Author: editor desk

नवी दिल्ली : वृत्तसंस्था  चीन देशाची राजधानी असलेल्या बीजिंगमधील एका रुग्णालयात लागलेल्या भीषण आगीत २१ जणांचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे. तर 71 जणांना वाचवण्यात यश आले आहे. आगीची माहिती अग्निशमन दलाला देण्यात आली. त्यानंतर त्यांनी घटनास्थळी पोहचून आगीवर नियंत्रण मिळवण्यासाठी शर्थीचे प्रयत्न केले. एजन्सीने दिलेल्या माहितीनुसार, बीजिंगमधील चांगफेंग हॉस्पिटलमध्ये हा अपघात झाला. रेस्क्यू टीम घटनास्थळी पोहोचली आणि त्यांनी 21 लोकांना बाहेर काढले आणि रुग्णालयात दाखल केलं. परंतु उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाला. रुग्णालयात लागलेल्या आगीचे कारण अद्याप समजू शकले नसून, घटनेचा गांभीर्याने तपास सुरू असल्याचे पोलिसांनी सांगितले आहे. एजन्सीने दिलेल्या माहितीनुसार, बीजिंगच्या फेंगताई जिल्ह्यातील एका रुग्णालयाच्या इमारतीला दुपारी 12:57 वाजता आग…

Read More

जळगाव : प्रतिनिधी  शहरातील शाहू नगर परिसरातून एकाची दुचाकी लांबविल्या प्रकरणी शहर पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सविस्तर वृत्त असे कि, शहरातील शाहू नगरातील हनुमान मंदिर जवळील रहिवासी दीपक मल्हारी टेकावडे(वय ४६) यांनी दि १६ रोजी दुपारच्या सुमारास उन तापत असल्याने घराजवळील चौकात झाडाच्या खाली लावलेली असतांना भर दुपारी एम.एच.१९.०५९० काळ्या रंगाची दुचाकी अनोळखी व्यक्तीने चोरून नेली आहे. या प्रकरणी शहर पोलिसात धाव घेत अनोळखी चोरट्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोना.योगेश पाटील हे करीत आहेत.

Read More

अमळनेर : प्रतिनिधी  शहरातील खाजा नगर भागातील एका १५ वर्षीय तरुणीला १७ रोजी तर तालुक्यातील सोनखेडी येथील एका १७ वर्षीय मुलीस 15 एप्रिल रोजी पळवून नेल्याची घटना घडली आहे. या प्रकरणी अज्ञात व्यक्तीविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सविस्तर वृत्त असे कि, तालुक्यातील सोनखेडी येथील रहिवासी असलेल्या १७ वर्षीय अल्पवयीन मुलीस १५ रोजी रात्री घरात झोपलेली होती. मात्र रात्री साडे बारा वाजेच्या सुमारास तिच्या आईला ती दिसून आली नाही.तिचा शोध घेतला असता ती मिळून न आल्यामुळे अज्ञात व्यक्तीने तिला आमिष दाखवून पळवून नेले आहे. परिवाराने दिलेल्या फिर्यादीवरून अमळनेर पोलिसात अज्ञात व्यक्ती विरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास पोलीस…

Read More

धरणगाव : प्रतिनिधी तालुक्यातील हिंगोणे खुर्द येथे विद्युत तारांच्या शॉर्टसर्किटमुळे शेतातील काढलेला २५ हजारांचा मका खाक जाळून खाक झाल्याची घडली. याप्रकरणी धरणगाव पोलिसात अकस्मात आगीची नोंद करण्यात आली आहे. धरणगाव तालुक्यातील हिंगोणे खुर्द येथील ज्ञानेश्वर नारायण पाटील (७५) यांची हिंगोणे खु. गावाजवळ शेती आहे. दि. १६ रोजी दुपारी १ वाजेच्या सुमारास महावितरणच्या पोलवरील तारांचा शॉर्टसर्किट होऊन त्यातून आगीची ठिणगी पडली. त्यामुळे शेतात कापून ठेवलेल्या मका पिकाला आग लागून सुमारे २५ हजार रुपयांचे नुकसान झाले. याप्रकरणी धरणगाव पोलिसात अकस्मात आगीची नोंद झाली असून पुढील तपास पो. ना. दीपक पाटील हे करीत आहेत. दरम्यान, याप्रकरणी पंचनामा करून भरपाई देण्याची मागणी होत आहे

