Author: editor desk

वाशीम : वृत्तसंस्था वाशिम जिल्ह्यातील शिरपूर गावचे सुपुत्र आकाश आढागळे हा जवान भारतीय सैन्यदलात कर्तव्यावर असतांना लडाखमधील लेहमध्ये वीरमरण आलंय. गेल्या ११ वर्षापासून भारतीय सैन्यदलात आकाश आढागळे (वय ३१) कर्तव्य बजावत होता. त्यांच्या मृत्युमुळे आढागळे कुटुंबावर दु:खाचा डोंगर कोसळला आहे. लेहमध्ये कर्तव्य बजावत असताना ८ सप्टेंबर २०२३ रोजी एका दुर्घटनेमध्ये त्यांना गंभीर दुखापत झाली होती. त्यांना तातडीने उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं. सैन्यदलाच्या रुग्णालयात त्यांच्यावर उपचार सुरु होते. दुर्घटनेमध्ये आकाश यांच्या शरीराला गंभीर जखमा झाल्या होत्या. उपचारादरम्यान रविवारी (१० सप्टेंबर) त्यांची प्राणज्योत मालवली. आकाश यांच्या पश्चात त्यांची पत्नी रुपाली आढागळे, ४ वर्षाची तनवी नावाची मुलगी, आई विमलबाई आढागळे…

Read More

बुलढाणा : वृत्तसंस्था प्रेम प्रकरणातून राज्यातील अनेक शहरात नको ती घटना घडत असते. अशीच एक धक्कादायक घटना बुलढाणा जिल्ह्यातील संग्रामपूर तालुक्यात २५ वर्षीय तरुणाची निर्घुण हत्या करण्यात आल्याने खळबळ उडाली आहे. पत्नीसोबत संबंध असल्याच्या संशयातून ही भयंकर घटना घडली असून या प्रकरणी आरोपी त्रिशरण रामदास इंगळे यास पोलीसांनी तात्काळ अटक केली आहे. मिळालेल्या माहितीनुसार, संग्रामपूर तालुक्यातील वानखेड या गावातील आकाश सुरेश परघरमोर या २५ वर्षीय युवकाचा खून झाल्याची खळबळजनक घटना घडली आहे. मृत तरुण व आरोपीच्या पत्नीचे प्रेमप्रकरण असल्याचा संशयातून दिवसाढवळ्या हे हत्याकांड घडले आहे. आरोपी त्रिशरण इंगळे याची पहिली पत्नी मुले येथे सोडून काही वर्षापूर्वी पळून गेली. दुसऱ्या…

Read More

सातारा : वृत्तसंस्था राज्यात गेल्या वर्षापासून सोशल मीडियातील वादातून अनेक ठिकाणी राडा झाल्याच्या घटना घडत आहे. अशीच एक घटना सातारा जिल्ह्यातील पुसेसावळी येथे दोन गटात झालेल्या हिंसक वादानंतर परिसरात त्याचे तीव्र पडसाद उमटले आहे. महापुरुषांबाबत सोशल मीडियावर बदनामीकारक मजकूर प्रसारीत केल्यावरुन हा वाद सुरू झाला होता. दरम्यान एका विशिष्ठ समुदायास या मुळे लक्ष्य करण्यात आले आहे. परिसरात जाळपोळ आणि दगडफेक झाल्याची माहिती सुत्रांनी दिली असून प्रार्थना स्थळावरही हल्ला झाल्याचे वृत्त आहे. यात एक युवक गंभीर जखमी झाला असून त्याच्यावर उपचार सुरू आहेत. तणावाच्या पार्श्वभूमीवर सातारा जिल्ह्यात तणाव असून मोठा पोलिस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. पोलिसांनी सर्वांना शांततेचे आवाहन केले…

