भुसावळ : प्रतिनिधी शहरातील “नगरपालिका दवाखान्यासमोरील व्यापारी संकुलात असलेल्या न्यू गुजराती स्वीट मार्ट व मॉडर्न रोड गोपी शॉपिंग मॉल या दुकानाच्या मालकांना दोघा अज्ञातांनी अनुक्रमे १० व २० हजार अशी खंडणी मागून धमकावल्याप्रकरणी दोघांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, शहरातील नगरपालिका दवाखान्यासमोरील न्यू गुजराती स्वीट माचे मालक कपिल मेहता हे दुपारी १:२० मिनिटांनी दुकानाच्या काउंटरवर बसलेले असताना २० ते २५ वर्षे वयोगटातील दोन तरुण तोंडावर रुमाल बांधून काउंटरजवळ आले व मोबाइल घेऊन ‘बात कर लो’, असे म्हणून फोन हातात दिला. पलीकडून ‘राजा बात कर रहा हूँ. पाच मर्डरवाला बोल रहा हूँ. आज जो लड़के दकान पे आये उनके…
Author: editor desk
नवी दिल्ली : वृत्तसंस्था गेल्या दोन महिन्यापासून देशाचे केंद्रीय रस्ते वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांना जीवे मारण्याची धमकी देण्यात आली होती आता पुन्हा एकदा त्यांच्या दिल्लीतल्या निवासस्थानी धमकी मिळाली आहे. केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांना काल संध्याकाळी त्यांच्या दिल्लीतील निवासस्थानी फोन करून जीवे मारण्याची धमकी देण्यात आलेली आहे. गडकरींच्या कार्यालयाने दिल्ली पोलिसांना याची माहिती दिली आणि आता पोलिसांकडून या प्रकरणाचा तपास सुरू आहे. ‘एएनआय’ने यासंदर्भातील वृत्त दिले आहे. दिल्ली पोलिसांचे म्हणण्यानुसार, केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या निवासस्थानी आलेल्या जीवे मारण्याच्या धमकीच्या फोनची माहिती त्यांच्या कर्मचाऱ्यांनी पोलिसांना दिली होती. पोलिस सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, घटनेची पडताळणी केली जात असून, तपास सुरू आहे.…
मुंबई : वृत्तसंस्था राज्यात गेल्या आठवड्यापासून तापमान वाढत आहे. यात जळगाव जिल्ह्यात दोन ते तीन बळी या उष्मघाताने घेतले असून राज्यातील विदर्भात तापमानाचा पारा ४५ अंश सेल्सिअसच्या वर गेला असताना बुधवार १७ मे पासून पुन्हा तापमानवाढीचा इशारा भारतीय हवामान खात्याने दिला आहे. महाराष्ट्रातील अनेक भागात तापमान दोन ते तीन अंश सेल्सिअसने वाढण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे. गेल्या काही दिवसांत राज्यातील तापमानात सातत्याने बदल होताना दिसून येत आहेत. अवकाळी पावसानंतर राज्यातील काही भागांमध्ये तापमानाचा पारा ४५ अंश सेल्सिअसवर जाऊन पोहोचला आहे. राज्यातील सर्वाधिक तापमानाची नोंद विदर्भातील अकोला शहरात घेण्यात आली. तर उर्वरित शहरांमध्येदेखील हा पारा ४२ ते ४४च्या दरम्यान होता. सोमवारी…