Read More

जळगाव : प्रतिनिधी  शेतजमीन खरेदीनंतर सातबारा उतार्‍यावर शेतकर्‍याचे नाव लावून देण्याचे काम करून देण्यासाठी 15 हजारांची लाच मागून तडजोडीअंती 12 हजार रुपयांची लाच स्वीकारताना भुसावळ सजाचे कोतवाल रवींद्र लक्ष्मण धांडे (54, रा.भुसावळ) व खाजगी कर्मचारी हरी देविदास ससाणे (44, रा.आंबेडकर नगर, भुसावळ) यांना जळगाव एसीबीच्या पथकाने अटक केली. ही कारवाई भुसावळ तहसील कार्यालयाच्या आवारात मंगळवारी दुपारी एक वाजेच्या सुमारास करण्यात आली. सविस्तर वृत्त असे कि,, कुर्‍हेपानाचे भागातील तक्रारदाराने या संदर्भात एसीबीकडे तक्रार दिली होती. शेतीची नोंद सातबारा उतार्‍यावर घेण्यासाठी त्यांनी मंडळाधिकार्‍यांची भेट घेतल्यानंतर त्यांनी कोतवालांना भेटण्यास सांगितल्यानंतर रवींद्र धांडे यांनी 12 हजारांची लाच मागितली मात्र लाच द्यावयाची नसल्याने एसीबीकडे तक्रार…

Read More

जळगाव : प्रतिनिधी  शहरातील एका अपाटमेंटमधून बंद प्लॅटमधून चोरट्यांनी १२ हजारांच्या रोकडसह दोन लाख १६ हजारांचे दागिणे लांबवल्याने नागरीकांमध्ये खळबळ उडाली आहे. या प्रकरणी सोमवारी जिल्हापेठ पोलिसात अज्ञात चोरट्यांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला. सविस्तर वृत्त असे कि, शहरातील भगीरथ कॉलनी परिसरातील वक्रतुंड अपार्टमेंटमध्ये कांचन मधुकर कदम (वय २८) हे खाजगी नोकरदार असून कुटुंबासह वास्तव्याला आहेत. कदम कुटुंब गावाला गेल्याने प्लॅट बंद असल्याची संधी चोरट्यांनी साधत 14 ते 16 एप्रिल दरम्यान घरफोडी केली. मुख्य दरवाजाचे कुलूप तोडून चोरट्यांनी किचनमधील लहान लाकडी पेटीतून 12 हजारांची रोकड, 52 हजारांची सोन्याची पोत, 12 हजारांची मंगळसूत्राची पोत, एक लाख 80 हजार रुपये किंमतीचा सोन्याचा गोफ,…

Read More

जळगाव : प्रतिनिधी  गेल्या आठदिवसापासून राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अजित पवार भाजपसोबत जाणार असल्याच्या चर्चा सुरू झाल्या आहेत. त्यामुळे महाराष्ट्राचं राजकारण ढवळून निघालं आहे. आता या राजकारणावर शिंदे गटाचे मंत्री गुलाबराव पाटील यांनी प्रतिक्रिया दिली आहे. मंत्री गुलाबराव पाटील म्हणाले कि, पक्ष फुटतोय असे कोण म्‍हणेल. शरद पवारांच्या बोलण्यावर विश्वास कोण ठेवणार. ते मोठे नेते आहेत. असं म्‍हटले जाते की शरद पवार जे बोलतात त्याच्या विरुद्ध घडतं; हे मी म्‍हणू शकत नाही. ते मोठे व्‍यक्‍ती असून त्‍यांच्‍याबद्दल बोलणे उचित नाही, असेही त्यांनी सांगितले. राज्‍यात सध्‍या सुरू असलेल्‍या राजकीय वातावरणाबद्दलच्‍या प्रकरणावर प्रतिक्रीया देताना गुलाबराव पाटील माध्‍यमांशी बोलत होते. राज्‍यात सुरू असलेल्‍या राजकीय…

