नवी दिल्ली : वृत्तसंस्था देशभरात सोशल मिडीयावर अनेक व्हिडीओ व्हायरल होत असतात काही खरे असतात तर काही खोटे असतात. अशीच एक धक्कादायक घटना उत्तर प्रदेश मध्ये घडली आहे. थेट नागरिकांनी त्या जावयाला चोप देण्याची भाषा केली आहे. सासरच्या लोकांकडे जावायाने बोलेरो गाडी मागितली होती. त्यावेळी सासरच्या लोकांनी गाडी देण्यास नकार दिला, त्यावेळी जावयाने पत्नीला जोराची मारहाण केली, त्याचबरोबर पत्नीचा नको त्या अवस्थेतील व्हिडीओ माहेरच्या लोकांना पाठवून दिला आहे. काही व्हिडीओ सोशल मीडियावर टाकले असल्याचे सु्ध्दा त्यांनी सांगितले आहेत. त्या महिलेवरती रेप करण्यासाठी पुतण्या आणि इतर घरच्यांना सुध्दा पाठवलं होतं असा आरोप त्यांच्यावरती करण्यात आला आहे. दहा लोकांच्या विरोधात…
Author: editor desk
नवी दिल्ली : वृत्तसंस्था देशभरात अनेक धक्कादायक घटना घडत असतांना शुक्रवारी देखील अशीच घटना घडली आहे. एका पत्नीने आपल्या पती आणि तीन मुलांची हत्या केली आहे. त्याचबरोबर ती महिला रात्रीत घटनास्थळावरुन गायब झाली आहे. ती महिला घरातून बाहेर जाताना दरवाजा बंद करुन गेली. ज्यावेळी शनिवारी ही घटना लोकांना समजली, त्यावेळी शेजारी आणि स्थानिकांना मोठा धक्का बसला आहे. नवरा नको त्या अवस्थेत सापडला आहे. या घटनेची माहिती पोलिसांना मिळाल्यानंतर त्यांनी घटनास्थळी धाव घेतली. पोलिस या प्रकरणाची कसून चौकशी केली आहे. तिथल्या एका व्यक्तीने पोलिसांनी या प्रकरणाची माहिती दिली. पोलिस घटनास्थळी दाखल झाल्यानंतर चौकशी सुरु केली आहे. पोलिसांना शंका आहे की,…
अमळनेर : प्रतिनिधी राज्यातील शिंदे , फडणवीस व अजित पवारांच्या मंत्रिमंडळात जळगाव जिल्ह्यातील अमळनेर तालुक्याचे आ.अनिल पाटील यांना मंत्रीपदाची लॉटरी लागली असून मंत्री पाटील सध्या राज्यातील अनेक ठिकाणी घडलेल्या घटनेची पाहणी करण्यासाठी असतांना अमळनेर शहरातील त्यांच्या निवासस्थानावर दि.२ रोजी मोठा मोर्चा निघाला होता. मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठाच्या आदेशान्वये मागसवर्गीय ५६ जातींचे नोकरीविषयक हक्क हिरावून घेण्याच्या निर्णयाविरोधात येथील नगरपालिकेच्या कर्मचाऱ्यांनी थेट मदत, पुनर्वसन व आपत्ती व्यवस्थापन मंत्री अनिल पाटील यांच्या निवासस्थानी शेकडोच्या संख्येने धडकत मोर्चा काढला. राष्ट्रीय नगरपालिका मजदूर महासंघ व भारतीय कर्मचारी महासंघातर्फे हा मोर्चा काढण्यात आला होता. कोर्टाने दिलेल्या आदेशामुळे मागासवर्गीय ५६ जातींचे नोकरीविषयक हक्क…
