Author: editor desk

जामनेर : प्रतिनिधी  तालुक्यातील एका गावात राहणाऱ्या ३० वर्षीय महिलेचा जुन्या भांडणाच्या कारणावरून वादातून पतीला मारहाण करीत महिलेचा विनयभंग केल्याचा धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. याप्रकरणी पहूर पोलीस स्थानकात ३ जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, जामनेर तालुक्यातील एका गावात ३० वर्षीय महिला आपल्या परिवारासह रहायला आहे. दि. २३ रोजी रात्री ९ वाजेच्या सुमारास जुन्या भांडणाच्या कारणावरून गावातील सुनील आत्माराम ठाकरे, अशोक धोंडू धनगर, दीपक भानुदास धनगर यांनी महिलेचा हात पकडून अंगावरील कपडे फाडत तिच्यासोबत लज्जा उत्पन्न होईल असे कृत्य करीत तिच्या पतीला देखील यावेळी मारहाण करत जीवेठार मारण्याची धमकी दिली आहे. या प्रकरणी महिलेने थेट पहूर…

Read More

धरणगाव : प्रतिनिधी  तालुक्यातील कोतवालांची रिक्त पदे भरतीकामी आरक्षण सोडतबाबतचे पत्रक जारी झाले असून आता या पदावर लवकर आरक्षण सोडत निश्चित केलेली आहे. त्यामुळे तालुक्यातील ६ गावांना कोतवाल मिळणार आहे. मिळालेल्या माहितीनुसार धरणगाव तालुक्यातील गारखेडा, बांभोरी बु., कल्याणे बु., पष्टाणे बु., चांदसर बु., जांभोरा बु., याठिकाणी कोतवालांची रिक्त पदे भरतीकामी आरक्षण सोडत बाबतचे पत्रक जारी झाले आहे. त्यात म्हटले आहे कि, धरणगांव तालुक्यातील कोतवाल संवर्गातील पदे भरणेकामी कार्यवाही सुरू आहे. सदर कामी दिनांक २६ मे रोजी दुपारी १२.०० वाजता तहसिल कार्यालय, धरणगांव येथे आरक्षण सोडत निश्चित केलेली असल्याने याबाबत आपल्या स जेतील प्रत्येक गावांतील ग्रामस्थांना जास्तीत जास्त संख्येने उपस्थित राहण्याबाबत दवंडी…

Read More

मुंबई : वृत्तसंस्था  राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या वतीने घेण्यात आलेल्या इयत्ता बारावीच्या परीक्षेचा निकाल उद्या (गुरुवारी) दुपारी 2 वाजता ऑनलाईन स्वरुपात जाहीर करण्यात येणार आहे, अशी माहिती राज्य बोर्डाकडून बुधवारी येथे देण्यात आली. अन्य शिक्षण मंडळांचे बारावीचे निकाल नुकतेच जाहीर झाल्यावर राज्यभरातील लक्षावधी विद्यार्थी, पालक आणि शिक्षकांना राज्य बोर्डाच्या बारावीच्या निकालाची प्रतीक्षा होती. मे महिन्याच्या अखेरीस निकाल जाहीर होईल, अशी माहिती सांगितली जात होती. मात्र, मे महिन्याच्या अगदी अखेरीऐवजी राज्य बोर्डाने 25 मे रोजी बारावीच्या निकालाची तारीख जाहीर करून सुखद धक्का दिला आहे. राज्य शिक्षण मंडळाच्या वतीने फेब्रुवारी आणि मार्च 2023 दरम्यान इयत्ता बारावीची परीक्षा राज्यातील नऊ…

