साक्षीदार | ५ सप्टेंबर २०२३ राज्यातील अनेक शेतकरी ऊसाची मोठी लागवड करीत असतात पण एक शेतात गांजाची लागवड करीत असल्याचं उघड झाल्याने हे प्रकरण चर्चेत आले आहे. त्याचबरोबर अशा शेतकऱ्यांच्यावरती कारवाई सुध्दा झाली आहे. विशेष म्हणजे सांगली जिल्ह्यात या आगोदर अशी अनेक प्रकरण उजेडात आली आहेत. त्याचबरोबर पोलिसांनी कारवाई सुध्दा केली आहे. काल जत तालुक्यातील एका शेतकऱ्याने गांजाची लागवड केल्याचं उजेडात आलं आहे. ज्यावेळी पोलिसांनी सगळा परिसर तपासून पाहिला त्यावेळी त्यांना तब्बल 20 किलो गांजा शेतात सापडला आहे. सापडलेल्या गांजाची किंमत अंदाजे किंमत साडे पाच लाख रुपये असल्याची माहिती सांगली पोलिसांनी दिली आहे. सांगली जिल्ह्यातील जत तालुक्यातील बाज या…
Author: editor desk
नवी दिल्ली : वृत्तसंस्था अनेकांना दारूचे व्यसन लागले असते पण काही लोक या व्यसनामध्ये काय करून टाकतील हे कुणीही सांगू शकत नाही. दारूपायी आणखी एक कुटुंब उध्वस्त झाल्याची धक्कादायक घडल्याचे उघडकीस आले आहे. तेथे एका नातवाने दारूच्या नादात असं कृत्य केलं जे ऐकून सर्वांच्याच काळजाचा थरकाप उडाला. अख्खं गावचं हादरलं. ही दुर्दैवी घटना गोंदिया जिल्ह्यातील सडक अर्जुनी तालुक्यातील गिरोली गावातील आहे. तेथे दारूच्या आहारी गेलेल्या तरूणाने जे कृत्य केले ते ऐकून साऱ्या गावकऱ्यांच्या पायाखालची जमीन हादरली. दारूच्या नादात त्या तरूणाने त्याच्या वयोवृद्ध आजोबांना मारहाण केली. आई आणि पत्नीला घरात लपवून का ठेवलं, असा प्रश्न विचारत त्याने आजोबांना बेदम चोप…
धरणगाव : प्रतिनिधी जळगाव जिल्हा पालकमंत्री गुलाबराव पाटील यांची सोशल मिडीयावर बदनामी केल्याप्रकरणी एका विरोधात धरणगाव पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मिळालेल्या माहितीनुसार, धरणगाव शहरातील लहान माळी वाडा येथील रहिवासी विलास रामा महाजन (वय ४२) यांनी फिर्यादीनुसार, मी सन 2022 पासुन शिवसेना बाळासाहेब ठाकरे गटाचा धरणगाव शहर अध्यक्ष म्हणुन कार्यरत आहे. आज दिनांक ०५ रोजी 12.43 वा सुमारास आमच्या धरणगाव शहरातील धरणगाव प्रेस व धरणगाव शहरातील तालुक्यातील इतर सोशल मिडीया (फेसबुक, इंस्ट्राग्राम, व्हॉटसप ) ग्रुप वर ऑडीओ क्लीप वायरल झाली त्यात जळगाव जिल्हयाचे पालकमंत्री गुलाबराव पाटील यांच्या मोबाईलवर छत्रपती संभाजी नगरातील एका व्यक्तीने त्याच्या मोबाईल यावरुन फोन करुन जालना…
