पुणे : वृत्तसंस्था अनेक लोकांना दारू पिण्याची मोठी सवय असते. पण हीच सवय एका तरुणाच्या जीवावर बेतली आहे. दारू पिण्यासाठी जात असताना झालेल्या अपघातात तरुणाचा मृत्यू झाला. हा अपघात 2 जून रोजी चाकण येथे घडला. याप्रकरणी पोलीस अंमलदार हर्षल शिरवले यांनी शनिवारी (दि. २६) चाकण पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार अज्ञात चारचाकी वाहन चालकावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, नीकेश हे दारू पिण्यासाठी दुचाकी वरून जात असताना अज्ञात चारचाकी वाहनाने भोयर यांच्या गाडीला धडक दिली. यात भोयर गंभीर जखमी झाले. यातच त्यांचा मृत्यू झाला. हा अपघात दोन जून रोजी घडला. त्यानुसार पोलिसांनी अकस्मात गुन्ह्याची…
Author: editor desk
नवी दिल्ली : वृत्तसंस्था देशात अनेक घटना नात्याला काळिमा फासणाऱ्या घडत आहे. एका दिराने त्याच्या वहिनीला भांडण सोडवून समेट घडवण्यासाठी घरी बोलावले. त्याच्यावर विश्वास ठेवून महिला तिकडे गेलीही. पण त्यानंतर दीर, मोठा दीर आणि आणखी एका नातेवाईकाने तिचा विश्वासघात करत तिच्यावर अत्याचार केल्याची माहिती समोर आली आहे. एवढेच नव्हे तर ती पोलिसांत जाऊ नये यासाठी त्यांनी तिला धमकीही दिली. पीडित महिला कशीबशी आपला जीव वाचवून तेथून पळाली. नंतर तिने पोलिस स्थानकात जाऊन तिची आपबीती कथन केली पण पोलिसांनी तक्रार दाखलच करून घेतली नाही. उत्तर प्रदेशातील बरेली येथे हा दुर्दैवी प्रकार घडला आहे. अखेर पीडित महिलेने बरेली एडीजीजीकडे जाऊन न्यायाची…
सांगली : वृत्तसंस्था राज्याला हादरविणारी घटना सांगली जिल्ह्यातील एका तालुक्यात घडली आहे. आश्रमशाळेतील जवळपास 170 विद्यार्थ्यांना जेवणातून विषबाधा झाल्यामुळे अचानक प्रशासनाची मोठी धावपळ सुरु झाली. जत तालुक्यातील उमदी येथील समता आश्रम शाळेतील ही घटना असून. विद्यार्थ्यांवर तातडीने जवळच्या ग्रामीण रुग्णालयात उपचार सुरु केले असल्याची माहिती मिळाली आहे. हे प्रकरण अतिशय गंभीर असल्यामुळे प्रशासन खडबडून जागे झाले आहे. दोषींवर कडक कारवाई होणार आहे. सदर घटनेची संपूर्ण चौकशीकरून 24 तासाच्या आत अहवाल सादर करण्याच्या जिल्हाधिकाऱ्याच्या समाजकल्याण विभागाच्या सहायक आयुक्तांना सूचना दिल्या आहेत. जत तालुक्यातील उमदी येथील एका आश्रमशाळेतील १७० विद्यार्थ्यांना जेवणातून विषबाधा झाल्याचा प्रकार घडला आहे. त्या शाळेचं नाव समता आश्रम…
