Author: editor desk

मुंबई : वृत्तसंस्था  देशातील अनेक नेत्यांना धमकीचे फोन येत आहे. केद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्यानंतर राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना देखील धमकी आली आहे. या प्रकरणी पोलिसांनी एकाला ताब्यात घेतले आहे. मी एकनाथ शिंदेंना उडवणार आहे, असा धमकीचा फोन आल्यानंतर पुण्यात प्रचंड खळबळ उडाली . सोमवारी रात्री आरोपीने 112 या हेल्पलाईनवर कॉल करून धमकी दिली. मी एकनाथ शिंदे यांना उडवणार आहे असे म्हणून त्यांनं फोन बंद केला. पोलिसांना युध्दपातळीवर तपास करून आरोपीला ताब्यात घेतलं आहे. राजेश मारूती आगवने असे आरोपीचे नाव असून तो मुंबईतील धारावी परिसरात राहतो. याबाबत अधिक माहिती अशी की, सोमवारी रात्री 112 या पोलिसांच्या हेल्पलाईनवर कॉल आला…

Read More

नवी दिल्ली : वृत्तसंस्था  देशात अनेक घटना घडत असता ज्या वाचून तुम्हाला धक्काच बसत असतो अनेक लोक संपत्तीच्या वादातून परिवारातील सदस्यांना कशा प्रकारे त्रास दिला जात अशीच एक घटना समोर आली आहे. आग्रा येथे मृत्यू झालेल्या एका वृद्ध महिलेच्या अंगठ्याच्या ठशावरून मृत्यूपत्र तयार करून घर आणि दुकान बळकावल्याचा आरोप करण्यात आला आहे. या घटनेचा एक धक्कादायक व्हिडीओ समोर आल्याने एकच खळबळ उडाली आहे. व्हायरल व्हि़डीओत एका कारमध्ये वृद्ध महिलेचा मृतदेह असल्याचे दिसत आहे. त्याचवेळी तिथे एक व्यक्ती येतो, जो त्या वृद्ध महिलेच्या अंगठ्याचा ठसा घेतो. सेवला जाट येथील रहिवासी जितेंद्र शर्मा यांनी दिलेल्या माहितीनुसार, त्यांची आजी कमला देवी यांचे 08-05-2021…

Read More

मुंबई : वृत्तसंस्था  गेल्या काही महिन्यांपासून देशातील नामवंत बॉलिवूड अभिनेता सलमान खानला धमक्यांचे फोन येत आहेत. आता पुन्हा एकदा सलमानला धमक्यांचे फोन आले आहेत. फोन करणाऱ्या व्यक्तीनं यावेळी थेट मुंबई पोलिसांच्या मुख्य नियंत्रण कक्षेत फोन केला होता. सोमवारी रात्री 9 वाजताच्या सुमारास हा धमकीचा फोन आला होता. या प्रकरणी मुंबई पोलीस अधिक तपास करत आहेत. मिळालेल्या माहितीनुसार, सलमानला धमकीचा फोन करणाऱ्या व्यक्तीनं सलमानला 30 तारखेला मारणार असल्याचं देखील सांगितलं आहे. फोन करणारी व्यक्ती ही गौरक्षक जोधपूर राजस्थान येथील असून त्या व्यक्तीनं स्वत:ची ओळख रॉकीभाई असी करून दिली आहे. या फोनमुळे सलमान खानच्या सुरक्षेत आणखी वाढ होण्याची शक्यता आहे. सलमान खानला…

