जळगाव : प्रतिनिधी एका महाविद्यालयीन विद्यार्थिनीला गेल्या काही दिवसापासून काही फोटो व व्हिडिओ व्हायरल करण्याची धमकी देऊन ब्लॅकमेल करणाऱ्या विद्यार्थ्याला त्या विद्यार्थिनीच्या भावाने व त्याच्या मित्रांनी चांगलीच धुलाई केल्नंयातर त्याला रामानंदनगर पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले. ही घटना आदर्शनगरात रविवारी रात्रीच्या सुमारास घडली. याप्रकरणी रात्री उशिरापर्यंत कारवाई सुरू होती. घटनास्थळावरून मिळालेल्या माहितीनुसार, आदर्श नगरमध्ये शिक्षणासाठी बाहेर गावाहून आलेला एक विद्यार्थी राहतो. शहरापासून नजीक असलेल्या एका महाविद्यालयात शिक्षण घेत असतांना त्याच महाविद्यालयात शिक्षण घेणाऱ्या एका विद्यार्थिनीला गेल्या चार ते पाच दिवसापासून ब्लॅकमेल करीत होता. त्याच्याकडे असलेल्या मोबाईलमध्ये काही फोटो व व्हिडिओ व्हायरल करेल अशी धमकी या विद्यार्थिनीला तो सातत्याने देत…
Author: editor desk
जळगाव : प्रतिनिधी जळगाव जिल्ह्यातील अनेक गावातील पोलीस पाटील व कोतवाल पदासाठी रिक्त असलेल्या जांगावर जळगाव शहरातील आठ केंद्रांवर पोलीस पाटील व कोतवाल पदासाठी उमेदवारांनी लेखी परीक्षा दिली. याचा निकाल अवघ्या साडेसात तासातच जिल्ह्याच्या अधिकृत संकेतस्थळावर जाहीर करण्यात आला असून आता या पदासाठी पात्र ठरलेल्या उमेदवारांची मुलाखती घेण्यात येऊन त्यांना नियुक्तीपत्र देण्यात येणार आहे. जिल्ह्याचे नूतन जिल्हाधिकारी आयुष प्रसाद यांनी आपल्या कार्य तत्पर तेचा परिचय यानिमित्ताने करून दिला आहे. असा हा निकाल पहिल्यांदाच देण्यात आला असावा. जिल्हा निवड समितीमार्फत घेण्यात आलेल्या पोलीस पाटील व कोतवाल पदांसाठीची परीक्षा आज शहरातील ८ केंद्रावर सुरळीत पार पडली. पोलीस पाटील २२८० व…
भडगाव : प्रतिनिधी तालुक्यातील एका गावात बारा वर्षीय मुलाचा एका पित्याने गळा दाबून खून करून स्वतःही झाडाला गळफास घेत आत्महत्या केल्याची घटना शिवनी या गावात घडली आहे. मात्र साक्षीदार आणि इतर पुराव्यावरून सुरुवातीला अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली होती. मात्र मयत पित्यावर खुनाचे कलम लावण्यात आले आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, भडगाव तालुक्यातील शिवनी येथे राव चव्हाण (वय ४८) त्यांचा बारा वर्षीय मुलगा कौशिक संजय चव्हाण हा पैसे मागत असल्याने व माघारी बोलत असल्याचा राग आल्याने संजय चव्हाण याने शेतातील पत्री शेड मध्ये असलेल्या खाटेवर कौशिक याचा गळा दाबून स्वतःही झाडाच्या फांदीला गळफास घेऊन आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना २९…
