Author: editor desk

नाशिक : वृत्तसंस्था एका पतीने पत्नी झोपलेली असतांना तिची निर्घृणपणे हत्या केल्यानंतर त्याने स्वत: देखील गळफास घेऊन आपली जीवनयात्रा संपवल्याची घटना बुधवारी १३ सप्टेंबर पहाटेच्या सुमारास आडगाव परिसरातील इच्छानगरमध्ये ही घटना घडली. या घटनेत विशाल निवृत्ती घोरपडे आणि प्रीती विशाल घोरपडे अशी मृत पती-पत्नीची नावे आहेत. हि घटना नाशिकमध्ये घडली आहे. मिळालेल्या माहितीनुसार नाशिक शहरातील आडगाव परिसरातल्या इच्छामनीनगर गेल्या काही दिवसापासून विशाल घोरपडे हे आपल्या पत्नी प्रीती घोरपडे हिच्यासह राहण्यासाठी होता. मंगळवारी रात्री काही कारणावरुन त्यांचा वाद झाला होता. दरम्यान, प्रीती गाढ झोपेत असताना विशालने बुधवारी पहाटेच्या सुमारास तिची हत्या केली. प्रीती झोपेत असताना विशालने घरातील मुसळीने तिच्या डोक्यात…

Read More

यावल : प्रतिनिधी यावल तालुक्यातील एका गावातील अल्पवयीन मुलीस महाविद्यालयात बसलेली असतांना तिचा इन्स्टाग्रामचा आयडी मागून तिचा विनयभंग करणार्‍या तरूणाविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, यावल तालुक्यातील एका गावात राहणार्‍या अल्पवयीन विध्यार्थीनी एका महाविद्यालयात शिकत असून दिनांक १२ सप्टेबर मंगळवार रोजी विध्यार्थीनी ही आपल्या मैत्रीणींच्या सोबत वर्गात बसलेली असतांना त्याच महाविद्यालयातील एक विध्यार्थी तिच्या जवळ येवून तिला ”तु इंस्टाग्रामवर रील्स बनवते का? तुझा इंस्टाग्रामची आयडी दे” अशी मागणी केली असता विध्यार्थीनीने त्याला मी इंस्टाग्राम वापरत नसल्याचे सांगितले. यावेळी विध्यार्थ्याने लज्जा उत्पन्न होईल असे बोलला असता तेव्हा विध्यार्थीनीने आपण महाविद्यालयाकडे तक्रार करणार असल्याचे म्हटल्यावर तीला तुला महाविद्यालय ईमारती…

Read More

जळगाव : प्रतिनिधी  राज्याचे पाणीपुरवठा व स्वच्छता मंत्री तथा जिल्हा पालकमंत्री ना. गुलाबरावजी पाटील यांच्या मातोश्रीचे सहा सप्टेंबर रोजी दुःखद निधन झाले. मंत्री महोदय दुःखात असून देखील बैलपोळा निमित्त मदतीचा हात म्हणून आत्महत्याग्रस्त शेतकर्यांच्या वारसदारांना बैल जोडी सजवण्यासाठी साज, ज्यांच्याकडे बैलजोडी नाही त्यांना किराणा किटचे वाटप कार्यकर्ते व पदाधिकारी यांच्या हस्ते करण्यात आले. मंत्री महोदयांना आत्महत्या केलेल्या शेतकऱ्यांच्या वारसांना स्वतः भेटुन ही भेट द्यायची होती परंतु दुर्दैवाने त्यांच्यावर अचानक ओढवलेल्या दु:खा मुळे ते स्वतः पोहचू शकले नाही. तरी देखील दुसऱ्यांच्या अानंदात आपला वाटा असावा या भावनेने त्यांनी आपले दुख बाजुला सारुन शेतकऱ्यांचा पाळा गोड केला. मंत्री महोदय आणि जिल्हा…

