Author: editor desk

नवी दिल्ली : वृत्तसंस्था ईशान्य रेल्वेचे (गोरखपूर) वरिष्ठ अधिकारी के सी जोशी यांना केंद्रीय गुन्हे अन्वेषण विभाग अर्थात सीबीआयने अटक केली. कंत्राटदाराकडून तीन लाख रुपयांची लाच मागितल्याप्रकरणी, तसेच कंपनीची सरकारी नोंदणी आणि नुकताच केलेला करार रद्द करण्याची धमकी दिल्याप्रकरणी कारवाई केली. सीबीआयने जोशीच्या गोरखपूर आणि नोएडा येथील निवासस्थानांवरही छापे टाकले. तिथून २.६१ कोटी रुपयांची रोकड जप्त केल्याचे अधिकाऱ्यांनी सांगितले. “ईशान्य रेल्वे, गोरखपूरचे प्रधान मुख्य साहित्य अधिकारी के सी जोशी यांना मंगळवारी संध्याकाळी अटक करण्यात आली. कंत्राटदाराकडून तीन लाख रुपयांची लाच घेताना त्यांना रंगेहाथ पकडण्यात आले. कॉन्ट्रॅक्टरने सीबीआयकडे यासंदर्भात तक्रार दाखल केली होती. ईशान्य रेल्वेला सेवा आणि विविध उत्पादनांची विक्री…

Read More

जालना : वृत्तसंस्था राज्यात गेल्या काही दिवसापासून मराठा समाजाला आरक्षण मिळावे या मागणीसाठी मनोज जरांगे पाटील यांच्या नेतृत्त्वात सुरू असलेले आंदोलन अखेर सुटले आहे. मनोज जरांगे पाटील यांनी मागणी केल्याप्रमाणे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे स्वत: जालना जिल्ह्यातील आंतरवाली सराटीमध्ये आले आणि त्यांच्या हस्ते ज्यूस घेत मनोज जरांगे यांनी उपोषण सोडले आहे. मात्र, त्या अनेक महत्त्वाच्या घडामोडी घडल्या. मनोज जरांगे पाटील यांच्या उपोषणाच्या 15 व्या दिवशीच यावरील तोडगा निघाला होता. मात्र, उपोषण सोडण्यासाठी 17 वा दिवस उजाडावा लागला. त्यामागे अनेक कारणे आहेत. मुंबई पासून ते आंतरवाली सराटीपर्यंत अनेक घटनाक्रम घडल्यानंतर उपोषण अखेर मागे घेण्यात आले. इतकेच नाही तर सरकारला आणखी 10 दिवसांचा…

Read More

जळगाव : प्रतिनिधी  एका अल्पवयीन मुलाने दुस-या अल्पवयीन मुलासोबत मध्यरात्रीच्या सुमारास अनैसर्गिक अत्याचार केल्याचा धक्कादायक प्रकार जळगावातील मुलांच्या निरीक्षणगृहात उघडकीस आला आहे. या प्रकरणात एका विरोधात जिल्हापेठ पोलिस स्टेशनला गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, जळगाव शहरातील मुलांच्या निरीक्षणगृह / बालगृहातील दि. ३१ ऑगस्ट रोजी रात्री २.३० वाजेच्या सुमारास एका १३ वर्षीय अल्पवयीन मुलाने सोबत असलेल्या १० वर्षीय मुलासोबत अनैसर्गिक कृत्य केले. घडलेला प्रकार जर कुणाला सांगितला तर मारहाण करण्याची धमकी अल्पवयीन मुलास देवून हे चुकीचे कृत्य करण्यात आले. या प्रकरणी जिल्हा पेठ पोलिस स्टेशनला दाखल गुन्ह्याचा पुढील तपास स.पो.नि.मिरा देशमुख करत आहेत.