Read More

मुंबई : वृत्तसंस्था अवघ्या काही दिवसांवर गणेशोत्सव येऊन ठेपला असून सर्वच गणेशोत्सव मंडळांनी तयारी आपली तयारी सुरु केली आहे. तसेच अनेक गणेशोत्सव मंडळांनी वर्गणी गोळा करण्यासही सुरुवात केली आहे. मात्र मुंबईत जबरदस्तीने वर्गणी गोळा करणाऱ्या मंडळाच्या तीन जणांना अटक केली आहे. मिळालेल्या माहितीनुसार, मुंबईतील साकीनाका जंक्शन, शालीमार हॉटेलजवळची ही घटना आहे. एका मंडळातील काही कार्यकर्त्यंनी प्लास्टिक स्क्रॅपवाल्याकडून ५ हजार रुपयांच्या वर्गणीची जबरदस्ती केली. मात्र अशाप्रकारे जबरदस्तीने वर्गणी वसूल करण्याचा प्रयत्न केल्याप्रकरणी तिघांवर पोलिसांनी गुन्हा दाखल करत अटक केली आहे. मुंबई पोलिसांनी यापूर्वीच त्यांच्या सूचनांमध्ये कार्यकर्त्यांनी वर्गणी वर्गणीच्या स्वरूपातच मागावी, खंडणी मागू नये अन्यथा कारवाई केली जाईल असे म्हटले होते.…

Read More

वर्धा : वृत्तसंस्था राज्यातील अनेक नागीकाना एअरलाइन्समध्ये नोकरी, खोटे क्रेडिट कार्डसह खोटे लोन देण्याचे आमिष दाखवून कॉल सेंटरच्या माध्यमातून नागरिकांना घालण्याचा गोरखधंदा वर्धा पोलिसांनी उधळून लावला असून, बदरपूर साऊथ दिल्ली येथील उच्चभ्रू परिसरात सुरू असलेल्या दोन कॉल सेंटरवर कारवाई करून दोघांना अटक केली. फसवणुकीतील ८९ हजार रुपये रोख तसेच मोबाइल, सिम कार्ड असा एकूण २ लाख ३५ हजार ९०० रुपयांचा मुद्देमाल जप्त केला. आकाश सुभाष सहानी (३०), राकेश रामप्रकाश राजपूत (३०) अटक केलेल्या आरोपींची नावे आहेत. मिळालेल्या माहितीनुसार, वर्ध्यातील रहिवासी प्रांजली दिनेश चुलपार हिने मोबाइलवर जॉब सर्च अपडेट नावाचे अॅप डाऊनलोड करून त्यामधील फॉर्म भरला होता. ८ जून २०२३…

Read More

धुळे : प्रतिनिधी प्रेम विवाह केल्याच्या रागातून मुलीला मारहाण करणाऱ्या वडिलांसह काकाविरोधात साक्री पोलिस ठाण्यात मुलीने शनिवारी गुन्हा दाखल केला. ही घटना शुक्रवारी सायंकाळी घडली होती. हि घटना धुळे जिल्ह्यातील साक्री तालुक्यातील नाडसे या गावात घडली आहे. मिळालेल्या माहितीनुसार, स्मिता नीलेश भामरे (वय २१, रा. नाडसे ता. साक्री) यांनी याबाबत फिर्याद दाखल केली. त्यानुसार स्मिता आणि नीलेश या दोघांनी प्रेमविवाह केला. त्यांच्या लग्नाला मुलीच्या पालकांची परवानगी नव्हती. तरीदेखील मुलीने प्रेमविवाह केला. तो राग मनात धरून वडील मधुकर यशवंत नेरकर (वय ४८) आणि काका अशा दोघांनी मुलीला मारहाण केली. जीवे ठार मारण्याची धमकीही दिली. ही घटना शुक्रवारी सायंकाळी साडेसहा वाजता…

Read More

जामनेर : प्रतिनिधी   जळगाव जिल्ह्यातील जामनेर तालुक्यातील अल्पवयीन तरुणीचा नात्यानेच आत्याचा मुलगा असलेल्या तरुणाशी विवाह लावून देण्यात आला व लग्नानंतरच्या संबंधातून पीडीत तरुणी गर्भवती राहिली. तरुणी अल्पवयीन असतानाही तिचा विवाह लावून देण्यात आल्याचा प्रकार उघडकीस आल्यानंतर याप्रकरणी पतीसह तिचे आई-वडील, आत्या आणि मामा यांच्याविरोधात जामनेर पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला. जामनेर तालुक्याच्या एका गावातील अल्पवयीन मुलीचा विवाह तिच्या आई वडीलांनी तिच्या आत्याच्या मुलासोबत लावला. विवाहानंतर तरुणी कात्रज पुणे येथे सासरी पतीसोबत गेली. जून 2022 ते सप्टेंबर 2023 या कालावधीत पतीने शरीरसंबंध प्रस्थापीत केल्यानंतर तरुणी गर्भवती झाली. या घटनेप्रकरणी भारती विद्यापीठ पोलिस स्टेशन पुणे येथील हवालदार रवींद्र ओझय्या चिप्पा यांनी…

