Author: editor desk

मुंबई : वृत्तसंस्था  दिग्गज अभिनेता असलेला सलमान खानने नुकतेच एका चित्रपटानं ईद दिवशी चांगली कमाई केली होती. पण त्यानंतर या चित्रपटानं म्हणावी तशी कमाई केलेली नाहीये. 150 करोडच्या बजेटमध्ये बनवलेल्या या चित्रपटाला प्रेक्षकांनी मोठ्या प्रमाणात पसंती दर्शवली नसून या चित्रपटाची कमाई जास्त झालेली नाहीये. मिळालेल्या माहितीनुसार, या चित्रपटानं विदेशी बॉक्स ऑफिसवर जवळपास 52.75 कोटींची कमाई केली आहे. तर भारतात सलमानच्या या चित्रपटानं 20 कोटी एवढी कमाई केली आहे. तसंच महामारीनंतर हा चित्रपट पठाण चित्रपट वगळता सर्वाधिक कमाई करणारा चित्रपट ठरला आहे. विशेष म्हणजे या चित्रपटानं कमाईच्या बाबतीत केजीएफ 2 आणि ब्रह्मास्त्र या चित्रपटांना मागे टाकलं आहे. दरम्यान, ‘किसी का भाई…

Read More

जळगाव : प्रतिनिधी  राज्यातील बारावीचा निकाल नुकताच घोषित झाला आहे. यात जळगाव जिल्ह्याचे पालकमंत्री गुलाबराव पाटील यांचे स्वीय सहाय्यक गोविंदा पाटील यांची कन्या कु. मृणाली पाटीलने १२ वी वाणिज्य विभागात मु.जे. महाविद्यालयात ९६.८३ टक्के गुण मिळवून यश मिळवले असून मृणालीला तब्बल दोन विषयात पैकीच्या पैकी गुण मिळविल्याने तिच्यावर अभिनंदांचा वर्षाव होत आहे. पाणीपुरवठा व स्वच्छतामंत्री गुलाबराव पाटील यांचे स्वीय सहाय्यक गोविंद पाटील यांची कन्या मृणाली गाेविंद पाटील हिला बारावीच्या परिक्षेत ९६.८३ टक्के गुण मिळाले आहे. सुरूवातीपासूनच मृणालीने सीए होण्याचा निश्चय करून वाणिज्य शाखेत प्रवेश घेवून हे यश मिळविले आहे. मृणालीने बुक कीपिंग अकाऊंटंसी आणि आयटी या दोन विषयात पैकीच्या पैकी…

Read More

जळगाव : प्रतिनिधी  शहरातील एका परिसरातील महिला शिक्षिका फुले मार्केट परिसरात आले असता त्यांच्याकडील रोकड चोरट्यांनी चोरून नेल्याची घटना उघडकीस आली आहे. या प्रकरणी शहर पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मिळालेल्या माहितीनुसार, शहरातील फुले मार्केट परिसरात शनिवारी दुपारी दीड वाजेच्या सुमारास शुभांगी सुरेश बडगुजर (रा. पिंप्री खुर्द, ता. धरणगाव) या महिला शिक्षिकेने संसारात काटकसर करून आणि खासगी क्लास ने जमविलेली ७० हजार रुपयांची रोकड अज्ञात चोरट्याने फुले मार्केट परिसरातून लांबविल्याची घटना उघडकीस आली आहे. याप्रकरणी महिलेने गुरुवारी शहर पोलिसात तक्रार दिल्यानंतर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. शुभांगी बडगुजर या घरामध्ये लहान मुलांची खासगी क्लास चालवितात. त्यातून त्यांनी घरखर्च भागवून…

