Author: editor desk

हिंगोली : वृत्तसंस्था दोन सख्या चुलत भाऊ – बहिणीने गळफास घेत आपली जीवनयात्रा संपविल्याची घटना हिंगोलीच्या आखाडा बाळापूर पोलीस स्थानकाच्या हद्दीतील डोंगरकडा गावात घडली आहे. राज्यात मोठी धक्कादायक घटना घडली आहे. मिळालेल्या माहितीनुसार, हिंगोलीच्या बाळापुर हद्दीत असलेल्या डोंगरकडा या गावातील आनंदा पंडित (वय २८) व ऐश्वर्या पंडित (वय १८) या दोघी चुलत बहीण भावांनी गळफास घेऊन जीवन संपवल्याले आहे. डोंगरकडा गावातील एकाच गल्लीमध्ये ऐश्वर्या व आनंद हे दोघेही नात्याने सख्खे चुलत बहीण भाऊ राहायचे. सोमवारी सायंकाळी स्वतःच्या घरात बहिणीने तर रात्री भावाने शेतामधील झाडाला गळफास घेत जीवन संपवले. दरम्यान या घटनेची माहिती मिळताच बाळापूर पोलिसांनी दोघांचेही मृतदेह आखाडा…

Read More

मुंबई : वृत्तसंस्था जिलेबीचे पैसे मागितल्याने ग्राहकाने जिलेबी मालकाच्या डोक्यात लोखंडी माप मारल्याची घटना ठाण्यात उघडकीस आली असून यावेळी जिलेबी मालकाचा तोल जाऊन तो उकळत्या तेलाच्या कढईत पडला. यात विक्रेता गंभीर भाजला असून, त्याला ऐरोली येथील नॅशनल बर्न रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे. ठाण्यातील वागळे इस्टेट परिसरात ही धक्कादायक घटना घडली आहे. याप्रकरणी श्रीनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मात्र घटनेला तीन दिवस उलटूनही आरोपीला अद्याप अटक करण्यात आली नाही. राजेश यादव असे पीडित जिलेबी विक्रेत्याचं नाव आहे. वागळे इस्टेट परिसरात पीडित राजेश यादव यांचा जिलेबीचा गाडा आहे. या गाड्यावर आरोपी जिलेबी खाण्यासाठी आला होता. जिलेबी…

Read More

मुंबई : वृत्तसंस्था राज्यात अनेक ठिकाणी चोरी व घरफोडीच्या घटना सातत्याने घडत असल्याने राज्यातील पोलीस सर्तक असतांना तीन चोरटे धोकादायक शस्त्रांचा वापर करून दरोडा टाकण्याच्या तयारीत असतांना मालाड पोलिसांनी त्यांना अटक केले आहे. मिळालेल्या माहितीनुसार, शनिवारी पहाटे 3 वाजून 30 मिनिटांच्या सुमारास ही घटना घडली. पहाटेच्या वेळी हे तिघे मालडमधील रामचंद्र गल्लीत संशयास्पद रितीने फिरताना आढळले. पोलिसांची चाहूल लागताच त्यांचे आणखी दोन साथीदार राहूल आणि सलमान या दोघांनी तिथून पोबारा केला. तर नाझीर चौधरी, गोविंद उर्फ छोटू आणि लक्ष्मण निर्मल मात्र या तिघांना ताब्यात घेण्यात पोलिसांना यश मिळाले. आणि त्यांनी मोठ्या दरोड्याचा कट उधळून लावला. नंतर मिळालेल्या माहितीच्या आधारे पोलिसांनी…