अयोध्या : वृत्तसंस्था अयोध्येत सुरु असलेल्या राम मंदिराचे उद्घाटन जानेवारीच्या तिसऱ्या आठवड्यात केले जाणार आहे. मंदिर खुले झाल्यानंतरही रामभक्तांना रामाच्या मूर्तीला हात लावण्याची संधी मिळणार नाही. भाविकांना गर्भगृहात प्रवेश दिला जाणार नाही. सुमारे ३५ फूट अंतरावरून लोकांना दर्शन घेता होईल. श्रीरामजन्मभूमी तीर्थक्षेत्र ट्रस्टने दिलेल्या माहितीनुसार, गर्भगृहाचे पावित्र्य राखण्यासाठी ही व्यवस्था करण्यात आली आहे. हिंदू धार्मिक मान्यतेनुसार, मंदिराच्या गर्भगृहात प्रवेश करण्याचा अधिकार फक्त राजा आणि मंदिराच्या पुजाऱ्याला आहे. ही पारंपरिक पद्धत लक्षात घेऊन केवळ पंतप्रधान आणि पुजारी यांनाच गर्भगृहात प्रवेश देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. येथील पुजारी आणि कर्मचायांना सरकारी पातळीवर सुविधा देण्याची तयारी सुरु आहे. श्री रामजन्मभूमीचे मुख्य…
जळगाव : प्रतिनिधी जळगाव शहरात गेल्या काही महिन्यापासून सुरु असलेल्या दुचाकी, मोबाईल चोरीच्या घटना सातत्याने वाढ होत आहेत. यावर आता जिल्हा स्थानिक गुन्हे शाखेने मोठी कारवाई केली असून घरफोडी आणि दुचाकी चोरीच्या गुन्ह्यात सराईत तीन आरोपींना अटक केली असून त्यांच्याकडून दोन दुचाकी आणि मोबाईल ताब्यात घेण्यात आले आहे. दोन आरोपीना तालुका पोलिस स्टेशन तर एका आरोपीला एमआयडीसी पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले आहे. मिळालेल्या माहितीनुसार, जिल्ह्यात घरफोडी चोरी व दुचकी चोरी गुन्हयातील आरोपीताचा शोध घेणे बाबत पोलीस अधीक्षक एम. राजकुमार, अपर पोलीस अधीक्षक चंद्रकात गवळी, अपर पोलीस अधीक्षक रमेश चोपडे, उपविभागीय पोलीस अधिकारी संदीप गावीत , अशांनी केलेले मागदर्शन…
अमरावती : वृत्तसंस्था संभाजी भिडे यांच्या कार्यकर्त्यांकडून तिरंगा ध्वजासोबतच भगवा ध्वज फडकवू असे कार्यकर्त्यांना आवाहन केले आहे. यामुळे अमरावती शहरात बच्चू कडू व संभाजी भिडे यांच्या कार्यकर्त्यांमध्ये वाद होण्याची शक्यता आहे. संभाजी भिडे हे काही दिवसांपूर्वी अमरावती येथे आले असता त्यांनी महात्मा गांधी यांच्याबाबत वादग्रस्त विधान केल्यानंतर त्यांच्यावर अमरावतीच्या राजापेठ पोलीस ठाण्यात गुन्हा देखील दाखल करण्यात आला आहे. संभाजी भिडे चे कार्यकर्ते मात्र भगवा ध्वज घेऊन रॅली काढू, असे म्हटल्याने या वादात आणखी ठिणगी पडण्याची शक्यता आहे. महात्मा गांधी यांच्याबद्दल केलेल्या विधावरून राज्याचे राजकीय वातावरण शिवप्रतिष्ठानचे संभाजी भिडे यांनी वातावरण तापवलेले असतांना पुन्हा एकदा ते वादाच्या भोवऱ्यात सापडत…
मुंबई : वृत्तसंस्था बेळगावातील शाहुनगर मन सून्न करणारी घटना घडली आहे. विजेचा धक्का लागून आजोबा, आजी आणि नातीचा जागीच मृत्यू झाला आहे. या घटनेनंतर परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे. मिळालेल्या माहितीनुसार, कर्नाटकातील बेळगावी जिल्ह्यातील रामदुर्गा तालुक्यातील अरबेंची तांडा भागातील रहिवासी इरप्पा गंगाप्पा लमाणी (५० वर्ष), शांतव्वा इरप्पा लमाणी (४५ वर्ष) आणि अन्नपूर्णा हुन्नाप्पा लमाणी (८ वर्ष) अशी मृतांची नावे आहेत. आंघोळीसाठी हिटरच्या मदतीने पाणी गरम करण्यासाठी ठेवलं होते. अचानक नातीला पहिल्यांदा विजेचा धक्का बसला. नातीला विजेचा धक्का लागल्याचं पाहिल्यानंतर तिला वाचवण्यासाठी गेलेल्या आजी-आजोबांनाही विजेचा धक्का बसला आणि तिघांचाही जागीच मृत्यू झाला. एपीएमसी पोलीस स्टेशनमध्ये याप्रकरणी गुन्हा दाखल…