Read More

नांदेड : वृत्तसंस्था आठ महिन्यांच्या गरोदर पत्नीसह तीन वर्षांच्या मुलीची पतीनेच गळा आवळून हत्या केल्याची घटना कंधार तालुक्यातील बोरी खु. येथे बुधवारी पहाटे घडली. माहेरहून पैसे घेऊन ये आणि तुला मुलीच होतात, या कारणावरून या हत्या केल्याचा आरोप नातेवाइकांनी केला आहे. विशेष म्हणजे, हत्येनंतर आरोपीने स्वतः पोलिस ठाण्यात जाऊन घटनेची माहिती दिली. हि घटना नांदेड जिल्ह्यात घडली आहे. मयत भाग्यश्री यांची आईने पोलिस ठाण्यात दिलेल्या तक्रारीनुसार तुला मुलगीच कशी झाली, आम्हाला मुलगा पाहिजे होता, असे म्हणून सासरी छळ होत होता. भाग्यश्री दुसऱ्यांदा गरोदर झाल्यानंतर तुला दुसरी पण मुलगीच आहे. तू चेक कर असा तगादा लावला होता. मिळालेल्या माहितीनुसार,…

Read More

जळगाव : प्रतिनिधी  आठ महिन्यांपूर्वी चोरलेली दुचाकी जळगावात विक्रीसाठी आलेल्या गौरव अशोक मोटवाणी (रा. जालना) याच्या जिल्हापेठ पोलिसांनी तांबापुरातून मुसक्या आवळल्या. त्याच्याकडून चोरीची दुचाकी हस्तगत करण्यात आली. निमखेडी शिवारातील रहिवासी असलेले विलास नारायण महाजन यांची दुचाकी १६ जानेवारी रोजी सिंधी कॉलनीतून चोरीला गेली होती. ही दुचाकी गुन्हेगार गौरव मोटवाणी याने लांबविली असून, बुधवारी तो तांबापुरा भागात दुचाकी विक्रीसाठी आल्याची माहिती पोलिस निरीक्षक डॉ. विशाल जयस्वाल यांना मिळाली. यांनी केली कारवाई  सदर कारवाई ही पोलीस अधीक्षक एम.राजकुमार, अपर पोलीस अधीक्षक चंद्रकांत गवळी, उप विभागीय पोलीस अधिकारी संदीप गावित यांचे मार्गदर्शनाखाली पो.हे. कॉ. सलीम सुभान तडवी, पो. कॉ. रविंद्र साबळे, पोकाँ…

Read More

जळगाव : प्रतिनिधी  जळगाव शहरातील जिल्हा पेठ पोलीस स्थानकाच्या हद्दीतील चोपडा मार्केटमधील हॉटेल लयभारी हॉटेलमधील कुंटणखाना प्रकरणी पाच जणाविरोधात जिल्हा पेठ पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. दि.१२ रोजी सायंकाळी ७ वाजेच्या सुमारास पोलिसांनी छापा टाकला होता. या छाप्यात पाच महिलांसह चार पुरुषांना ताब्यात घेतले. मिळालेल्या माहितीनुसार, जळगाव जिल्हापेठ पोलिस ठाण्याच्या हद्दीतील एका लॉजवर कुंटणखाना सुरू असल्याची गोपनीय माहिती जिल्हापेठ पोलिस ठाण्याचे पोलिस निरीक्षक डॉ.विशाल जयस्वाल यांना मिळाली. त्यानुसार त्यांनी सहाय्यक पोलिस उपनिरीक्षक मीरा देशमुख, हवालदार सलीम तडवी रवींद्र साबळे, तुषार पाटील, जयेश मोरे, महिला कॉन्स्टेबल मनीषा बिरारी आणि कल्पना मोटे यांचे पथक तयार करून कारवाईसाठी रवाना केले. बनावट…

Read More

जळगाव : प्रतिनिधी  जळगाव शहरातील मोहाडी रोडवरील नेहरू नगरात बनावट प्रॉडक्ट तयार करून विक्री करणाऱ्या दोन जणांवर बुधवारी १३ सप्टेंबर रोजी दुपारी २ वाजता एमआयडीसी पोलिसांनी छापा टाकला. या कारवाईत पोलिसांनी ७ लाख ५ हजार ७४५ रुपये किंमतीचा मुद्देमाल हस्तगत केला. एमआयडीसी पोलिस ठाण्यात दोन जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला. मिळालेल्या माहितीनुसार, नेहरू नगर व गायत्री नगरातील दोघेजण वेगवेगळ्या कंपनीचे बनावट प्रॉडक्ट तयार करून विक्री करत असल्याची गोपनीय माहिती कंपनीचे फिल्ड अधिकारी सिद्धेश शिर्के यांना समजली व त्यांनी पोलिस अधीक्षक एम. राजकुमार यांची भेट घेऊन कारवाई करण्याची मागणी केली. एमआयडीसी पोलिस ठाण्याचे पोलिस निरीक्षक जयपाल हिरे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस…

