम्यान, आत्महत्येचे कारण समजून आलेले नसून याप्रकरणी तालुका पोलिसांत अकस्मात मृत्यूची नोंद केली आहे. जगदीश हा ममुराबाद येथे आई- वडिलांसह वास्तव्यास होता. तो जळगावातील एका कंपनीत कामगार म्हणून कामाला होता. शनिवारी घरात त्याने गळफास घेत जीवनयात्रा संपविली. सायं. ५ वाजता कुटुंबीय घरी आल्यानंतर त्यांना मुलाचा मृतदेह…
जळगाव : प्रतिनिधी शहरातील एका परिसरात दुचाकी जवळून गेल्यामुळे पाळीव कुत्रा घाबरून पळाल्याच्या शुल्लक कारणावरून शेख सलिम शेख निजाम (५२, रा. सुप्रिम कॉलनी) यांना कुत्र्यांच्या मालकासह इतर तीन जणांनी मारहाण केल्याची घटना शुक्रवारी सकाळी ९:३० वाजेच्या सुमारास समता नगरातील वंजारी टेकडीजवळ घडली. याप्रकरणी रामानंदनगर पोलिसात गुन्ह्याची नोंद करण्यात आली आहे. सविस्तर वृत्त असे कि, शहरातील एका परिसरात शुक्रवारी सकाळी ९ वाजेच्या सुमारास सलीम त्यांच्या पत्नीला घेण्यासाठी भावाकडे जाण्यासाठी दुचाकीने निघाले. वंजारी टेकडी जवळून जात असताना एका पाळीव कुत्र्याच्या बाजूने त्यांची दुचाकी गेली आणि तो कुत्रा घाबरून पळून गेला. हा प्रकार कुत्र्याच्या मालकाच्या लक्षात आल्यानंतर त्यांनी शेख सलिम यांना शिवीगाळ करून…
जळगाव : प्रतिनिधी शहरातील एमआयडीसीतील डी सेक्टर येथील माहेर असलेल्या विवाहितेने माहेरून 50 हजार रुपये न आणळल्याने छळ करण्यात आला. या प्रकरणी पतीसह सासरच्या पाच जणांविरुद्ध एमआयडीसी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. मिळालेली माहिती अशी कि, शहरातील एमआयडीसी भागातील रहिवासी नयना प्रदीप राठोड (25) यांचा यवतमाळ जिल्ह्यातील पिंपळगाव करजगाव येथील प्रदीप शंकर राठोड यांच्याशी विवाह झाला आहे. नयना तिचे पती यांनी नयना हिच्या नणंदेकडून पन्नास हजार रुपये घेतले होते. या पैशांची परतफेड करण्यासाठी नयना हिने तिच्या माहेरून पन्नास हजार रुपये आणावेत, अशी मागणी पतीसह सासरच्या मंडळींनी केली तसेच या कारणावरून वेळोवेळी नयना तिचा शारीरिक व मानसिक छळ केला. छळाला…
मुंबई : वृत्तसंस्था राज्यात शिंदे गटाची व ठाकरे गटाची एकमेकावर आरोप प्रत्यारोपाच्या फैरी सुरूच आहे. उद्धव ठाकरे त्यांच्या प्रत्येक भाषणात बंडखोर आमदारांवर घणाघाती टीका करत असतात. तर गुलाबराव पाटील त्यांच्या प्रत्येक टीकेला प्रत्युत्तर देताना पलटवार करत असतात. शनिवारी रायगड येथे माध्यमांशी बोलताना त्यांनी पुन्हा उद्धव ठाकरे यांच्यावर निशाणा साधला आहे. तसेच ज्या काँग्रेस आणि राष्ट्रवादीने शिवसेनेचे नुकसान केले त्यांच्यासोबत तुम्ही बसला आहात असा टोला लगावला. गुलाबराव पाटील म्हणाले, ज्या काँग्रेसने आम्हाला (शिवसैनिकांना) तुडवलं, ज्या काँग्रेसने आम्हाला संपवलं. ज्या राष्ट्रवादीने तीन वेळा आमचा पक्ष फोडला. त्यांच्यासोबत तुम्ही मांडीला मांडी लावून बसलात. राष्ट्रवादीने तीन वेळा आमचा पक्ष फोडल. आधी छगन भुजबवळ ,…
