Author: editor desk

जळगाव : प्रतिनिधी  लखनऊ येथे नुकतेच पार पडलेल्या आंतरराष्ट्रीय स्तरावरील १९ व्या जागतिक शांतता आणि एकता उत्सव ‘कॉनफ्लूएंस २०२३’ मध्ये जळगावच्या किड्स गुरुकुल इंटरनॅशनल स्कूलने डंका वाजवला आहे. उत्सवातील विविध स्पर्धेत सहभागी झालेल्या २० विद्यार्थ्यांच्या संघाने तब्बल ७ स्पर्धेत ८ बक्षिसे पटकावली आहेत. विजयी संघ सर्वोत्कृष्ट विजेतेपदाची ट्रॉफी घेऊन जळगावात पोहचताच त्यांचे शाळा व्यवस्थापन व पालकांतर्फे जंगी स्वागत करण्यात आले. जगातील सगळयात मोठी शाळा म्हणून नावाजलेली लखनऊ येथील सिटी माँटेसरी स्कूलतर्फे दि.३० ऑगस्ट ते २ सप्टेंबर २०२३ दरम्यान डब्ल्यूयूसीसी ऑडिटोरियम लखनऊ येथे १९ व्या जागतिक शांतता आणि एकता उत्सव ‘कॉनफ्लूएंस २०२३’ चे आयोजन करण्यात आले होते. विद्यार्थ्यांमध्ये एकता, शांततेचे…

Read More

पुणे : वृत्तसंस्था राज्यात गुन्हेगारीच्या घटना वाढत असतात यासोबत चोरीच्या देखील घटना घडत आहे. अशातच एक धक्कादायक घटना पिंपरीत घडली आहे. चोरी करत असताना पाहिले म्हणून तिघांनी एका सुरक्षारक्षकाला हाताने व लोखंडी तलवारीने मारहाण केली आहे ही घटना रविवारी रात्री पिंपरी येथे घडली. याप्रकरणी सुखदेव राजेंद्र मोरे (वय 45 रा पिंपरी) यांनी पिंपरी पोलीस ठाण्यात फिरत दिली आहे. यावरून पोलिसांनी उज्वल विनोद लव्हे (वय.21 रा पिंपरी) याला अटक केली असून, त्याचे साथीदार गौरव वाल्मिकी व राज वाल्मिकी यांच्यावर गुन्हा दाखल केला आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, उज्वल व गौरव याला पिंपरी पुलाखालून स्टील चोरी करताना फिर्यादी यांनी पाहिले होते. यादरम्यान…

Read More

पारोळा : प्रतिनिधी जळगाव ग्रामीण भागात होणाऱ्या अपघाताच्या संख्येत नियमित वाढ होत आहे. नेहमी दुचाकी, चारचाकीचा अपघात होत असतो मात्र नुकताच झालेल्या अपघातात एका चारचाकी कारने सायकलस्वाराला जबर धडक दिल्याने सायकलस्वार जागीच ठार झाल्याची घटना पारोळा शहराजवळील हायवेच्या बायपास रस्त्यावरील धरणगाव चौफुलीवर मंगळवारी रात्री साडे आठच्या सुमारास घडली आहे. मिळालेल्या माहितीनुसार, पारोळा शहरातील बायपास हायवेवर धरणगाव चौफुलीवर मंगळवारी रात्री साडेआठ वाजेच्या सुमारास शहराकडे आपल्या सायकलीने येणारे शिवाजी शामराव मराठे (वय ३८, रा शिवाजी विभाग,पारोळा) हे घरी येत असताना जळगावकडून धुळेकडे जाणाऱ्या इनोव्हा कारने जोरदार धडक दिल्याने सायकल चालक पंधरा ते वीस फूट फेकले गेल्याने त्याचा जागीच मृत्यू झाल्याची घटना घडली.…

