Author: editor desk

भुसावळ : प्रतिनिधी  एका २८ वर्षीय तरुणाचे दुर्देवी निधन झाल्याची घटना घडली आहे. पुण्याहून आपल्या १५ दिवसांची चिमुकली पाहण्यासाठी व आजीच्या तेराव्यासाठी आलेल्या तरुणाचा उष्माघाताने सोमवारी दुपारी येथे मृत्यू झाला. गिरीश शालिग्राम पाटील (वय २८) असे मृताचे नाव आहे. तो पुणे येथे रेल्वेच्या सेवेत कार्यरत होता. आपल्या आजीच्या तेराव्यासाठी तो ९ रोजी भुसावळ येथे आला होता. गिरीश याला पंधरा दिवसांपूर्वीच मुलगी झाली असून, १४ रोजी पत्नी व बाळाला पाहण्यासाठी तो जामनेर तालुक्यातील गाडेगाव येथे गेला होता. त्यानंतर, नशिराबाद येथे नातेवाइकांकडे गेला होता. १५ रोजी सकाळी त्याची प्रकृती बिघडल्यावर दुपारी त्याला डॉ. मानवतकर यांच्या रुग्णालयात दाखल करण्यात आले. तेथे उपचारादरम्यान दुपारी…

Read More

धरणगाव : प्रतिनिधी  तालुक्यातील वराड येथे पती-पत्नीचे भांडण सोडविण्यासाठी गेलेल्या मजुराचा डोक्यात वीट घालून दि.१४ रविवारी रोजी रात्री खून करण्यात आल्याची धक्कादायक घटना घडली आहे. यात बिसन भोंडा नरगावे (वय ४०) असे मयताचे नाव आहे. मिळालेल्या माहितीनुसार, वराड येथील रामजी ऑइल मिलमध्ये मध्य प्रदेशातील मजूर कामावर आहेत. यात नजरिया शुभाराम कुमारिया (३५) याचे रविवारी रात्री त्याच्या पत्नीशी भांडण सुरू होते. ते सोडविण्यासाठी बिसन नरगावे (रा. करचोली, जि. बडवानी) गेला होता; मात्र त्याला नजरियाने संतापाच्या भरात विटा आणि दगडाने मारहाण केली. यात त्याचा मृत्यू झाला. या प्रकरणी गोटू नरगावे याने दिलेल्या फिर्यादीनुसार नजरिया कुमारीया याला अटक करण्यात आली आहे. पुढील तपास…

Read More

जळगाव : प्रतिनिधी  शहरातील एका परिसरातील १९ वर्षीय तरुणाने आज दि १५ रोजी सकाळी ११ वाजेच्या सुमारास आपल्या घरात आपली जीवनयात्रा संपविल्याची दुर्देवी घटना घडली आहे. या प्रकरणी एमआयडीसी पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद घेण्याचे काम सुरू होते. मिळालेल्या माहितीनुसार, शहरातील सुप्रीम कॉलनीती परिसरातील रहिवासी आकाश सुरेश शेरे (वय-१९) या तरुणाने आज सकाळी राहत्या घरात दोरीने गळफास घेऊन आपली जीवनयात्रा संपविल्याची घटना सकाळी ११ वाजेच्या सुमारास उघडकीस आली आहे. या घटनेची माहिती मिळाल्यानंतर नातेवाईक व मित्रपरिवार यांनी जिल्हा शासकीय रुग्णालयात गर्दी केली होती. सुप्रीम कॉलनी परिसरात आकाश शेरे हा आपल्या आई सविता आणि लहान भाऊ दीपक यांच्यासोबत रहायला होता. एमआयडीसी…

