Author: editor desk

मुंबई : वृत्तसंस्था महाराष्ट्र सार्वजनिक आरोग्य विभागांतर्गत गट क पदाच्या विविध जागा भरण्यात येणार आहेत. या रिक्त जागा भरण्यासाठी तबब्ल ६९३९ जागांची भरती जाहीर करण्यात आली असून पात्र उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात आले आहेत. या भरतीसाठी उमेदवारांना ऑनलाईन अर्ज करता येणार आहेत. तर भरतीसाठी अर्ज करण्याची शेवटची तारीख १८ सप्टेंबर २०२३ आहे. महाराष्ट्र सार्वजनिक आरोग्य विभाग भरती २०२३ अंतर्गत भरल्या जाणाऱ्या विविध पदांची नावे, भरतीसाठी आवश्यक शैक्षणिक पात्रता, वयोमर्यादा, नोकरीचे ठिकाण आणि अर्ज फी या बाबतची सविस्तर माहिती जाणून घेऊया. पदांची नावे – ग्रहवस्त्रपाल, वस्त्रपाल, भंडार नि वस्त्रपाल, प्रयोगशाळा वैज्ञानिक अधिकारी, प्रयोगशाळा सहाय्यक, क्ष किरण तंत्रज्ञ, रक्तपेढी तंत्रज्ञ, औषध निर्माण…

Read More

भंडारा : वृत्तसंस्था राज्यातील एका छोट्या गावात नवऱ्याने बायकोची निर्घृण हत्या करुन नंतर स्वत: देखील आत्महत्या केलीची धक्कादायक घटना उघडकीस आल्याने राज्य हादरले आहे. हि घटना भंडारा जिल्ह्यातील सेलोटी गावामध्ये घडली आहे. या प्रकरणी भंडारा पोलीस तपास करत आहेत. मिळालेल्या माहितीनुसार, संपूर्ण सेलोटी गाव साखर झोपेमध्ये असताना पहाटेच्या सुमारास नवरा-बायकोमध्ये जोरदार भांडण झाले. हा वाद ऐवढा विकोपाला गेला की संतप्त नवऱ्याने पत्नीच्या डोक्यामध्ये लाकडी पाट घातला. या हल्ल्यात बायको गंभीर जखमी झाली. अतिरक्तस्राव झाल्यामुळे बायकोचा जागीच मृत्यू झाला. या घटनेनंतर नवऱ्याने देखील टोकाचे पाऊल उचलले. बायकोची हत्या केल्यानंतर नवऱ्याने देखील कालव्यामध्ये उडी मारून आत्महत्या केली. भारती भारत चाचेरे (४० वर्षे)…

Read More

वर्धा : वृत्तसंस्था राज्यात आज पहाटेपासून रक्षाबंधन सण साजरा होत असतांना या सणावर वर्धा या शहरात मोठी दुर्घटना घडली आहे. या घटनेत तीन तरुणाचा दुर्देवी मृत्यू झाल्याची बातमी समोर आली आहे. मिळालेल्या माहितीनुसार, मंदिरावर झेंडा चढवताना विजेचा धक्का लागून ३ जणांचा मृत्यू झाला असून हि घटना वर्ध्याच्या पिपरी मेघे गावात आज ३० ऑगस्ट सकाळी आठ वाजता घडल्याने परिसरात मोठी शोककळा पसरली आहे. या घटनेत अशोक सावरकर(वय 55), बाळू शेर (वय 60) आणि सुरेश झिले (वय 33) या तीन तरुणाचा दुर्देवी मृत्यू झाला आहे. वर्ध्याच्या पिपरी मेघे गावातील तुळजाभवानी मंदिरावर झेंडा लावायला तीन तरुण चढले होते. मंदिरातील झेंड्याचा खांब हा 25…

