जळगाव : प्रतिनिधी जळगाव जिल्ह्यात आज सकाळी ८ वाजेच्या सुमारास भीषण अपघात झाल्याची बातमी समोर आली आहे. या बस अपघातात १० ते १२ प्रवासी जखमी तर दोन जणाचा मृत्यू झाल्याची माहिती मिळत आहे. मिळालेल्या माहितीनुसार, एरंडोल तालुक्यात पिंपळ कोठा गावाजवळ श्री चौधरी ट्रॅव्हल्स (बस क्रमांक :एआर ०१ वाय ०००९) ही खासगी बस मुंबई-नागपूर महामार्गावर दुभाजकाला आदळून पलटी झाली आहे. या अपघातात चार प्रवासी गंभीर जखमी झाले आहेत. तर दहा ते बारा प्रवासी किरकोळ जखमी झाले आहेत. तर यात असून चालक ठार झाला आहे. दीपेंद्र कुमार (वय २५), बलराम (वय ३३), दिनेश कुमार (वय ३०), रतनलाल कुमावत (वय ४०), जयराम…
Author: editor desk
धरणगाव : प्रतिनिधी धरणगाव शहरात एका छायाचित्रकार तरुणाने फोटोग्राफीचा व्यवसाय सांभाळून उत्तम शेती करीत असून नवीन तरुण पिढीला शेती आणि पूरक व्यवसाय करण्यात पण अधिक प्रमाणात रस असल्याचे जाणवत आहे. धरणगावातील छायाचित्रकार सागर पाटील या तरुणाने आपला फोटोग्राफी चा व्यवसाय उत्तम प्रकारे सांभाळून शेती आणि जोड व्यवसाय पण करत एक नवीन गोष्टी करण्याचा आणि शिकण्याचा त्याचा ध्यास सुरू आहे. आताच झालेल्या बैलपोळा मध्ये त्यांनी छान पद्धतीने बैल सजवून, त्यांची मिरवणूक काढली.. यात परिसरातील सर्वच ज्येष्ठ नागरिक तसेच तरुण वर्ग उपस्थित होता..अगदी आनंदाने आणि उत्साहाने सर्वानी बैलपोळा साजरा केला.सागर पाटील यांनी आपले मनोगत व्यक्त करतांना सांगितले की ग्रामीण भाग, शेती,…
रावेर : प्रतिनिधी जळगाव जिल्ह्यात दोन दिवसापासून सुरु असलेल्या पावसामुळे शुक्रवारी संध्याकाळपासून रावेर तालुक्यात पावसाला सुरुवात झाली असून या पावसामुळे तापी नदीला आलेल्या पुरामुळे हतनूर धरणाचे बॅकवॉटर रस्त्यावर आल्याने सकाळपासून ऐनपूर-निंबोल रास्ता पाण्याखाली गेला आहे. यामुळे या रस्त्यावरील वाहतूक बंद पडली आहे. तर जुन्या अजनाड गावात तापी नदीच्या पुराची पाणी पातळी वाढली असून तहसिलदार बंडू कापसे यांनी येथे भेट देवून परिस्थितीची पाहणी केली. तापी नदीच्या पुराची पाणी पातळी वाढत असल्याने तालुक्यातील तापी नदी काठावरील नागरीकांना तहसिलदार कापसे यांनी सतर्कतेचा इशारा दिला आहे. तसेच आपत्ती व्यवस्थापन यंत्रणा सज्ज ठेवण्यात आली आहे. शुक्रवारी रात्री आठ वाजेपासून पावसाला सुरूवात झाली असून १५…
धरणगाव : प्रतिनिधी महाराष्ट्र शासन कौशल्य, रोजगार, व्यवसाय प्रशिक्षण व नाविन्यता विभागाच्या अंतर्गत व्यवसाय आणि कौशल्य अभ्यासक्रमांची जागृती व्हावी, या उद्देशाने धरणगाव येथील शासकिय औद्योगिक प्रशिक्षण (आयटीआय) संस्थेतर्फे रविवारी १७ सप्टेंबर २०२३ रोजी सकाळी ७.०० वाजता ‘पी.एम. रन फॉर स्किल मॅरेथॉन स्पर्धेचे’ आयोजन करण्यात आले आहे. रविवारी होत असलेल्या औद्योगीक प्रशिक्षण संस्था (आयटीआय) चे २०० विद्यार्थी व ५० विद्यार्थिनी ह्या मॅरेथॉन स्पर्धेत भाग घेणार आहेत. १६ वर्षाच्या पुढील मुले-मुली व स्त्री-पुरुष यात भाग घेऊ शकतात. स्पर्धेला कुठलेही शुल्क आकारलेले नाही. स्पर्धेची सुरूवात रविवारी स. ७ वाजता शासकीय आय.टी.आय. पासून शहरातील छत्रपती शिवाजी महाराज स्मारक तेथून परत शासकीय आय.टी.आय.पर्यंत असणार…
