जळगाव तालुक्यातील एका गावातील दोन भाऊ गावापासून काही अंतरावर रानात सरपण गोळा करण्यासाठी गेले असल्याने एका २५ वर्षीय तरुणावर दबा धरुन बसलेल्या बिबट्याने हल्ला चढविल्याची घटना रविवारी सकाळी 11 वाजेच्या सुमारास जळगाव तालुक्यातील मन्यारखेडा परिसरात घडली. यावेळी जखमीच्या भावाने त्याठिकाणी धाव घेत जखमी भावाला तात्काळ शासकीय वैद्यकीय रुग्णालयात दाखल केले. या हल्ल्यात मदन सुखदेव अहिरे (वय- २५) हा तरूण जखमी झाला असून त्याच्यावर उपचार सुरु आहे. जळगाव तालुक्यातील मन्यारखेडा गावात मदन अहिरे हा तरुण वास्तव्यास आहे. त्याचा मोठा भाऊ राजेंद्र सुकदेव अहिरे (वय २८) हा त्याला गावापासून 2 किलोमीटर अंतरावर असलेल्या रानात सकाळी 11 वाजता सरपण गोळा करायला घेवून गेला…
Author: editor desk
मुंबई : वृत्तसंस्था गेल्या काही दिवसापासून कोरोनाच्या रुग्णात वाढ झाली होती पण सध्या कोरोनाची रुग्णसंख्या कमी होत असली तरी मृत्युमुखी पडणाऱ्यांची संख्या मात्र काही केल्या कमी होताना दिसत नाही. तर गेल्या २४ तासांत महाराष्ट्रात कोरोना विषाणूचे ४८९ नवे रुग्ण आढळून आले असून या प्राणघातक विषाणूमुळे एका रुग्णाला आपला जीव गमवावा लागला आहे. यासह, राज्यातील कोविड-19 (COVID-19) बाधित लोकांची संख्या आतापर्यंत 81,65,466 वर पोहोचली असून मृतांची संख्या 1,48,514 वर पोहोचली आहे. सध्या राज्यात मृत्यूचे प्रमाण 1.81 टक्के आहे. रविवारी राज्यात 1126 जणांनी या साथीवर मात केली. यानंतर कोरोनातून बरे होणाऱ्यांची संख्या 80,12,873 झाली आहे. राज्यात कोरोनातून बरे होण्याचे प्रमाण ९८.१३ टक्के…
जळगाव : प्रतिनिधी शहरातील एका परिसरात दरोडा टाकण्याच्या तयारीत असलेल्या पाच जणांना रामानंद नगर पोलिस स्थानकाच्या पोलिस पथकाने ताब्यात घेतले आहे. त्यांच्या विरुद्ध अटकेची कारवाई रात्री उशिरापर्यंत सुरु होती. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, शहरातील कोल्हे नगर परिसरातील शिव कॉलनीच्या शंभर फुटी रत्यावरील प्रतिक पार्क अपार्टमेंट नजीक संशयित आरोपी खुशाल विनोद पांडे, नागेश प्रल्हाद सोनार, मयुर उर्फ विक्की दिपक आलोणे, दुर्गेश सन्यासी आणि वसीम हुसेन पटेल हे पाच जण दरोडा टाकण्याच्या उद्देशाने फिरत असतांनाच पोलिसांनी ताब्यात घेतले आहेत. त्यांच्या विरुद्ध रामानंद नगर पोलिस स्टेशनला भाग 5 गु.र.न. 143/23 भा.द.वि 392, आर्म अॅक्ट 3,4,25 नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. त्यांच्या ताब्यातून लोखंडी…
