जळगाव : प्रतिनिधी जळगाव – ममुराबाद रस्त्यावर झाला अपघात जळगाव जिल्ह्यात दुचाकी, चारचाकी व बसचे होत असलेल्या अपघातामध्ये नियमित वाढ होत असतांना आढळून येत आहे. दुचाकीवर लिफ्ट घेऊन शेताजवळ पोहोचले अन् मागून आलेल्या बसने धडक दिल्याने दुचाकीवर मागे बसलेली महिला व दुचाकीचालक मयूर संजय पाटील (२४) व अनिता अविनाश सावळे (वय ४०, दोघे रा. ममुराबाद) हे दोघं जण जखमी झाले. ही घटना ममुराबाद ते विदगाव रस्त्यावर शुक्रवार, १८ ऑगस्ट रोजी सकाळी पावणे नऊ वाजेदरम्यान घडली. मिळालेल्या माहितीनुसार, ममुराबाद येथील मयूर पाटील हा शुक्रवारी सकाळी शेतात जात होता. त्या वेळी रस्त्याने एका शेतकरी महिलेने त्याला लिफ्ट मागितली. दोघे…
Author: editor desk
जळगाव : प्रतिनिधी जिल्ह्यातील राज्य उत्पादन शुल्क व पोलिस प्रशासनाने गावठी हातभट्टी चालकांवर कारवाईची मोहीम हाती घेतली आहे. दोन दिवसात तब्बल ९२ जणांना अटक करीत सात लाख ५२ हजार २५५ रुपये किंमतीचा मुद्देमाल जप्त केला आहे. मिळालेल्या माहितीनुसार, १७ व १८ ऑगस्ट या दोन दिवसात राज्य उत्पादन शुल्क विभागाने एकूण ४० गुन्हे नोंदविले. १८ ऑगस्ट रोजी पोलिस विभागासोबत संयुक्त मोहीम राबविण्यात येऊन त्यात १०५ गुन्हे नोंदविले आहेत. या कारवाईमध्ये ९२ जणांना अटक केली असून इतर १३ जणांचा गावातील तलाठी व पोलिस पाटील यांच्या मदतीने शोध घेण्यात येत आहे. या कारवाईमध्ये एक हजार ३२४ लिटर गावठी दारू जप्त करण्यात…
जळगाव : प्रतिनिधी जळगाव जिल्ह्यात अनेक दिवसापासून नियमितपणे गुन्हेगारी घटना घडवून आणणाऱ्या विरोधात जळगाव पोलीस दलाने कारवाईचा धडाका सुरु केला असून जिल्ह्यातील दोघांना पुन्हा एमपीडीए अंतर्गत स्थानबद्ध करण्यात आल्याने गुन्हेगार धास्तावले आहेत. जळगाव जिल्ह्यातील भुसावळ तालुका पोलिस स्टेशन आणि चोपडा शहर पोलिस स्टेशन हद्दीतील दोघांना स्थानबद्ध करण्यात आले आहे. मिळालेल्या माहितीनुसार, भुसावळ तालुका पोलिस स्टेशनला विविध गुन्हे दाखल असलेला इब्राहीम उर्फ टिपू उर्फ टिप्या साततार मण्यार (रा.वराडसीम, ता.भुसावळ) आणि आकाश संतोष भोई (रा. साने गुरुजी वसाहत चोपडा) यांना स्थानबद्ध करण्यात आले आह.े इब्राहीम उर्फ टिपू याच्याविरुद्ध भुसावळ तालुका पोलिस स्टेशनला तीन, फैजपूर आणि शनीपेठ पोलिस स्टेशनला प्रत्येकी एक…
जळगाव : प्रतिनिधी जळगाव शहरातील मेहरूण जवळील जॉगिंग ट्र्कवर दुचाकी अपघातानंतर २३ वर्षीय तरूणाला मारहाण करून त्याच्याजवळील मोबाईल, रोख रक्कम आणि इतर साहित्य जबरी हिसकावून फरार झालेल्या चार जणांपैकी दोन जणांना अटक करण्यात एमआयडीसी पोलीसांना यश आले आहे. दोघांना न्यायालयाने चार दिवसांची पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे. मिळालेल्या माहितीनुसार, मेहरुण ट्रॅकवर १५ ऑगस्ट रोजी सायंकाळी ७ वाजेच्या सुमारास तारीक अलताफ खाटीक (२३, रा. गुलाब बाबा कॉलनी) हे त्यांच्या दुचाकीने जात असताना दुचाकीने (एमएच १९, डीयू ४६१०) धडक दिली होती. अपघात करणाऱ्या व त्यांच्या सोबत दुचाकीवर असलेल्या एकूण चार जणांनी तारीक खाटीक यांना अपघाताच्या कारणावरुन मारहाण करुन २५ हजार…
