भुसावळ : प्रतिनिधी तालुक्यातील साकेगाव येथे भाडे तत्वावर राहत असलेल्या भाडेकरू तरुणांच्याा घरातून चोरट्यांनी मध्यरात्री पाच मोबाईलसह लॅपटॉप लांबविल्याची घटना बुधवार १२ रोजी मध्यरात्रीच्या सुमारास घडला. या प्रकरणी भुसावळ तालुका पोलिसात अज्ञात चोरट्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला. सविस्तर वृत्त असे कि, साकेगावातील रहिवासी असलेले नरसिंग काकडीया वसावे (वय २५) हे प्रमोद सोनवणे यांच्या मालकिच्या घरात भाडेकरू आहेत. शिवाय त्यांच्यासोबत अन्य तरुण शिक्षणानिमित्त भाडे तत्वाने राहतात. बुधवारी रात्री वसावे यांना झोप लागल्यानंतर त्यांना दरवाजाची कडी लावण्याचा विसर पडल्याने चोरट्याने घरात प्रवेश करीत 42 हजार रुपये किंमतीचे पाच मोबाईल, 18 हजार रुपये किंमतीचे लॅपटॉप लांबवला. सकाळी झोपेतून उठल्यानंतर चोरीचा प्रकार लक्षात आल्यानंतर…
Author: editor desk
मुंबई : वृत्तसंस्था राज्यात आज पहाटे जुन्या मुंबई-पुणे महामार्गावर भीषण अपघात झाला आहे. एक खासगी बस दरीत कोसळली असून यात १३ जणांचा मृत्यू झाले असून २० ते २५ जण जखमी झाल्याची प्राथमिक माहिती समोर येत आहे. दरम्यान, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी या अपघाताची तात्काळ दखल घेत मृतांच्या नातेवाईकांना 5 लाखांची मदत जाहीर केली आहे. तसेच, जखमींवर शासकीय खर्चाने उपचार करण्यात येतील, असेही सांगितले. बोरघाटातील शिंगरोबा मंदिरजवळ आज पहाटे चार वाजण्याच्या सुमारास ही घटना घडली. या खासगी बसमध्ये 42 प्रवासी होते. 13 जणांचा मृत्यू झाला आहे. एका जणाचा मृतदेह अद्याप सापडलेला नाही. त्याचा शोध सुरू आहे. तर, या दुर्घटनेत 29 प्रवासी…
भुसावळ : प्रतिनिधी महिलेच्या मोबाईलमधे काढलेले फोटो पतीला दाखवण्याची धमकी देत विवाहित महिलेचे फोटो स्टेट्सला ठेवल्याने विवाहीतेचा विनयभंग केल्याप्रकरणी एकाविरुद्ध भुसावळ तालुका पोलिस स्टेशनला गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सविस्तर वृत्त असे कि, भुसावळ तालुक्यातील एका गावात २९ वर्षीय विवाहिता मजुरी करून आपल्या परिवाराचा उदरनिर्वाह करीत आहे. या घटनेतील संशयित आरोपी कैलास तायडे याने विवाहीतेकडून वेळोवेळी काही रक्कम उधार घेतली होती. दरम्यानच्या कालावधीत त्याने आपल्या मोबाईलमधे तिचे फोटो काढले होते. विवाहीतेने आपल्याला वेळोवेळी उधार दिलेली रक्कम पुन्हा मागू नये यासाठी त्याने मोबाईलमधे काढलेल्या फोटोचा आधार घेतला असे विवाहीतेचे म्हणणे आहे. ते फोटो आपल्या पतीला दाखवण्याची धमकी कैलासने दिली असा विवाहीतेचा…