जळगाव : प्रतिनिधी जळगाव जिल्ह्यात तब्बल तीन वेळा आमदारकी भूषविणारा भाजप नेता बी.एस.पाटील आज शरद पवार यांच्या उपस्थितीत राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात प्रवेश केला आहे. त्यामुळे जळगावात आता राष्ट्रवादी काँग्रेसची ताकद वाढणार आहे. जळगाव जिल्ह्याच्या दौर्यावर शरद पवार आज आलेले आहेत. त्यांची जळगावात आज सभा सुरु झालेली होती. यावेळी शरद पवार व प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांच्या हस्ते बी.एस.पाटील यांचा पक्ष सोहळा संपन्न झाला. खान्देशातील मोठं नाव असलेले बी.एस.पाटील असून ते तीनवेळा आमदार राहिले आहेत. त्यांना 2009 च्या निवडणुकीत भाजपने तिकीट नाकारलं होतं. त्यामुळे त्यांनी अपक्ष निवडणूक लढवली होती. पण या निवडणुकीत त्यांचा पराभव झाला होता. त्यानंतर 2014 च्या विधानसभा निवडणुकीवेळी ते…
मुंबई : वृत्तसंस्था राज्यातील मुंबईमधील पवई परिसरात राहणाऱ्या 24 वर्षीय एअर होस्टेस रुपल ओगर हिच्या हत्येच्या आरोपीला जेरबंद करण्यास पोलिसांना यश आलं आहे. ही हत्या सफाई कामगाराने केली असून पोलिसांनी त्याच्या अंगावर असलेल्या जखमांच्या आधारे या हत्येचा उलगडा केला. आता ही हत्या चोरीच्या उद्देशाने केली होती की आणखी काही उद्देश त्यामागे होता याचा तपास सुरू आहे. रविवारी एका 24 वर्षीय एअर होस्टेस रुपल ओगर यांची तिचा राहत्या घरात गळा चिरून हत्या करण्यात आली होती. या हत्या प्रकरणात पोलिसांनी 12 तासाच्या आत त्याच इमारतीत काम करणारा सफाई कामगाराला अटक करून या गुन्ह्यातील आरोपीचा छडा लावला आहे. मात्र गेल्या काही दिवसात…
मुंबई : वृत्तसंस्था राज्यातील रस्त्यावर होणाऱ्या वाहतुकीची कोंडी मोठ्या प्रमाणात होत असते. डोंबिवलीतील टाटा पॉवर लेन परिसरात वाहन दुरूस्ती करणारी अनेक गॅरेजेस आहेत. मात्र त्यांचा व्याप दुकांनापुरताच नसून रस्त्यावरही त्यांचे सामान असते, वाहने दुरूस्त केली जातात. वाहनांचे पार्ट्सही विकले जातात. मात्र दुकानदारांच्या या पसाऱ्यामुळे तिथे चालायलाही जागा नसते, अनेकदा वाहतूक कोंडीही होते. हेच लक्षात घेऊन डोंबिवलीतील रहिवासी असणाऱ्या राजू चव्हाण यांनी त्यांना जाब विचारला. तसेच एक पाऊल पुढे टाकत त्यांनी पालिकेत तक्रार करत कारवाईची मागणी केली. मात्र यामुळे भडकलेल्या गॅरेज मालकासह इतर काही लोकांनी चव्हाण यांना बेदम मारहाण केल्याचे समोर आले आहे. रविवारी दुपारी ही धक्कादायक घटना घडली. गॅरेज…
हिंगोली : वृत्तसंस्था राज्यातील महामार्गावर अपघाताची संख्या वाढत असतांना आता हिंगोली जिल्ह्यातील कळमनुरी येथील हिंगोली ते नांदेड या राष्ट्रीय महामार्गावर कळमनुरी शिवारात भरधाव कार दुभाजकावर आदळून रविवारी सकाळी अपघात झाला. यामध्ये पती पत्नीचा जागीच मृत्यू झाला. मिळालेल्या माहितीनुसार, कावरखे कुटुंबीय कारने नांदेडहून हिंगोलीकडे येत होते. चालकाचा कारवरील ताबा सुटल्याने कार दुभाजकावर आढळली व चार ते पाच वेळा उलटली. यामध्ये प्रा. जयप्रकाश पाटील कावरखे (वय ६५), मंजूषा जयप्रकाश कावरखे (वय ६०) हे दोघे जागीच ठार झाले. त्यांचा मुलगा पराग हा गंभीर जखमी झाला. त्यास कळमनुरी येथील उपजिल्हा रुग्णालयात प्राथमिक उपचार करून पुढील उपचारासाठी हिंगोली येथे पाठविण्यात आले आहे.
