जळगाव : प्रतिनिधी देशातील हुकूमशाही मोडायची वेळ आलेली आहे. २०२४ ला सरकार बदलणारच आणि हा हुकूमशाहीचा फुगा तुम्हीच पडणार. आणि ही ताकद शिवसेना व तुमच्यामध्ये आहे. आतापासून सरकार हादरायला लागला आहे. गद्दार म्हणता आम्ही शिवसेची काँग्रेस होऊ देणार नाही. पण पंचवीस वर्षे भाजपसोबत सत्तेत असताना आम्ही कधीही शिवसेना भाजपचे होऊ द्यायचे नाही. आणि आता त्यांनी गुलामगिरी पत्करून दिल्लीला फेऱ्या मारत आहे. त्यामुळे कमळाबाईची पालखी हलवायला ही काही शिवसेना नाही, अशी ठाकरे शैलित उद्धव ठाकरे यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी तसेच राज्य शासनावर जळगाव येथील सभेत केली. जळगाव येथे आज महापालिकेत सरदार वल्लभभाई पटेल व पिंप्राळा येथील छत्रपती शिवाजी महाराज यांचा पुतळ्याचे…
Author: editor desk
अमळनेर : प्रतिनिधी तालुक्यातील एका गावात राहणाऱ्या व शिक्षण घेणाऱ्या तेरा वर्षीय अल्पवयीन मुलीचा विनयभंग करणाऱ्या दोघांना पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. मिळालेल्या माहितीनुसार, अमळनेर तालुक्यातील एका गावात राहणारे तेरा वर्षीय मुलगी हिला सार्वोटे तालुका अमळनेर येथील साहिल आणि भुऱ्या दोघांची पूर्ण नाव माहित नाही यांनी मोटरसायकलवर फिरविण्याचा उद्देशाने बसवून त्या अल्पवयीन मुलीला धार तालुका अमळनेर गावाजवळील पीर बाबाच्या टेकडी जवळ नेऊन दमदाटी करून जबरदस्तीने तिच्या अंगाला स्पर्श करून तिचा विनयभंग केल्याची घटना 9 सप्टेंबर रोजी सकाळी साडेअकरा ते दुपारी तीन वाजेच्या दरम्यान घडली याप्रकरणी पिढीतेने दोघांविरुद्ध दिलेल्या फिर्यादीवरून साहिल आणि भुऱ्या यांच्या विरुद्ध अमळनेर पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल करण्यात आला…
जळगाव : प्रतिनिधी मेहरुण परिसरातील बगीच्याजवळ ५ एप्रिल रोजी रात्री १० वाजण्याच्या सुमारास अंधाराचा फायदा घेत विशाल राजू अहिरे, आशुतोष सुरेश मोरे, दीक्षांत देविदास सपकाळे, शुभम भिकन चव्हाण, गोपाल सीताराम चौधरी (सर्व रा. रामेश्वर कॉलनी) हे दबा धरून बसले होते. याबाबतची माहिती मिळताच एमआयडीसी पोलिस तेथे पोहोचले. आशुतोष सुरेश मोरे हा गावठी कट्ट्यासह सापडला होता, तर त्याचे साथीदार पळून गेले होते. त्यापैकी पाच महिन्यांपासून फरार असलेल्या विशाल राजू अहिरे याला रेल्वे स्थानकातून एमआयडीसी पोलिसांनी ताब्यात घेतले. विशाल राजू अहिरे हा गुन्हा घडल्यापासून फरार होता. तो रेल्वेने जळगावात येणार असल्याची माहिती पोलिस निरीक्षक जयपाल हिरे यांना मिळाली होती. त्यानुसार…
