मुंबई : वृत्तसंस्था मराठी चित्रपटसृष्टीत नेहमी चर्चेत असलेली अभिनेत्री सई ताम्हणकर हि जरा वेगळ्या कारणाने सध्या चर्चेत येत आहे. सईच्या ड्रायव्हरला भर रस्त्यात बेदम मारहाण करण्यात आली आहे. हा प्रकार मुंबईतील मालाड येथील मालवणी परिसरात घडला आहे. यामुळे याची सध्या जोरदार चर्चा सुरू झाली आहे. तिच्या ड्रायव्हरला चक्क बेल्ट आणि बांबूने बेदम मारहाण केली गेली आहे. त्याला झालेल्या मारहाणीनंतर त्याला रुग्णालयात दाखल करावे लागले आहे. सईच्या ड्रायव्हरने घडलेल्या घटनेनंतर पोलिसांत धाव घेत मारहाण केलेल्या चार जणांविरोधात एफआयआर दाखल केली आहे. दरम्यान, याबाबत माहिती अशी की, ड्रायव्हरने सतत हॉर्न वाजवल्याने दुकाचीवर असलेल्या चार जणांनी सईच्या ड्राइव्हरला गाडीतून खाली खेचून मारहाण…
Author: editor desk
पुणे : वृत्तसंस्था राज्यातील पुणे शहरात गेल्या काही दिवसापूर्वी महाविद्यालयीन युवतीवर कोयत्याने हल्ला झाला होता. पुणे शहरातील पेरुगेट पोलीस चौकीजवळ भर दिवसा झालेल्या या प्रकारामुळे खळबळ माजली होती.या प्रकारसंदर्भात विधानसभेत प्रश्न उपस्थित झाला होता. एकतर्फी प्रेमातून महाराष्ट्र लोकसेवा आयोगाची (एमपीएससी) परीक्षा उत्तीर्ण झालेल्या दर्शना पवार हिचा खून झाला होता. आता एकतर्फी प्रेमाचा प्रकार टिनएजर मुलांमध्ये समोर आला आहे. यामुळे चिंता निर्माण झाली आहे. या प्रकारणात मुलीने धक्कादायक पाऊल उचलले आहे. एक १८ वर्षीय युवक औंध भागात राहणाऱ्या १४ वर्षीय मुलीचा सतत पाठलाग करत होता. परंतु ती मुलगी त्याला काहीच प्रतिसाद देत नव्हती. यामुळे त्याने त्या मुलीचे काही फोटो काढले.…
मुंबई : वृत्तसंस्था राष्ट्रवादीचे नेते नवाब मलिक यांनी तुरुंगातून बाहेर पडल्यानंतर राज्याच्या राजकारणात अजित पवारांनी त्यांना बाहेर काढले असल्याच्या चर्चा सुरु असतांना त्यांनी आज आपली भूमिका स्पष्ट केली आहे. त्यानुसार त्यांनी शरद पवार यांच्या नेतृत्वातील मूळ राष्ट्रवादी काँग्रेससोबत राहण्याचा निर्धार केला आहे. यामुळे ते राष्ट्रवादीच्या कोणत्या गटासोबत जाणार? या चर्चेला पूर्णविराम मिळाला आहे. ईडीने नवाब मलिक यांना मनी लाँड्रिंगप्रकरणी अटक केली होती. सुप्रीम कोर्टाने नुकताच त्यांना जामीन मंजूर केला. त्यानंतर ते राष्ट्रवादीच्या कोणत्या गटात जाणार? अशी चर्चा राजकीय वर्तुळात रंगली होती. या पार्श्वभूमीवर नवाब मलिक यांनी ‘टाइम्स ऑफ इंडिया’ या इंग्रजी वृत्तपत्राशी बोलताना आपली भूमिका स्पष्ट केली आहे.…