Read More

मुंबई : वृत्तसंस्था  भाजपचे मंत्री चंद्रकांत पाटील म्हणाले होते कि, बाबरी पाडली तेव्हा, एकही शिवसैनिक नव्हता, असे वक्तव्य करून पाटील यांनी नव्या वादाला तोंड फोडले आहे. त्यावर आता ठाकरे गटाचे नेते व माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आज पत्रकार परिषद घेऊन प्रत्युत्तर दिले आहे. उद्धव ठाकरे म्हणाले की, हा विषय गंभीर आहे. काल गोमूत्रधारी चंद्रकांत पाटील बाबरीच्या खंदकातून बाहेर पडले. जेव्हा बाबरी पाडली तेव्हा हे सगळे उंदीर बिळात होते. सध्याचे पंतप्रधान पण कुठेच नव्हते. तेव्हाच्या भरकटलेल्या भाजपचे उपाध्यक्ष सुंदरसिंह भंडारी यांनी बाबरी प्रकरण आपल्या अंगलट येऊ नये म्हणून ही जबाबदारी झटकली होती. हे काम शिवसेनेचे असल्याचे म्हटले होते, याची आठवणही…

Read More

जळगाव : प्रतिनिधी  अल्पवयीन मुलीला लग्नाचे आमिष दाखवून तिला गर्भवती केले आणि होणाऱ्या बाळाला स्वीकारण्यास नकार देणाऱ्या धरणगाव तालुक्यातील नारणे येथील आरोपीस अमळनेर जिल्हा सत्र न्यायालयाने बारा वर्षांची सश्रम कारावासाची शिक्षा सुनावली आहे. नारणे येथील मूळ रहिवासी शरद सखाराम भिल (२४) हा चहार्डी, ता. चोपडा येथे ट्रॅक्टरचालक म्हणून काम करीत होता. त्याचे लग्न झालेले होते. मात्र पत्नी आपल्या मुलांसह माहेरी निघून गेलेली होती. म्हणून त्याने चहार्डी येथील बकऱ्या चारणाऱ्या अल्पवयीन मुलीचा २०१९ ते २०२० दरम्यान रोज पाठलाग करून तिला प्रेमाची गळ घालायचा आणि तिला लग्नाचे आमिष दाखवायचा. तिच्याशी जंगलात, पाटचारीजवळ बळजबरीने शारीरिक संबंध करत असे. मुलगी विरोध करीत असताना तिला…

Read More

जळगाव : प्रतिनिधी  शहरातील नवीन बसस्थानक येथे गर्दीचा फायदा घेऊन काजल कमलेश पवार (रा. कोळसेवाडी कल्याण ईस्ट, ता. ठाणे) या प्रवासी महिलेची २६ हजार रुपये किमतीचे दागिने ठेवलेली लहान पर्स रावेर-पुणे बसमधून उतरत असताना चोरट्याने लांबविल्याची घटना सोमवारी दुपारी १२.३० वाजेच्या सुमारास घडली. याप्रकरणी रात्री जिल्हापेठ पोलिस ठाण्यात गुन्ह्याची नोंद करण्यात आली आहे. सोमवारी दुपारी काजल पवार या भुसावळ येथून रावेर-पुणे बसमधून जळगावला येण्यासाठी निघाल्या. १२.३० वाजता त्या नवीन बसस्थानक येथे उतरल्या. त्यानंतर रिक्षात बसत असताना त्यांना त्यांची मोठ्या पर्सची चेन उघडलेली दिसली. त्यातील दागिने ठेवलेली लहान पर्स दिसून आली नाही. पवार यांनी लागलीच बसमध्ये जाऊन पर्सचा शोध घेतला. पण,…

Read More

अमळनेर : प्रतिनिधी  तालुक्यातील मारवड रस्त्यावर असलेल्या एका पेट्रोल पंपाजवळ दोन दुचाकीच्या समोरासमोर झालेल्या धडकेत एक जण गंभीर जखमी झाल्याची घटना घडली आहे. याप्रकरणी एका दुचाकीधारकावर मारवड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मिळालेल्या माहितीनुसार, पारोळा तालुक्यातील वाघरे येथील रहिवासी बापू वेलचंद पाटील हा तरुण दुचाकी एमएच १८ बीबी ८८०६ मारवाड रस्त्यावरून धार येथे जात होता. त्यावेळी समोरून येणारी दुचाकी एमएच १९ सीडी ४१२१ वरील चालक दरपण मुरलीधर पाटील रा. मारवड ता. अमळनेर यांनी जोरदार धडक दिली. या धडकेत बापू वेलचंद पाटील हा गंभीर दुखापत झाल्याने जखमी झाला. तसेच वाहनाचे मोठे नुकसान झाले. या अपघात घडल्यानंतर दरपण मुरलीधर पाटील…