Read More

जळगाव : प्रतिनिधी  जळगाव शहर मनपात सरदार वल्लभभाई पटेल व पिंप्राळा परिसरातील छत्रपती शिवाजी महाराज यांच्या स्मारकाचे लोकापर्ण करण्यासाठी आज माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हे सकाळी शहरात आले असता त्यांचे राष्ट्रवादीचे युवा नेते विशाल देवकर यांनी भेट घेतल्याने जळगाव ग्रामीण मतदार संघात राजकीय चर्चेला उधान आले आहे. राज्याचे माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे व संजय राऊत यांनी आज सकाळी १० वाजता जळगावात आले असता त्यांचे माजी पालकमंत्री गुलाबरावजी देवकर यांचे यांचे चिरंजीव विशाल देवकर यांच्यासह हेमंत पाटील, धवल पाटील, सुरज पाटील यांनी त्यांचे स्वागत केले. यावेळी उद्धव ठाकरे यांनी विशाल देवकर यांना आगामी विधानसभेच्या निवडणुकी बाबत शुभेच्या देखील दिल्याचे…

Read More

पुणे : वृत्तसंस्था राज्यात गाजलेल्या कोपर्डी बलात्कार प्रकरणातील मुख्य आरोपीने गळफास घेतल्याचा धक्कादायक प्रकार रविवारी पहाटे उघडकीस आल्याने खळबळ उडाली आहे. जितेंद्र शिंदे असे मयत आरोपीचे नाव आहे. या घटनेनंतर अधिकारी घटनास्थळी दाखल झाले आहेत. महाराष्ट्राला हादरावून सोडणार्‍या कोपर्डी बलात्कार आणि खून प्रकरणातील मुख्य आरोपी जितेंद्र शिंदे हा येरवडा कारागृहात जन्मठेपेची शिक्षा भोगत असताना रविवारी पहाटे त्याने येरवडा कारागृहातील बराकमध्ये त्याने गळफास घेऊन आत्महत्या केली. कारागृहात पोलीस गस्तीवर गेले असताना जितेंद्र शिंदेचा मृतदेह आढळून आला. या घटनेची माहिती मिळतात वरीष्ठ अधिकारी घटनास्थळी दाखल झाले आहेत.13 जुलै 2016 च्या संध्याकाळी अहमदनगर जिल्ह्यातल्या कोपर्डी इथल्या एका अल्पवयीन मुलीवर बलात्कार करून तिची…

Read More

भुसावळ : प्रतिनिधी  भुसावळातील तरुणास सायबर भामट्यांनी टास्क पूर्ण करण्यास सांगून तब्बल पावणेनऊ लाख रुपयांचा गंडा घातल्याचा प्रकार समोर आल्यानंतर शहरात खळबळ उडाली आहे. याप्रकरणी सायबर पोलिसात अज्ञात भामट्यांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, भुसावळातील चेतन कन्हैय्या फिरके (गिरीजा कॉलनी, भुसावळ) या तरुणाच्या तक्रारीनुसार, 31 ऑगस्ट ते 9 सप्टेंबरदरम्यान राज चंद्रिका सांगणार्‍या युजर आयडीवरील भामट्याने टेलिग्रामवरून संपर्क साधला व टास्क पूर्ण केल्यास अधिक नफा (बोनस) मिळवून देण्याचे आमिष दाखवत विश्वास संपादन केला व तरुणाच्या एसबीआय खात्यातून वेळोवेळी आठ लाख 82 हजारांची रक्कम हडपली तसेच केवळ सहा हजार 825 रुपये ऑनलाईन ट्रान्सपर केले मात्र अन्य रक्कम ट्रान्सपर न…

Read More