पाचोरा : प्रतिनिधी जिल्ह्याचे राजकारण परळीत मुंडे भाऊ बहिणीनंतर आता पाचोऱ्यात आणखी एका आमदार भाऊ आणि बहिण राजकारणाच्या आखाड्यात एकमेकांसमोर उभे ठाकणार आहेत. शिवसेनेत फूट पडल्यानंतर ठाकरे गटाला सोडून एकनाथ शिंदे यांच्यासह ४० आमदार यांनी स्वतंत्र गट स्थापन केला. यात जळगाव जिल्ह्यातील पाच आमदारांचा सहभाग होता. यात पाचोरा तालुक्याचे आमदार किशोर पाटील यांचा देखील सहभाग होता. शिवसेनेत फूट पडल्यानंतर डॅमेज कंट्रोल चांगल्याच पद्धतीने ठाकरे गट करीत आहे. शिंदे गटाला आगामी निवडणूक आणि पदोपदी शह देण्यासाठी ठाकरे गट चाल खेळत असून जळगावातील पाचोऱ्यात काल एक चाल खेळून शिंदे गटाला झटका देण्याचा प्रयत्न ठाकरेंकडून झाला. आता पुढे काय होते ते लवकरच कळेल…
Author: editor desk
मुंबई : वृत्तसंस्था गेल्या काही दिवसांपूर्वीच उस्मानाबादचं नामांतर धाराशिव आणि औरंगाबादचं नामांतर छत्रपती संभाजीनगर करण्यात आलं आहे. मात्र आता या नामांतरावर आक्षेप घेण्यात येत आहे. उस्मानाबादच्या नामांतराविरोधात मुंबई उच्च न्यायालयात रीट याचिका दाखल करण्यात आली आहे. सध्या या याचिकेवर सुनावणी सुरू आहे. त्यामुळे न्यायालयाचे पुढील आदेश येईपर्यंत सरकारी कार्यलयांनी उस्मानाबाद नावात बदल करू नयेत असे निर्देश जिल्हाधिकाऱ्यांकडून देण्यात आले आहेत. याबाबत एक पत्रक जिल्हाधिकारी कार्यलयाकडून काढण्यात आलं आहे. कार्यालयीन नावात बदल उस्मानाबादचे नामांतर धाराशिव करण्यास केंद्र आणि राज्य शासनाकडून मान्यता मिळाल्यानंतर काही सरकारी कार्यालयांनी देखील नावात बदल केला होता. मात्र उस्मानाबादच्या नामांतराविरोधात मुंबई उच्च न्यायालयात रीट याचिका दाखल करण्यात आली…
मुंबई : वृत्तसंस्था राज्यातील अनेक तरुण-तरुणी नोकरीच्या शोधात आहेत. काही काही तरुणांनी अनेक ठिकाणी नोकरी देखील केली आहे. पण प्रत्येक ठिकाणी बॉस चांगला असेल असे नाही अनेक ठिकाणी बॉस चांगला आहे पण वेतन कमी आहे. ज्याठिकाणी वेतन चांगले आहे. त्याठिकाणी बॉसचे टेन्शन असे हे समीकरण जुळून आहे. त्यामुळे तुम्ही अशी नोकरी करू शकतात ज्याठिकाणी वेतन देखील बक्कळ असेल व त्याठिकाणी बॉसचे टेन्शन देखील नसेल. सोशल मीडिया आणि ऑनलाइन शॉपिंगच्या युगात ई-कॉमर्ससह अनेक कंपन्यांच्या वेबसाइटला कंटेंट रायटरची गरज आहे. काही कंपन्या कायमस्वरूपी लेखकांना कामावर घेतात तर काही छोट्या कंपन्या फ्रीलांसरद्वारे लेखन करून घेतात. अशा कंपन्यांसाठी तुम्ही फ्रीलान्सिंगचे काम करू शकता. देशातील…