Read More

मुंबई : वृत्तसंस्था  राज्यातील ठाकरे गट व शिवसेनेच्या शिंदे गटाचा वाद आता वाढला असून यात शिंदे गटाने ठाकरे गटाला जोरदार धक्का दिला आहे. कारण देखील तसेच काही आहे. शिवसेनेची मालमत्ता आणि पक्षाचा निधी प्रमुखांकडे सोपवा अशी मागणी करणारी याचिका अॅडव्होकेट आशिष गिरी यांनी केली आहे. सुप्रीम कोर्टात ही याचिका करण्यात आलीय. पक्षाचा निधी आणि स्थावर मालमत्ता सध्याच्या प्रमुखांकडे देण्याची मागणी करण्यात आलीय. केंद्रीय निवडणूक आयोगाचा निकाल योग्य असल्याचा दावाही या याचिकेत करण्यात आला आहे. शिवसेना भवन, पक्षाचा निधी आणि पक्षाच्या सर्व शाखा शिंदे गटाकडे हस्तांतरित करण्यात याव्यात असं या याचिकेत नमुद करण्यात आलं आहे. निवडणूक आयोगाचा निकाल योग्य केंद्रीय निवडणूक…

Read More

जळगाव : प्रतिनिधी  जळगाव शहरातील शाहू नगरात शुल्लक कारणाने दोन भावांना मारहाण केल्याची घटना घडली आहे. या प्रकरणी दोन तरुणाविरोधात शहर पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, शहरातील शाहू नगरातील हनुमान मंदीराजवळ मयुर रानवडे हे आपल्या परिवारासोबत वास्तव्याला आहे. याच परिसरात समीर बिहारी आणि सुमेर तडवी यांना सोईस्कर जाण्या येण्यासाठी दुसरा रस्ता असतांना दोघे मयूरच्या घरासमोरून जातात. त्यामुळे त्यांच्या घरात असलेली मुलगी घबरते. दरम्यान, ८ एप्रिल रोजी रात्री ११ वाजेच्या सुमारास घराकडून का जातात असा जाब मयूर व त्याचा भाऊ कल्पेश यांनी विचारला. याचा राग आल्याने समीर बिहारी आणि सुमेर तडवी या दोघांनी प्लास्टीकचा पाईपाने दोन्ही भावांना…

Read More

पुणे : वृत्तसंस्था  येत्या 8 जूनपासून महाराष्ट्रात पावसाचे आगमन होणार असून, 22 जूनपासून संपूर्ण महाराष्ट्रात मुसळधार पाऊस पडणार असल्याचा अंदाज हवामान अभ्यासक पंजाब डख यांनी नगरच्या शासकीय विश्रामगृहातील पत्रकार परिषदेत वर्तविला आहे. पंजाब डख म्हणाले, 9 आणि 10 तारखेपर्यंत राज्यात अवकाळी पाऊस पडणार आहे. रविवारपासून संगमनेरकडे पाऊस पडणार नसून, तो पाऊस संगमनेरकडून नगर जिल्ह्याकडे पडणार आहे. त्याचबरोबर 10 तारखेपर्यंत राज्यात असेच वातावरण असणार आहे. त्यानंतर 11, 12, 13 तारखेला उत्तर महाराष्ट्राकडे पुन्हा एकदा थोडय़ाफार प्रमाणात पावसाची शक्यता आहे. त्यानंतर 13, 14, 15 तारखेला पुन्हा हवामान कोरडे राहणार आहे. त्यानंतर 16, 17, 18 एप्रिलला राज्यात पुन्हा पावसाचे वातावरण होणार आहे. त्याचबरोबर…

Read More