Read More

जळगाव : प्रतिनिधी  जिल्ह्यातील अनेक ठिकाणी अवैध वाळू वाहतुक करणार्‍या वाहनांवर महसूल प्रशासन कारवाई करून जप्त केलेला वाळूचा ट्रक चक्क जिल्हाधिकारी कार्यालयातून पळवून नेल्याची घटना दुपारच्या सुमारास घडली आहे. या प्रकरणी जिल्हा पेठ पोलिसात गुन्हा देखील दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, जळगाव जिल्हाधिकारी कार्यालय परिसरात अवैध वाळूचा ट्रक जप्त करण्यात आला होता. या सर्व वाहनांवर देखरेखीसाठी पोलीस मुख्यालयातील बाळू पाटील, अविनाश जाधव, गौरख पाटील व तुषार सोनवणे यांची गार्ड म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. दि.२३ रोजी मंगळवारी बाळू पाटील व अविनाश जाधव हे ड्युटीवर असतांना दुपारी सव्वा दोन वाजेच्या सुमारास त्यांना गाडी सुरु होण्याचा आवाज आला. त्यांनी त्याठिकाणी…

Read More

जळगाव  : प्रतिनिधी  शहरातील एका परिसरात दुचाकीवरून आलेल्या चोरट्यांनी तरुणाच्या हातातील मोबाईल लांबवला. ही जळगाव शहरातील हॉटेल कमल पॅराडाईज समोरील रोडवर जानेवारी महिन्यात घडली होती मात्र तब्बल चार महिन्यानंतर तरुणाने तक्रार दिल्यावरून मंगळवार, 23 मे रोजी दुपारी अज्ञात चोरट्यांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मलकापूर तालुक्यातील म्हैसवाडी येथील १८ वर्षीय तरूण जयेश प्रकाश राणे हा जळगाव शहरात शिक्षणानिमित्त रहायला आहे. ११ जानेवारी रोजी रात्री साडेआठ वाजेच्या सुमारास जयेश हा जळगाव भुसावळ रोडवरील हॉटेल कमल पॅराडाईज समोरील रोडवरून मोबाईलवर बोलत पायी जात असताना त्याच्या मागून दोन अज्ञात चोरटे दुचाकीवरून आले व काही कळण्याआत त्यांनी जयेशच्या हातातील 13 हजार रूपये…

Read More

धरणगाव : प्रतिनिधी  तालुक्यातील चमगाव रस्त्यावर आज सकाळच्या सुमारास एक ट्रक खताने भरलेला कृषी विभागाला मिळालेल्या गोपनीय माहितीनुसार घटनास्थळी पोहचले असता. ट्रकचा चालक क्लीनर फरार होण्यात यशस्वी झाल आहे. त्यामुळे धरणगाव तालुक्यात एकच खळबळ उडाली आहे. मिळालेल्या माहितीनुसार , तालुक्यातील चमगाव रस्त्यावर आज सकाळी ट्रक (एमएच १८, बीजी ५८०३) मधून एका पिकअप व्हॅनमध्ये खताची गोणी भरली जात असल्याची माहिती कृषी विभागाच्या अधिकाऱ्याना मिळून आली असता त्यांनी घटनास्थळी धाव घेत पाहणी केली असता त्या गाडीचा चालकासह क्लीनर फरार होण्यात यशस्वी झाला होता त्यांनी त्यानंतर त्यांनी पिकअप वरील चालकाला खतांची गोणी कोणत्या शेतकऱ्याकडे घेऊन जात असल्याचे विचारले असता, त्याला काहीही सांगता आले…

Read More

धरणगाव : प्रतिनिधी  तालुक्यातील चमगाव रस्त्यावर आज सकाळच्या सुमारास एक ट्रक खताने भरलेला भाजप तालुकाध्यक्ष यांनी पकडला त्यानंतर कृषी विभागाला घटनास्थळी पाचारण केल्यानंतर त्यांनी हा ट्रक लागलीच धरणगाव पोलिस स्थानकात आणण्यात आला होता. त्यामुळे धरणगाव तालुक्यात एकच खळबळ उडाली आहे. मिळालेल्या माहितीनुसार , तालुक्यातील चमगाव रस्त्यावर आज सकाळी ट्रक (एमएच १८, बीजी ५८०३) मधून एका पिकअप व्हॅनमध्ये खताची गोणी भरली जात असल्याची माहिती भाजप तालुकाध्यक्ष निर्दोष पवार यांना मिळाली असतान त्यांनी घटना स्थळी जावून विचारपूस केली असता या गाडीतील चालक व एक व्यक्ती फरार होवून गेला आहे. त्यानंतर त्यांनी लागलीच धरणगाव कृषी विभागाचे श्री. चव्हाण यांना फोन करून बोलविले असता…

