नवी दिल्ली : वृत्तसंस्था शहरातील एका नाल्यातून पोलिसांना डोके व हात नसलेला मृतदेह सापडला होता. शेजारील मुझफ्फरनगर जिल्ह्यातील बेपत्ता तरुण म्हणून त्याची ओळख पटली परंतु अंत्यसंस्काराच्या काही तासांपूर्वी चंदीगडमध्ये हा युवक त्याच्या गर्लफ्रेंडसोबत जिवंत सापडला. त्यानंतर नाल्यात सापडलेला मृतदेह आता मेरठ पोलिसांनी पोस्टमॉर्टमसाठी पाठवला आहे. हि घटना उत्तर प्रदेशातील मेरठमध्ये घडली आहे. ९ सप्टेंबर रोजी मेरठच्या दौराला भागात डोके आणि हात कापलेले एक मृतदेह आढळून आला होता. मेरठ पोलिसांनी वायरलेसवर संदेश दिल्यानंतर मुझफ्फरनगर पोलीस सतर्क झाले. काही दिवसांपूर्वी मुझफ्फरनगरच्या मन्सूरपूर भागात एका कुटुंबाचा २० वर्षांचा मुलगा मॉन्टी कुमार बेपत्ता झाला होता. पोलिसांनी तात्काळ कुटुंबीयांना माहिती दिली. कुटुंबीय मेरठमधील पोस्टमॉर्टम हाऊसमध्ये…
Author: editor desk
मुझफरनगर : वृत्तसंस्था सासऱ्यानेच सूनेवर अत्याचार केल्याची संतापजनक घटना उत्तरप्रदेशमधील मुझफरनगरमध्ये उघडकीस आल्याने खळबळ उडाली आहे. पिडीतेने पतीला याबाबत सांगताच पतीने तिला मारहाण करत तिलाच घराबाहेर हाकलून दिले. याबाबत सविस्तर माहिती अशी की, घरात सुन एकटी असल्याचा फायदा घेत सासऱ्यानेच आपल्या गर्भवती सुनेला वासनेचे शिकार बनवले. उत्तर प्रदेशच्या ककरौली पोलीस स्टेशन परिसरातील हे संपूर्ण प्रकरण आहे. पिडीतेचे 19 ऑगस्ट 2022 रोजी गावातील तरुणासोबत लग्न झाले होते. तरुणीच्या सासऱ्याची तिच्यावर वाईट नजर होती. घटनेच्या दिवशी पिडीता घरात एकटी असताना सासऱ्याने तिच्यावर बलात्कार केला. त्यानंतर याबाबत कुठे वाच्यता केल्यास जीवे मारण्याची धमकी देत फरार झाला. पिडीतेने संध्याकाळी घरी आल्यानंतर पतीला आपबीती…
नवी दिल्ली : वृत्तसंस्था प्रत्येक परिवारात घरगुती वाद होत असतात पण अनेक वाद हे काही वेळाने सुटत असतात पण काही वाद मात्र शेवटच्या टोकाला जात आहे. अशीच एक धक्कादायक घटना मध्य प्रदेशात घडली आहे. फक्त १०० रुपये मागितले म्हणून बायकोने तिच्या नवऱ्याला पेटवून दिले. कोटमा पोलीस ठाण्याच्या हद्दीतील मनमारी गावात सोमवारी रात्री हा प्रकार घडला. अनुपूर जिल्ह्यातील मनमारी गावात नवरा-बायकोमध्ये वाद झाला. वादाची ठिणगी इतकी पेटली की, बायकोने रागाच्या भरात त्याला पेटवून दिलं. फक्त १०० रुपये मागितले म्हणून बायकोने दुचाकीतील पेट्रोल काढून ते अंगावर ओतले. त्यानंतर पेटवून दिले, असा आरोप पीडित पतीने केला आहे. या घटनेत अंगद प्रसाद…
