Author: editor desk

पारोळा : प्रतिनिधी  तालुक्यातील तालुक्यातील खेडीढोक येथील माहेर असलेल्या एका २२ वर्षीय विवाहितेचा दोन लाखांसाठी शारीरिक व मानसिक छळ केल्याप्रकरणी तीन जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या विवाहितेचे गुजरात येथील उधना हे सासर आहे. मिळालेली माहिती अशी  की, डिसेंबर २०१८मध्ये मदनपुरा लिंबायत, उधना (गुजरात) येथे विकी राजेंद्र राजपूत याच्याशी विवाह झाला. घरात पती, सासू शोभा राजेंद्र राजपूत, दीर महेंद्र राजेंद्र राजपूत, दिरानी प्रियंका महेंद्र राजपूत असे एकत्र राहत होते. पती विकी हा गाड्या भाड्याने देण्याचा व्यवसाय करतो. व्यवसाय वाढवण्यासाठी माहेरहून दोन लाख रुपये आणावे, म्हणून वेळोवेळी मानसिक, शारीरिक छळ करून शिवीगाळ व मारहाण केली. वडिलांची परिस्थिती हलाखीची असल्याकारणाने पैसे…

Read More

नवी दिल्ली : वृत्तसंस्था  दररोज अनैतिक संबंधातून पळून गेलेल्या लोकांच्या अजब-अजब घटना समोर येत असतात. पण सध्या राजस्थानमधील अशाच एका घटनेची जोरदार चर्चा रंगली आहे. या घटनेबाबत वाचून लोक हैराण झाले आहेत. सीकर शहरात राहणाऱ्या एका विवाहित महिला आपल्या तीन मुलींना घेऊन प्रियकरासोबत फरार झाली. साधारण 4 दिवस शोधाशोध घेतल्यानंतर त्यांचा पत्ता लागला नाही तर महिलेच्या कुटुंबियांनी पोलिसात तक्रार दाखल केली. धक्कादायक बाब म्हणजे महिला ज्या प्रियकरासोबत पळून गेली तो 5 मुलांचा पिता आहे. मिळालेल्या माहितीनुसार, सीकर शहरात राहणारी 38 वर्षीय एक विवाहित महिलेला शेजारी राहणारा मुकेश नायक नावाची व्यक्ती पळवून घेऊन गेला. विवाहितेसोबत तिच्या तीन मुली ज्यांचं वय 17,…

Read More

जळगाव : प्रतिनिधी  शहरात अवैध वाळू वाहतूक करणाऱ्याची संख्या मोठ्या प्रमाणात झाली आहे. यावर आता पोलीस प्रशासनाने कारवाई करीत अवैध वाळू वाहतुकीला लगाम लावत आहेत. शहरातील श्याम नगरमधून अवैध वाळू वाहतूक करणारे ट्रॅक्टर पकडण्यात आल्याची घटना १२ रोजी उघडकीस आली असून वाळूने भरलेले ट्रॅक्टर पोलिसांनी जप्त केले आहे. याबाबत सूत्रांची दिलेली माहिती अशी कि, शहरातील श्यामनगर ते हरीविठ्ठल नगरात अवैधरित्या वाळूची वाहतूक ट्रॅक्टरद्वारे होत असल्याची माहिती रामानंद नगर पोलीसांना मिळाली. त्यानुसार पोलीसांनी बुधवारी १२ एप्रिल रोजी सकाळी ११ वाजता श्याम नगर परिसरात कारवाई करत विना क्रमांकाचे ट्रॅक्टर पोलीसांनी पकडले. ट्रॅक्टर चालक समाधान खंडू सोनवणे रा. श्रध्दा कॉलनी, जळगाव याच्याकडे वाळू…