मुंबई : वृत्तसंस्था भारत हा देश कृषीप्रधान असल्याने देशाची अर्थव्यवस्था शेतीवर अवलंबून आहे. तर यंदा देखील मान्सून उशिराने दाखल होण्याचा अंदाज वर्तवण्यात येत आहे. अंदमानमध्ये मान्सून उशिराने दाखल होणार असल्याचा अंदाज स्कायमेटने वर्तवला आहे. यंदा मान्सूनची सुरुवात कमकुवत दिसत असल्याने विलंबाने मान्सून दाखल होणार असल्याचं सांगितलं जात आहे. संपूर्ण भारतीय अर्थव्यवस्था मान्सूनवर अवलंबून असते. २२ मे रोजी दरवर्षी मान्सून देशात दाखल होतो आणि १ जून रोजी केरळमध्ये येतो. परंतु यावर्षीची परिस्थिती वेगळी आहे. चक्रीवादळ आणि बदललेल्या परिस्थितीमुळे २२ मेची तारीख हुकणार आहे. केरळमध्ये नेमका कधी येणार, याबद्दल निश्चितता नाही. मागच्या वर्षी १ जूनच्या ऐवजी ३ जून रोजी केरळमध्ये मान्सून दाखल…
जळगाव : प्रतिनिधी शहरातील रस्त्यासाठी मंजुर झालेल्या शंभर कोटींच्या निधीतून ज्या भागात अमृतची जलवाहिनी व भूमिगत गटारींचे (मलनिस्सारण) काम पूर्ण झाले आहे. त्या भागातील ९१ रस्ते हे 100 कोटीच्या मंजूर निधीतून होणार आहे. शहरातील रस्त्यांच्या काँक्रिटीकरणासाठी शंभर कोटी रुपयांचा निधी आमदार राजूमामा भोळे यांच्या प्रयत्नाने मंजुर झाला. असून या निधीतून २६७ रस्त्यांचे काँक्रिटीकरण केले जाणार आहे. परंतु अमृत २.० योजने अंतर्गंत होणाऱ्या भूमिगत गटारींचे काम शहरातील ६० टक्के भागात बाकी असल्यामुळे त्या भागातील रस्त्यांचे काम करतांना अडचणी निर्माण झाल्या आहेत. म्हणून सध्या भूमिगत गटारी व पाणी पुरवठा लाईनचे काम ज्या ज्या भागात पूर्ण झाले आहे, त्या त्या भागातील रस्ते तयार…
चाळीसगाव : प्रतिनिधी तालुक्यातील एका अल्पवयीन मुलीवर अत्याचार करणाऱ्या आरोपीस चाळीसगाव शहर पोलिसांनी बेड्या ठोकल्या आहे. मिळालेल्या माहितीनुसार, १२ मे रोजी सायंकाळी ६ वाजण्याच्या सुमारास शहरातील एका अल्पवयीन मुलीस तिची आई नातेवाइकांकडे सोडून मजुरीच्या कामासाठी गेली होती. ही अल्पवयीन मुलगी रात्री ८ वाजण्यापूर्वी तिच्या मामेबहिणीसोबत घरी परत येत असताना वाटेत आकाश ऊर्फ सुपड्या विठ्ठल पाटील (वय २९) हा भेटला. मामेबहिणीला त्याने आपण या मुलीला स्कुटीवरून घरी सोडून देतो, असे सांगितले. त्यानंतर अत्याचार केला. त्यावेळी ती मुलगी रडू लागल्याने त्याने ठार मारण्याची धमकी दिली. मुलीने आई-वडिलांना घटना सांगितल्यावर त्यांनी आरोपीच्या घरी जाऊन शोध घेतल्यानंतर आरोपी पळून गेला. पोलिस निरीक्षक संदीप पाटील…
पुणे : वृत्तसंस्था महिलांच्या तपासासाठी गृह विभागाने स्वतंत्र समिती स्थापन करावी आणि शोध मोहिम राबवावी, दर 15 दिवसांनी करण्यात आलेल्या कार्यवाहीचा अहवाल राज्य महिला आयोगास सादर करण्यात यावा, अशी सूचना राज्य महिला आयोगाने गृह विभागाला केली. राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा रुपाली चाकणकर यांनी ही माहिती पत्रकार परिषदेत दिली. राज्य सरकारने हरवलेल्या मुली आणि महिलांचा शोध घेण्यासाठी शक्य तितकी तत्परता दाखवावी, अशी विनंती रुपाली चाकणकर यांनी केली आहे. पाहिजे तशी तत्परता राज्य सरकारकडून दाखवली जात नसल्याचंही त्या म्हणाल्या. राज्य सरकारच्या कार्यशैलीवर प्रश्न उपस्थित करत नाहीत, मात्र या प्रकरणात ज्या तत्परतेने काम व्हायला हवं होतं ते होताना दिसत नाही, असं राज्य महिला…