मुक्ताईनगर : प्रतिनिधी जळगाव जिल्ह्यातील मुक्ताईनगर तालुक्यात दोन भावांच्या नात्याला काळिमा फासणारी घटना घडली आहे. लहान भावाने आपल्या मोठ्या भावाच्या डोक्यात दगड टाकून खून केल्याची धक्कादायक घटना तालुक्यातील पिंप्रीपंचम येथे उघडकीस आल्याने परिसरात मोठी खळबळ उडाली आहे. या घटनेत मुखा मानकू शिंदे (45, पूर्णाड वस्ती, ता.मुक्ताईनगर) यांचा मृत्यू झाला असून याप्रकरणी संशयित लहान भाऊ पंढरी मानकू शिंदे (पूर्णाड वस्ती, ता.मुक्ताईनगर) यास अटक करण्यात आली. मिळालेल्या माहितीनुसार, मुक्ताईनगर तालूक्यातील पूर्णाड वस्ती येथे मुखा मानकु शिंदे (वय ४५) हे आपल्या परीवारासह वास्तव्यास असून लहान भाऊ पंढरी शिंदे ( वय ४०) हा काही दिवसांपासून त्याला पैसे मागत होता मात्र पैसे न…
जळगाव : प्रतिनिधी जळगाव शहरापासून नजीक असलेल्या उमाळा बस स्टॉपनजीक भरधाव वेगाने येणाऱ्या एका चारचाकी वाहनाने प्रवासी रिक्षास जबर धडक दिल्याने रिक्षा चालकाचा मृत्यू झाला असून प्रवासी जखमी झाल्याची घटना घडली आहे. याप्रकरणी एमआयडीसी पोलीस स्थानकात अनोळखी चालका विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, जळगाव शहरापासून काही अंतरावर असलेल्या उमाळा गावाच्या बस स्थानकानजीक दिनांक १६ ऑगस्ट रोजी दुपारी १२ वाजेच्या सुमारास भरधाव वेगाने येणाऱ्या चारचाकी क्रमांक एम.एच.०२.बी.आर.४३९१ या चारचाकीने प्रवासी रिक्षा एम.एच.१९.व्ही.३७६८ ला जोरदार धडक दिल्याने रिक्षाचालक राजू ओमप्रकाश साहू (वय ४५) यांचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे. तर रिक्षात असलेले प्रवासी यांना दुखापत झाली असून…
मुंबई : वृत्तसंस्था राज्यातील अनेक नवोदित कलाकारांपासून ते मोठमोठ्या सेलिब्रिटींनीही त्यांच्यासोबत घडलेल्या कास्टिंग काऊचच्या घटना सातत्याने वाढत असतांना दिसत आहे. अनेक धक्कादायक घटना वारंवार ऐकायला मिळतात. नुकतीच मुंबईत अंगाचा थरकाप उडवणारी घटना घडली आहे. मुंबईतल्या एका कास्टिंग डायरेक्टरने 18 वर्षांच्या मुलीसोबत हे वाईट कृत्य केलं आहे. बॉलिवूड इंडस्ट्रीत आपली ओळख बनवण्यासाठी ही मुलगी स्वप्नांची नगरी मुंबईत आली होती. मात्र संबंधित कास्टिंग डायरेक्टरने तिला आपल्या जाळ्यात अडकवलं आणि तिच्यासोबत गैरवर्तणुकीचा प्रयत्न केला. मीडिया रिपोर्ट्सनुसार, त्या मुलीने प्रतिकार करताच कास्टिंग डायरेक्टरने तिचं डोकं फोडलं. याप्रकरणी आरोपीला पोलिसांनी अटक केली आहे. बिहारचा कास्टिंग डायरेक्टर दीपक मालाकार (वय २६) असं त्याचं नाव असून गेल्या…
कल्याण : वृत्तसंस्था राज्यातील अनेक अल्पवयीन मुलीसह विवाहितांना पळवून नेण्याच्या घटना ताजी असतांना कल्याणमध्ये एक नवीन प्रकरण समोर आले आहे. गेल्या तीन दिवसापासून ड्युटीवर गेलेली महिला पोलीस कर्मचारी बेपत्ता असल्याचे समोर आले आहे. याप्रकरणी बाजारपेठ पोलिसात मिसिंगची तक्रार देण्यात आली आहे. तीन दिवस उलटून शोध लागत नसल्याने कुटुंबीयांमध्ये संतापाचे वातावरण आहे. या घटनेत महिला पोलीस कर्मचारी श्वेता सरगिरे वय २४ असे बेपत्ता महिलेचे नाव असून बाजारपेठ पोलिसांकडून तीन पथक तयार करत महिला पोलिसाचा शोध सुरु आहे. महिलेची कोणतीही माहिती अद्याप समोर आलेली नाही. पोलीस सर्व बाजूंनी सखोल तपास करत आहेत. नवी मुंबई पोलीस दलात कल्याण पश्चिमेला राहणारी श्वेता…