Read More

मुंबई : वृत्तसंस्था आर बी एन नाईट नावाच्या पबमध्ये पब मॅनेजर आणि ग्राहकांमध्ये राडा झाल्याचे पाहायला मिळाले. पब मॅनेजरने ग्राहकाकडे बिलाचे पैसे मागितले म्हणून ग्राहकाने मॅनेजरवर चाकूने वार केले. या हल्ल्यामध्ये मॅनेजर जखमी झाला आहे. तसेच ही घटना घडताच नवी मुंबईचे पोलीस देखील घटनास्थळी दाखल झाले. मात्र हा हल्ला करणाऱ्या आरोपीने पोलिसांसोबतही आणि अरेरावीची भाषा केली. बिलाचे पैसे मागितल्यामुळे झालेल्या या हल्ल्यातून आरोपीला नवी मुंबई पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. नवी मुंबईतील एपीएमसी परिसरामध्ये ही घटना घडली आहे. मिळालेल्या माहितीनुसार, आर बी एन नाईट नावाच्या पबमध्ये ग्राहकाकडे पैसे मागितल्यावर त्या ग्राहकाने डायरेक्ट पब मॅनेजरवर चाकूने हल्ला केला. पब मॅनेजरने ग्राहकाकडे…

Read More

जळगाव : प्रतिनिधी  राज्य सरकारच्या अनुदानित आणि सरकारी शाळांमधील शिक्षकांच्या पदांची भरती कंत्राटी पद्धतीने करण्याचा निर्णय दुर्दैवी असल्याची भावना आमदार सत्यजीत तांबे यांनी व्यक्त केली. सरकारने पोर्टलद्वारे नियमित भरतीचे आश्वासन दिले असताना आता कंत्राटी भरतीचा विषय काढून सरकार या मुद्द्याला फाटे फोडत आहे. सरकारने शिक्षकभरती किंवा शासकीय-निमशासकीय पदांची भरती कंत्राटी पद्धतीने करू नये, अशी आग्रही मागणी आ. तांबे यांनी मागणी केली आहे. राज्य सरकारने अनुदानित, सरकारी शाळांमधील शिक्षकांसह विविध शासकीय व निमशासकीय पदांची भरती कंत्राटी पद्धतीने करण्याचा निर्णय घेतला आहे. वास्तविक सध्या असलेली शिक्षकांच्या रिक्त पदांची संख्या लक्षात घेत सरकारने आपल्या पोर्टलवरून नियमित भरती प्रक्रिया राबवण्याची गरज आहे.…

Read More

जळगाव : प्रतिनिधी  जळगाव जिल्ह्यातील सर्व तालुक्यांमध्ये गाय व बैल या जनावरांमध्ये लम्पी स्किन डिसीज या साथ रोगांचा प्रादुर्भाव दिसून येत आहे. या पार्श्वभूमीवर उद्या साजरा केला जाणारा बैल पोळा सण पशुपालकांनी सार्वजनिकरित्या मिरवणूक काढून साजरा न करता बैलांची गोठ्यातच पूजा करून साजरा करावा. असे आवाहन जिल्हा पशुसंवर्धन उपायुक्त डॉ.श्यामकांत पाटील यांनी केले आहे. पशुसंवर्धन विभागामार्फत लम्पीवर उपचार व प्रतिबंधात्मक उपाय व्यापक प्रमाणावर राबविण्यात येत आहेत. सद्यस्थितीत जिल्ह्यात लम्पीमुळे बैल मृत्युमुखी पडण्याचे प्रमाण जवळपास ६० टक्के असल्याने विशेष काळजी घेणे आवश्यक आहे. बैलपोळा पशुपालकाच्या जिव्हाळयाचा सण आहे. मात्र आपल्या बैलाचे लम्पी स्कीन या संसर्ग आजारापासून संरक्षण व्हावे, आजाराची…

Read More