Read More

बीड : वृत्तसंस्था बीड जिल्ह्यातील जातेगाव यागावातील एका पती-पत्नीने गावभर चक्कर मारल्यानंतर सकाळी १० वाजता सोबत जेवण केले. त्यानंतर नवरा- बायकोमध्ये टोकाचे भांडण झाले. यात दोघांनीही राहत्या घरी दोरीने गळफास घेऊन आत्महत्या केली. ही घटना मंगळवारी दुपारी गेवराई तालुक्यातील जातेगाव परिसरात उघडकीस आली. यामध्ये राजू बंडू चव्हाण (३१) व सोनाली राजू चव्हाण (२८) असे आत्महत्या केलेल्या नवरा-बायकोचे नाव आहे राजू हे नाशिकला असतात. मागील आठवड्यात ते सोनालीचा वाढदिवस असल्याने गावी आले होते. मंगळवारी सकाळी राजू यांनी घराच्या बाहेरच असलेल्या मराठा आंदोलनस्थळी भेट दिली. त्यानंतर ते घरी गेले. त्यांनी दोन मुलींसोबत जेवणही केले; परंतु, त्यानंतर त्यांच्यात वाद झाला. यातूनच दोघांनीही…

Read More

नागपूर : वृत्तसंस्था एका मुलीच्या त्रासाला कंटाळून एका तरुणाने फेसबुक लाईव्ह केल्यावर आत्महत्या केली. संबंधित तरुणाने व्हिडीओ काढल्यानंतर कन्हान नदीच्या पुलावरून नदीत उडी घेत जीव दिला. कामठी पोलिस ठाण्याच्या हद्दीत रविवारी ही घटना घडली. मिळालेल्या माहितीनुसार, नागपूर शहरातील मिनीमातानगर परिसरातील मनीष रामपाल यादव मृत तरुणाचे नाव आहे. तो इलेक्ट्रिकचे दुकान चालवायचा. तो रविवारी सकाळी १० वाजता घरून दुचाकीने निघाला. सायंकाळी त्याने अगोदर मोबाइलवर व्हिडीओ तयार केले व त्यात त्याच्यासोबत घडलेला प्रकार सांगितला. त्यानंतर त्याने फेसबुक लाइव्ह केले व मोबाइल दुचाकीच्या डिक्कीत ठेवला. त्यानंतर कन्हान नदीत उडी घेत जीव दिला. संपर्कात असलेल्या एका मुलीने त्याला जाळ्यात ओढले व पैशांची मागणी…

Read More

जामनेर : प्रतिनिधी दोन मुलींच्या पाठीवर तिसरीही मुलगी झाल्यानंतर बापाने तिची हत्या केल्याची संतापजनक घटना जामनेर तालुक्यात घडली. विशेष म्हणजे नवजात आठ दिवसीय बालिकेच्या तोंडात नराधम पित्याने चक्क तंबाखू टाकली. हरिनगर तांडा, ता.जामनेर येथे रविवारी हा प्रकार उघडकीस आला आहे. याप्रकरणी गोकुळ गोटीराम जाधव (30) असे या नराधम पित्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला असून त्यास अटक करण्यात आली. वाकोदजवळ हरिनगर तांडा (ता. जामनेर) येथील रहिवासी गोकुळ जाधव याला दोन मुली आहेत. शनिवार, 2 सप्टेंबर रोजी वाकोद प्राथमिक आरोग्य केंद्रात तिसरे अपत्य मुलगी जन्माला आल्यानंतर रविवारी चिमुरडीची गोकुळने हत्या केली. आशा सेविका या नवजात अर्भकांच्या जन्माची नोंद घेण्यासाठी गोकुळच्या घरी गेल्या,…

Read More

नवी दिल्ली : वृत्तसंस्था राजस्थानमध्ये देवदर्शनासाठी जात असलेल्या बसचा भीषण अपघाताची घटना समोर आली आहे. या अपघातात १२ जणांचा मृत्यू झाला आहे. तर १२ हून अधिक जण जखमी झाले आहेत. घटनेची माहिती मिळताच पोलीस कर्मचारी घटनास्थळी दाखल झाले आणि बचावकार्य सुरु केले. मिळालेल्या माहितीनुसार, मृतांमध्ये सहा महिला आणि सहा पुरुषांचा समावेश आहे. सर्व मृत गुजरातच्या भावनगर येथील रहिवासी असल्याचे सांगण्यात येत आहे. बसमध्ये एकूण ६० प्रवासी प्रवास करत असल्याची माहिती आहे. बसमधील प्रवासी भावनगरहून मथुरेला दर्शनासाठी जात होते. मात्र भरतपूर-आग्रा महामार्गावर बसमध्ये अचानक तांत्रिक बिघाड झाला. चालक आणि त्याचा साथीदारासह इतर प्रवासीही बसमधून उतरले. चालक आणि त्याचे साथीदार बस पुन्हा…

