जळगाव : प्रतिनिधी शहरातील रस्त्यासाठी मंजुर झालेल्या शंभर कोटींच्या निधीतून ज्या भागात अमृतची जलवाहिनी व भूमिगत गटारींचे (मलनिस्सारण) काम पूर्ण झाले आहे. त्या भागातील ९१ रस्ते हे 100 कोटीच्या मंजूर निधीतून होणार आहे. शहरातील रस्त्यांच्या काँक्रिटीकरणासाठी शंभर कोटी रुपयांचा निधी आमदार राजूमामा भोळे यांच्या प्रयत्नाने मंजुर झाला. असून या निधीतून २६७ रस्त्यांचे काँक्रिटीकरण केले जाणार आहे. परंतु अमृत २.० योजने अंतर्गंत होणाऱ्या भूमिगत गटारींचे काम शहरातील ६० टक्के भागात बाकी असल्यामुळे त्या भागातील रस्त्यांचे काम करतांना अडचणी निर्माण झाल्या आहेत. म्हणून सध्या भूमिगत गटारी व पाणी पुरवठा लाईनचे काम ज्या ज्या भागात पूर्ण झाले आहे, त्या त्या भागातील रस्ते तयार…
Author: editor desk
चाळीसगाव : प्रतिनिधी तालुक्यातील एका अल्पवयीन मुलीवर अत्याचार करणाऱ्या आरोपीस चाळीसगाव शहर पोलिसांनी बेड्या ठोकल्या आहे. मिळालेल्या माहितीनुसार, १२ मे रोजी सायंकाळी ६ वाजण्याच्या सुमारास शहरातील एका अल्पवयीन मुलीस तिची आई नातेवाइकांकडे सोडून मजुरीच्या कामासाठी गेली होती. ही अल्पवयीन मुलगी रात्री ८ वाजण्यापूर्वी तिच्या मामेबहिणीसोबत घरी परत येत असताना वाटेत आकाश ऊर्फ सुपड्या विठ्ठल पाटील (वय २९) हा भेटला. मामेबहिणीला त्याने आपण या मुलीला स्कुटीवरून घरी सोडून देतो, असे सांगितले. त्यानंतर अत्याचार केला. त्यावेळी ती मुलगी रडू लागल्याने त्याने ठार मारण्याची धमकी दिली. मुलीने आई-वडिलांना घटना सांगितल्यावर त्यांनी आरोपीच्या घरी जाऊन शोध घेतल्यानंतर आरोपी पळून गेला. पोलिस निरीक्षक संदीप पाटील…
पुणे : वृत्तसंस्था महिलांच्या तपासासाठी गृह विभागाने स्वतंत्र समिती स्थापन करावी आणि शोध मोहिम राबवावी, दर 15 दिवसांनी करण्यात आलेल्या कार्यवाहीचा अहवाल राज्य महिला आयोगास सादर करण्यात यावा, अशी सूचना राज्य महिला आयोगाने गृह विभागाला केली. राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा रुपाली चाकणकर यांनी ही माहिती पत्रकार परिषदेत दिली. राज्य सरकारने हरवलेल्या मुली आणि महिलांचा शोध घेण्यासाठी शक्य तितकी तत्परता दाखवावी, अशी विनंती रुपाली चाकणकर यांनी केली आहे. पाहिजे तशी तत्परता राज्य सरकारकडून दाखवली जात नसल्याचंही त्या म्हणाल्या. राज्य सरकारच्या कार्यशैलीवर प्रश्न उपस्थित करत नाहीत, मात्र या प्रकरणात ज्या तत्परतेने काम व्हायला हवं होतं ते होताना दिसत नाही, असं राज्य महिला…