Read More

धरणगाव : प्रतिनिधी  महाराष्ट्राला वारकरी संप्रदायाची मोठी परंपरा लाभलेली आहे. हीच परंपरा पुढे जोपासण्यासाठी राज्यातील अनेक गादीपती व कीर्तनकार आपल्या वाणीतून भाविकांना अध्यात्मिक उर्जा देत असतात. राज्यात कीर्तनकार म्हणून प्रसिद्ध असलेले ह.भ.प.रविकिरण महाराज दोडाईचाकर यांनी आज जळगाव जिल्हा पालकमंत्री गुलाबराव पाटील यांच्या निवासस्थानी भेट दिली आहे. जळगाव जिल्ह्याचे पालकमंत्री गुलाबराव पाटील यांच्या पाळधी येथील निवासस्थानी राज्यातील जनतेला आपल्या वाणीतून अध्यात्मिक संदेश देण्याचे काम करणारे ह.भ.प.रविकिरण महाराज दोडाईचाकर यांनी भेट देवून आशीर्वाद दिले आहेत. यावेळी पालकमंत्री गुलाबराव पाटील, जिल्हा परिषद सदस्य प्रतापराव पाटील यांची उपस्थिती होती. यावेळी पालकमंत्री गुलाबराव पाटील म्हणाले कि, साधू संत येती घरा तोच दिवाळी दसरा, राज्यातील प्रत्येकाच्या…

Read More

अहमदाबाद : वृत्तसंस्था  पतीच्या निधनानंतर पत्नीला सती प्रथेप्रमाणे जीवन संपविण्याचा हट्ट कुटुंबीयांना केला होता. सती जाण्यासाठी, सासरच्या मंडळींनी सुनेवर इथपर्यंत दबाव टाकला की, अखेर महिलेनं नदीत उडी घेत आत्महत्या केली. याप्रकरणी पोलिसांनी गुन्हा दाखल केला असून आरोपींना अटक करण्याची प्रक्रिया सुरू आहे. हि घटना गुजरातमध्ये घडली आहे. राजस्थानची मूळ निवासी असलेली संगिता लाखरा, जी आपल्या पतीसमवेत गुजरातमध्ये राहत होती. तिने अहमदाबाद येथील साबरमती नदीमध्ये उडी घेऊन जीवन संपवले. काही दिवसांपूर्वीच तिच्या पतीचे निधन झाले होते. पतीच्या निधनानंतर सासरच्या मंडळींकडून तिला शारिरीक आणि मानसिक त्रास दिला जात होता. पोलीस अधीक्षक एम.वी. पटेल हे याप्रकरणाची चौकशी करत आहेत. प्राथमिक तपासातून समोर आलेल्या…

Read More

जळगाव : प्रतिनिधी  आणखी कोणाला त्रास नाही देणार अशा आशयाची सुसाईड नोट लिहून तरुणाने आपली जीवन यात्रा संपविण्याची जळगावला दुर्दैवी घटना शिव कॉलनी परिसरात बुधवारी घडली. अक्षय विलास सुर्यवंशी (वय-२६ वर्ष, रा. शिवकॉलनी बसस्टॉप जवळ, जळगाव) असे मयत तरुणाचे नाव आहे. जळगाव शहरातील शिवकॉलनी परिसरात अक्षय सुर्यवंशी हा तरुण परिवारासह वास्तव्याला होता. खासगी कंपनीत काम करून तो आपला उदरनिर्वाह करत होता. मंगळवारी रात्री १० वाजता तो जेवण करून झोपला, मध्यरात्री सर्वजण झोपलेले असताना त्याने घरात गळफास घेऊन आत्महत्या केली. हा प्रकार सकाळी ८ वाजताच्या सुमारास उघडकीस आला. आई अक्षयला उठवण्यासाठी गेली असता त्याने आत्महत्या केल्याचे दिसले. अक्षयचा गळफास घेतलेल्या अवस्थेतला…

Read More

जळगाव : प्रतिनिधी  तापमानात वाढीमुळे जमिनीतील पाण्याची पातळी कमी होत आहे. त्यामुळे सिंचन प्रकल्पातील जलसाठाही कमी होत आहे. यामुळे जळगाव जिल्ह्यात गेल्या आठवड्यापेक्षा या आठवड्यात आणखी ४ गावांत पाणी टंचाई जाणवत आहे. पूर्वी १४ गावांमध्ये १६ टँकरद्वारे पाणीपुरवठा होत होता. आता १८ गांवात २० टँकरने पाणी पुरवठा होत असल्याने पाणी टंचाईच्या तीव्र झळा सोसाव्या लागत आहे. अल निनोमुळे जिल्हाभरात उष्णतेची लाट जाणवत आहे. वाढत्या उन्हासोबत पाणीटंचाईचेही संकट जिल्हावासीयांवर उभे राहिले आहे. यंदा पावसाळा एक महिना उशिराने येणार असल्याचा अंदाज हवामान विभागाने वर्तविला आहे. १८ गावांमध्ये २० टँकर जामनेर तालुक्यातील मोरगाव, रोटवद, किन्ही, नेरी दिगर येथे चार टँकर, भडगाव तालुक्यातील तळबंद…

