यवतमाळ : वृत्तसंस्था केंद्र सरकारच्या पर्यटन मंत्रालयाकडून विविध योजना राबविल्या जातात. या योजनांमध्ये गुंतवणूक केल्यास भरभक्कम असा परतावा मिळतो, असे आमिष दाखवून यवतमाळातील तब्बल नऊ जणांना गंडविण्यात आले. या ठगबाजाला आर्थिक गुन्हे शाखेने नागपूर पोलिसांकडून ताब्यात घेतले. पोलिस कोठडीत असलेल्या ठगबाजाचे अनेक कारनामे पुढे येऊ लागले आहेत. त्याने मैत्रिणीवर चक्क ५२ लाख रुपये उडविले. ताज हॉटेल लखनऊ, रेडिसन ब्ल्यू हॉटेल नागपूर येथेही लाखोंच्या पाठ्य त्याने केल्याची कबुली दिली. अनिरुद्ध आनंदकुमार होशिंग (३०, रा. वाराणसी, उत्तर प्रदेश) असे या ठगबाजाचे नाव आहे. त्याने यवतमाळातील नऊ जणांना विविध प्रकारचे आमिष दाखवून गंडविले. यात त्याला यवतमाळातील महादेवनगर येथे राहणाऱ्या मीरा फडणीस यांनी सहकार्य…
Author: editor desk
जळगाव : प्रतिनिधी जळगाव शहरातील वेगवेगळ्या परिसरातून तीन मोबाईल चोरीचे गुन्हे दाखल झाल्यानंतर सम्राट कॉलनी येथील एका चोरट्याला स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने राकेश जगताप याला अटक केली असून त्याच्याकडून तीन मोबाईल हस्तगत करण्यात आले आहे. मिळालेल्या माहितीनुसार, पोलीस अधीक्षक एम. राजकुमार, जळगाव, अपर पोलीस अधीक्षकचंद्रकांत गवळी, जळगाव, उप विभागीय पोलीस अधिकारी. संदिप गावीत, जळगाव जिल्हा यांनी जिल्ह्यात मोबाईल चोरी संदर्भात गुन्ह्यांची वाढ झाली असल्याने सदरचे गुन्हे उघडकिस आणणे चाबत एलसीबी चे वरिष्ठ पोलीस निरीक्षक किसन नजनपाटील यांना आदेश दिले होते, वरिष्ठ पोलीस निरीक्षक, स्थानिक गुन्हे शाखा, जळगावचे किसन नजनपाटील, यांनी सफी विजयसिंग पाटील, अकरम शेख, सुधाकर अंभारे,…
पारोळा : प्रतिनिधी मद्य प्राशन करुन भरधाव वेगाने वाहन चालवणाऱ्या ट्रक चालकने रस्त्यांच्या कडेला चालणाऱ्या सहा वर्षीय लहान चिमुरडीला चिरडल्याने तिचा जागीच मृत्यू झाल्याची घटना दि.8 रोजी दुपारी तीन वाजेच्या सुमारास घडल्याने परिसरातील ग्रामस्थ चांगलेच आक्रमक झाले होते. मिळालेल्या माहितीनुसार, पारोळा तालुक्यातील देवगावपासून एक किलोमीटर अंतरावरील वस्तीत दुपारी ३ वाजेच्या सुमारास देवगाव येथील पूजा अनिल भील (वय ६ ) ही गावातील वसंत जिभाऊ नगर परिसरात असलेल्या रस्त्याच्या कडेला चालत होती. या वेळी देवगाव फाट्याकडून देवगावकडे तामसवाडी येथील नीलेश संजय बेलदार (वय २४) या ट्रक चालकाने त्याच्या ताब्यातील आयशर गाडी (एमएच- ०४, एचएस- ४७३१ ) ने पूजाला मागून जबर धडक दिली.…