मुंबई : वृत्तसंस्था राष्ट्रवादीचे नेते अजित पवार भाजपात जाणार या चर्चेवर जरी प्रतिक्रिया आल्या असल्या तरी अजित पवार मात्र ज्या ठिकाणी जातात त्या ठिकाणी याच चर्चेवर बोलत असतांना दिसून येत आहे त्यांनी एका हॉटेलच्या उद्घाटनाच्या निमित्ताने अजित पवार आले होते. त्यावेळी त्यांनी गेल्या काही दिवसांपासून सुरु असलेल्या चर्चांसंदर्भात स्पष्टपणे मत मांडले. अजित पवार म्हणाले की, 1967 पासून शरद पवार साहेबांवर बारामतीने विश्वास ठेवला आहे. शरद पवार साहेबांनी माझ्यावर 1990 पासून माझ्यावर विश्वास टाकला आहे. या विश्वासाला मी तडे जाऊ देणार नाही. कोणी काय डोक्यात वेगळा घालायचं प्रयत्न केला तर डोक्यात घेऊ नका, असे स्पष्ट ते भाजपमध्ये जाणार असल्याच्या चर्चांसंदर्भात स्पष्ट…
मुंबई : वृत्तसंस्था सामान्यपणे फळं-भाज्या, मांस किंवा असे आणखी काही पदार्थ जे आपण स्वच्छ करूनच खातो. पण असंच चिकन स्वच्छ करणं एका व्यक्तीला मात्र महागात पडलं आहे. या व्यक्तीने अशा पद्धतीने चिकन स्वच्छ केलं की त्याचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला. त्यानंतर पोलिसांनी या व्यक्तीला अटक केली आहे. आता प्रत्येक जण चिकन स्वच्छ करतो. मग चिकन स्वच्छ करणं गुन्हा आहे का? चिकन स्वच्छ करू नये का? त्यामुळे काही धोका आहे का? चिकन स्वच्छ केल्याने या व्यक्तीला पोलिसांनी अटक का केली? असे एक ना दोन किती तरी प्रश्न तुम्हाला पडले असतील. हे प्रकरण आहे दादरा आणि नगर हवेलीच्या सिल्वासा शहरातील. पोल्ट्री…
जळगाव : प्रतिनिधी ऐनपूर येथील वर्षानुवर्षे चालत आलेली बारागाड्या ओढण्याची परंपरा कोरोना काळ वगळता यंदाही कायम ठेऊन ऐनपूर येथील बारीघाट ते मरिमाता मंदीर बारागाड्या ओढण्यात आल्या. परंतु यात बारगाड्यांचा ताबा सुटल्याने एक जणाचा मृत्यू तर चार ते पाच जण किरकोळ जखमी झाले. ऐनपूर येथे बारागाड्या ओढण्याची परंपरा ही जुनी असून वर्षानुवर्षं येथे बारागाड्या हे ओढण्यात येत असतात, परंतु संपूर्ण देशात कोरोना काळात लॉकडाऊन असल्याने कोरोना काळ वगळता ही परंपरा आजही कायम ठेवण्यात आली होती. अक्षय तृतीयेच्या दुसर्या दिवशी या बारागाड्या ओढण्यात येतात, अक्षयतृतीया निमित्त दि.23 एप्रिल रोजी ऐनपुर येथील बारिघाट येथे या बारागाड्या ओढण्यात आल्या. परंतु त्या ओढत असताना गाड्यांचा…
जळगाव : प्रतिनिधी होणाऱ्या पत्नीला व्हिडीओ कॉल करून हितेश गौतम बागडे (वय २०, रा. नाथवाडा, सिंधी कॉलनी) या तरुणाने राहत्या घरात गळफास घेऊन आपली जीवनयात्रा संपविल्याची धक्कादायक घटना शनिवार दि. २२ एप्रिल रोजी रात्री १० वाजेच्या सुमारास सिंधी कॉलनीतील नाथवाडा येथे घडली आहे. या घटनेबाबत एमआयडीसी पोलिस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. सविस्तर वृत्त असे कि, शहरातील सिंधी कॉलनीजवळील नाथवाडा येथे हितेश बागडे हा सध्या महाविद्यालयीन शिक्षण करीत होता. दोन महिन्यांपूर्वीच त्याचा साखरपुडा झाला होता. नेहमीप्रमाणे रात्री ९ वाजता घराच्या दुसऱ्या मजल्यावर असताना तो भावी पत्नीसोबत व्हिडीओ कॉलवर बोलत होता. त्यानंतर त्याने थेट गळफास घेऊन आत्महत्या केली. हा…