रावेर : प्रतिनिधी तालुक्यातील लहान वाघोदा येथून शौचालयाला जाऊन येते असे सांगून २० वर्षीय विवाहिता बेपत्ता झाल्याची तक्रार तिच्या पतीने दिल्यावरून सावदा पोलीस स्टेशनला हरविल्याची नोंद करण्यात आली आहे. मिळालेली माहिती अशी कि, रावेर तालुक्यातील लहान वाघोदा येथील मोहन राजाराम बारेला (वय २८) हे हात मजुरी करतात. ७ ऑगस्ट रोजी सकाळी ७ वाजेच्या सुमारास त्यांची पत्नी शिलाबाई मोहन बारेला वय 20 ही तिच्या चुलत ननंदकडे झोपलेली असताना शौचालयाला जाऊन येते असे सांगून निघून गेली. मात्र तिचा नातेवाईकांकडे सर्वत्र शोध घेऊनही ती न मिळून आल्याने 11 ऑगस्ट रोजी दुपारी दोन वाजता सावदा पोलीस स्टेशनला मोहन बारेला यांनी फिर्यादी दिल्यावरून…
मुंबई : वृत्तसंस्था राज्याचे मुख्यमंत्री मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या ठाणे जिल्ह्यात एक मोठी घटना समोर आली आहे. ठाणे महानगरपालिकेच्या छत्रपती शिवाजी महाराज रुग्णालयात एका रात्रीत तब्बल १७ रुग्णांचा मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना घडली आहे. प्रचंड अनागोंदी, गोंधळ, अपुरी डॉक्टर क्षमता आणि रुग्णांच्या संख्येत झालेली प्रचंड वाढ यामुळे एकच रात्री 17 जणांनी आयुष्य गमावले. मृत्यू झालेल्या 17 पैकी 13 रुग्ण हे आयसीयूमधील तर 4 रुग्ण जनरल वॉर्डमधील होते. रुग्णालय प्रशासनाने या बातमीला दुजोरा दिला असून, काही रुग्ण प्रायव्हेट हॉस्पिटलमधून शेवटच्या क्षणी आल्याने तर काही रुग्ण 80 पेक्षा जास्त वयाचे असल्याने मृत्यू झाल्याचे सांगितले आहे. मात्र सिव्हिल रुग्णालय बंद झाल्यापासून…
नंदुरबार : वृत्तसंस्था अचानक शाळेत विद्यार्थ्याचा मृत्यू झाल्यामुळे नातेवाईकांनी प्रशासनावरती गंभीर आरोप केले असल्याची घटना उघडकीस आली आहे. त्याचबरोबर त्या शाळेत शिकत असलेल्या इतर विद्यार्थ्यांच्या पालकांनी सुध्दा चिंता व्यक्त केली आहे. विद्यार्थ्यांचा मृत्यू झाल्याची बातमी सगळीकडं व्हायरल झाल्यानंतर शाळेच्या आवारात विद्यार्थ्याच्या नातेवाईकांनी आणि इतर नागरिकांनी गर्दी केली. अचानक विद्यार्थ्याचा मृत्यू झाल्याने पालकांना मोठा धक्का बसला आहे. पालकांनी शाळा प्रशासनाला जाब विचारल्यानंतर समाधानकारक उत्तर न दिल्यामुळं शाळेत २१ तास गोंधळ सुरु होता. त्या विद्यार्थ्याच्या मृत्यूची चौकशी करण्याचे आदेश दिल्यानंतर नातेवाईकांनी मृतदेह ताब्यात घेतला असल्याची माहिती मिळाली आहे. नंदूरबार जिल्ह्यातील तोरणमाळ शासकीय माध्यमिक आश्रम शाळेत इयत्ता पहिलीच्या वर्गात शिकणाऱ्या एका विद्यार्थ्यांचा…