Read More

मुंबई : वृत्तसंस्था जळगाव तालुक्यातील म्हसावद येथे आपल्या घरी सुट्टीसाठी आलेल्या मुंबईतील पोलिसाचा दुर्देवी अपघातात मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना सोमवारी रात्री घडली आहे. यात दीपक जयसिंग बाविस्कर (वय ३२) असे मयत पोलिसाचे नाव आहे. याप्रकरणी एमआयडीसी पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली. मिळालेल्या माहितीनुसार, जळगाव तालुक्यातील म्हसावद येथे दीपक बाविस्कर हे आपल्या कुटुंबियांसह वास्तव्यास होते व ते मुंबई येथे रेल्वे पोलिसात नियुक्तीस होते. दीपक बाविस्कर हे सुट्टीनिमित्त आपल्या गावी आल्यानंतर . सोमवारी रात्री दिपक बाविस्कर हे कामाच्या निमित्ताने दुचाकीने वावडदा येथे गेले होते. तेथील काम आटोपून परत घरी म्हसावदरोडवरील कुरकुरे नाल्याजवळ त्यांचया वाहनाला अज्ञात वाहनाने धडक दिली. याप्रकरणी…

Read More

मुंबई : वृत्तसंस्था मुंबईतील गुन्हेगारीचं प्रमाण दिवसेंदिवस वाढतच असून सध्या लोकल प्रवासही आता फारसा सुरक्षित राहिलेला नसल्याचे गुन्ह्यांच्या वाढत्या घटनांवरून दिसून येत आहे. असाच एक प्रकार रेल्वे स्टेशनवर घडल्याचे समोर आले आहे. मुंबईतील मध्य रेल्वेच्या विद्याविहार स्टेशनवर असाच काहीसा प्रकार घडला. तेथे एका महिलेचा विनयभंग झाल्याचे प्रकरण समोर आले आहे. या प्रकरणी एका व्यक्तीला अटक करून विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ४ सप्टेंबर रोजी ही घटना घडली असून आरोपीविरोधात कलम 354 व कलम 509 अंतर्गत कुर्ला रेल्वे पोलिस स्थानकांत हा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. इरफान सिद्दीकी (वय 39) असे आरोपीचे नाव असून तो मुंब्रा येथील रहिवासी असल्याचे…

Read More

नाशिक : वृत्तसंस्था राज्यातील अनेक शहरात गुन्हेगारी घटना नियमित घडत असतांना एक धक्कादायक घटना नाशिक शहरात घडली आहे. येथे लोकांना लुटण्यासाठी चोरट्यांनी नवनवी शक्कल लढवण्यास सुरूवात केली आहे. तेथे दोन सराईत गुन्हेगारांना पोलिसांनी अटक केली आहे. या दोघांनी एका कारचालकाशी भांडण करत त्याला लुटल्याचे समोर आले आहे. या प्रकरणी दोन संशयित विशाल चाफळकर, अनिकेत गवळी यांची नावे समोर आली आहे. मिळालेल्या माहितीनुसार, एका कारचालकाला विशाल आणि अनिकेत या दोघांनी धमकावत त्याला लुटल्याची माहिती मिळाली आहे. साहिल ठाकूर असे फिर्यादीचे नाव आहे. गाडीचा कट लागला या कारणावरून विशाल आणि अनिकेत यांनी साहिल ठाकूर याच्याशी भांडण सुरू केले. हा वाद वाढतच…

Read More

मुंबई : वृत्तसंस्था राज्यातील अनेक ठिकाणी तोल गेल्याने नदीत पडून अनेक अल्पवयीन मुलांच्या मृत्युच्या घटना सतत घडत असतांना एक धक्कादायक घटना समोर आली आहे. विशेष म्हणजे पोहत असलेल्या मुलांना किनाऱ्यावर पाहत बसलेल्या मुलाचा मृत्यू झाला आहे. हि दुर्देवी घटना विरारमध्ये घडली आहे, त्यामध्ये एका मुलाचा बुडून मृत्यू झाला आहे. त्या मुलाचं नाव तुषार सचिन उंबाळकर असं आहे. तो मुलगा १६ वर्षाचा होता. ही घटना काल सायंकाळी चार वाजता घडली आहे. विरार पश्चिमेच्या चिकल डोंगरी तलाव परिसरात ही घटना घडल्यानंतर लोकांनी गर्दी केली होती. विरार पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. मिळालेल्या माहितीनुसार, विरार मध्ये एका १६  वर्षाच्या…