भुसावळ : प्रतिनिधी भुसावळ तालुक्यात कंडारीत जुन्या वादातून दोघा सख्ख्या भावंडांची निर्घृण हत्या करण्यात आली होती तर या घटनेतील एका जखमीचा उपचारादरम्यान मृत्यू झाला असून आता या हत्याकांडातील मृतांची संख्या तीन झाल्याने शहरात मोठी खळबळ उडाली आहे. मिळालेल्या माहितीनुसार, भुसावळ तालुक्यातील कंडारी गावातील शांताराम भोलानाथ साळुंखे (33) व राकेश भोलानाथ साळुंखे (28) या वीटभट्टी कामगार भावंडांची जुन्या वादातून दहा संशयितांनी चाकू, तलवार व लोखंडी रॉड डोक्यात मारून निर्घृण हत्या केली. ही घटना शुक्रवारी रात्री 10 वाजेच्या सुमारास कंडारी गावातील महादेव टेकडी परीसरातील पूजा पान सेंटरजवळील वखारीजवळील चौकात घडली होती. या घटनेत या रमेश अमोल इंगळे (32, सर्व रा.कंडारी) हे…
भुसावळ : प्रतिनिधी जळगाव जिल्ह्यात गेल्या अनेक महिन्यापासून वाळूमाफिया मोठ्या प्रमाणात वाळूचोरी करीत होते. हि वाळूचोरी रोखण्यासाठी यावल तालुक्यातील शिरसाड गावाजवळील महिला मंडळाधिकारी घटनास्थळी गेले असतांना वाळू माफीयांनी त्यांच्यावर हल्ला केला होता. याप्रकरणी यावल पोलिसांनी चार संशयीतांना अटक केली असून गुन्ह्यातील पळवून नेण्यात आलेले ट्रॅक्टर व टॉली पोलिसांनी जप्त केली. दरम्यान, अटकेतील संशयिताना यावल न्यायालयात हजर केले असता चौघांना 4 सप्टेंबरपर्यंत तीन दिवसांची पोलीस कोठडी सुनावण्यात आली. गुरुवारी अवैध वाळू वाहतूक करणार्या एका ट्रॅक्टरला बामणोद येथील महिला मंडळ अधिकारी यांनी रोखले होते. त्यांच्याशी धक्काबुक्की करीत सदर ट्रॅक्टर पळवण्यात आले होते व या प्रकरणी यावल पोलिसात गुन्हा दाखल करण्यात…
मुंबई : वृत्तसंस्था राज्यात महामार्गावर सुरु असलेल्या अपघाताची मालिका अजूनही संपत नसून महामार्गावर नियमित अनेकांचे जीव जात आहेत. अशीच एक धक्कादायक घटना हिंगोली ते कळमनुरी मार्गावर कळमनुरी शिवारात घडली आहे. भरधाव कार दुभाजकावर आदळून हिंगोली ते कळमनुरी मार्गावर कळमनुरी शिवारात झालेल्या अपघातात पती-पत्नीचा जागीच मृत्यू झाला आहे. तर मुलगा गंभीर जखमी झाला आहे. आज ३ रविवारी सकाळी आठ वाजण्याच्या सुमारास कळमनुरी शिवारात हा भीषण अपघात घडला. अपघातात प्रा. जयप्रकाश पाटील कावरखे, मंजूषा जयप्रकाश पाटील कावरखे यांचा मृत्यू झाला आहे. ते सेनगाव तालुक्यातील गोरेगाव येथील रहिवासी होते. अपघातातील दांपत्याचा मुलगा पराग पाटील गंभीर जखमी झाला आहे. त्याला उपचारासाठी नांदेडला हलविण्यात आले…
जळगाव : प्रतिनिधी जळगाव शहरातील एका शोरूममधून विनाक्रमांकाची दुचाकी देऊन ती पुन्हा पासिंगच्या बहाण्याने परत घेत ६० ते ७० जणांना लाखो रुपयांना गंडविल्याप्रकरणी शोरूमच्या मालकावर गुन्हा दाखल करण्यासह दोन पंटरला अटक करण्यात आली. याप्रकरणी शोरूमचे मालक गिरीश चौधरी यांच्यासह दीपक ऊर्फ मनोज हिरालाल कोळी (रा. कांचननगर) आणि सुमित राजू सपकाळे (रा. पांझरापोळ) या दोन पंटरांविरुद्ध गुन्हा दाखल झाला. त्यात दोन पंटरांना शहर पोलिसांनी अटक केली. खोटेनगरातील रहिवासी चंद्रकांत इसे हे सेवानिवृत्त असून त्यांच्या पत्नी या राज्य परिवहन महामंडळाच्या एरंडोल आगारात आगार व्यवस्थापक म्हणून नोकरीला आहेत. सन २०२२ मध्ये दीपक ऊर्फ मनोज हिरालाल कोळी याने इसे यांच्या पत्नीला तुम्हाला कमी…