भुसावळ : प्रतिनिधी शहरातील जामनेर रोडवरील वांजोळा परिसरातील रस्त्याच्या लागून तिसरे शेतात कोरड्या विहिरीमध्ये बिबट्या पडल्याने तो विहिरीच्या कपरात बसून आहे. शिकारीचा पाठलाग करताना बिबट्या कोरड्या विहिरीत पडल्याची घटना मध्यरात्रीच्या सुमारास शहरापासून जवळच असलेल्या निमगाव शिवारात घडली. पहाटेच्या सुमारास ही घटना उघडकीस आल्यानंतर नागरीकांनी बिबट्याला पाहण्यासाठी मोठी गर्दी केली होती. वनविभागाला माजी नगरसेवक पिंटू कोठारी यांनी सकाळी माहिती कळवल्यानंतर सुमारे २२ कर्मचार्यांचा ताफा घटनास्थळी दाखल झाला असून बिबट्याला विहिरीतून बाहेर काढण्याचे प्रयत्न सुरू झाले आहेत. कुर्हा भागात यापूर्वीही बिबट्याचा संचार आढळला असून मध्यरात्री शिकारीचा पाठलाग करताना बिबट्या निमगाव शिवारातील एका कोरड्या विहिरीत कोसळल्याचा अंदाज आहे मात्र विहिर खोल असल्याने त्यास…
भुसावळ : प्रतिनिधी शहरातील शिरपुर कन्हाळा रोडवरील वल्डस्कुलचे बाजुला रोडवर सार्व जागी काही इसम बनावट सोने असल्याचे माहिती असून सुद्धा संबंधित इसमास खरे असल्याचे भासवून फसवणूक करतांना मिळून आले म्हणून दोघांना पोलिसांनी ताब्यात घेतले. मिळालेली माहिती अशी कि, उपविभागीय पोलीस अधिकारी सोमनाथ वाघचौरे यांना बातमीदारांकडून गोपनीय माहिती मिळाल्याच्या आधारे तत्काळ पथक तयार करून घटनास्थळी रवाना केले.पथक दिनांक २९ एप्रिल रोजी 05.15 वाजता शिरपुर कन्हाळा रोडवरील वल्डस्कुलचे बाजुला रोडवर सार्व जागी सापळा रचून होते.काही वेळेनंतर संबंधित आरोपी नामे किसनलाल दौलतराम बागरी वय 36 रा.बल्लुर ता.जि.सिरोही राजस्थान,बाबुलाल ओबाराम बागरी वय 42 रा.लक्ष्मी नगर बिबलसर ता.जि. जालोद राजस्थान हे स्वताचे फायदयासाठी त्यांचे जवळील…
धरणगाव : प्रतिनिधी धरणगाव बाजार समितीच्या निवडणुकीच्या मतमोजणीला सुरुवात झाली असून महायुती आणि महाविकास आघाडीमध्ये प्रचंड चुरस सुरुवातीपासून तर शेवटपर्यत बघायला मिळाली अखेर पालकमंत्री गुलाबराव पाटील यांचे सहकार पॅनलचा धरणगावात डंका वाजला आहे. धरणगाव बाजार समिती ताब्यात घेण्यासाठी राष्ट्रवादीचे माजी मंत्री गुलाबराव देवकर ठाकरे गटाचे नेते सुरेशनाना चौधरी, तसेच ठाकरे गटाची युवा सेनेचे जिल्हाप्रमुख निलेश चौधरी व राष्ट्रवादी काँग्रेसचा एक गट या पद्धतीने बाजार समिती ताब्यात घेण्यासाठी महाविकास आघाडीने जोरदार ताकद लावली होती. धरणगाव बाजार समितीवर शिंदे गटाचे मंत्री गुलाबराव पाटील यांच्या सहकार पॅनलने १८ पैकी १२ जागांवर विजय मिळवत एकहाती सत्ता मिळवली आहे. तर राष्ट्रवादीच्या माजी मंत्री गुलाबराव देवकर…
जळगाव : प्रतिनिधी सहा बाजार समित्यांसाठी रविवारी आज सकाळी दहा वाजेपासून मतमोजणीस सुरुवात झाली आहे. जळगाव कृउबा समितीसाठी शहरातील थोर सन्मित्र कार्यालय येथे मतमोजणीस प्रारंभ झालेला आहे. कृषी उत्पन्न बाजार समितीच्या निवडणुकीत महाविकास आघाडीने दहा जागा मिळवून भाजपा शिंदे गट युतिचा दणदणीत पराभव केला आहे. ग्रामपंचायत सर्वसाधारण मतदार संघातून दोन जागांसाठी सहा उमेदवार रिंगणात होते. यात दहा फेऱ्या होऊन युतीचे मिलींद दत्तात्रय चौधरी 268 मते व अपक्ष पल्लवी देशमुख 364 मते मिळवून विजयी झाले. सर्व साधारण गटातून लक्ष्मण गंगाराम पाटील, सुरेश पाटील, मनोज चौधरी, मनपाचे विरोधी पक्षनेते सुनील महाजन, योगराज सपकाळे, प्रभाकर सोनवणे, शामकांत सोनवणे हे विजयी झाले असून आतापर्यत…
