Author: editor desk

अमरावती : वृत्तसंस्था  राज्यातील भाजप व शिंदे सरकारचा मंत्री मंडळावर नेहमी आपली बाजू मांडणारे आ.बच्चू कडू हे सातत्याने आक्रमक पवित्रा घेत असतात पण सध्या अमरावती लोकसभा मतदारसंघावर प्रहारच्या बच्चू कडू यांनी दावा केल्याने खासदार नवनीत राणा यांची डोकेदुखी वाढली आहे. अमरावती लोकसभा मतदारसंघावर आम्ही लक्ष केंद्रीत केले असून भाजप-शिंदे गटाच्या युतीत आम्हाला ही जागा मिळाली नाही तर आम्ही स्वबळावर लढू, असे बच्चू कडू म्हणाले. काही दिवसांपूर्वी गुवाहाटीतील सौदेबाजीवरून रवी राणा यांनी बच्चू कडू यांना डिवचले होते. यावेळी दोघांमध्ये चांगलेच वाकयुद्ध रंगले होते. नंतर हा वाद थेट हमरीतुमरीपर्यंत आला होता. अखेर मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांच्या मध्यस्थीनंतर हा वाद मिटला. मात्र आता बच्चू…

Read More

जळगाव : प्रतिनिधी  मुख्यमंत्री एकनाथ शिंदे ३ जून रोजी जळगाव दौऱ्यावर येणार आहेत. ‘ शासन आपल्या दारी ‘ कार्यक्रम अंतर्गत जळगाव जिल्ह्यातील ७५ हजार लाभार्थ्यांना त्यांच्याहस्ते योजनांचा लाभाचे वितरण केले जाणार आहे. जळगाव जिल्हाधिकाऱ्यांना संभाव्य दौरा मुख्यमंत्री कार्यालयाकडून शुक्रवारी मिळाला आहे. त्यानुसार प्रशासकीय पातळीवर तयारी सुरू झाली आहे. त्यानुसार मुख्यमंत्री शिंदे हे ३ जून ला दुपारी साडेचार वाजता जी. एस. ग्राऊंडवर लाभार्थ्यांना भेटणार आहेत आणि विविध योजनांचा लाभ वितरित करणार आहेत. ७५ हजार लाभार्थी जिल्हा प्रशासनाने २ लाख २१ हजार ८२९ जणांची लाभार्थी म्हणून नोंद घेतली आहे.या कार्यक्रमासाठी मात्र विविध विभागातील ७५ हजार लाभार्थ्यांची निवड करण्यात आली आहे.त्यांना प्रातिनिधीक स्वरुपात…

Read More

जळगाव : प्रतिनिधी  अमळनेर तालुक्यातील एका रस्त्यावरून घरी जाणाऱ्या तरुणाला भरदुपारी चाकू भोसकून त्याच्याकडील 2 लाखाची रोकड लुटणार्‍या दोन चोरट्यांना स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने ताब्यात घेतले आहे. मिळालेल्या माहितीनुसार, अमळनेर तालुक्यातील ताडेपुरा येथील राजेंद्र रमेश सूर्यवंशी (वय 35) हा सद्या मेहरुण पसिरात राहत असून तो सेंट्रिंग कामाचा ठेकेदार आहे. प्लॉटच्या व्यवहाराच्या दोन लाखांची रोकड घेवून दि. 23 रोजी राजेंद्र सुर्यवंशी हा (एमएच 19, डीएच 6840) क्रमांकाच्या दुचाकीने धरणगाव मार्गे आपल्या गावाकडे जाण्यासाठी निघाला. गावाहून परत येताना तो पत्नीलाही सोबत घेऊन येणार होता. धरणगावपासून पाच किलोमीटरवर असलेल्या म्हसले गावाजवळ अचानक आलेल्या दुचाकीवरील पाच जणांनी त्याला एकटे गाठले. त्याच्या डोळ्यांत तिखट घालून…