मुंबई : वृत्तसंस्था लग्न करण्यासाठी अनेक तरुण तरुणी जीवनसाथी मॅट्रीमोनी या साईटवरून लग्न जमवून घेत असतात पण एका मुलाने एका मुलीसोबत मैत्री करून महिनाभर चॅटिंगही झाली. मुलाने मी लंडनला असून, दिल्लीमधील कस्टम ऑफिसमध्ये माझी बॅग अडकली आहे. ती सोडविण्यासाठी दीड लाख रुपये घेत फसवणूक केली. हा प्रकार जुलै २०२१ मध्ये घडला. त्यानंतर अंबाजोगाईच्या डॉक्टर मुलीने सायबर पोलिसांकडे धाव घेतली. पोलिसांनी यात तांत्रिक तपास करून दीड लाख रुपये परत मिळवून दिले आहेत. तक्रार आल्यानंतर दोन वर्षे रक्कम थांबविली होती. परंतु, आता न्यायालयाच्या आदेशाने हे पैसे खात्यावर वर्ग केले आहेत. अंबाजोगाईतील एक मुलगी मुंबईत वैद्यकीय अधिकारी आहे. जून महिन्यात तिची जीवनसाथी…
जळगाव : प्रतिनिधी जळगाव जिल्ह्यातील भुसावळात एकामागोमाग तीन खुनाच्या घटना एकाच दिवसात घडल्याने शहरासह जिल्हा हादरला होता. त्यातील पहाटेच्या सुमारास एका कुविख्यात गुन्हेगाराची हत्या करण्यात आल्याची घटना घडली होती. याबाबत सकाळी १० वाजेच्या सुमारास मयताच्या वडिलांच्या फिर्यादीवरून भुसावळ बाजारपेठ पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल करण्यात आला आहोत. या खुनातील आरोपीला बाजार पेठ पोलिसांना ताब्यात घेण्यात यश आले असून पुढील चौकशी सुरु आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, शहरातील वांजोळा रोड परिसरातील दत्तनगरातील रहिवासी सुरेश पांडु शिंदे, (वय-६८) यांनी आज पहाटे बाजार पेठ पोलीसात फिर्याद दिल्यानुसार दि. २ रोजी मध्यरात्रीच्या सुमारास निवृतीनगर येथील काशी विश्वेवर मंदरा समोरील नगरपरिषदेच्या पाणी पुरवठा योजनेच्या सिमेंटच्या टाकीच्या…
जळगाव : प्रतिनिधी जळगाव शहरातील रामानंदनगर पोलीस ठाण्याच्या हद्दीतील रेकॉर्डवरील गुन्हेगारावर जिल्हाधिकारी आयुष प्रसाद यांनी एमपीडीए कायद्यांतर्गत स्थानबध्द करण्याचे आदेश काढले असल्याची माहिती स्थानिक गुन्हे शाखेचे वरीष्ठ पोलीस निरीक्षक किसन नजन पाटील यांनी शुक्रवारी १ सप्टेंबर रोजी दुपारी १ वाजता दिलेल्या प्रसिध्दीपत्रकान्वये कळविले आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, रामानंद नगर पोलीस ठाण्याच्या हद्दीत विश्वास अरूण गारूंगे हा गुन्हेगार परिसरात अवैधरित्या गावठी दारू बनविणे व त्याची विक्री करणे व शासनाच्या आदेशाने उल्लंघन करणे असे वेगवेगळ्या स्वरूपाचे एकुण १८ गुन्हे रामानंद नगर पोलीसात दाखल आहे. शिवाय त्याच्यावर या आधि ४ वेळा प्रतिबंधात्मक कारवाई देखील करण्यात आली. परंतू त्याच्या कोणतीही सुधारणा झाली…