जळगाव : प्रतिनिधी लाठ्याकाठ्यांच्या मारहाणीत सागर रमेश पालवे (२४, रा. मालदाभाडी, ता. जामनेर) या तरुणाच्या मृत्यूप्रकरणी ज्ञानेश्वर ऊर्फ पिंटू बिजलाल बोदडे (४०, रा. मुक्ताईनगर), नीलेश रोहिदास गुळवे (२२, रा. रामेश्वर कॉलनी, जळगाव) या दोघांना एमआयडीसी पोलिसांनी अटक केली. त्यांना न्यायालयात हजर केले असता १२ सप्टेंबरपर्यंत पोलिस कोठडी सुनावण्यात आली. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, एमआयडीसीतील नवीन गुरांचा बाजार परिसरातील एका ट्रान्सपोर्टमध्ये सागर रमेश पालवे हा दोन वर्षांपासून चालक म्हणून कामाला होता. ७ सप्टेंबर रोजी रात्री ९ ते १० वाजेदरम्यान ट्रान्सपोर्टवर असताना त्याच ठिकाणी चालक म्हणून काम करणारे ज्ञानेश्वर ऊर्फ पिंटू बिजलाल बोदडे व नीलेश रोहिदास गुळवे यांनी खोलीमध्ये लाठ्याकाठ्यांनी मारहाण…
भुसावळ : प्रातिनिधी भुसावळ तालुक्यातील फुलगावसह वरणगावातील रेणुकानगर परिसरात दि. ८ रोजी मध्यरात्रीनंतर चोरट्यांनी धुमाकूळ घातला. एकाच रात्रीत आठ ते दहा घरांची कुलपे तोडून दोन तोळे सोने व सहा हजार रोख रक्कम लांबवली आहे. मिळालेल्या माहितीनुसार, वरणगाव येथील रेणुकानगरमध्ये चोरट्यांनी चार ते पाच घरांची कुलपे तोडून चोरी करण्याचा प्रयत्न केला. तसेच फुलगावमध्ये एका घरातून दोन तोळे सोने व सहा हजार रु रोख रक्कम चोरून नेल्याचा अंदाज आहे. रात्री दोन ते तीन वाजेदरम्यान काळे रेनकोट अंगात घातलेले तीन चोरटे फिरत असल्याचे सीसीटीव्हीत कैद झाले आहे. त्यामुळे परिसरात भीतीचे वातावरण पसरले आहे. फुलगाव येथील घराचे मालक बाहेर गावी गेले आहेत.…
पुणे : वृत्तसंस्था जावयाने त्याच्या नावावर असलेली जमीन मुलीच्या नावावर करून द्यावी, यासाठी सासऱ्याने नातेवाइकांच्या मदतीने चक्क जावयाचे अपहरण केले. पुण्यातून त्याला बळजबरीने चारचाकीत बसवत थेट बीडला नेले. तेथील एका गोठ्यात दोरीने हात-पाय बांधून डांबून ठेवले. याप्रकरणी जावयाने दिलेल्या फिर्यादीवरून सासऱ्यासह त्याच्या नातेवाइकांविरुद्ध येरवडा पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. विनोद साहेबराव आडे (वय २५, रा. रामनगर, येरवडा) असे अपहरण झालेल्या जावयाचे नाव आहे. त्यांनी येरवडा पोलिसांना दिलेल्या फिर्यादीनुसार, सासरे प्रकाश गेमा राठोड, चुलत सासरा रमेश गेमा राठोड यांच्यासह नातेवाईक मंगेश वडते, योगेश वडते, दादासाहेब राठोड, अशोक गेमा राठोड (सर्व रा. शाहूनगर तांडा, पोस्ट बंगाली पिंपळा, गेवराई, बीड)…
पुणे : वृत्तसंस्था बेकायदेशीररित्या खरेदी केलेले पिस्तूल हाताळत असताना चुकून झाडल्या गेल्या आणि यात एक तरुण गंभीर जखमी झाला आहे. ही घटना गुरुवारी रात्री दहा वाजण्याच्या सुमारास हवेली तालुक्यातील सांगरून या गावातील गणपती मंदिरामध्ये घडली. या प्रकारामुळे चांगलीच खळबळ उडाली होती. यात अविष्कार उर्फ मोन्या तुकाराम धनवडे असं जखमी झालेल्या तरुणाचं नाव आहे. जखमी झालेल्या तरुणावर पुण्यातील दीनानाथ मंगेशकर रुग्णालयात उपचार सुरु आहे. या प्रकरणी अभय छबन वाईकर (वय 22), अविष्कार उर्फ मोन्या तुकाराम धनवडे या दोघांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मिळालेल्या माहितीनुसार, अभय छबन वाईकर आणि अविष्कार तुकाराम धनवडे हे दोघेही एकमेकांचे चांगले मित्र आहेत. दोघेही एकाच…