Read More

यावल : प्रतिनिधी  तालुक्यातील हिंगोणा शिवारातील एका विहिरीत कुजलेल्या अवस्थेत आढळून आलेल्या महिलेच्या मृत्यू प्रकरणी एका ३३ वर्षीय तरुणाविरुद्ध खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला असून याची कबुली देखील आरोपीने दिली असली तरी त्या महिलेची अद्यापही ओळख पटलेली नाही, त्यामुळे पोलिसांसमोर ओळख पटविण्याचे आव्हान आहे. मिळालेल्या माहितीनुसार, हिंगोणा शिवारात एका विहिरीमध्ये दि.८ रोजी कुजलेल्या स्थितीत महिलेचा मृतदेह आढळून आला होता. या महिलेच्या हातावर ‘सखाराम सुभाष’, असे गोंदलेले होते. याप्रकरणी पोलिसांत प्रथमदर्शनी अकस्मात मृत्यूची नोंद झाली होती. दरम्यान, मयत महिलेसोबत खुमसिंग बारेला याला पाहिल्याची माहिती मिळाल्यावर संशयित आरोपी रावेर तालुक्यातील खिरवळ येथील खुमसिंग सरदार बारेला (वय ३३) असे असून तो सध्या मोर…

Read More

जळगाव : प्रतिनिधी  शहरातील तीन पोलीस स्थानकाच्या हद्दीतील वेगवेगळ्या घटनेत तब्बल १९ जबरी चोरीतील दोन संशयित आरोपींना अटक करण्यात रामानंदनगर पोलिसांना अटक केली असलायची माहिती जिल्हा पोलीस अधीक्षक एम. राजकुमार यांनी शुक्रवार २६ मे रोजी सकाळी ११ वाजता पत्रकार परिषद घेऊन माहिती दिली आहे. शहरातील रामानंदनगर, जिल्हापेठ आणि एमआयडीसी पोलीस ठाण्याच्या हद्दीतील सन २०१८ पासून जबरी चोरीचे करीत असलेला संशयित आरोपी दत्तात्रय अमृत बागुल (वय- 39, रा. मोहाडी जि. धुळे ह.मु. जळगाव) आणि सुधाकर उर्फ जितेंद्र सुरेश महाजन (वय-२५, रा. रामेश्वर कॉलनी, मेहरूण) या दोन जणांना अटक करण्यात आली होती. या दोघांची सखोल चौकशी केली असता दोघांनी तब्बल १९ जबरी…

Read More

जळगाव : प्रतिनिधी कॉंग्रेसचे नेते राहुल गांधी यांचा छत्रपती शिवरायांसाठी लिहिलेल्या गीतावर बनवलेला व्हिडिओ व्हायरल झाला आणि शिवरायांचा अवमान झाला म्हणून संघ-भाजप पिलावळीने बोंब ठोकण्यास सुरुवात केली. छत्रपती शिवराय हे भारतातच नव्हे तर जगभरात आपल्या ऐतिहासिक व अभूतपूर्व कार्यामूळे ओळखले जाणारे थोर रत्न आहेत. त्यांच्या कार्यातून, विचारांतून आणि धोरणांतून जगभरातील शोषणाविरुद्ध लढणारे तमाम कार्यकर्ते प्रेरणा घेत असतात, घेत राहतील. पण शिवरायांचा अवमान झाला म्हणून बोंब ठोकण्याचा नैतिक अधिकार शिवप्रेमाच्या ढोंगाचा बुरखा पांघरलेल्या संघ-भाजप पिलावळीला अजिबात नाही. जय भगवान गोयल या संघ-भाजप परिवारातील तथाकथित लेखकाने ‘आज के शिवाजी नरेंद्र मोदी’ नावाचे पुस्तक लिहिले. या पुस्तकाच्या मथळ्यावरुन तर नरेंद्र मोदींची तुलना शिवरायांशी…

Read More

मुंबई : वृत्तसंस्था  दुकानाचं उद्घाटन असो वा एखाद्याचा जन्म दिवस गौतमीच्या कार्यक्रमाशिवाय सेलिब्रेशन पुढे जातच नाही. यामुळे सध्या गौतमी आणि कार्यक्रमात राडा हे जणू समीकरणच बनत चाललं आहे. यामुळे अनेकदा वाद निर्माण झाले आहेत. यातच आता गौतमीच्या आडनावावरून वाद निर्माण झाला आहे. गौतमीचे खरे आडनाव पाटील नसून तिने तिचे खरे आडनाव लपून ठेवल्याचा आरोप मराठा समन्वयक राजेंद्र जऱ्हाड पाटील यांनी केला आहे. यावर काल विरारमध्ये कार्यक्रमासाठी आलेल्या गौतमीने पत्रकारांशी संवाद साधला. त्यावेळी तिने आडनावावरून वाद झालेल्या विषयावर भाष्य केले. ती म्हणाली की, “मी पाटील आहे तर पाटील आडनावच वापरनार ना. मी या गोष्टीकडे लक्ष देणार नाही. मला कोणी काहीही बोलले…