भंडारा : वृत्तसंस्था राज्यातील महामार्गावर अपघाताची मालिका सुरु असतांना नुकतेच राष्ट्रीय महामार्गावरून भंडाराकडे जात असलेला मालवाहू ट्रक जात होता. याचवेळी समोरून प्रवाशांना घेऊन भंडाऱ्याच्या दिशेने येत असलेल्या कारला जोरदार धडक दिली. यात कारमधील चालकासह आठ प्रवाशी गंभीर जखमी झाले आहेत. सदर अपघात राष्ट्रीय महामार्गावरील पलाडी शिवारात घडली असून या अपघातात आठ प्रवासी जखमी झाले आहेत. त्यांना उपचार्थ भंडारा जिल्हा सामान्य रुग्णालयात पाठविण्यात आले आहे. दरम्यान भंडारा येथून लाखनीकडे प्रवाशी वाहनात आठ प्रवाशी बसून जात होते. दरम्यान पलाड़ी शिवारात कारमधील चालक समोर जाणाऱ्या वाहनाला ओव्हरटेक करत पुढे जाण्याचा प्रयत्न करत होता. ओव्हरटेक करत असताना अंदाज चुकला व विरुद्ध दिशेने येणाऱ्या…
रावेर : प्रतिनिधी जळगाव जिल्ह्यातील रावेर तालुक्यातील एका गावात एका महिलेने तीन लाखांची खंडणी न दिल्यास पतीविरोधात बलात्काराचा गुन्हा दाखल करून बदनामी करेल, अशी धमकी प्रियकराच्या पत्नीला दिल्याचा प्रकार उघडकीस आल्याने खळबळ उडाली. निंभोरा पोलीस स्टेशनला 30 वर्षीय महिलेविरोधात याप्रकरणी खंडणीचा गुन्हा दाखल करण्यात आला. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, रावेर तालुक्यातील एका गावातील एका महिलेचे एका पुरूषासोबत संबंध असल्याने प्रेयसी असलेल्या या महिलेने चक्क प्रियकराच्या पत्नीला धमकी देत तुझ्या व माझ्या पतीचे संबंध असून ते कायम सुरू ठेवायचे असतील तर मला तीन लाख रुपयांची खंडणी देत अन्यथा मी तुझ्या पतीविरुद्ध बलात्काराचा गुन्हा दाखल करेन, अशी धमकी दिली. तक्रारदार विवाहितेच्या नातेवाईक महिलेलादेखील…
ठाणे : वृत्तसंस्था कसारा येथील वीर तानाजीनगर परिसरातील एका घरात प्रेमीयुगुलाचे मृतदेह आढळून आल्याने ठाणे जिल्ह्यात मोठी खळबळ उडाली आहे. सोमनाथ सोनवणे (वय २३ वर्ष) आणि सुजाता देशमुख (वय २१ वर्ष) अशी मृतांची नावे आहेत. दोघांनीही गळफास घेऊन आत्महत्या केल्याचं समोर आलं आहे. या घटनेनं परिसरात एकच खळबळ उडाली आहे. दरम्यान, घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी तातडीने घटनास्थळी धाव घेत दोघांचे मृतदेह ताब्यात घेतले. सोमनाथ आणि सुजाता यांनी आत्महत्या करण्याचं कारण काय? याची माहिती अद्यापही समोर आलेली नाही. मिळालेल्या माहितीनुसार, सोमनाथ आणि सुजाता हे मूळ अहमदनगर जिल्ह्यातील अकोले तालुक्यातील रहिवाशी होते. दोघांमध्ये प्रेमसंबंध असल्याने दीड महिन्यांपूर्वी दोघेही घर सोडून कसारा येथील…
मुंबई : वृत्तसंस्था राज्यातील प्रत्येक पोलिसावर कायदा आणि सुव्यवस्था राखण्याची जबाबदारी असते. नागरिकांची सुरक्षा करणे, त्यांच्यासाठी सुरक्षित वातावरण तयार करण्याची जबाबदारी आहे, अशा पोलीस अधिकाऱ्याने एका महिलेवर बलात्कार केल्याचा आरोप आहे. नालासोपारा पूर्वेकडील आचोळे पोलीस ठाण्यात सहाय्यक पोलीस निरीक्षकावर एका वकिल महिलेने बलात्काराचा गुन्हा दाखल केला आहे. जानेवारी 2020 पासून हा सहाय्यक पोलीस निरीक्षक विविध ठिकाणी नेवून, बलात्कार करत असल्याचे तक्रारीत पीडितेने म्हटले आहे. पालघर पोलीस ठाण्यात सध्या सहाय्यक पोलीस निरीक्षकपदी असलेले मल्हार धनराज थोरात होता. त्याने नालासोपारा, वालीव आणि दहिसर पोलीस ठाण्याच्या हद्दीत सहाय्यक पोलीस निरीक्षकपदी काम केलं आहे. पीडित महिला ही 33 वर्षाची असून, ती व्यवसायाने वकिल आहे.…