धरणगाव : प्रतिनिधी जल जीवन मिशन अंतर्गत “ हर घर नल से जल ” ही योजना यशस्वी करून लोकांपर्यंत पाणी पोहोचविणे हेच मिशन मानून ग्रामपंचायत व ठेकेदार यांनी समन्वय ठेवून मुदतीत व दर्जेदार पध्ततीने पा. पु. योजना पूर्ण करण्याचे आवाहन केले. साळवा गावाच्या विकासाठी सर्वानीच एकजुटीने प्रयत्न करा. आपल्या पासून जनहित सध्या व्हावे कोणीही दुखावले जावू नये यासाठी पक्ष्याच्या कार्यकर्त्यांनी झटावे. पक्ष हा कार्यकर्त्यांवर अवलंबून असतो. आम्ही शिवसेना पक्ष सोडला नसून गद्दार कसे म्हणाता ? खरे गद्दार कोण हे जनतेला माहित आहे. ज्वलंत हिंदुत्वासाठी , मराठी माणसाच्या न्याय हक्कासाठी आणि बाळासाहेबांच्या विचारांसाठी आमचा लढा आहे. त्यासाठीच आम्हाला उठाव करावा लागला.…
धरणगाव : प्रतिनिधी पिंपळे फाटा ते शगुन जिनिंगदरम्यान दुचाकीची समोरासमोर धडक होऊन एका इसमाचा मृत्यू झाल्याची घटना सोमवारी दुपारी घडली. याप्रकरणी वासुदेव हिलाल चित्ते यांच्या फिर्यादीवरून गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मिळालेल्या माहितीनुसार, चोपडा येथील इस्त्रीचे काम करणारे महेंद्र हिलाल चित्ते (४०) हे मोटारसायकलने (एमएच १९ एडब्ल्यू ४६९७) चोपडा येथून येत असताना त्यांच्या दुचाकीला पवन कैलास कोळी याच्या दुचाकीने (एमएच १९ डीट १९५८९) धडक दिली. त्यात महेंद्र चित्ते यांच्या डोक्याला मार लागल्याने त्यांचा मृत्यू झाला. अपघातात पवन कोळी हाही जखमी झाला आहे. तपास हेड कॉन्स्टेबल सय्यद करीम अमजद करीत आहेत.
जळगाव : प्रतिनिधी जळगाव तालुक्यातील धानवड गावाजवळील तलावामध्ये मित्रांसोबत पोहण्यासाठी गेलेल्या करण जयराम पवार (११, रा. चिंचोली) या बालकाचा बुडून मृत्यू झाल्याची दुर्देवी घटना सोमवारी दुपारी ४ वाजता घडली. दरम्यान, सायंकाळी मृतदेह जिल्हा रुग्णालयात आणल्यानंतर कुटूंबीयांसह ग्रामस्थांची गर्दी झाली होती. याप्रकरणी एमआयडीसी पोलिसात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. मिळालेल्या माहितीनुसार, सोमवारी दुपारी चिंचोली येथील करण हा गावातील आपल्या दोन सवंगड्यांसोबत धानवड गावाजवळील तलावात पोहण्यासाठी गेला. करण हा खोल पाण्यात गेल्याने तो बुडाला. तलावात गाळ असल्यामुळे तो वर येवू शकला नाही. त्यामुळे अन्य दोघांनी आरडा-ओरड गेली. आरडा-ओरड एकून जवळच काम करणाऱ्या लोकांनी घटनास्थळी धाव घेतली. तोपर्यंत करण याचा बुडून मृत्यू झाला…