Read More

जळगाव : प्रतिनिधी राज्याच्या राजकारणात आजवर जनतेने काका-पुतण्याचे राजकारण पाहिले आहे पण सध्या जळगाव जिल्ह्याच्या राजकारणात सासरे व सुनेचे राजकारण दिसून आले आहे. थेट सुनेने आपल्या सासऱ्याला एका महत्त्वाच्या विषयावर महत्त्वाचा सल्ला दिला आहे. हे प्रकरण आहे ते खडसे परिवारातील एकनाथ खडसे यांच्या सून सध्या भाजपच्या खासदार आहे तर खडसे राष्ट्रवादीचे नेते व आमदार देखील आहे. भुसावळ येथे रावेर लोकसभेच्या खा.रक्षा खडसे आल्या होत्या. यावेळी त्यांनी मीडियाशी संवाद साधताना सासऱ्याला सल्ला दिला. नाथाभाऊंनी मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावरून थेट गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर टीका केली होती. एकनाथ खडसेंनी जालना लाठीमारवरून देवेंद्र फडणवीस यांच्यावर टीका केली होती. तसेच पंतप्रधान नरेंद्र मोद यांना साकडं…

Read More

रावेर : प्रतिनिधी  पत्नी घरी गर्भवती असून ती लवकरच प्रसूती होणार असतांना दुचाकीने कामावर जात असलेल्या पतीवर काळाने झडप घालत दुर्देवी मृत्यू झाला आहे. दुचाकीस्वार मनोहर ऊर्फ मनोज कडू वाघ (वय २९) या तरुणाला भरधाव ट्रकने चिरडल्याने तो जागीच ठार झाला. हा अपघात अहिरवाडी गावाजवळ मंगळवारी सकाळी झाला. मिळालेली माहिती अशी की, रावेर तालुक्यातील अहिरवाडी येथील रहिवासी मनोहर ऊर्फ मनोज वाघ हा मंगळवारी सकाळी दुचाकीने नेरूळ येथे कामावर जात असताना भरधाव ट्रकने त्याला धडक दिली. यात मनोहर दुचाकीवरून रस्त्यावर कोसळताच ट्रकने चिरडल्याने तो जागीच गतप्राण झाला. अपघाताची माहिती मिळताच मनोहरच्या मित्रांसह नातेवाईकांनी घटनास्थळी धाव घेत त्याला लागलीच रुग्णालात…

Read More

मुंबई : वृत्तसंस्था राज्यात गुन्हेगारीचे प्रमाण इतक्या मोठ्या प्रमाणात वाढत असतांना देखील अनेक गुन्हेगार तस्करी करण्यासाठी वेगवेगळ्या युक्त्या लढवत असतांना देखील पकडले जात आहे. अशीच एक घटना मुंबईत घडली आहे. सोन्याची तस्करी करण्यासाठी गुन्हेगारांकडून नवनवीन युक्त्या लढविल्या जात असून शारजाहून आलेल्या एका प्रवाशाने सोबत आणलेल्या मिक्सरच्या भांड्यात तब्बल १ किलो सोने लपविले होते. या प्रवाशाला अटक करण्यात आली आहे. शारजाहून मुंबईत आलेल्या एका प्रवाशाच्या संशयास्पद हालचालीनंतर विमानतळावरील सीमा शुल्क विभागाच्या अधिकाऱ्यांनी त्याची चौकशी केली. त्याने परदेशातून येताना पास्ता बनविण्याचे भांडे तसेच नवा मिक्सर ग्राइंडर याची खरेदी केली होती. अधिकाऱ्यांनी त्याच्या इतर सामानासह ज्यावेळी मिक्सरचा बॉक्स उघडला त्यावेळी त्यामध्ये १…

Read More