Read More

मुंबई : वृत्तसंस्था पती व पत्नीचे प्रेम हे सुंदर असते. पण कधी कधी या प्रेमात मिठाचा खडा पडला तर अशी जोडी कुठल्याही टोकाला जावून निर्णय घेत असते. अशीच एक खळबळजनक घटना मुंबईत घडली आहे. डायबिटिज असताना पत्नी वारंवार मिठाई खायला मागत होती. यामुळे संतापलेल्या वृद्ध पतीने पत्नीची हत्या केल्याची धक्कादायक घटना कांदिवली परिसरात उघडकीस आली आहे. या घटनेमुळे एकच खळबळ उडाली आहे. पतीलाही गेल्या 40 वर्षांपासून डायबिटिजचा त्रास आहे. समता नगर पोलिसांनी आरोपी पतीला अटक केली आहे. विष्णुकांत बालुर असे आरोपी पतीचे नाव आहे. तर शकुंतला बालुर असे मयत पत्नीचे नाव आहे. दाम्पत्याचा मुलगा नोकरीनिमित्त अमेरिकेत राहतो. पोलिसांनी मुलाला…

Read More

जळगाव : शहरातील छत्रपती शिवाजी महाराज परिसरात एक जुनी इमारत मंगळवारी सकाळी ९ वाजेच्या सुमारास कोसळली असून या इमारती खाली एक महिला अडकली असून तिला बाहेर काढण्यासाठी बचावकार्य सुरू झाले आहे. घटनास्थळावरून मिळालेल्या माहितीनुसार, जळगाव शहरात अनेक जुन्या इमारती असून मनपा प्रशासनाने त्या मालमत्ताधारकांना नोटीस देखील बजावल्या आहेत. मंगळवारी सकाळी छत्रपती शिवाजी महाराज नगरात असलेली एक जुनी इमारत ९ वाजेच्या सुमारास अचानक कोसळली. इमारतीच्या ढिगाऱ्याखाली राजश्री सुयोग पाठक वय – ५२ ही महिला अडकली असून तिला बाहेर काढण्यासाठी बचावकार्य सुरू झाले आहे. घटनास्थळी नागरिकांची मोठी गर्दी जमली असून पोलिसांनी धाव घेतली आहे. इमारत जीर्ण झालेली असल्याने त्यात फारसे कुटुंब…

Read More

चाळीसगाव : प्रतिनिधी  चाळीसगाव तालुक्यातील श्रीक्षेत्र वालझिरी येथे मुख्य महादेवाच्या मंदिरातून एका 55 वर्ष वृद्ध महिलेच्या गळ्यातील ३० हजार रुपये किमतीचे सोन्याचे मंगळसूत्र लंपास केल्याची घटना घडली आहे या प्रकरणी एका महिलेने विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, श्रावण सोमवार निमित्त चाळीसगाव तालुक्यातील श्री क्षेत्र वालझीरी येथे दिनांक २८ ऑगस्ट रोजी दुपारी ३ वाजेच्या सुमारास पाचोरा तालुक्यातील दिघी येथील निर्मलाबाई बारकू परदेशी या दर्शनासाठी गेले असता. त्या ठिकाणी महादेवाच्या मंदिराजवळ भाविकांच्या गर्दीचा असल्याचा फायदा घेत एका महिलेने त्यांचे ३० हजार रुपये किमतीचे सोन्याचे मंगळसूत्र दहा ग्रॅम वजनाचे लंपास केल्याचे घटना समजतात त्यांनी लागले चाळीसगाव ग्रामीण…

Read More

जळगाव : प्रतिनिधी  जळगाव शहरातील शाहू नगरात दोन गटात वाद होऊन दगडफेक झाल्याची घटना रविवारी रात्री घडली असून या घटनेत चार जण गंभीर जखमी झाले असून त्यांच्यावर रुग्णालयात उपचार सुरू आहे. याप्रकरणी सात जणांविरुद्ध शहर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. सासरी पत्नी व मुलांना घेण्यासाठी आलेल्यांसोबतच पैशावरून हा वाद झाला व त्यांच्यावर दगडफेक झाली. मिळालेल्या माहितीनुसार, चाळीसगाव येथील यासीन नगरातील रहिवासी परवेझ शेख सईद हे बांधकाम ठेकेदार इद्रीस शेख इकबाल यांच्याकडे मिस्तरी काम करीत होते. ठेकेदाराकडून कामासाठी आगाऊ उचल म्हणून परवेझ यांनी ४० हजार रुपये घेतले होते. त्यापैकी २५ हजार रुपये त्यांना परत दिले होते. रविवारी रात्री दहा…