Read More

जळगाव : प्रतिनिधी  जळगावात दहा दिवसांवर मुलाचे लग्न येवून ठेपल्याने नातेवाईकांसह ऑफिसातील अधिकार्‍यांसह कर्मचार्‍यांना लग्नपत्रिका वाटण्यासाठी गेलेल्या गस सोसायटीतील प्रशासन अधिकारी महेंद्र रामा मोरे (वय -57, रा. जीवननगर) यांचा एरंडोल येथे कार्यालयात हृदयविकाराच्या झटक्याने मृत्यू झाल्याची दुर्देवी घटना मंगळवारी दुपारी 3 वाजेच्या सुमारास घडली. या घटनेमुळे लग्नाच्या घरात शोककळा पसरली आहे. ज्या घरातून येत्या दहा दिवसात लग्नाची वरात निघणार होती त्याच ठिकाणाहून आता वडिलांची दुर्देवी अंत्ययात्रा निघणार आहे. शहरातील जीवन नगरात ग. स. सोसायटीचे प्रशासन अधिकारी महेंद्र रामा मोरे (वय 57) हे आपल्या परिवारासह वास्तव्याला आहेत. त्यांचा मोठा मुलगा विक्रांत याचे दि. 1 जून रोजी विवाह सोळहा होणार आहे. विवाह…

Read More

चाळीसगाव : प्रतिनिधी  शहर पोलिस स्टेशनमधील पथक दि. २२ रोजी बामोशी बाबांच्या दर्गा परिसरात संशयित आरोपींची तपासणी करत असताना एक युवक अल्पवयीन मुलीसोबत आढळून आला. तो तडीपार असलेला गुन्हेगार असून त्याने मुलीला पळवल्याचे समोर आले. अमोल ऊर्फ भावड्या दिलीप वाघ (वय २४ रा. राजापूर, ता. येवला, जि. नाशिक) असे आरोपीचे नाव आहे. त्याला येवला पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले. दर्गा परिसरात संशयितांची तपासणी करीत असताना एक युवक एका अल्पवयीन मुलीसोबत मिळून आला. युवकावर संशय बळावल्याने त्यास ताब्यात घेऊन चौकशी केल्यावर प्रकार उघडकीस आला. येवला तालुका पोलिस स्टेशन जि. नाशिक येथे संपर्क साधला. त्यावेळी त्याने अल्पवयीन मुलीला फूस लावून पळवून आणल्याचे समोर…

Read More

जळगाव : प्रतिनिधी  अमळनेर शहरातील गांधलीपुरा भागातील चार वेळा हद्दपार झालेला सराईत गुन्हेगार काजल उर्फ रशीद शेख (वय ३७) याच्यावर पोलिसांनी एमपीडीए कारवाई करून पहाटेच अमरावती मध्यवर्ती कारागृहात रवाना केले आहे. पोलिस निरीक्षक विजय शिंदे यांनी पदभार घेताच पाच महिन्यात चार सराईत गुन्हेगारांवर एमपीडीए कारवाई झाली आहे. काजल उर्फ रशीद शेख हा सराईत गुन्हेगार समजला जात होता. चार वेळा हद्दपार, पाच वेळा प्रतिबंधात्मक कारवाई सह त्याच्यावर जबरी चोरी करणे, खंडणी मागणे, धारदार शस्त्र, बंदुकीचा वापर, स्फोटक पदार्थ बाळगणे, जातीयवादीगुन्हे करणे, दंगल माजवणे, शासकीय कामात अडथळे निर्माण करणे, तसेच आदेशाचे पालन न करणे, जुगार, धमकावणे असे विविध प्रकारचे २७ गुन्हे दाखल…

Read More