जळगाव : प्रतिनिधी धावत्या रेल्वेतून म्हसावद ते बोरनार रेल्वे लाइनवर पडून शुक्रवारी सकाळी ८ वाजेच्या सुमारास अनोळखी पुरुषाचा मृत्यू झाल्याची घटना घडली असून या प्रकरणी एमआयडीसी पोलिस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद केली आहे. अद्याप मृतदेहाची ओळख पटलेली नसून नातेवाइकांना ओळख पटविण्याचे आवाहन पोलिसांनी केले आहे. शुक्रवारी सकाळी म्हसावद ते बोरनार अप रेल्वे लाइनवरील खांबा क्रमांक ३९५/२४-२२ दरम्यान धावत्या रेल्वेतून पडून एका अनोळखी पुरुषाचा मृत्यू झाला. ही घटना स्टेशन प्रबंधकाने एमआयडीसी पोलिस ठाण्याला कळविल्यानंतर पोलिस कर्मचारी स्वप्निल पाटील, प्रदीप पाटील, हेमंत पाटील यांनी घटनास्थळी जाऊन पंचनामा केला. मृतदेहाची अंगझडती घेतली, मात्र ओळख पटेल असे काहीही मिळून आलेले नाही. अखेर मृतदेह जिल्हा…
जळगाव : प्रतिनिधी जळगाव जिल्ह्यातील भुसावळ तालुक्यातील एका रस्त्यावरील शेतात दोन तरुणांवर गोळीबार झाल्याची धक्कादायक बातमी समोर आली आहे. यामुळे भुसावळ तालुक्यात एकच खळबळ माजली आहे. घटनास्थळी पोलीस पथक दाखल झाले होते. तर जखमी तरुणांना रूग्णालयात दाखल केले असल्याचे खात्रीलायक वृत्त आहे. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, भुसावळ तालुक्यातील साकरी फाट्याजवळील उड्डाणपुलाजवळील एका शेतात दोघा तरुणांवर तीन संशयीतांनी गावठी कट्ट्यातून दोन फैरी झाडत गोळीबार केल्याने भुसावळ तालुक्यात मोठी खळबळ उडाली आहे. ही धक्कादायक घटना शुक्रवारी रात्री 10 वाजेच्या सुमारास घडली. हल्लेखोरांच्या गोळीबारात अक्षय रतन सोनवणे (26, भुसावळ) व मंगेश अंबादास काळे (24, भुसावळ) हे दोघे तरुण जखमी झाले असून त्यांना डोक्याला व…
जळगाव : प्रतिनिधी सातबारा उतार्यावर वारसांची नावे लावून सातबारा उतारा देण्यासाठी पंधराशे रुपयांची लाच मागून सुट्टीच्या दिवशी ती तलाठी कार्यालयात स्वीकारताना लाचखोर तलाठ्यासह कोतवालाला जळगाव एसीबीने शुक्रवारी दुपारी अडीच वाजता रंगेहाथ अटक करताच महसूल विभागात लाचखोर हादरले आहेत. ही कारवाई भडगाव तालुक्यातील बु.॥ तलाठी कार्यालयात करण्यात आली. तलाठी सलीम तडवी व कोतवाल कविता सोनवणे अशी लाचखोरांची नावे आहेत. मिळालेल्या माहितीनुसार, भोरटेकच्या तक्रारदाराची वडिलोपार्जित जमीन असून सातबारा उतार्यावर वारसांची नाव लावण्यासाठी आरोपी तलाठ्याने प्रकरण स्वीकारताना एक हजार रुपये लाच घेतली मात्र त्यावर त्यांची भूक भागली नाही व त्यांनी पुन्हा पंधराशे रुपयांची लाच कोतवालासोबत मागितली. तक्रार केल्यानंतर सापळा रचण्यात आला. शुक्रवारी महामानव…
मुंबई : वृत्तसंस्था बॉलिवूडचा भाईजान सलमान खान आतापर्यत लग्न का नाही करत याबाबत त्याने अनेक ठिकाणी वेगवेगळे कारण दिले आहे. पण आता तो वेगळ्याच चर्चेत सापडला आहे. सलमान खान हा त्याच्यापेक्षा २५ वर्ष लहान अभिनेत्रीसोबत त्याचे नाव जोडले गेल्याने हि चर्चा देशभर सुरु झाली आहे. त्या अभिनेत्रीचे नाव पूजा हेगडेचं असल्याचेही समजते. ते दोघं रिलेशनशिपमध्ये असल्याच्या चर्चा तर अनेक दिवसांपासून सुरु होत्या. त्या दोघांचे अनेक फोटो आणि व्हिडीओ पाहिल्यानंतर तर त्यांच्या रिलेशनशिपच्या चर्चांना उधाण आलं होतं. दरम्यान, सलमानसोबतच्या रिलेशनशिपच्या चर्चांवर पूजा हेगडेनं प्रतिक्रिया दिली आहे. सलमान आणि पूजा जेव्हापासून ‘किसी का भाई किसी की जान’ या चित्रपटात एकत्र काम करत…