छत्रपती संभाजीनगर : वृत्तसंस्था छत्रपती संभाजीनगर शहरात नात्यातल्याच २३ वर्षीय तरुणावर २६ वर्षीय विवाहित तरुणीने विनयभंगाचा गुन्हा दाखल केला. पोलिसांनी त्याच्यावर प्राथमिक कारवाईही केली. मात्र, तरुणीने पतीसह त्याच्या घरी जात त्याला बेदम मारहाण केली. रविवारी तिच्यासह पतीवर मुकुंदवाडी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला. यानंतर दोन तासांत पोलिस आयुक्तालयात जात पायऱ्यांवर अंगावर रॉकेल ओतून आत्महत्येचा प्रयत्न केला. परंतु कर्तव्यावरील पोलिसांनी धाव घेत तिच्या हातातून काडीची पेटी ओढल्याने अनुचित प्रकार टळला. २६ वर्षीय तक्रारदार महिलेने २४ ऑगस्ट रोजी सिडको पोलिस ठाण्यात गोकुळ पाटोळे याच्याविरोधात तक्रार दिली. १८ ऑगस्ट रोजी पैशांच्या व्यवहारातून घरात गैरप्रकार केल्याच्या आरोपावरून त्याच्या विरोधात विनयभंगाचा गुन्हा दाखल केला. पोलिसांनी…
भुसावळ : प्रतिनिधी भुसावळ तालुक्यातील कंडारी येथील तिहेरी हत्याकांडप्रकरणी दि. ४ रोजी आणखी तीन आरोपींना पोलिसांनी अटक केली. त्यांना भुसावळ न्यायालयात हजर केले असता तिघांना दि. ७ सप्टेंबरपर्यंत पोलिस कोठडी सुनावली. मिळालेल्या माहितीनुसार, भुसावळ तालुक्यातील कंडारी येथील संशयित आरोपी देविदास मधुकर पवार (वय ३०), अमोल रवींद्र कोळी (वय २४), मयूर लीलाधर तायडे (वय २२) अशी आरोपींची नावे आहेत. याप्रकरणी या आधी तीन आरोपींना अटक केली होती. त्यांनाही न्यायालयाने दि. ७ सप्टेंबरपर्यंत पोलिस कोठडी सुनावली आहे. या प्रकरणात एकूण सहा आरोपींना अटक करण्यात आली आहे. तर, चार आरोपी अद्यापही फरार आहेत, अशी माहिती सरकारी वकील अॅड. नितीन खरे यांनी…
धरणगाव : प्रतिनिधी धरणगाव शहरात दोन ठिकाणी चोर्या केल्याने व्यापार्यांसह नागरीक धास्तावले आहेत. शहरातील मुख्य बाजार पेठेतील कापड दुकान आणि गुजराथी गल्लीतील एक बंद घर फोडत अज्ञात चोरट्यांनी रोकड, चांदीचा क्वाईन, असा साधारण 50 हजाराहून अधिकचा ऐवज लंपास केल्याने शहात खळबळ उडाली आहे. मिळालेल्या माहितीनुसार, धरणगावातील मुख्य बाजार पेठेतील मिश्रीलाल लालचंद कापड दुकान सोमवारी पहाटे 5 वाजेच्या सुमारास तोंडावर मास्क आणि एकाने रुमाल बांधलेला अशा दोघा चोरट्यांनी फोडले. दुकानात प्रवेश केल्यानंतर चोरट्यांनी अवघ्या काही मिनिटात गल्ल्यातील साधारण 15 ते 20 हजारांची रोकड घेऊन पोबारा केला तर गुजराथी गल्लीतील शाम कर्वा हे बाहेर गावी गेले असल्याने घर बंद होते. चोरट्यांनी बंद…