जळगाव : प्रतिनिधी पूर्वी पाणीपुरवठा विभागाला केवळ ७०० कोटींचे बजेट होते. मात्र आता जलजीवन मिशन मुळे ५० हजार कोटी पेक्षाही जास्त बजेट आहे. त्यामुळे राज्याला पिण्याचे पाणी पाजण्याचे पुण्याची सेवा करण्याची संधी मिळाली असल्यामुळे मी भाग्यशाली मंत्री आहे. रावेर तालुक्यात 89 गावांच्या पाणीपुरवठा योजना मंजूर असून गरीब व वंचित पात्र लाभार्थ्यांचेच संजय गांधी निराधार योजनेचे प्रकरण मंजूर करण्याचे समितीला निर्देश केले. काळ्या आईची सेवा करणाऱ्या शेतकऱ्यांचा अभिमान असून शेतकरी हितासाठी कटीबद्ध असल्याचे सांगितले. जनता हीच आपली श्रद्धा असून जिल्ह्याच्या विकासासाठी प्रयत्न करीत आहे. एस. टी. च्या महिलांना निम्मे तिकीट व ज्येष्ठांना मोफत प्रवासामुळे रिक्षावाले नाराज झाले असले तरी त्यांच्यासाठी…
धरणगाव : प्रतिनिधी भडगाव तालुक्यातील पिंपरखेड येथील तरुणाचा धरणगाव तालुक्यातील पाळधी ते उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ यादरम्यान शनिवारी रात्री ११ वाजताच्या सुमारास भीषण अपघात झाला. अज्ञात ट्रकने त्याला मागून धडक दिली. शासकीय रुग्णालयात उपचारासाठी नेले असता, डॉक्टरांनी त्यास तपासून मयत घोषित केले. याप्रकरणी पाळधी पोलिस स्टेशनला घटनेची नोंद करण्यात आली आहे. भडगाव तालुक्यातील पिंपरखेड येथील भूषण संभाजी महाजन – माळी (वय २९) असे मयत तरुणाचे नाव आहे. शनिवारी तो त्याच्या नातेवाईकांकडे जळगाव तालुक्यातील शिरसोली येथे आला होता. रात्री दहा वाजेनंतर तो शिरसोलीवरून पिंपरखेडला पाळधी मार्गे जायला निघाला होता. विद्यापीठाच्या दिशेने चालत असताना त्याला अज्ञात ट्रकने जोरदार धडक दिली. त्यात…
यवतमाळ : प्रतिनिधी जिल्ह्यातील कामरगाव येथून जवळच असलेल्या बेंबळा येथील १४ वर्षे वय असलेली अल्पवयीन मुलगी २४ ऑगस्ट रोजी बोरगाव निघोट येथे शाळेत जात असताना आरोपी मुलाने तिचा विनयभंग केला. दाखल तक्रारीवरून पोलिसांनी त्याला तत्काळ अटक करून त्याची कारागृहात रवानगी केली. यामुळे जबर मानसिक धक्का बसल्याने आरोपीच्या आईने २५ ऑगस्ट रोजी विष प्राशन करून जीवनयात्रा संपविण्याचा प्रयत्न केल्याचा प्रकार घडला. प्राप्त माहितीनुसार, बेंबळा येथील सरपंच रेखा नरेंद्र जवंजाळ यांचा मुलगा वैभव जवंजाळ याने २४ ऑगस्ट रोजी दुपारी ११ वाजताच्या सुमारास मैत्रिणींसोबत बोरगाव निघोट येथे शाळेत जाण्याकरिता निघालेल्या १४ वर्षीय मुलीच्या समोर (एमएच ३१ बीएच) क्रमांकाची दुचाकी आडवी करत…
नागपूर : वृत्तसंस्था राज्यात गेल्या काही वर्षापासून प्रेम प्रकरणे अनेक उघडकीस येत आहे. त्यातून निर्माण होणारी गुन्हेगारी सुद्धा मोठ्या प्रमाणात सक्रीय झाली असून नुकतेच एक प्रकरण समोर आले आहे. चारित्र्यावर संशय घेऊन पत्नीचा धारदार शस्त्राने गळा चिरून हत्या केल्याची घटना नागपूर शहरातील आंबेडकरनगरात रविवारी सकाळी उघडकीस आली. पोलिसांनी आरोपी पतीला अटक केली आहे. प्रणाली ललित दहाट (३४) असे मृत महिलेचे नाव आहे, तर ललित रामदास दहाट (३८) असे आरोपीचे नाव आहे. सहा वर्षांपूर्वी दोघांनी मंदिरात लग्न केले. लग्नानंतर ललित प्रणालीच्या चारित्र्यावर संशय घ्यायचा. त्यावरून वाद व्हायचे. अशाच वादातून आरोपीने गळा चिरून प्रणालीची हत्या केली. माहेरी गेलेली पत्नी परतल्यानंतर…