Read More

अमळनेर : प्रतिनिधी  शहरात यात्रा बघण्यासाठी येत असलेल्या रिक्षाचा अपघात झाला आहे. यात २१ वर्षीय तरुणीचा मृत्यू तर दोन जण जखमी झाल्याची बातमी समोर आली आहे. १३ मे रोजी रात्री साडेआठ वाजेच्या सुमारास अमळनेर तालुक्यातील मेहेरगाव फाट्याजवळ यात्रेसाठी रिक्षातून जात असताना दुसऱ्या वाहनाने धडक दिल्याने रिक्षा उलटली. या अपघातात रिक्षातील २१ वर्षीय तरुणीचा मृत्यू झाला असून दोन जण जखमी झाल्याची घटना घडली. या अपघातात अश्विनी गुलाब भामरे असं मयत तरुणीचं नाव आहे. १६ एप्रिल रोजी अश्विनी हिचे लग्‍न ठरले होते. मात्र, लग्नाची तारीख अद्याप ठरली नव्हती. तत्पूर्वीच अश्विनीवर अपघाताच्या रुपाने काळाने झडप घातली. या अपघात प्रकरणी मारवड पोलीस ठाण्यात गुन्हा…

Read More

कजगाव : प्रतिनिधी  जळगाव  जिल्‍ह्यात उष्णतेची लाटेमुळे तापमानाचा पारा या आठवड्यात अधिक वाढला आहे. यामुळे उष्माघाताने तीन दिवसात मृत्यू होणाऱ्यांची संख्या वाढली आहे. कजगाव येथील तरुण अक्षय रत्नाकर सोनार (वय २९) याचा उष्माघाताने मृत्यू झाल्याची घटना समोर आली आहे. राजस्थान कडील गरम वाऱ्यांमुळे जळगाव जिल्ह्यात राज्यासह उष्णतेची लाट आहे. त्यातच वाढत्याच शनिवारी (ता.१३) संध्याकाळी अक्षय सोनार याला अस्वस्थ वाटू लागले. यानंतर चाळीसगाव येथील खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र उपचार सुरू असताना त्याचा मृत्यू झाला. अक्षय हा सुवर्णकार समाजाचे माजी अध्यक्ष रत्नाकर सोनार यांचा थोरला मुलगा होता. अक्षयच्‍या मागे दीड वर्षाचा मुलगा, पत्नी, आई, वडील, एक भाऊ असा परिवार आहे.

Read More

मुंबई : वृत्तसंस्था  सुप्रीम कोर्टाने दिलेल्या निकालानंतर उद्धव ठाकरे गट आक्रमक झालेला आहे. सोळा आमदारांच्या अपात्रते बाबत विधानसभा अध्यक्षांनी निर्णय घ्यावा असे सुप्रीम कोर्टाचे आदेश आहेत. त्यानुसार विधानसभा अध्यक्षांनी हा निर्णय घ्यावा यासाठी ठाकरे झाला असून ते आज विधानसभा अध्यक्षांना 79 पानांची निवेदन देणार आहे, अशी माहिती विश्वासनीय सुत्रांकडून मिळत आहे. महाराष्ट्रातील सत्ता संघर्षावर सुप्रीम कोर्टाने दिलेला निकालावर उद्धव बाळासाहेब ठाकरे गट हे आक्रमक झाले असून. बेकायदेशीर पद्धतीने तयार झालेले सरकारवर न्यायालयाने ठपका ठेवलेला आहे. तसेच 16 आमदारांच्या अपात्रतेबाबत विधानसभा अध्यक्षांनी निर्णय घ्यावा याबाबत ही निर्णय दिलेला आहे. त्यानुसार विधानसभा अध्यक्षांनी लवकरात लवकर यावर प्रक्रिया करावी असा जोर आता उद्धव…

Read More

नंदुरबार : वृत्तसंस्था  प्रेमसंबंधाचे ब्रेक अप झाल्यानंतर संतप्त झालेल्या माजी प्रियकराने भावासोबत घरी जाणाऱ्या मुलीला रस्त्यात गाठून पळवून नेण्याचा प्रयत्न केला. यावेळी आड आलेल्या भावाने विरोध केल्यानंतर त्याला मारहाण करत, मुलीला जिवंत सोडणार नाही, अशी धमकी दिल्याचा प्रकार नंदुरबार शहरात घडला आहे. याप्रकरणी १९ वर्षीय युवतीने फिर्याद दिली आहे. नंदुरबार तालुक्यातून शिक्षणासाठी येणाऱ्या १९ वर्षीय तरुणीचे नांदरखेडा येथील राजेंद्र सुरेश सूर्यवंशी (२४) या युवकासोबत प्रेमसंबध होते; परंतु कालांतराने दोघांच्यात ‘ब्रेक अप’ झाला होता. या ब्रेकअपमुळे सैरभैर झालेला राजेंद्र सातत्याने युवतीचा पाठलाग करून तिची मनधरणी अथवा भांडण करत होता. १२ मे रोजी युवती दुपारी शहरातील दुधाळे शिवारातील हस्तीनगरातून भावासह मोटारसायकलीने आपल्या…