Read More

धरणगाव : प्रतिनिधी  तालुक्यातील बांभोरी येथे असलेल्या हिताची कंपनीच्या कामगारांनी गेल्या दोन दिवसापासून संप पुकारण्यात आला असल्याने आज जिल्ह्याचे पालकमंत्री गुलाबराव पाटील यांनी त्यांची भेट घेत लवकरात लवकर प्रश्न सोडवू असे आश्वासन दिले आहे. येत्या शुक्रवार पर्यंत कंपनीच्या प्रशासनाशी बोलून कामगारांच्या हिताचा निर्णय घेऊन संप मिटवून असे आश्वासन गुलाबभाऊंनी यावेळी दिले. बांभोरी हिताची अस्टेमो ब्रेक सिस्टम इंडिया प्रा.लि. या कंपनीतील कामगार बेमुदत संपावर गेलेले आहेत. याठिकाणी असे पालकमंत्री ना.गुलाबरावजी पाटील यांनी संपावर गेलेल्या कामगारांची भेट घेतली. त्यांच्यासोबत अनिलशेठ नन्नवरे, ईश्वर शेठ नन्नवरे सरपंच सचिन बिऱ्हाडे, शांताराम महाराज, माजी सरपंच राकेश नन्नवरे.भिकन शेठ , रवींद्र शेठ, मागासवर्गीय सेनेचे जिल्हा प्रमुख मुकुंद…

Read More

रावेर : प्रतिनिधी  तालुक्यातील मोठा वाघोदा येथील बसस्थानकाजवळ पाच टपऱ्यांना आग लागली. यात लाखोंचे नुकसान झाले आहे. ही घटना दि. २४ रोजी पहाटे २ वाजेच्या सुमारास घडली. आगीबाबत नेमके कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही. मिळालेल्या माहितीनुसार, बऱ्हाणपूर – अंकलेश्वर महामार्गावरील मोठे वाघोदे येथे विजय नथ्थू चौधरी यांच्या मालकीचे पान सेंटर आहे. यात झेरॉक्स मशीन, लॅपटॉप स्टेशनरी व इतर साहित्य आगीत जळून खाक झाले. यात अंदाजे दोन लाख रुपयांचे नुकसान झाले आहे. गुलशन समशेर पठाण यांचे सुमारे दीड लाख रुपयांचे टपरीसह साहित्य जळून खाक झाले तर मलक इमाम यांच सायकल दुरुस्तीची टपरी तसेच साहित्य जळून चाळीस हजार रुपयांच नुकसान झाले आहे. मधुकर…

Read More

छत्रपती संभाजी नगर : वृत्तसंस्था  तेलंगणात काकाचा अंत्यविधी आटोपून गुजरातमधील सुरतच्या दिशेने जात असलेल्या कारच्या चालकास डुलकी लागल्यामुळे गाडी दुभाजकावर आदळली. त्यात चार चुलत भावांचा मृत्यू तर पुतण्या जखमी झाला. ही घटना बुधवारी पहाटे साडेपाच ते सहा वाजण्याच्या सुमारास छत्रपती संभाजी नगराजवळील समृद्धी महामार्गावरील जयपूर शिवारात घडली. या अपघाताची करमाड पोलिस ठाण्यात नोंद केल्याची माहिती निरीक्षक मुरलीधर खोकले यांनी दिली. या अपघातात मयतामध्ये सुरेशभाई रामू गौड (३८), श्रीनिवास रामू गौड (३६), संजय राजनभाई गौड (४३) आणि कृष्णा राजनभाई गौड (४८, सर्वजण रा. सुरत, गुजरात) यांचा समावेश आहे. भार्गव सुरेशभाई गौड (१९) हा युवक जखमी झाला. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मृत चार…

Read More