Read More

नवी दिल्ली : वृत्तसंस्था उत्तर प्रदेशातील कानपूर येथे एक धक्कादायक घटना समोर आली आहे. सख्खा भाऊ वैरी झाल्याची हि घटना आहे एका चपातीवरुन झालेल्या वादात त्याने आपल्या मोठ्या भावाची अत्यंत निर्घृणपणे हत्या केली. या घटनेचं कारण ठरली एक चपाती. आरोपीने फक्त मोठ्या भावाची हत्याच केली नाही तर त्यानंतर त्याने मृतदेहासोबत जे केलं ते कळाल्यानंतर लोकांना धक्काच बसला. पोलिसांनी याप्रकरणी आरोपीला अटक केली आहे. मिळालेल्या माहितीनुसार, कानपूरमधील बिल्हौर भागातील नानामाऊ गावात एका घरात दोन भाऊ एकाचे नाव कल्लू तर दुसऱ्याचे भुरा हे राहत होते. यात कल्लू हा मोठा भाऊ होता. त्याचे लग्न झालेले नव्हते. भुरा विवाहित आहे. रक्षाबंधनाला त्याची पत्नी…

Read More

नाशिक : वृत्तसंस्था नाशिक रोड परिसरातील दसक शिवारात असलेल्या मलनिस्सारण केंद्राजवळ ३० वर्षीय तरुण आठ दिवसांपासून बेपत्ता असतांना त्याचा मृतदेह पोलिसांना छिन्न-विच्छिन्न अवस्थेत आढळून आला. याप्रकरणी नाशिकरोड पोलीस ठाण्यात हत्याचा गुन्हा दाखल केला. प्रेम प्रकरणावरून या तरुणाची हत्या झाली असल्याचा संशय पोलिसांना आहे. तोच धागा पकडत नाशिक पोलिसांनी अवघ्या २ तासात पत्नी आणि तिच्या प्रियकराला ताब्यात घेतलंय. या हत्येप्रकरणी पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आठ दिवसांपूर्वी जेलरोड येथील पंचक येथे राहणारा ३० वर्षाचा तरुण बेपत्ता झाला होता. यासंदर्भात त्याच्या नातेवाईकांनी बेपत्ता झाल्याची तक्रार पोलीस ठाण्यात नोंदवली होती. सोमवारी या युवकाचा मृतदेह दसक शिवारात असलेल्या मलनिस्सारण केंद्राजवळ आढळून आला. सुरुवातीला पोलिसांनी मृतदेह…

Read More

भुसावळ : प्रतिनिधी  तुम्ही शिक्षकांनी केलेल्या चांगल्या कामाची दखल घेऊन तुम्हाला हा पुरस्कार देण्यात आला आहे. यापुढेही तुम्ही अशाच पध्दतीने काम करावं. हा पुरस्कार पुढच्या मोठ्या पुरस्काराची पायाभरणी ठरावी. पुढे पुढे आपली राष्ट्रपती पुरस्कारापर्यंत मजल जावी, असे प्रतिपादन आमदार सत्यजीत तांबे यांनी केले. भुसावळ येथील नाहाटा विद्यालयातील वाचन कक्षात नुकताच शिक्षक दिनानिमित्त ‘गुरूगौरव सत्कार समारंभ – २०२३’ पुरस्कार सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते. त्यावेळी आ. सत्यजीत तांबे बोलत होते. आ. तांबे पुढे म्हणाले की, ज्या शिक्षकांना पुरस्कार मिळाला आहे. त्यांनी निश्चितच त्यांच्या नोकरीमध्ये, कार्यामध्ये काहीतरी असं कामं केलेलं असणार. ते काम बघूनचं संयोजकांनी आणि आयोजकांनी शिक्षकांना पुरस्कार दिलेला आहे.…

Read More