छत्रपती संभाजीनगर : वृत्तसंस्था राज्यात गेल्या काही दिवसापासून अनेक नेत्यांना जीवे ठार मारण्याच्या धमकीचे सत्र सुरु आहे. यात आणखी एका आमदाराला धमकीचे निनावी पत्र मिळाल्याने खळबळ उडाली आहे. छत्रपती संभाजीनगर गेल्या काही दिवसापासून वेगवेगळ्या विषयामुळे चर्चेत आहे ते पुन्हा आता एका नव्या चर्चेत आले आहे. संभाजीनगर जिल्ह्यातील वैजापूरचे आमदार रमेश बोरनारे यांना धमकीचं पत्र आलंय. राज्यातील काही नेत्यांना थेट मोबाइलवर फोन, संदेशाद्वारे धमकी मिळाली. तर बोरनारे यांच्या नावाने नुकतंच एक निनावी पत्र आलंय. या पत्रातून त्यांना जीवानिशी मारण्याची धमकी मिळाली आहे. संभाजीनगर शिवसेनेत यामुळे खळबळ माजली आहे. आमदार रमेश बोरनारे हे वैजापूर विधानसभा मतदार संघाचे शिवसेना आमदार आहेत. एकनाथ शिंदे…
मुंबई : वृत्तसंस्था राज्यात तरुणाईच्या मनावर राज्य करणारी गौतमी पाटीलची सध्या सगळीकडे एकच चर्चा आहे. ती म्हणजे सबसे कातील गौतमी पाटील तिचा कार्यक्रम म्हणलं की राडा तर होणारच. गावागावात तिच्या कार्यक्रमांना तुफान गर्दी होते. कधीकधी गर्दी आवाक्याच्या बाहेर जाते आणि पोलिसांना मध्यस्थी करावी लागते. मात्र जुन्नर येथे नुकत्याच झालेल्या कार्यक्रमात एक वेगळाच प्रकार पाहायला मिळाला. गौतमीचा कार्यक्रम निर्विघ्न पार पडावा म्हणून गावातील महिलाच हातात काठ्या घेऊन समोरच्या रांगेत बसल्या. जुन्नर तालुक्यातील निमदरी गावाजवळच्या पिराचीवाडी येथील वेताळेश्वर देवाच्या यात्रेदरम्यान गौतमी पाटीलचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. गौतमीचा कार्यक्रम म्हणजे गर्दी, गोंधळ तर होणारच. पण कोणताही अनुचित प्रकार घडू नये म्हणून स्टेजच्या…
भुसावळ : प्रतिनिधी यंदा उन्हाळ्यातही ढगाळ वातावरण कायम असल्याने तापमान ३८ अंशांच्या वर गेले नव्हते, मात्र गुरुवारी भुसावळला ४२.९ अंश तापमानाची नोंद करण्यात आली आहे. ही शासकीय नोंद असली तरी एका खासगी संस्थेने भुसावळला ४४ अंश तापमानाची नोंद केली आहे. उन्हाळा सुरू होऊन दोन ते अडीच महिन्याचा कालावधी उलटला आहे. फेब्रुवारी व मार्च या महिन्यांमध्ये ढगाळ वातावरणामुळे शहराचे तापमान ४० अंशाच्या आतच होते. त्यामुळे उन्हाच्या झळा नागरिकांना बसत नव्हत्या. मात्र गेल्या दोन दिवसांमध्ये भुसावळ शहराचे तापमान ४० अंशांच्या पुढे गेले आहे. १३ रोजी भुसावळ शहराचे तापमान कमाल ४२.९ किमान ३२.१ तापमानाची नोंद केली आहे. तर वेलनेस वेदर या खासगी संस्थेने…