बीड : वृत्तसंस्था राष्ट्रवादीचे नेते अजित पवारांसह दिग्गज नेत्यांनी पक्षासोबत बंडखोरी केल्यानंतर पक्षाचे संस्थापक अध्यक्ष शरद पवार यांनी बंडखोरांच्या मतदारसंघात सभा घेण्याचा निर्णय घेतला असून धनंजय मुंडेंचा बीडमध्ये शरद पवारांची आज जाहीर सभा होत आहे. आता आजच्या सभेत शरद पवार धनंजय मुंडेंचा कसा समाचार घेतात? हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवारांनी अजित पवार गटाला माझे फोटो वापरल्यास कोर्टात जाणार, असल्याचा इशारा दिला आहे. पवारांचा हा इशारा धुडकावत बीडमध्ये धनंजय मुंडेंच्या समर्थकांनी बॅनरवर पवारांचा फोटो लावला आहे. “कामाच्या माणसाला आशीर्वाद द्या,” अशी विनंती मुंडे समर्थकांनी केली आहे. “शरद पवार आमचे ज्येष्ठ नेते असून आम्ही त्यांचा…
अमळनेर : प्रतिनिधी अमळनेर तालुक्यात विहिरीच्या पाण्यात बुडून मृत्यू झालेल्या तरूणाचा मृतदेह एसडीआरएफ पथकाने चार तासांच्या अथक प्रयत्नानी शोधून काढला आहे. मदत व पुनर्वसन मंत्री अनिल पाटील यांनी जिल्हाधिकारी आयुष प्रसाद यांच्याशी दूरध्वनीवरून संपर्क साधत शोध व बचाव कार्य करण्याच्या सूचना दिल्या होत्या. पारोळा येथील वंजारी शिवारालगत रहिवाशी असलेले विनोद धोत्रे यांचा चिरंजीव शुभम धोत्रे (वय १७) हा शिक्षणाकामी अमळनेर येथे राहत होता. प्रताप महाविद्यालय इयत्ता ११ वीत शिक्षण घेत होता. त्याच्यासोबत चार पाच मित्रांसह तो विहिरीत पोहायला गेला होता. विहीरीत उडी मारल्यावर तो वर आला नाही. मुलांनी आरडाओरड केल्यानंतर ही घटना स्थानिकांनी तात्काळ मदत व पुनर्वसन मंत्री अनिल पाटील…
जळगाव : प्रतिनिधी ग्रामस्थांनी गावात स्वच्छता राखून स्वतःच्या आरोग्याची काळजी घ्यावी. आरोग्यसेवेतून आत्मिक समाधान प्राप्त होत असते. १५ ऑगस्ट पासून सर्व शासकीय रुग्णालयात शासनामार्फत मोफत आरोग्य सेवा पुरविल्या जात आहे. ५ लाखापर्यंत प्रत्येकाला मोफत या आभा कार्ड द्वारे आरोग्य सेवा मिळणार असून आपल्या आरोग्य विषयी माहीती असलेले आभा कार्ड हे प्रत्येक नागरीकांना नवसंजीवनी व आधारवड ठरणार असल्याचे प्रतिपादन स्वच्छता व पाणीपुरवठा मंत्री गुलाबराव पाटील यांनी केले. ते नांद्रा बु येथे स्वातंत्र्य दिनानिमित्त आरोग्य शिबिराचे व आभा कार्डचे वाटप प्रसंगी बोलत होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी जिल्हा प्रमुख निलेश पाटील हे होते. ना. गुलाबराव पाटील म्हणाले की, कानळदा ते रिधुर या रस्त्याच्या डांबरीकरणासाठी…