धरणगाव : प्रतिनिधी धरणगाव बाजार समितीच्या निवडणुकीच्या मतमोजणीला सुरुवात झाली असून महायुती आणि महाविकास आघाडीमध्ये प्रचंड चुरस बघायला मिळत आहे. ग्रामपंचायत मतदार संघातील महायुतीचे ‘सहकार’ पॅनलचे ३ उमेदवार तर महाविकास आघाडीचा एक उमेदवार विजयी झाल्याचे कळते. सोसायटी मतदार संघात मात्र, महाविकास आघाडीचे आणि महायुतीमध्ये प्रचंड चुरस बघायला मिळत आहे. धरणगाव बाजार समितीची निवडणुक मोठ्या चुरशीची झाली होती. आज सकाळी मतमोजणी सुरु झाल्यानंतर पहिला निकाल हा पालकमंत्री गुलाबराव पाटील यांच्या बाजूने लागला. हमाल-मापाडी मतदारसंघातील ‘सहकार’ पॅनलचे ज्ञानेश्वर वसंत माळी हे विजयी झाले आहेत. सोसायटी मतदार संघात मात्र, महाविकास आघाडीचे आणि महायुतीमध्ये प्रचंड चुरस असून अवघ्या काही मतांनी दोन्हीकडचे उमेदवार मागेपुढे आहेत.…
धरणगाव : प्रतिनिधी धरणगाव – एरंडोल कृषी उत्पन्न बाजार समितीच्या मतमोजणी आज सकाळी ८ वाजेपासून सुरु झाल्या आहे. तर पहिलाच निकाल पालकमंत्री गुलाबराव पाटील यांच्या नेतृत्वात हमाल मापाडी मतदार संघातून उमेदवार विजयी झाला आहे. धरणगाव कृषी उत्पन्न बाजार समितीच्या निवडणुकीत शिवसेना-भाजप-राष्ट्रवादी (संजय पवार गट) चे सहकार पॅनलच्या पालकमंत्री गुलाबरावजी पाटील, आमदार चिमणराव पाटील, संजय पवार, पी. सी. आबा पाटील यांच्या नेतृत्वात सहकार पॅनल तर महाविकास आघाडीतील सुरेशनाना चौधरी, गुलाबराव देवकर, गुलाबराव वाघ यांच्या वतीने शेतकरी पॅनल हि निवडणूक लढवीत आहे. त्यात सहकार पॅनलचे उमेदवार ज्ञानेश्वर वसंत माळी यांनी बाजी मारली असून त्यांनी शेतकरी पॅनलचे पितांबर महारु पाटील यांना पराभूत केले…
अमळनेर : प्रतिनिधी अमळनेरात हॉटेलमध्ये जेवण करून बिल देण्याच्या वादातून दोन मित्रांवर एकाने चाकू हल्ला केल्याची खळबळ जनक घटना काल रात्री घडली. यातील संशयिताच्या पोलिसांनी नाशिक येथून मुसक्या आवळल्या आहेत. मिळालेल्या माहितीनुसार, शहरातील पैलाड परिसरातील ऋषिकेश श्याम सोनार (वय २२) व तेजस रवींद्र पाटील (22, रा. मिल कंपाऊंड) हे नाशिक जवळील एका देवीचे दर्शन घेऊन अमळनेरात परतले होते. त्यानंतर ते मित्रांसोबत एका हॉटेल मध्ये जेवणासाठी गेले. तेथे बिल भरण्यावरून त्यांच्यात वाद झाला. त्यातून त्यांच्यावर चाकू हल्ला करण्यात आला, यात ऋषिकेश सोनार गांभीर जखमी आहे. धुळे सिव्हिल ला बेशुद्ध अवस्थेत आहे. तर तेजस पाटील ही जखमी आहे. यात मुख्य दादू पाटील…