धरणगाव : प्रतिनिधी गेल्या एक महिन्यापासून पावसाने दडी मारल्याने जळगाव जिल्ह्यातील धरणगाव तालुक्यातील अनेक शेतकरी हैराण झाले असतांना आता शेतातील पिके कोमजू लागले आहे. यामुळे अनेक शेतकरी आता अडचणीत येत असल्याची चिंता व्यक्त केली जात आहे. त्यामुळे या भिषण परिस्थितीची पाहणी करण्यासाठी कृषी विभाग, पिक विमा कंपनीचे प्रतिनिधी तलाठी, ग्रामसेवक, यांच्यासह रोमकचच्या उपस्थितीन सुकलेल्या पिकाची काही शेतात नजर पाहणी करण्यात आली. यावेळी मृग, उदिड आधी पिकांचा उत्पन्नाम ६००% ७००% घट झाल्याचे दिसून आले. यामध्ये प्रत्येक . पिकाचे – शेतकऱ्यांचे पंचनामे 90-92 कबी विभाग, महसुल, विमा कंपनी यांच्या मार्फत उख्यात आले यावेळी कृषी अधिकारी – पदमाकर वसेक पाया जो क्रिया…
पाचोरा : प्रतिनिधी येथे होणारा ‘शासन आपल्या दारी’ हा कार्यक्रम 9 सप्टेंबर ऐवजी आता 12 सप्टेंबर ला होणार असल्याचे आमदार किशोर पाटील यांनी एका प्रसिद्ध पत्रकाव्दारे कळविले आहे. 9 तारखेला मुख्यमंत्र्याचा अचानक दिल्ली दौरा ठरल्याने हा नियोजित कार्यक्रम पुढे ढकलण्यात आला आहे. मुख्यमंत्री एकनाथराव शिंदे,उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व अजित पवार यांच्या कार्यव्यस्ततेमुळे जळगाव जिल्ह्यातील पाहिला तालुकास्तरीय ‘शासन आपल्या दारी’ या उपक्रमासाठी होणारा दि.२६ ऑगस्ट रोजीचा पाचोरा दौरा स्थगित झाला होता त्यानंतर हा दौरा ९ सप्टेंबर रोजी होईल असे सांगत आ.किशोर पाटील यांनी पत्रकार परिषदेत जाहीर केले होते. मात्र त्यात पुन्हा एकदा बदल झाला असून आता हा दौरा १२…
नवी दिल्ली : वृत्तसंस्था देशातील अनेक राज्यात गुन्हेगारीच्या घटना मोठ्या प्रमाणत घडत आहे. अशीच एक घटना छत्तीसगडच्या विलासपूरमध्ये घडली आहे. तेथे एका भाजी व्यापाऱ्याने दुसऱ्या व्यापाऱ्याचे अपहरण करून त्याची हत्या केल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. जबलपूर येथील व्यापारी आणि राजस्थानमधील व्यापारी यांच्यात भाजीचा सौदा झाला होता. पण जबलपूरच्या व्यावसायिकाला तो भाजीपाला आवडला नाही. त्यामुळे त्यांच्यातील सौदा फिस्कटला. दोघांवरून त्याच कारणामुळे वाद झाला. त्यानंतर जबलपूरच्या व्यापाऱ्याने राजस्थानच्या व्यापाऱ्याची हत्या केली. मिळालेल्या माहितीनुसार, विलासपूरच्या तख्तपूर भागातील जबलपूर येथील भाजी व्यापारी सनम अन्सारी यांना राजस्थानचे भाजी व्यापारी भगवानराम बिश्नोई यांनी आणलेल्या काही भाज्या आवडल्या नाहीत. त्यामुळे त्यांच्यातील खरेदीचा सौदा फिस्कटला. यामुळे भगवानराम…
मुंबई : वृत्तसंस्था जुन्या मुंबई पुणे नागपूर महामार्गावर खासगी बसच्या चालकाचे नियंत्रण सुटल्याने ही दुर्घटना घडली असून यामध्ये सात- ते आठ प्रवासी जखमी झाले आहेत. जखमींपैकी ३ जणांची प्रकृती गंभीर असल्याचे सांगण्यात येत आहे. मिळालेल्या माहितीनुसार, जुन्या मुंबई पुणे नागपूर महामार्गावर सुलतानपूर नजिक खाजगी बसला भीषण अपघात झाला. बस चालकाला झोप आल्याने भरधाव बस वरील नियंत्रण सुटून बस पलटी झाली. या अपघातात बसमधील सात ते आठ प्रवासी जखमी झाले आहेत. अपघाताची माहिती मिळताच स्थानिक नागरिक तसेच पोलिसांनी तात्काळ धाव घेत जखमींना मदत केली. अपघातातील जखमी प्रवाशांवर सध्या मेहकर रुग्णालयात उपचार सुरू आहेत. यामधील तिघांची प्रकृती गंभीर असल्याचे सांगण्यात…