पुणे : वृत्तसंस्था राज्याचे राजकारण शुक्रवारी रात्रीपासून तापले होते. कारणही तसेच काही होते राज्याचे विरोधी पक्षनेते असलेले अजित पवार ‘नॉट रिचेबल’ झाले होते. त्यानंतर आज दुपारी ते जेव्हा माध्यमासमोर आले तेव्हा अनेक राजकारणीचा जीव भांड्यात पडला आहे. “तब्येत बरी नसल्यामुळे डॉक्टरांच्या सल्ल्याने औषधं घेऊन घरीच विश्रांती घेत होतो,” असं अजित पवार यांनी स्पष्ट केलं. “माझ्याविषयी चुकीच्या बातम्या दाखवल्यामुळे व्यथित झालो आहे,” असं अजित पवार म्हणाले. तसंच “माध्यमांनी विनाकारण बदानामी करणं थांबवावं, खात्री करुनच यापुढे बातम्या द्याव्यात,” असा सल्ला देखील अजित पवार यांनी दिला. दरम्यान अजित पवार यांनी आज (8 एप्रिल) पुण्यातील खराडी येथे रांका ज्वेलर्सच्या शोरुमचं उद्घाटन केलं. यावेळी त्यांच्या…
मुंबई : वृत्तसंस्था गेल्या काही दिवसापासून सोन्याच्या दरात मोठी वाढ होत असतांना आज अचानक सोन्यासह चांदीच्या भावात घसरण झाल्याचे दिसले आहे. सध्या सोन्याचा दर 60623 रुपये प्रति 10 ग्रॅम आणि चांदी 74164 रुपये किलो दराने विकली जात आहे. मात्र, त्यावर कोणताही कर जोडलेला नाही. त्यामुळे आता ग्राहकांना मोठा दिलासा मिळाला आहे. आता सराफा बाजारातील नवीन दर सोमवारी म्हणजेच 10 एप्रिल रोजी जाहीर होणार आहेत. गुड फ्रायडेनिमित्त शुक्रवारी बाजार बंद होता, तर आज शनिवार आणि उद्या रविवारी सराफा बाजारात सुट्टी आहे. याआधी गुरुवारी सोने 158 रुपये प्रति 10 ग्रॅमने स्वस्त होऊन 60623 रुपये प्रति किलोवर बंद झाले. बुधवारी शेवटच्या व्यवहाराच्या दिवशी…
छत्रपती संभाजीनगर : प्रतिनिधी शहरातील शासकीय वैद्यकीय महाविद्यालय (घाटी) येथे राज्यस्तरीय ‘अवयवदान जनजागृती अभियान’चे उद्घाटन वैद्यकीय शिक्षण मंत्री गिरीष महाजन यांच्या हस्ते येथे पार पडले. यावेळी महाजन बोलत होते. राज्यात कोरोनाचे रुग्ण पुन्हा एकदा वाढत असल्याने राज्यसरकारने मोठा निर्णय घेतला आहे. तसेच प्रत्येक नागरिकाला चांगली आरोग्य सेवा मिळावी या हेतून येत्या दोन महिन्यात 15 हजार जागांची भरती केली जाईल, अशी माहिती वैद्यकीय शिक्षण मंत्री गिरीश महाजन यांनी दिली आहे. यावेळी बोलताना महाजन म्हणाले की, लोकसंख्या जास्त आणि डॉक्टरांची संख्या कमी ही अवस्था संपूर्ण महाराष्ट्रभर आहे. प्रत्येक नागरिकाला चांगली आरोग्य सेवा मिळावी या हेतून येत्या दोन महिन्यात 15 हजार जागांची भरती…