Read More

धरणगाव : प्रतिनिधी  एरंडोल तालुक्यातील कृषी उत्पन्न बाजार समितीची निवडणुक जिल्ह्यात चर्चेत आलेली होती. त्यानंतर या समितीवर पालकमंत्री गुलाबराव पाटील यांनी एक हाती सत्ता मिळविली आहे. पण आज होणाऱ्या सभापती पदासाठी होणाऱ्या निवडणुकीत चर्चेला उधान आले आहे. मिळालेल्या माहितीनुसार, धरणगाव – एरंडोल तालुक्यातील कृषी उत्पन्न बाजार समितीची आज सभापतीपदी निवडणूक होत आहे. यात प्रामुख्याने शिवसेनेचे तालुका प्रमुख गजानन नाना पाटील यांच्या पत्नी लताबाई गजानन पाटील या नावाची जोरदार चर्चा सुरु आहे. गजानन पाटील हे जिल्हा पालकमंत्री गुलाबराव पाटील यांच्या सोबत तब्बल २५ वर्षापासून एकनिष्ठ काम करीत असून त्यांना हि संधी मिळणार असल्याची चर्चा जोर धरीत आहे.

Read More

धरणगाव : प्रतिनिधी  तालुक्यातील चमगाव रस्त्यावर दोन दिवसा आधी सकाळच्या सुमारास एक ट्रक खताने भरलेला कृषी विभागाला मिळालेल्या गोपनीय माहितीनुसार पकडण्यात आला होता. घटनास्थळावरून ट्रकचा चालक क्लीनर फरार होण्यात यशस्वी झाल होता. हि गाडी धरणगाव कृषी कार्यालयात लावण्यात आली असून अधिकारीनी नमुने घेत ते तपासणीसाठी पाठविण्यात आल्याची माहिती मिळाली आहे. मिळालेल्या माहितीनुसार , तालुक्यातील चमगाव रस्त्यावर ट्रक (एमएच १८, बीजी ५८०३) मधून एका पिकअप व्हॅनमध्ये खताची गोणी भरली जात असल्याची माहिती कृषी विभागाच्या अधिकाऱ्याना मिळून आली असता त्यांनी घटनास्थळी धाव घेत पाहणी केली असता त्या गाडीचा चालकासह क्लीनर फरार होण्यात यशस्वी झाला होता. त्यानंतर कृषी अधिकारी यांनी हि गाडी धरणगाव…

Read More

धरणगाव : प्रतिनिधी  जिल्ह्याचे पालकमंत्री गुलाबराव पाटील यांनी आपल्या विकास कामांचा धडाका आजही कायम असून आज धरणगाव तालुक्यातील नारणे या गावात विकास कामाचे भूमिपूजन व जाहीर सभेचे आयोजन करण्यात आले आहे. राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली व उपमुख्यमंत्री देवेद्र फडणवीस, मंत्री गिरीश महाजन यांच्या सहकार्याने पालकमंत्री गुलाबराव पाटील यांच्या हस्ते आज दि २६ रोजी धरणगाव तालुक्यातील नारणे या गावी जल जीवन मिशन पाणी पुरवठा योजनेचे २४ लाखांचे काम तर २५/१५ अंतर्गत कॉंक्रीटीकरणाचे ५ लाखांच्या कामासह शेत शिवार बंधाराचे कामाचे भूमिपूजन आज होत आहे. या कार्यक्रमाप्रसंगी पालकमंत्री गुलाबराव पाटील यांची तोफ धडाडणार आहे. त्यामुळे राज्यातील अनेक नेत्यांचे लक्ष या जाहीर…

Read More