धरणगाव : प्रतिनिधी जल जीवन मिशन अंतर्गत “ हर घर नल से जल ” ही योजना यशस्वी करून लोकांपर्यंत पाणी पोहोचविणे हेच मिशन मानून ग्रामपंचायत व ठेकेदार यांनी समन्वय ठेवून मुदतीत व दर्जेदार पध्ततीने पा. पु. योजना पूर्ण करण्याचे आवाहन केले. साळवा गावाच्या विकासाठी सर्वानीच एकजुटीने प्रयत्न करा. आपल्या पासून जनहित सध्या व्हावे कोणीही दुखावले जावू नये यासाठी पक्ष्याच्या कार्यकर्त्यांनी झटावे. पक्ष हा कार्यकर्त्यांवर अवलंबून असतो. आम्ही शिवसेना पक्ष सोडला नसून गद्दार कसे म्हणाता ? खरे गद्दार कोण हे जनतेला माहित आहे. ज्वलंत हिंदुत्वासाठी , मराठी माणसाच्या न्याय हक्कासाठी आणि बाळासाहेबांच्या विचारांसाठी आमचा लढा आहे. त्यासाठीच आम्हाला उठाव करावा लागला.…
धरणगाव : प्रतिनिधी पिंपळे फाटा ते शगुन जिनिंगदरम्यान दुचाकीची समोरासमोर धडक होऊन एका इसमाचा मृत्यू झाल्याची घटना सोमवारी दुपारी घडली. याप्रकरणी वासुदेव हिलाल चित्ते यांच्या फिर्यादीवरून गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मिळालेल्या माहितीनुसार, चोपडा येथील इस्त्रीचे काम करणारे महेंद्र हिलाल चित्ते (४०) हे मोटारसायकलने (एमएच १९ एडब्ल्यू ४६९७) चोपडा येथून येत असताना त्यांच्या दुचाकीला पवन कैलास कोळी याच्या दुचाकीने (एमएच १९ डीट १९५८९) धडक दिली. त्यात महेंद्र चित्ते यांच्या डोक्याला मार लागल्याने त्यांचा मृत्यू झाला. अपघातात पवन कोळी हाही जखमी झाला आहे. तपास हेड कॉन्स्टेबल सय्यद करीम अमजद करीत आहेत.
जळगाव : प्रतिनिधी जळगाव तालुक्यातील धानवड गावाजवळील तलावामध्ये मित्रांसोबत पोहण्यासाठी गेलेल्या करण जयराम पवार (११, रा. चिंचोली) या बालकाचा बुडून मृत्यू झाल्याची दुर्देवी घटना सोमवारी दुपारी ४ वाजता घडली. दरम्यान, सायंकाळी मृतदेह जिल्हा रुग्णालयात आणल्यानंतर कुटूंबीयांसह ग्रामस्थांची गर्दी झाली होती. याप्रकरणी एमआयडीसी पोलिसात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. मिळालेल्या माहितीनुसार, सोमवारी दुपारी चिंचोली येथील करण हा गावातील आपल्या दोन सवंगड्यांसोबत धानवड गावाजवळील तलावात पोहण्यासाठी गेला. करण हा खोल पाण्यात गेल्याने तो बुडाला. तलावात गाळ असल्यामुळे तो वर येवू शकला नाही. त्यामुळे अन्य दोघांनी आरडा-ओरड गेली. आरडा-ओरड एकून जवळच काम करणाऱ्या लोकांनी घटनास्थळी धाव घेतली. तोपर्यंत करण याचा बुडून मृत्यू झाला…
भुसावळ : प्रतिनिधी एका २८ वर्षीय तरुणाचे दुर्देवी निधन झाल्याची घटना घडली आहे. पुण्याहून आपल्या १५ दिवसांची चिमुकली पाहण्यासाठी व आजीच्या तेराव्यासाठी आलेल्या तरुणाचा उष्माघाताने सोमवारी दुपारी येथे मृत्यू झाला. गिरीश शालिग्राम पाटील (वय २८) असे मृताचे नाव आहे. तो पुणे येथे रेल्वेच्या सेवेत कार्यरत होता. आपल्या आजीच्या तेराव्यासाठी तो ९ रोजी भुसावळ येथे आला होता. गिरीश याला पंधरा दिवसांपूर्वीच मुलगी झाली असून, १४ रोजी पत्नी व बाळाला पाहण्यासाठी तो जामनेर तालुक्यातील गाडेगाव येथे गेला होता. त्यानंतर, नशिराबाद येथे नातेवाइकांकडे गेला होता. १५ रोजी सकाळी त्याची प्रकृती बिघडल्यावर दुपारी त्याला डॉ. मानवतकर यांच्या रुग्णालयात दाखल करण्यात आले. तेथे उपचारादरम्यान दुपारी…
