Author: editor desk

धरणगाव : प्रातिनिधी शहरातील पारधी वाड्यात एका दिवसात अज्ञात चोरट्यांनी तीन घरे फोडून रोख रक्कम व दागिन्यांचा ऐवज लांबविल्याची घटना बुधवारी रोजी पहाटे तीन वाजण्याच्या सुमारास उघडकीस आल्याने शहरात मोठी खळबळ उडाली. मिळालेल्या माहितीनुसार, शहरातील पारधी वाडा येथे एकाचवेळी तीन ठिकाणी घरफोडी करण्यात आली. याबाबत मधुकर एकनाथ दाभाडे (पारधी वाडा, धरणगाव) यांनी तक्रारीत म्हटले आहे की, बुधवारी पहाटे 3 वाजण्याच्या सुमारास घरात सर्वजण झोपलेले असताना अज्ञात दोन ते तीन जण घरात घुसले. यावेळी चोरट्यांनी घरातील आई, वडील व मुलगा हे झोपले असताना रुमाल लावून त्यांना बेशुद्ध केले. लोखंडी कपाटातील 20 हजार रुपयांची रोकड, चांदीचे ब्रेसलेट असा मुद्देमाल…

Read More

पाचोरा : प्रतिनिधी पाचोरा तालुक्यातील एका २४ वर्षीय विवाहितेला मुलाला मारण्याची धमकी देत एकाने तिच्यावर अत्याचार केल्याची घटना उघडकीस आल्याने मोठी खळबळ उडाली आहे. मिळालेल्या माहितीनुसार, पाचोरा तालुक्यातील एका गावातील २४ वर्षीय विवाहिता आपल्या मुलासह वास्तव्यास असून ती शेतीचे काम करून आपला उदरनिर्वाह करते. गेल्या दीड ते दोन महिन्यांपासून गावातील महेंद्र गोविंद गुजर याने महिलेला मुलाला जीवे ठार मारण्याची धमकी देत तिच्यावर वारंवार अत्याचार केला. तसेच याला प्रतिकार केला असता महिलेवर विळ्याने वार करून हाताला दुखापत केली आहे. हा प्रकार गेल्या दिड महिन्यांपासून ते 29 ऑगस्ट रोजीच्या रात्री साडेआठ वाजेदरम्यान घडला. पीडीतेने पाचोरा पोलीस ठाण्यात धाव धेवून तक्रार…

Read More

नवी दिल्ली : वृत्तसंस्था पत्नीला तिच्या प्रियकरासोबत आक्षेपार्ह अवस्थेत पतीने पाहिल्यानंतर भयानक कृत्य उत्तर प्रदेशमधील रायबरेलीत घडले आहे. रामविलास (३८) या व्यक्तीने त्याच्या पत्नीला प्रियकरासोबत रंगेहाथ पकडल्यानंतर रागाच्याभरात तिला विजेचा शॉक देऊन तिची हत्या केली आहे. मयत महिलेचं नाव मिथिलेश असून तिचा प्रियकर लक्ष्मी शंकर हा तिथून पळून जाण्यात यशस्वी झाल्याने त्याचे प्राण वाचले. या भयावह घटनेनंतर पोलिसांनी रामविलास याला अटक केली आहे, टाईम्स ऑफ इंडियाने याबाबत वृत्त दिलं आहे रामविलासला अटक केल्यानंतर चौकशीत त्याने पोलिसांना सांगितलं की, तो सोमवारी रात्री घरी परतला तेव्हा त्याला त्याची पत्नी मिथलेश एका पुरुषासोबत आक्षेपार्ह अवस्थेत दिसली. पोलिसांनी सांगितलं की, शेजाऱ्यांनी रामविलास यांच्या…