Read More

मुंबई : वृत्तसंस्था  महाविकास आघाडीमधील महत्वाचा पक्ष मानला जाणारा राष्ट्रवादी कॉंग्रेसचे दिग्गज नेते अजित पवार आपल्या पक्षावर नाराज असल्याच्या चर्चा राज्यभर सुरु झाल्या आहे. अजित पवार राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये नाराज असल्याच्या चर्चा आहेत. मात्र, या अफवा असल्याचे म्हणत स्वतः अजित पवार, शरद पवार आणि महाविकास आघाडीतून जोरदार खंडन सुरू आहे. असे संशयाचे चित्र असताना आज अजित पवार यांनी सोशल मीडियावरील पक्षाचे नाव आणि चिन्ह असलेला वॉलपेपर हटवला. त्यामुळे हे धुके गडद झाले आहे. शरद पवार यांनी आजच पत्रकार परिषद घेऊन अजित पवार नाराज नाहीत. ते भाजपमध्ये पक्षप्रवेश करणार नसल्याचे स्पष्टपणे सांगितले. मात्र, महाराष्ट्राच्या राजकारणातील राजकीय धुळवड सर्वोच्च न्यायालयाच्या निकालापूर्वी रंगताना दिसते…

Read More

मुंबई : वृत्तसंस्था  राज्यात सध्या पक्षांतरांचे वारे वाहू लागले आहेत. तर अजित पवार यांच्या पक्ष बदलणार असल्याच्या चर्चा राजकीय वर्तुळात रंगल्या आहेत. अशातच राज्याच्या राजकारणातून एक मोठी बातमी समोर आली आहे. राष्ट्रवादीचे नेते धनंजय मुंडे नॉट रिचेबल असल्याची चर्चा रंगली आहे. राज्यात सुरू असलेल्या राजकीय चर्चेनंतर राष्ट्रवादीचे आमदार धनंजय मुंडे मुंबईकडे रवाना झाल्याची चर्चा आता जोर धरू लागली आहे. धनंजय मुंडेंचे दोन्ही नंबर संपर्क क्षेत्राच्या बाहेर आहेत. दरम्यान धनंजय मुंडे हे काल देखील संभाजीनगरला जाऊन आले आहेत. मात्र त्यानंतर धनंजय मुंडे हे नॉट रिचेबल झाले आहेत त्यामुळे राजकीय वर्तुळात चर्चेला उधाण आलं आहे. याबाबतची माहिती एका वृत्तवाहिनीने दिली आहे.

Read More

जळगाव जिल्ह्यातील महिलांवर होणाऱ्या अत्याचाराचे प्रमाण दिवसेदिवस वाढत जात आहे. यात पुन्हा या घटनेची भर पडली आहे.  सून व सासऱ्याचे नाते अगदी वडील व मुलगी प्रमाणे असते पण याच नात्याला जळगाव जिल्ह्यातील धरणगाव तालुक्यात काळिमा फासला गेला आहे. धरणगाव तालुक्यातील १९ वर्षीय सुनेवर अत्याचार केल्याप्रकरणी सासऱ्याविरोधात धरणगाव पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सविस्तर वृत्त असे कि, धरणगाव तालुक्यातील एका गावात रहिवासास असलेल्या सुनेला सासऱ्याने दि २९ मार्च ते ११ एप्रिल या दरम्यान शेतात व राहत्या घरात वेळो वेळी जबरदस्ती चुकीचे कृत्य केले म्हणून सुनेने पोलिसात धाव घेत सासऱ्याविरोधात गुन्हा दाखल केला असून पुढील तपास पोउनी.संतोष पवार हे करीत आहेत.

Read More