पुणे : वृत्तसंस्था राज्यातील अनेक शहरात चोरीसह घरफोड्या करणाऱ्या अनेक टोळी सक्रीय झाल्या आहे. अशा अनेक फरार टोळ्यांच्या मागावर पोलीस असतांना एका टोळीतील सदस्य पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. त्याने दहा, वीस नव्हे तर तब्बल दीडशे घरफोड्या केल्या होत्या. परंतु तो पोलिसांना सापडत नव्हता. त्याला पकडण्यासाठी पोलिसांकडून अनेक प्रयत्न केले गेले. नेहमीचकवा देऊन तो फरार होत होता. गुन्हेगारांचे अपराध कधीतरी पूर्ण होतात, त्या पद्धतीने त्याच्या अपराधांचा कोटा पूर्ण झाला अन् अखेर पुणे पोलिसांच्या सापळ्यात तो आला. यामुळे पोलिसांनीही सुटकेचा निःश्वास सोडला. मिळालेल्या माहितीनुसार, तब्बल दीडशे घरफोडीचे गुन्हे असलेल्या सराईत गुन्हेगारास पुणे येथील कोंढवा पोलिसांनी बेड्या ठोकल्या आहेत. त्याच्यावर हडपसर, बिबवेवाडी,…
जळगाव : प्रतिनिधी गेल्या महिनाभरपसून दडी मारून बसलेले पाऊस गेल्या दोन दिवसापासून जळगाव जिल्ह्यात पडत आहे. त्यामुळे जळगाव जिल्ह्यात शेतातील पिकांसह धरणातील पाणीसाठ्यांना याचा फायदा होण्याची शक्यता आहे. हेजेरी लावली आहे. त्यामुळे गेल्या २४ तासांत झालेल्या पावसामुळे जिल्ह्यातील जलसाठयात एका टक्क्याने वाढ झाली आहे. ऑगस्ट महिन्यामध्ये पावसाने दडी मारली त्यामुळे तब्बल एक महिना पाऊस नसल्यामुळे जळगाव जिल्ह्यात दुष्काळाचे सावट निर्माण झालेले आहे. जळगाव जिल्ह्यात सप्टेंबरच्या पहिल्या आठवड्यात जिल्ह्यातील तीन प्रकल्पांमधे साठा शून्यावर आहे. मोठे, मध्यम आणि लघु प्रकल्पातील जलसाठा अत्यंत कमी आहे. त्यामुळे यंदा भीषण पाणीटंचाईच्या संकटाला सामोरे जाण्याची श्यकता आहे. बुधवारी रात्री पावसाचे आगमन झाल्याने जळगाव जिल्ह्यात…
सोलापूर : वृत्तसंस्था अनेक परिवारात सासू – सुनेचे भांडण होत असतात पण काही भांडण काही काळासाठी असतात तर काही भांडण इतक्या टोकाला पोहचते कि काही होवू शकते अशीच एक घटना सोलापुरात घडली आहे. न सांगता कार्यक्रमाला गेली म्हणून पतीने हात पकडला आणि सासूने ब्लेडने तिच्या हातावर वार करून जखमी केल्याची घटना विडी घरकुल येथे घडली. स्नेहा गिरीधर टंकसाळ या विवाहितेने दिलेल्या तक्रारीनुसार सासू सरस्वती रामचंद्र टंकसाळ व पती गिरीधर रामचंद्र टंकसाळ या दोघांविरुद्ध एमआयडीसी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे. फिर्यादी स्नेहा ही सोमवारी सायंकाळी ७ वाजेच्या सुमारास कार्यक्रमाला गेली होती. यावरून सासूने लाथाबुक्क्यांनी मारहाण केली. यानंतर स्नेहाला…