नाशिक : वृत्तसंस्था राज्यातील महामार्गावर होणाऱ्या अपघाताची संख्या नियमित वाढ होत असून आज नाशिक-पेठ-धरमपूर राष्ट्रीय महामार्गावरील करंजाळीजवळ शुक्रवारी बस आणि कारचा भीषण अपघात झाल्याची घटना घडली होती. त्यावेळी या अपघातात दोघांचा जागीच मृत्यू झाला होता. तर दोघेजण गंभीर जखमी असल्याने त्यांना पुढील उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. त्यानंतर आता उपचारादरम्यान या दोघांचाही मृत्यू झाला असून करंजाळी बस अपघातातील मृतांची संख्या ४ वर पोहचली आहे… मिळालेल्या माहितीनुसार, गुजरातमधील सुरत येथील चार तरुण देवदर्शनासाठी आले होते. यावेळी ते देवदर्शन करून नाशिकहून परतीचा प्रवास करत असतांना राष्ट्रीय महामार्ग क्र. ८४८ वरील करंजाळी गावानजीक नाशिकहून गुजरातकडे भरधाव वेगाने जाणाऱ्या कार क्रमांक जीजे…
नवी दिल्ली : वृत्तसंस्था एका तरुण आणि तरुणीला गावकऱ्यांनी शिक्षा दिली. त्याची सगळीकडं चर्चा सुरु झाली आहे. ज्यावेळी नको त्या अवस्थेत तरुण आणि तरुणी सापडली. त्यावेळी त्या दोघांच्या डोक्यावरील केस गावकऱ्यांनी कापले. त्याचबरोबर त्यांची गावातून धिंड काढण्यात आली. हा सगळा प्रकार गावातील एका व्यक्तीनं पोलिसांच्या कानावर घातला. त्याचबरोबर त्या दोघांना रात्रभर बांधून ठेवलं होतं अशी माहिती मिळाली आहे. पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली आणि त्या दोघांची सुटका केली. ज्या महिलेने पोलिसांकडे तक्रार केली. तिच्या सांगण्यावरुन तिथल्या तरुणांना पोलिसांनी ताब्यात घेतलं आहे. त्याचबरोबर गावातील ज्या लोकांनी त्या घृणास्पद वागणूक दिली अशा लोकांना सुध्दा ताब्यात घेतले आहे. हे प्रकरण झारखंड राज्यातील आहे.…
नवी दिल्ली : वृत्तसंस्था देशभरातील अनेक राज्यात महिलासोबत अत्याचाराच्या घटना घडत असतांना आता बिहार राज्यातील एका आदिवाशी महिलेवरती सहा जणांनी अत्याचार केल्याचं एक प्रकरण पोलिस स्टेशनमध्ये दाखल झालं आहे. ज्या महिलेने आरोप केले आहेत. त्या सहापैकी पाच लोकांना पोलिसांनी ताब्यात घेतलं आहे. हे प्रकरण बिहार राज्यातील आहे, बिहार राज्यातील मुंगेर येथील आदिवासी महिला असल्याचं पोलिसांनी स्पष्ट केलं आहे. ज्या लोकांना पोलिसांनी ताब्यात घेतलं आहे. त्यांनी सुध्दा त्या महिलेवरती आरोप केले आहेत. हा गुंता सोडवताना पोलिसांनी दमछाक झाली एवढं मात्र नक्की आहे. पोलिसांनी ताब्यात घेतलेल्या आरोपींची नावे सागर हंसदा, हट्टू हंसदा, शिवा टुड्डू, मुकेश हंसदा आणि बट्टू उर्फ सूरज…