Read More

मुक्ताईनगर : प्रतिनिधी  जळगाव जिल्ह्यातील मुक्ताईनगर तालुक्यात पोलिसांच्या नाका बंदी दरम्यान गावठी पिस्तूल घेऊन फिरणाऱ्या तरुणाला मुक्ताईनगर पोलिसांनी पकडले असून त्याला गावठी पिस्तूल देणाऱ्या अन्य तीन जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मिळालेल्या माहितीनुसार, सोमवारी रात्री सव्वानऊच्या सुमारास नाकाबंदी करत असतांना पोलिसांना रवींद्र उर्फ माया तायडे हा तरूण गावठी कट्टयासह आढळून आला. त्याची झडती घेतली असता हा प्रकार उघडकीस आल्याने त्याला ताब्यात घेण्यात आले. तायडे याची चौकशी केली असता त्याने नशिराबाद येथील युवराज कडू होंडाळे याच्याकडून १९ हजार रूपयात हा कट्टा खरेदी केल्याची माहिती दिली. यासाठी मुक्ताईनगर येथील मयूर विजयसिंग राजपूत याचा फोन पे क्रमांक वापरल्याचेही त्याने सांगितले. या…

Read More

पुणे : वृत्तसंस्था पुणे जिल्ह्यातील पिंपरी चिंचवड शहरात बुधवारी पहाटेच्या सुमारास एक धक्कादायक घटना घडली अन परिवारातील चार सदस्यांचा आगीत होरपळून मृत्यू झाल्याची बातमी समोर आली आहे. मृतांमध्ये पती-पत्नीसह दोन लहान मुलांचा समावेश असून त्यांची नावे समोर आलेली आहे. मिळालेल्या माहितीनुसार, पिंपरीच्या पूर्णानगर चिंचवड येथे बुधवारी पहाटेच्या सुमारास एका दुकानाला आग लागली. आगीने काही वेळेत रौद्ररूप धारण केले. ही आग आजूबाजूच्या दुकानांमध्ये पसरली. या घटनेत ४ जणांचा होरपळून मृत्यू झाला असून त्यात चिमणाराम बेणाराम चौधरी(वय 48), नम्रता चिमणाराम चौधरी(वय 40), भावेश चिमणाराम चौधरी (वय 15) आणि सचिन चिमणाराम चौधरी(वय 13) अशी मृतांची नावे असून सदर कुटुंब हे राजस्थानमधील…

Read More

जळगाव : प्रतिनिधी  जळगाव शहरातून जाणाऱ्या महामार्गावरून जात असताना अचानक वळण घेतलेल्या ट्रकला समोरून येणाऱ्या चारचाकी वाहनाने जोरदार धडक दिली. यात दोन्ही वाहनांचे नुकसान झाले. हा अपघात २७ ऑगस्ट रोजी रात्री गोदावरी अभियांत्रिकी महाविद्यालय समोर झाला. याप्रकरणी दोन्ही वाहन चालकांविरुद्ध एमआयडीसी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मिळालेल्या माहितीनुसार, जळगावकडून भुसावळकडे जात असलेल्या ट्रकचे (क्र. एमएच ४०- बीएल ६५८७) चालक सुनीलकुमार रमेशचंद्र चव्हाण (रा. नागपूर) यांनी अचानक वळण घेतले. त्याच वेळी समोरून येणाऱ्या चारचाकी वाहनाची (क्र. एमएच १९ एएक्स ०३५१) या ट्रकच्या मागील बाजूला धडक लागली. त्यामुळे दोन्ही वाहनांचे मोठे नुकसान झाले. याप्रकरणी पोकॉ किरण पाटील यांच्या…

Read More

जळगाव : प्रतिनिधी  जळगाव शहरातील अपघाताची मालिका नियमित सुरु असून पुन्हा एकदा जळगाव शहरात अपघात झाला आहे. शहरात दुधाचे कॅरेट उतरविल्यानंतर दूधवाटप करण्यासाठी निघालेल्या वाहनाचे अॅक्सिलेटर अडकल्याने अनियंत्रित झालेल्या या वाहनाने समोरून येणाऱ्या दुचाकीला धडक दिली. यात दुचाकीस्वार महिला पूजा वासुदेव तलरेजा (वय ४८) या गंभीर जखमी झाल्या असून, त्यांच्यावर खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत. ही घटना मंगळवारी सायंकाळी मासूमवाडीतील डायमंड हॉलजवळ घडली. मिळालेल्या माहितीनुसार, शहरातील सिंधी कॉलनीतील पूजा तलरेजा या दुचाकीवरून मासूमवाडीकडे जात होत्या, तर महामार्गावरून दुधाचे वाहन (एमएच ०५ आर ७५८०) दूधवाटप करून तुकारामवाडीकडे जात होते. एका दुकानावर दुधाचे कॅरेट उतरविल्यानंतर चालक वाहन घेऊन पुढे जात…