जळगाव : प्रतिनिधी शहरातून कामावरून दुचाकीने घरी जाण्यासाठी निघालेल्या तरूणाला भरधाव वेगाने येणारी अनोळखी चारचाकीने जोरदार धडक दिल्याने तरूण जखमी झाल्याची घटना गुरूवारी १७ ऑगस्ट रोजी रात्री बारा वाजता घडली. जखमी तरूणाला जिल्हा शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात दाखल करण्यात आले. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, यावल तालुक्यातील अंजाळे येथील रहिवासी किरण सोभा कोळी (वय-४३) हा तरूण जळगावात खासगी कामासाठी दुचाकी (एमएच १९ डीएल ४३४०) ने गेला होता. काम आटोपून घरी परतत असतांना गुरूवारी १७ ऑगस्ट रोजी रात्री सव्वा बारावाजेच्या सुमारास देऊळगाव जवळून जात असतांना त्याच्या दुचाकीला मागून अज्ञात भरधाव कारने जोरदार धडक दिली. या धडकेत किरण कोळी हा पडल्याने त्यांच्या दोन्ही…
मुंबई : वृत्तसंस्था राज्यातील मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेद्र फडणवीस व अजित पवार यांच्या मंत्रिमंडळाची मुंबईत आज पार पडलेल्या बैठकीत अनेक महत्त्वपूर्ण निर्णय घेण्यात आले. त्यात सर्वात महत्वाचा निर्णय म्हणजे, राज्य सरकारने कॅसिनो कायदा रद्दा केला आहे. महाराष्ट्र कॅसिनो (नियंत्रण व कर) अधिनियम हा कायदा 1976 पासून अस्तित्त्वात आहे. पण, त्याची अद्याप अधिसूचना काढलेली नाही. त्यामुळे कॅसिनो सुरू करण्यास इच्छूक लोक वारंवार न्यायालयात जातात आणि कॅसिनो सुरू करण्याची परवानगी मागतात. त्यामुळे महाराष्ट्रात हा कायदाच रद्द करण्याचा निर्णय सरकारने घेतला आहे. त्यामुळे महाराष्ट्रात आता कॅसिनो सुरू करण्यावर बंदी असणार आहे. याशिवाय आगामी काळातील गौरी-गणपती उत्सावासह दिवाळीत नागरिकांना 100 रुपयांत आनंदाचा शिधा…
जळगाव : प्रतिनिधी जळगाव जिल्ह्यातील यावल येथील महालक्ष्मी नागरी सहकारी पतसंस्थेच्या सखाराम कडू ठाकरे यांना पाच लाख रूपयांची लाच स्वीकारतांना आज रंगेहात अटक करण्यात आल्याने परिसरात खळबळ उडाली आहे. मिळालेल्या महितीनुसार, यावल शहरातील श्री महालक्ष्मी नागरी सहकारी पतंसंस्थेवर सध्या प्रशासकाची नियुक्ती करण्यात आली असून, सखाराम कडू ठाकरे यांच्याकडे प्रशासकपदाची सूत्रे आहेत. या पतसंस्थेच्या सावदा येथील शाखेत सावदा नगरपालिकेच्या अंतर्गत असलेल्या एका व्यापारी संकुलातील गाळ्याच्या मालकाने कर्ज थकीत केल्याने हा गाळा पतसंस्थेने जप्त केला होता. यानंतर गाळा मालकाने फेडीची प्रक्रिया पूर्ण केल्यानंतर संबंधीत गाळा आणि याची अमानत रक्कम ही त्याच्या नावावर करून देण्यासाठी सखाराम कडू ठाकरे यांनी त्या गाळा…