भुसावळ : प्रतिनिधी भुसावळ तालुक्यातील फेकरी टोलनाका येथे शुल्लक कारणाने तरुणाला लोखंडी रॉडने मारहाण केलायची घटना घडली आहे. याप्रकरणी रात्री ११ वाजता भुसावळ तालुका पोलीस ठाण्यात दोन जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मिळालेल्या माहितीनुसार, भुसावळ शहरातील खडका रोड परिसरातील रहिवासी अशफाक जाबीर बागवान उर्फ आम्रपाली जोगी (वय- २६) हे दि.२६ ऑगस्ट रोजी सायंकाळी साडेपाच वाजेच्या सुमारास भुसावळ तालुक्यातील फेकरी टोलनाका येथील हॉटेलच्या मागे असलेल्या जागेत संशयित आरोपी दानिश शेख, बाबा काल्या, सोनू शेख सर्व रा. खडका ता.भुसावळ या तिघांनी बेदम मारहाण करून गंभीर दुखापत केली. तसेच एकाने लोखंडी रॉडने मारहाण केल्याने दुखापत केली. तसेच एकाने धारदार वस्तूने केस कापून…
नाशिक : वृत्तसंस्था राज्यातील अनेक शहरात गेल्या काही महिन्यापासून गुन्हेगारीच्या घटना घडत असून यात ताजी घटना असलेल्या संदीप आठवले आणि ओम पवार यांच्यात काही दिवसांपूर्वी वाद झाला होता. संदीप आठवले या तरुणाचं वय २२ आहे. दोघात शाब्दिक वाद झाला. हा वाद इतका टोकाला गेला की, दोघात हाणामारी झाली. त्यावेळी संदीप आठवले यांच्या काही साथीदारांनी ओम पवार या तरुणाला बेदम मारहाण केली. त्यानंतर दोन तरुणांच्या गॅगवारमध्ये भांडणाला सुरुवात झाली. हा प्रकार नाशिक जिल्ह्यातील असून यामुळे पोलिस यंत्रणा खडबडून जागी झाली आहे. या प्रकरणातील पाच आरोपींना पोलिसांनी अटक केली आहे. संदीप आठवले या तरुणावरती धारदार शस्त्राने २५ वार केल्याने त्याचा जागीचं मृत्यू…
भुसावळ : प्रतिनिधी भुसावळ तालुक्यातील एका गावातील १३ वर्षीय दोन अल्पवयीन मुलीचा विनयभंग केल्याची घटना उघडकीस आल्यानंतर वरणगाव पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, भुसावळ तालुक्यातील एका गावातील दोन १३ वर्षीय अल्पवयीन मुली शाळेत जात असतांना नियमितपणे दोन ४० वर्षीय वृद्ध या मुलींचा पाठलाग करीत त्यांना फुले टाकून देत त्यांना चॉकलेट देत त्यानंतर आमचा फोन नंबर घेवून फोन करीत जा असे बोलले हि सर्व घटना दि.२६ ऑगस्ट रोजी ११ वाजेच्या सुमारास घडली. एका संशयित आरोपींने मुलीचा हात पकडून आमच्या सोबत चल असे म्हटले या सर्व घटनेची माहिती अल्पवयीन मुलीनी आपल्या परिवारातील सदस्यांना दिल्यानंतर अल्पवयीन मुलीच्या…