Read More

जळगाव : प्रतिनिधी  शहरातून ग्रामीण भागात जाणाऱ्या आव्हाने रोड परिसरात असलेल्या लक्ष्मी जीनिग बाजूला एक वेअर हाऊसचा खुलेआम भाड्याने दिल्याची चर्चा दोन दिवसापासून जिल्ह्यात सुरु होती. त्यावर आज थेट संबधित अधिकारी यांनी पाहणी करीत चौकशी करण्याचे आदेश दिले असल्याची खात्रीलायक माहिती मिळाली आहे. शहरातून आव्हाने रोड परिसरात असलेल्या लक्ष्मी जीनिगच्या बाजूला असलेले लक्ष्मी कृषी उत्त्पन्न खाजगी बाजार आव्हाणे शेतकऱ्याच्या मालासाठी गोडावून याठिकाणी असलेली भली मोठी जागा हि शहरात होणाऱ्या पिंप्राळा उड्डाणपुलाच्या गुजरात येथील कंपनीला भाड्याने दिल्याने तालुक्यातील शेतकरीना मात्र भर उन्हाळ्यात माल ठेवण्यासाठी जागा मिळत नाही, मात्र या वेअर हाऊसचे जे मालक आहे. त्यांनी कशी काय हि जागा भाड्याने देत…

Read More

मुंबई : वृत्तसंस्था  देशात होत असलेल्या महागाईवर आता कुणीही त्यावर तोडगा काढण्यास तयार नाही पण राज्यात होणारे लग्नसराई मात्र त्याच महागाईमध्ये मोठ्या धमाक्यात साजरा होत आहे. त्या महागाईत भर म्हणून सोन्याच्या भावाने ग्राहकांना झटकाच दिला आहे. दिपावली पर्यंत सोनं ६५ हजारापर्यंतो पोहचू शकत असा अंदाज व्यक्त करण्यात येत आहे. गेल्या काही महिन्यांपासून सोनं-चांदीच्या दरात झपाट्याने वाढ होत आहे. फेब्रुवारीच्या शेवटच्या आठवड्यात सोनं आणि चांदीच्या दरात घट झाली होती. मात्र त्यानंतर पुन्हा दरात वाढ झाली आहे. दिवाळीपर्यंत सोने ६५,००० रुपये आणि चांदी ८०,००० रुपयांपर्यंत पोहोचू शकते, असंही तज्ज्ञांचे म्हणणे आहे. सध्या चांदी ७६, ००० रुपयांवर पोहोचली आहे. सराफा बाजारातही सोन्या-चांदीच्या दरात…

Read More

मुंबई : वृत्तसंस्था  महाराष्ट्रातील राजकारण, पर्यावरण, शिवसेना याबाबत एका कार्यक्रमात आदित्य ठाकरेंना प्रश्न विचारण्यात आले होते. मुख्यमंत्री शिंदे यांच्या बंडाबाबत विचारण्यात आलेल्या प्रश्नावर त्यांनी गौप्यस्फोट केला आहे. त्यामुळे राज्याच्या राजकारणात खळबळ उडाली आहे. आदित्य ठाकरे म्हणाले, एकनाथ शिंदे यांनी तुरुंगाच्या भीतीने बंड केलंय. भाजपसोबत गेलो नाही तर मी तुरुंगात असेन, असे एकनाथ शिंदे मातोश्रीवर येऊन म्हणाले होते. एकनाथ शिंदे त्यावेळी मातोश्रीवर येऊन रडले होते, असे आदित्य ठाकरे म्हणाले. शिवसेना सोडून गेलेले 40 आमदार हे स्वत: साठी आणि पैशांसाठी गेले आहेत. केंद्रीय यंत्रणांकडून त्यांना अटक होणार होती, असेही आदित्य ठाकरे म्हणाले. दरम्यान, जवळपास आठ महिन्यांपूर्वी शिवसेनेत फूट पडली. विद्यमान मुख्यमंत्री एकनाथ…

Read More

मुंबई : वृत्तसंस्था  फेब्रुवारीअखेरपासून कोरोना झपाटय़ाने वाढत असून दैनंदिन रुग्णसंख्येचा अक्षरशः गुणाकार सुरू आहे. संपूर्ण जानेवारीत 128, फेब्रुवारीत 122 रुग्ण आढळले असताना मार्चमध्ये तेरा पट वाढ होऊन तब्बल 1719 कोरोनाबाधितांची नोंद झाली. तर एप्रिलच्या पहिल्या दहा दिवसांत 1941 रुग्णांची नोंद झाली आहे. ही रुग्णवाढ कायम राहणार असून मे महिन्यात सध्याच्या रुग्णसंख्येच्या दहा पट रुग्णवाढ होणार असल्याचा धोका पालिका प्रशासनाकडून व्यक्त करण्यात आला आहे. या पार्श्वभूमीवर पालिकेने खासगी रुग्णालयांसह आपली संपूर्ण आरोग्य यंत्रणा सज्ज ठेवली आहे. मुंबईत मार्च 2020 मध्ये कोरोनाने शिरकाव केल्यानंतर पालिका आणि तत्कालीन राज्य सरकारच्या नियोजनामुळे तीन लाटा यशस्वीरीत्या परतवून लावण्यात यश आले. यानंतर जानेवारी 2023 मध्ये दैनंदिन…