धरणगाव : प्रतिनिधी तालुक्यातील वराड येथे पती-पत्नीचे भांडण सोडविण्यासाठी गेलेल्या मजुराचा डोक्यात वीट घालून दि.१४ रविवारी रोजी रात्री खून करण्यात आल्याची धक्कादायक घटना घडली आहे. यात बिसन भोंडा नरगावे (वय ४०) असे मयताचे नाव आहे. मिळालेल्या माहितीनुसार, वराड येथील रामजी ऑइल मिलमध्ये मध्य प्रदेशातील मजूर कामावर आहेत. यात नजरिया शुभाराम कुमारिया (३५) याचे रविवारी रात्री त्याच्या पत्नीशी भांडण सुरू होते. ते सोडविण्यासाठी बिसन नरगावे (रा. करचोली, जि. बडवानी) गेला होता; मात्र त्याला नजरियाने संतापाच्या भरात विटा आणि दगडाने मारहाण केली. यात त्याचा मृत्यू झाला. या प्रकरणी गोटू नरगावे याने दिलेल्या फिर्यादीनुसार नजरिया कुमारीया याला अटक करण्यात आली आहे. पुढील तपास…
जळगाव : प्रतिनिधी शहरातील एका परिसरातील १९ वर्षीय तरुणाने आज दि १५ रोजी सकाळी ११ वाजेच्या सुमारास आपल्या घरात आपली जीवनयात्रा संपविल्याची दुर्देवी घटना घडली आहे. या प्रकरणी एमआयडीसी पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद घेण्याचे काम सुरू होते. मिळालेल्या माहितीनुसार, शहरातील सुप्रीम कॉलनीती परिसरातील रहिवासी आकाश सुरेश शेरे (वय-१९) या तरुणाने आज सकाळी राहत्या घरात दोरीने गळफास घेऊन आपली जीवनयात्रा संपविल्याची घटना सकाळी ११ वाजेच्या सुमारास उघडकीस आली आहे. या घटनेची माहिती मिळाल्यानंतर नातेवाईक व मित्रपरिवार यांनी जिल्हा शासकीय रुग्णालयात गर्दी केली होती. सुप्रीम कॉलनी परिसरात आकाश शेरे हा आपल्या आई सविता आणि लहान भाऊ दीपक यांच्यासोबत रहायला होता. एमआयडीसी…
अमळनेर : प्रतिनिधी शहरात यात्रा बघण्यासाठी येत असलेल्या रिक्षाचा अपघात झाला आहे. यात २१ वर्षीय तरुणीचा मृत्यू तर दोन जण जखमी झाल्याची बातमी समोर आली आहे. १३ मे रोजी रात्री साडेआठ वाजेच्या सुमारास अमळनेर तालुक्यातील मेहेरगाव फाट्याजवळ यात्रेसाठी रिक्षातून जात असताना दुसऱ्या वाहनाने धडक दिल्याने रिक्षा उलटली. या अपघातात रिक्षातील २१ वर्षीय तरुणीचा मृत्यू झाला असून दोन जण जखमी झाल्याची घटना घडली. या अपघातात अश्विनी गुलाब भामरे असं मयत तरुणीचं नाव आहे. १६ एप्रिल रोजी अश्विनी हिचे लग्न ठरले होते. मात्र, लग्नाची तारीख अद्याप ठरली नव्हती. तत्पूर्वीच अश्विनीवर अपघाताच्या रुपाने काळाने झडप घातली. या अपघात प्रकरणी मारवड पोलीस ठाण्यात गुन्हा…