जळगाव : प्रतिनिधी पाचोऱ्यात आज उद्धव ठाकरे यांची जाहीर सभेत शिंदे गटाच्या पदाधिकारी गुलाबराव पाटील यांचे मुखवटे घालून घुसणार होते. तर शिंदे गटाचे पदाधिकारी जळगाव शहरातून शेकडो कार्यकर्ते दुपारी ३ वाजेच्या सुमारास जळगावातून पाचोऱ्याच्या दिशेने निघाले असता त्यांना पोलीस प्रशासनाने शिरसोली रोडवर त्यांचा ताफा अडवला होता. यावर पालकमंत्री गुलाबराव पाटील यांच्याशी संपर्क साधला असता. पालकमंत्री गुलाबराव पाटील म्हणाले कि, स्व.आर.ओ.तात्या पाटील हे माझे चांगले मित्र होते. आ.किशोर पाटील यांचे काका होते. त्यांच्या कार्यक्रमाला विरोध नाही. आम्हाला फक्त संजय राऊत हा माणूस महाराष्ट्रात काही हि बोलत आहे. मी फक्त सांगितले कि, सभेत काही हि बोलू नका आमचे इतकच म्हणणे आहे. पण…
जळगाव : प्रतिनिधी पाचोऱ्यात आज उद्धव ठाकरे यांची जाहीर सभेत शिंदे गटाच्या पदाधिकारी गुलाबराव पाटील यांचे मुखवटे घालून घुसणार होते. तर शिंदे गटाचे पदाधिकारी जळगाव शहरातून शेकडो कार्यकर्ते दुपारी ३ वाजेच्या सुमारास जळगावातून पाचोऱ्याच्या दिशेने निघाले असता त्यांना पोलीस प्रशासनाने शिरसोली रोडवर त्यांचा ताफा अडवला होता. यावेळी पाचोऱ्याचे आ.किशोर पाटील व पोलीस प्रशासनाने शिंदे गटाचे पदाधिकारी याच्याशी मध्यस्थी करीत शिंदे गटाचे पदाधिकारीना पुन्हा जळगावच्या दिशेने माघारी फिरवले आहे. त्यामुळे आता पाचोऱ्यातील उद्धव ठाकरे यांच्या सभेला कुठल्याही प्रकारचा व्यत्यय येणार नाही. यावेळी घटनास्थळी पोलीस दाखल झाले होते. यावेळी शिवसेनेचे जिल्हाप्रमुख नीलेश पाटील यांच्यासह सरीता माळी-कोल्हे, पवन सोनवणे, जितेंद्र गवळी, गणेश सोनवणे,…
जळगाव : प्रतिनिधी जिल्ह्यातील पाचोरा येथे माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची आज जाहीर सभा होत आहे. यामुळे जिल्ह्यात दोन दिवसापासून ठाकरे गट व शिंदे गटात आरोपाच्या फैरी होत होत्या. तर आज शिंदे गटाचे पदाधिकारी पालकमंत्री गुलाबराव पाटील यांचे मुखवटे घालून पाचोऱ्याच्या दिशेने निघाले आहे. त्यामुळे पाचोऱ्यात तगडा पोलीस बंदोबस्तहि लावण्यात आला आहे. दोन दिवसापूर्वी ठाकरे गटाचे नेते संजय राऊत यांनी पालकमंत्री गुलाबराव पाटील यांना आव्हान दिले होते. कि, पाचोऱ्याच्या सभेत तुम्ही घुसून दाखवा त्याला शिंदे गटाच्या कार्यकर्त्यांनी आव्हान दिले असून आज दुपारी ३ वाजेच्या सुमारास शिवसेनेचे जिल्हाप्रमुख नीलेश पाटील यांच्यासह सरीता माळी-कोल्हे यांच्या नेतृत्वात अनेक कार्यकर्ते चारचाकी वाहनातून शिवसैनिक पाचोऱ्याच्या…