Read More

मुंबई : वृत्तसंस्था राज्यातील गुन्हेगारीच्या घटनेत सातत्याने वाढ होत असतांना आता थेट मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा बालेकिल्ला असलेल्या ठाण्याचा शिवसेना पदाधिकाऱ्यांचा हत्या झाल्याने एकच खळबळ उडाली आहे. आर्थिक व्यवहारातून ही हत्या झाल्याची माहिती समोर येते आहे. ठाण्यातील वसंत विहार परिसरात अक्षय ठुबे राहत होता. अक्षय ठुबे याच्याकडे शिवसेना शिंदे गटाचा उपशाखा प्रमुख पदाची जबाबदारी होती.अक्षय 29 तारखेपासून गायब होता, तेव्हापासून त्याचा शोध सुरु होता. त्यानंतर काल रात्री त्याचा मृतदेह सापडला आहे. आर्थिक देवाणघेवाण यातून ही हत्या झाल्याचं समोर आले आहे. ठाण्यातील चीतळसर पोलीस ठाण्याच्या हद्दीतील घडला आहे. याप्रकरणी पोलिसांनी ३ जणांना अटक केली असून अधिक तपास करत आहेत.

Read More

मुंबई : वृत्तसंस्था धाराशिव जिल्ह्यातील कळंब शहरातील मुख्य मार्गावरील स्टेट बँक ऑफ इंडियाचे ३९ लाख रुपये असलेले अख्खे एटीएम मशीनच चोरट्यांनी बुधवारी पहाटे लंपास केले. या घटनेनंतर पोलिसांची शोधपथके चोरट्यांच्या मागावर रवाना झाली असून, सीसीटीव्ही फुटेजचीही तपासात मदत घेतली जात आहे. कळंब शहरातील ढोकी रोडवरील एका कॉम्प्लेक्समध्ये स्टेट बँक ऑफ इंडियाचे एटीएम मशीन बसविलेले आहे. बुधवारी पहाटे अज्ञात चोरट्यांनी ३९ लाख रुपयांसह एटीएम मशीन लंपास केल्याचे सकाळी समोर आले पोलिसांनी या भागाची पाहणी केली असता एका वाहनात दोरीच्या साहाय्याने ही मशीन उचकटून चोरटे घेऊन गेले असावेत, असा अंदाज त्यांनी व्यक्त केला. सीसीटीव्हीत संशयास्पद रिक्षा चोरी झालेल्या परिसरातील एका दुकानाच्या…

Read More

अमळनेर : प्रतिनिधी  अमळनेर तालुक्यातील डांगर या गावी सर्पदंश झालेल्या एका दहा वर्षीय बालकाला दोन ठिकाणी वेळीच उपचार न मिळाल्याने त्याचा मृत्यू झाल्याची घटना मंगळवारी घडली. त्याला सुरुवातीला जानवे येथे प्राथमिक आरोग्य केंद्रात त्यानंतर अमळनेर येथे ग्रामीण रुग्णालयात नेले होते. परंतु, तेथेही त्याच्यावर तात्पुरते उपचार करण्यात आले. नंतर त्याला गंभीर अवस्थेत धुळे जिल्हा रुग्णालयात नेले असता उपचारादरम्यान त्याचा मृत्यू झाला. आकाश राजेंद्र भिल असे या मृत बालकाचे नाव आहे. आकाश याला जिल्हा परिषदेच्या शाळेत जाताना त्याला सर्पदंश झाला. दरम्यान, सर्पदंश होताच आकाशच्या मित्रांनी आरडाओरड केली. बालकाच्या काकांनी गावातील काही लोकांकडून दुचाकीची व्यवस्था करुन आकाश याला जानवे येथे प्राथमिक…

Read More

जळगाव : प्रतिनिधी  जळगाव जिल्हा कारागृहात खुनाच्या गुन्ह्यात दोन वर्षांपासून असलेला अमोल उर्फ कार्तिक नाना सोनवणे याने मंगळवारी बॅरेकमध्ये रुमालाच्या साहाय्याने गळफास घेवून आत्महत्येचा प्रयत्न केला. इतर बंदिवानांनी त्याला वाचवत खाली उतरविले. सोनवणे याला शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात दाखल केले असून जिल्हापेठ पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल आहे. खुनाच्या गुन्ह्यात अमोल सोनवणे हा २६ ऑगस्ट २०२१पासून जिल्हा कारागृहातील कोविड बॅरेकमध्ये बंदी म्हणून आहे. दि. २९ रोजी रात्री अचानक कोविड बॅरेकमधील बंदिवानांचा आरडाओरड चालू झाला. त्यामुळे या सर्व जणांनी धाव घेतली. यावेळी बॅरेकमधील बंदी अमोल हा रुमालाने कपाटावर चढून आडव्या खांबाला गळफास घेतलेला दिसला.