Read More

धरणगाव : प्रतिनिधी  राज्यातील अनेक ग्रामपंचायतीमधील लोकनियुक्त सरपंचाचा कार्यकाळ संपलेला आहे. या सरपंचानी गावासाठी अनेक कामे केली आहे. त्यामुळे नक्कीच या सरपंचान गावातील ग्रामस्थाचा मोठा पाठींबा असल्याने सरपंच ज्या दिवशी त्यांचा कार्यकाळ संपत आहे. यादिवशी ते भावूक देखील झाल्याचे दिसले आहे. पण यात चर्चा मात्र एकाच सरपंचाची होत आहे. त्याने थेट गावातील मुख्य चौकात जर माझ्याकडून काही चूक झाली असेल किवा नकळत तुमचे मन दुखले गेले असेल तर मोठ्या मनाने माफ करा असे फलक झळकल्याने राज्यातील अनेक गावामध्ये हे फलक सोशल मिडीयावर व्हायरल होत आहे. धरणगाव तालुक्यातील चांदसर गावातील लोकनियुक्त सरपंच सचिन जगन्नाथ पवार हे मागील निवडणुकीत ग्रामस्थांनी त्यांना निवडून…

Read More

मुंबई : वृत्तसंस्था  महाविकास आघाडीची बैठक नुकतीच पार पडली या बैठकीत उन्हाळ्याची तीव्रता लक्षात घेऊन स्थगिती करण्यात आलेली महाविकास आघाडीची ‘वज्रमूठ’ सभा पुन्हा एकदा सुरू करणार असल्याची चर्चा देखील झाली असल्याची माहिती राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष आणि माजी जलसंपदा मंत्री जयंत पाटील यांनी पत्रकार परिषदेत दिली. देशातील कर्नाटक निवडणुकीत कॉंग्रेसला मोठे यश मिळाल्यानंतर राज्यातील महाविकास आघाडी देखील मोठ्या जल्लोषात पुन्हा कामाला लागली आहे, गेल्या महिन्याभरापासून वज्रमुठ सभा थांबविण्यात आली होती ती पुन्हा आता सूरु होणार असल्याची चर्चा सध्या सुरु झाली आहे. भविष्यात येणाऱ्या लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीसाठी तिन्ही पक्षाचे प्रमुख आणि इतर घटक पक्ष बसून जागा वाटपाबाबत चर्चा करणार आहोत. याशिवाय…

Read More

रावेर : प्रतिनिधी तालुक्यातील एका गावातील ३१ वर्षीय महिला घराबाहेर कपडे धूत असतांना दोन इसमांनी जवळ येत विनयभंग केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. या प्रकरणी दोघाविरोधात रावेर पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मिळालेल्या  माहितीनुसार, रावेर तालुक्यातील एका गावात ३१ वर्षीय महिला आपल्या परिवारासोबत रहायला आहे. दि १० मे रोजी दुपारी १२ वाजेच्या सुमारास महिला घरी एकटी असतांना घराच्या ओट्यावर कपडे धूत असतांना गावातील दोन इसम या ठिकाणी येत महिलेजवळ उभे राहिल्याने महिलेणे सांगितले कि कपड्याचे पाणी तुमच्या अंगावर उडेल त्यामुळे तुम्ही दूर जा त्यांनी उलट महिलेला बोलले कि, तु काही माधुरी दीक्षित आहे का ? तुला एक दिवस उचलून…

Read More