मुंबई : वृत्तसंस्था मुंबईतील चांदिवली येथे एसयूव्ही कारची धडक बसून एक ज्येष्ठ नागरिक जखमी झाल्याची घटना घडली आहे. धक्कादायक गोष्ट म्हणजे, या आलिशान गाडीचा चालवणारा चालक, हा अवघ्या १४ वर्षांचा मुलगा होता. या घटनेचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होताच, एकच खळबळ माजली असून एवढ्या लहान मुलाच्या हातात कार देणाऱ्या पालकांबद्दलही संताप व्यक्त होत आहे. चांदिवलीतील नाहर अमृत शक्ती रोड येथील कॉलनीजवळ ही दुर्घटना घडली. त्या व्हिडीओनुसार, सकाळच्या सुमारास एक ज्येष्ठ नागरिक कॉलनीच्या गेटमधून चालत बाहेर आले व रस्त्याच्या कडेने चालत होते. तेवढ्यात त्याच बिल्डींगच्या गेटमधून एक एसयूव्ही (कार) बाहेर आली. डावीकडे वळतानाच एसयूव्हीची, बाजूला उभ्या असलेल्या रिक्षाला धडक बसली.…
मुंबई : वृत्तसंस्था राज्यात गेल्या काही दिवसापासून नियमित अपघाताची मालिका सुरु असतांना आज पुन्हा एकदा पुणे-बंगळुरु महामार्गावर रात्रीच्या सुमारास खंडाळानजीक झालेल्या मालवाहतुकीच्या वाहनांच्या अपघातात तिघे जण ठार झाल्याची प्राथमिक माहिती समाेर आली आहे. पाेलिस या घटनेची सखाेल चाैकशी करीत आहेत. पाेलिसांकडून मिळालेल्या माहितीनूसार खंडाळा येथील धनगरवाडी हद्दीत हा अपघात झाला. पुण्याच्या दिशेला जाणाऱ्या मार्गांवर हा अपघात झाला. पंक्चर झालेल्या ट्रकला मागून येऊन दुसऱ्या ट्रकने धडक दिल्याने हा अपघात झाला असल्याची माहिती पाेलिसांकडून मिळाली. या घटनेत तिघांचा मृत्यू झाल्याची माहिती प्राप्त झाली आहे. या अपघातानंतर पुण्याला जाणारी वाहतूक काही काळ थांबली हाेती. सुमारे तासभरांनंतर पाेलिसांनी वाहतुक सुरळीत केली.
मुंबई : वृत्तसंस्था राज्यातील अल्पवयीन मुलींवर अत्याचाराचे प्रमाण मोठ्या संख्येने वाढत असतांना एक धक्कादायक घटना समोर आली आहे. जेवण बनवण्याचं काम करणाऱ्या नराधमाने अल्पवयीन विद्यार्थिनीचा विनयभंग केल्याची धक्कादायक आणि संतापजनक घटना वसई परिसरात घडली आहे. या प्रकरणी आरोपी नराधमाला वालीव पोलिसांनी अटक केली असून राजाराम मौर्य (वय ५३) असं अटक केलेल्या आरोपीचे नाव आहे. मिळालेल्या माहितीनुसार, वसई पूर्वेस गावराई पाडा येथे संत लीला शाह हायस्कूल आणि ज्युनिअर कॉलेज असून या शाळेत आरोपी राजाराम मौर्य हा जेवण बनवण्याचे काम करतो. या शाळेत इयत्ता चौथीत पिडीत अल्पवयीन मुलगी शिकत असून ५३ वर्षाचा आरोपी राजाराम मौर्य याने या शाळेत शिकणाऱ्या ९ वर्षाच्या…