Read More

जळगाव : प्रतिनिधी  जळगावसह कुसूंबा येथील कार चोरट्यांना रामानंद पोलिसांनी अटक केली आहे. विशाल संजय सपकाळे (21, रा.कुसुंबा, जि.जळगाव) आणि वैभव महेंद्र बारी (21, रा.खंडेराव नगर, जळगाव) अशा अटकेतील संशयितांची नावे आहे असून त्यांच्याकडून चोरी केलेली कार जप्त करण्यात आली. जळगाव शहरातील शिव कॉलनी परीसरात राहणारे रवींद्र हरी पाटील यांच्या घराच्या मागील बाजूस त्यांच्या मालकीची इंडिका कार क्रमांक (एमएच 19 एपी 3860) ही 6 जुलै रोजी मध्यरात्री अज्ञात चोरट्यांनी चोरून नेली होती. याबाबत रामानंदनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता. गुन्हा दाखल झाल्यानंतर पोलीस ठाण्याच्या पोलीस निरीक्षक शिल्पा पाटील यांनी गुन्हे शोध पथकाला कारवाईच्या सूचना दिल्या. त्यानुसार पथकाला…

Read More

पुणे : वृत्तसंस्था राज्यात प्रेमाच्या माध्यमातून अनेक गुन्हेगारी घटना वाढल्याचे प्रमाण गेल्या वर्षभरापासून मोठ्या प्रमाणत बाहेर येवू लागल्या असतांना एक धक्कादायक घटना पुण्यात घडल्याचे समोर आले आहे. कोंढवा येथे ही घटना घडली. मिळालेल्या माहितीनुसार, येथे एक तरूण एकतर्फी प्रेमातून गेल्या अनेक दिवसांपासून एका शाळकरी मुलीचा पाठलाग करत होता. याप्रकरणी त्या मुलीने तिच्या आईकडे तक्रार केली. त्यानंतर तिच्या आईने त्याला समजावयचा प्रयत्न केला असता, त्या मुलाने तिच्या आईला थेट जीवे मारण्याचीच धमकी दिली. याप्रकरणी कोंढवा पोलिसांनी त्या तरूणाविरोधात गुन्हा दाखल केला आहे. आकाश (वय २४) असे त्या मुलाचे नाव आहे. याप्रकरणी पीडित मुलीच्या आईने पोलिसांत तक्रार दाखल केली होती.…

Read More

नवी दिल्ली : वृत्तसंस्था देशभर रक्षाबंधनाचा सण उत्साहात साजरा होत असतांना एक धक्कादायक घटना समोर आली आहे. भावा-बहिणीच्या प्रेमाचा सण असतो हा. मात्र या सणापूर्वी उत्तर प्रदेशातील एका गावात दुर्दैवी घटना घडली. तेथे एका मुलीला तिची आई ओरडली. यामुळे नाराज झालेल्या मुलीने टोकाचं पाऊल उचलत थेट कालव्यातच उडी मारली. ते पाहून तिला वाचवण्यासाठी तिच्या दिव्यांग भावानेही पाठोपाठ उडी मारली. या घटनेची माहिती मिळताच संपूर्ण गावात एकच गोंधळ माजला. तातडीने पोलिसांना फोन करण्यात आला. सध्या पोलिसांचे पथक गोताखोरांच्या मदतीने भाऊ आणि बहिणीचा शोध घेत आहे. मात्र काहीतरी अनुचित प्रकार घडण्याची शक्यता असल्याने लोक घाबरले आहेत. मिळालेल्या माहितीनुसार, फतेहपूरजवळील दुबेपूर गावात…

Read More