मुंबई : वृत्तसंस्था सात जन्म एकत्र राहण्याचे वचन देणाऱ्या नवार-बायकोदरम्यान होणारे वाद काही काळाने मिटूनही जातात. पण झारखंडच्या गुमला येथे मात्र एका दांपत्यामध्ये झालेल्या वादाचा शेवट अतिशय हिंसक आणि दु:खद होता. तेथे एका पतीने त्याच्याच पत्नीचे आयुष्य संपवल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. झारखंडच्या गुमला जवळील एका गावात ही घटना घडली. येथे राहणाऱ्या एका इसमाचे विवाहबाह्य संबंध होते. मात्र त्याच्या पत्नीला ते बिलकूल पसंत नव्हतं. तिने त्याला अनेकवेळा विरोध केला. या मुद्यावरून त्यांच्यामध्ये कित्येक वेळा भांडणेही व्हायची. या घटनेच्या दिवशी देखील 42 वर्षीय मृत महिला आणि 45 वर्षीय आरोपी यांच्यात वाद झाला. मात्र त्यानंतर आरोपी एवढा संतापला की त्याने त्याच्या…
जळगाव : प्रतिनिधी शहरातील गणपती हॉस्पिटलचे संचालक डॉ. शीतल ओसवाल यांना तीन धनादेश अनादर प्रकरणात ५० लाखांचा दंड आणि एक वर्षाच्या तुरुंगवासाची शिक्षा न्यायालयाने सुनावली आहे. त्यामुळे जळगाव शहरातील वैद्यकीय क्षेत्रात खळबळ उडाली आहे. याचिका करते अनिल शिरसाळे व त्यांच्या पत्नी २००२ पासून डॉ. शीतल ओसवल यांचे गणपती हॉस्पिटलमध्ये लॅब टेक्निशियन म्हणून कामाला होते. सेवेपोटी या दाम्पत्याला डॉ. ओसवाल यांनी ५५ लाखांचे धनादेश वेतनपोटी दिले. सोबतच धनादेश दिल्याचे पत्र दिले होते. डॉ. ओसवाल यांनी दिलेले दहा लाखांचे दोन व पाच लाखांचा एक धनादेश वटला नव्हता. यामुळे शिरसाळे यांनी न्यायालयात धाव घेत, धनादेश अनादरप्रकरणी तीन याचिका दाखल केली होती. त्यानुसार प्रथम…
धरणगाव ; प्रतिनिधी धरणगाव तालुक्यातील पाळधी गोमांसची वाहतूक करत असल्याच्या संशयातून संतप्त जमावाने ट्रक पेटवून दिल्याची घटना बायपास परिसरात गुरुवारी रात्री ११ वाजेच्या सुमारास घडली. यावेळी परिसरात काही काळ तणावाचे वातावरण होते. अनुचित प्रकार टाळण्यासाठी पोलिस प्रशासनाकडून दंगा नियंत्रक पथकाला पाचारण करण्यात आले होते. काय घडला प्रकार बांभोरी पेट्रोलपंपा नजीक उग्र वास येत असल्याने नागरिकांना एक ट्रकची तपासणी केली असता यात कातडी व हाडांचे असल्याचा प्रकार आढळून आला. यानंतर काही नागरिकांनी तत्काळ पोलिसांना पाचारण केले. यानंतर हा ट्रक पोलिसांनी पाळधी बायपास जवळील एका गोडावूनमध्ये लावण्यासाठी आणण्यात आला. त्यावेळेस ट्रकमधून कातडी व हाडांचे नमुने घेवून परीक्षणासाठी पाठविण्यात आले. ट्रक गोडावूनमध्ये लावण्याआधीच…