Read More

मुंबई : वृत्तसंस्था  आज मध्य महाराष्ट्र व दक्षिण कोकणात गारपिटीचा इशारा हवामान विभागाने दिला आहे. तर, उर्वरित राज्यातही विशेषत: मराठवाड्यात वादळी वाऱ्यासह पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. वादळी पाऊस, गारपिटीचा इशारा (येलो अलर्ट) दक्षिण कोकण : रत्नागिरी, सिंधुदुर्ग मध्य महाराष्ट्र : नंदूरबार, धुळे, नाशिक, नगर, पुणे, सातारा, कोल्हापूर. वादळी पावसाचा इशारा (येलो अलर्ट) कोकण : पालघर, ठाणे, मुंबई, रायगड. मध्य महाराष्ट्र : जळगाव, सांगली, सोलापूर, मराठवाडा : छत्रपती संभाजीनगर, जालना, बीड, धाराशिव, लातूर. विदर्भ : बुलडाणा, अकोला, अमरावती, वाशीम, यवतमाळ, वर्धा, नागपूर, भंडारा, गोंदिया, चंद्रपूर, गडचिरोली. हवामान विभागाने दिलेल्या माहितीनुसार, सध्या आग्नेय अरबी समुद्रात चक्राकार वाऱ्यांची स्थिती आहे. राजस्थान आणि…

Read More

भुसावळ :  प्रतिनिधी  साकेगाव महामार्गावर चौपदरीकरणाचे काम करणाऱ्या आयुष प्रोकॉन कंपनीचे लाखोंचे साहित्य असलेल्या कार्यालयास भीषण आग लागली. ही घटना बुधवारी दुपारी तीन वाजेच्या सुमारास घडली. यात, लाखोंचे नुकसान झाल्याचे प्राथमिक अंदाज आहे. आगीचे कारण अद्याप समोर आलेले नाही. आयुष प्रोकॉन कंपनीच्या कंपाऊंडच्या बाहेर कुणीतरी शेत शिवारामध्ये आग लावल्याची प्राथमिक माहिती आहे. ही आग काही क्षणातच आयुष प्रोकॉनच्या परिसरात पसरली व पत्र्याच्या शेडजवळ असलेल्या त्यांच्या कार्यालयामध्ये दहा-पंधरा दिवसांपूर्वीच बेल्टचे साहित्य उतरविण्यात आले होते. यांची किंमत लाखोंच्या घरात असल्याचे सांगण्यात आले. नेमके याच बेल्टच्या कार्यालयाला आग लागली. दुपारी तीन वाजेला लागलेली आग तीन ते साडेतीन तासाच्या प्रयत्नानंतर आटोक्यात आली. आग लागल्याची…

Read More

जळगाव : प्रतिनिधी  शहराच्या तापमानाने यंदा पहिल्यांदा चाळिशी पार केली असून, बुधवारी जळगाव शहराचे तापमान राज्यात दुसऱ्या क्रमांकावर होते. ४१.६ अंश अशी तापमानाची नोंद झाली. बुधवारी राज्यात चंद्रपूर शहरात सर्वाधिक ४१.८ अंश तापमान होते. धुळ्याच्याही तापमानाने बुधवारी ४० चा टप्पा ओलांडला आहे. जळगाव शहराच्या किमान तापमानातदेखील वाढ झाली असून, मंगळवारी रात्रीचे तापमान २५ अंशांवर होते. तर बुधवारी रात्रीचे तापमान २७ अंशांवर पोहोचले होते. राज्यातील रात्रीच्या सर्वात जास्त तापमानाची नोंद जळगाव शहरात झाली आहे.

Read More