Read More

जळगाव : प्रतिनिधी  राज्यातील सत्तेतवर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व उपमुख्यमंत्री देवेद्र फडणवीस यांनी पारदर्शी कारभार करू असे म्हणत सत्ता स्थापन केली होती, त्यांच्या मंत्रिमंडळातील एका दिग्गज मंत्र्यावर आज राष्ट्रवादीच्या नेत्यांनी जिल्ह्यातील प्रत्येक कामात दहा टक्के कमीशन तसेच पाणी योजनेतील राज्यातील सर्व निविदेत कमीशन, दारू तसेच वाळू व्यवसायातूनही कमीशन घेणारे राज्याचे पाणी पुरवठा मंत्री गुलाबराव पाटील राज्यातील सर्वात भ्रष्टाचारी मंत्री आहेत. असा गंभीर आरोप राज्याचे माजी मंत्री व राष्ट्रवादी कॉंग्रेसचे नेते गुलाबराव देवकर यांनी केला आहे. राष्ट्रवादी कॉंग्रेसचे नेते शरद पवार यांच्या पाच सप्टेंबर रोजी होणाऱ्या जळगाव दौऱ्यानिमित्त एकनाथ खडसे यांच्या निवासस्थानी पत्रकार परिषदेचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी गुलाबराव…

Read More

नागपूर : वृत्तसंस्था नागपूरला राज्याची उपराजधानी म्हटले जाते. नागपूरची आता क्राईम सिटी अशी ओळख बनत चालली आहे. जेष्ठ नागरिक, घरात एकट्या महिलांना गाठून लुटण्याचे प्रकार वाढत आहेत. अशी एक घटना नागपूरच्या यशोधरानगर पोलीस स्टेशन हद्दीत उघडकीस आली आहे. तीन भोंदू बाबांनी सासू-सुनेला लुटल्याची घटना घडली आहे. पालखीसाठी पैसे मागत त्यांना धागा दिला आणि महिलांना बेशुद्ध करून त्यांचं मंगळसूत्र घेऊन पळ काढला. याप्रकरणी यशोधरा नगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी तिन्ही आरोपींना अटक केली आहे. या तिन्ही चोरट्यांचा पोलिसांनी काही तासातच शोध घेतला. मात्र यांनी त्या धाग्याला कुठला द्रव लावला होता, त्यामुळे या महिला बेहोश झाल्या याचा…

Read More

जळगाव : प्रतिनिधी जळगाव शहरातील तांबापुरा भागात पटेल गल्ली येथे राहणारी वयोवृध्द महीला तसलीमबी मोहम्मद सैय्यद, वय 60 वर्षे, या बकरी ईद सणानिमीत्त धुळे येथे त्यांच्या मुलीकडे दिनांक २६ जून पासून ते दिनांक ८ जुलै दरम्यान गेलेल्या असतांना कोणीतरी अज्ञात इसमाने त्यांचे घराचा कडी कोंडा तोडुन आत प्रवेश करुन २३ हजार रुपये किंमतीचे सोन्या चांदीचे दागीने व २५ हजारांची रोकड असा एकुण ४८ हजारांचा किंमतीचा मुद्देमाल चोरुन नेला होता. सदर बाबतीत फिर्यादी यांनी दिलेल्या फिर्यादीवरुन दिनांक ८ जुलै रोजी एम. आय. डी. सी. पो.स्टे. ला गुन्हा दाखल करण्यात आला होता. सदर गुन्हयातील अज्ञात आरोपीताचा व गुन्हयातील गेल्या मालाचा शोध घेत…

Read More