Read More

जळगाव : प्रतिनिधी  राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष महीला आघाडी प्रदेशाध्यक्ष पदी रोहिणी खडसे यांची नियुक्ती करण्यात आली आहे आज दि 29 रोजी राष्ट्रवादी प्रदेश कार्यालय मुंबई येथे पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष शरदचंद्र पवार यांनी यांनी ॲड.रोहिणी खडसे यांना महीला आघाडी प्रदेशाध्यक्ष पदाचे नियुक्तीचे पत्र दिले. यावेळी राष्ट्रीय कार्याध्यक्ष सुप्रियाताई ताई सुळे, प्रदेशाध्यक्ष जयंतराव पाटील, मावळत्या महीला प्रदेशाध्यक्ष विद्या ताई चव्हाण, माजी मंत्री आ एकनाथराव खडसे, माजी मंत्री अनिल देशमुख, माजी मंत्री राजेश टोपे, माजी मंत्री जितेंद्र आव्हाड, माजी मंत्री आ.नवाब मलिक, आ.बाळासाहेब पाटिल आ शशिकांत शिंदे. हेमंत टकले, राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष रविंद्रभैय्या पाटील आणि राज्यातील राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे जिल्हाध्यक्ष उपस्थित…

Read More

जळगाव : प्रतिनिधी जळगाव शहरातील छत्रपती शिवाजी महाराज नगरात आज सकाळी २९ ऑगस्ट रोजी सकाळी ९ वाजेच्या जीर्ण इमारत कोसळल्याची घटना घडली होती. या घरातून तीन जण सुदैवाने बाहेर पाडण्यात यशस्वी झाले होते. पण या घटनेत एक वृद्ध महिला इमारतीत अडकल्याने मनपा प्रशासनातर्फे युद्ध पातळीवर त्यांना बाहेर काढण्याचे काम सुरु होते. पण दुर्देवाने या पथकाला अपयश आले असून यात ७५ वर्षीय वृद्ध राजश्री सुरेश पाठक यांचा मृत्यू झाला आहे. मिळालेल्या माहितीनुसार, छत्रपती शिवाजी महाराज नगर परिसरातील इमारतीचे मालक पाठक हे सकाळच्या सुमारास पूजा करण्यासाठी तसेच पाणी भरण्यासाठी येतात. आज देखील मंगळवारी २९ ऑगस्ट रोजी सकाळी पाठक कुटुंबीय पाणी भरण्यासाठी तसेच…

Read More

नवी दिल्ली : वृत्तसंस्था अनेक व्यक्ती संतापात काय करतील हे कुणीही सांगू शकत नाही अशीच एक धक्कादायक घटना घडली आहे यात संतापाच्या भरात नको ते कृत्य केले आहे. उत्तर प्रदेशच्या शाहजहांपुर येथे घडली आहे. तेथे एका इसमाने रागाच्या भरात त्याच्या शेजाऱ्याचा प्रायव्हेट पार्टच कापला. खरंतर दोघांमध्येही बकरीवरून भांडण सुरू होते. बघता-बघता ते एवढे वाढले की त्याचे मोठ्या वादात रुपांतर झाले आणि संतापाच्या भरात त्या इसमाने त्याच्या शेजारी राहणाऱ्या इसमाचा प्रायव्हेट पार्टच कापून टाकला. शेजाऱ्याची बकरी आरोपीच्या शेतात घुसली आणि त्यामुळे बरेच नुकसान झाले. यामुळे आरोपी अतिशय नाराज झाला असल्याने पीडित इसम हा 31 वर्षांचा असून आरोपी हा 28 वर्षांचा आहे.…

Read More