रावेर : प्रतिनिधी दोन वर्षासाठी हद्दपार करण्यात आलेल्या आरोपीकडून रावेरात गावठी बनावटीचे पिस्तूल दोन जिवंत काडतूस जप्त करण्यात आले आहे. रावेर पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मिळालेल्या माहितीनुसार, २३ मार्च २०२३ रोजी फैजपूर येथील उप विभागीय दंडाधिकाऱ्यांच्या प्रस्तावानुसार दोन वर्षासाठी जिल्ह्यातून हद्दपार करण्यात आलेले आहे. मात्र सदर संशयित रावेर शहरात असल्याची व त्याच्याकडे गावठी बनावटीचे पिस्तूल असल्याची गुप्त माहिती पोलीस निरीक्षक कैलास नागरे यांना मिळाली. त्यानुसार एक पथक पाठवून खात्री केली असता रावेर शहरातील रामदेवबाबा नगर आकाश लक्ष्मण रील याला पोलिसांनी अटक केली आहे. पोलिसांनी त्याची झडती घेतली असता त्याच्याकडे १५ हजार रुपये किंमतीचा गावठी बनावटीचा देशी…
पाचोरा : प्रतिनिधी भडगाव तालुक्यातील एका 36 वर्षीय महिलेला लग्नाचे खोटेआमिष दाखवून तिला जळगाव जिल्ह्यातील विविध ठिकाणी असणाऱ्या लॉजवर नेऊन तिच्यावर अत्याचार केल्याचा प्रकार उघडकीस आला असून या प्रकरणी महिलेच्या फिर्यादीवरून पाचोरा पोलीस स्टेशनला चौघांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलीस सूत्रांनी दिलेली माहिती अशी की, मे २००८ ते १५ मे २०२३ पर्यंत रिजवान जैनउद्दीन शेख वय ४२, धंदा – ड्रायव्हर, रा. वाल्मिकनगर, मंगलकार्यालय जवळ, चाळीसगाव ता. चाळीसगाव . पीडित महिलेला लग्नाचे आमिष दाखवुन वारंवार तिला विविध ठिकाणी यात सुधाशांती लाँज पाचोरा तसेच विलास लॉज जळगांव तसेच चाळीसगांव येथील लॉजचे नांव माहीत नाही आधी ठिकाणी शारीरीक संबंध निर्माण केले…
मुंबई : वृत्तसंस्था राज्यातील मुंबई शहरातून एक धक्कादायक बातमी समोर आली आहे. कुर्ला परिसरात एका इमारतीला भीषण आग लागल्याची घटना घडली आहे. या आगीत तब्बल ३९ जण गंभीर जखमी झाले असल्याचे देखील सांगण्यात आले आहे. मिळालेल्या माहितीनुसार, कुर्ला परिसरात एका इमारतीला लागलेल्या आगीमध्ये ३९ जण जखमी झाले असून इमारतीतील वेगवेगळ्या मजल्यांवरून सुमारे 60 लोकांना सुखरूप बाहेर काढण्यात आले आहे. सर्व जखमींवर सध्या रुग्णालयात उपचार सुरू आहेत. आगीची माहिती मिळताच अग्निशमन दलाचे जवान तातडीने घटनास्थळी दाखल झाले आहेत. सध्या आग आटोक्यात आणण्याचे प्रयत्न सुरू आहेत.
नवी दिल्ली : वृत्तसंस्था तिरुपती बालाजीचे दर्शन घेऊन परतणाऱ्या भाविकांच्या वाहनाने मालवाहू ट्रकला मागून जोराची धडक दिल्याने झालेल्या भीषण अपघातात पाच भाविक जागीच ठार झाले. चालकासह पाचजण बेळगाव जिल्ह्यातील अथणी तालुक्यातील बडची गावातील राहणारे आहेत. आंध्र प्रदेशातील अन्नमया जिल्ह्यातील तिरुपतीजवळील कव्वीपल्ली येथे दि.१५ रोजी शुक्रवारी सकाळी हा अपघात घडला आहे. अपघातात अकरा जण गंभीर जखमी झाले असून, त्यांच्यावर रुग्णालयात उपचार सुरू आहेत.हनुमंत अजूर (वय ३२), महानंदा अजूर (३२), शोभा अजूर (३२), अंबिका अजूर (१४, चौघेही रा. बडची, ता. अथणी, जि. बेळगाव), हनुमंत जाधव (४२) अशी ठार झालेल्यांची नावे आहेत. अकरा जखमींपैकी सात जणांची प्रकृती चिंताजनक आहे. बेळगाव जिल्ह्यातील अथणी येथील…
सोलापूर : वृत्तसंस्था सोलापूर जिल्ह्यातील मंगळवेढा या ठिकाणी लग्नामध्ये मानपान केले नसून, जागा घेण्यासाठी विवाहितेकडे पैशाची मागणी केली. या त्रासाला कंटाळून विवाहित माहेरी आल्यानंतर, पतीने दुसरे लग्न केल्याची तक्रार पत्नीने मंगळवेढा पोलिस ठाण्यात दिली आहे. मिळालेल्या माहितीनुसार, मंगळवेढा तालुक्यातील साळमाळगेवाडी येथील प्रियंका पडोळे यांनी फिर्याद दिली आहे यानुसार, प्रदीप पडोळे, अर्चना पडोळे, बाळासाहेब पडोळे, प्रतीक्षा पडोळे (चौघे रा. साळमाळगेवाडी, ता. मंगळवेढा) यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल झाला आहे. फिर्यादीनुसार, प्रियंका आणि प्रदीप यांचे लग्न १७ डिसेंबर २०२० मध्ये झाले होते. लग्नानंतर सासरकडील लोकांनी लग्नामध्ये मानपान केला नाही, तसेच जागा घेण्यासाठी माहेरहून पैसे आण, म्हणून मारहाण केली.
जळगाव : प्रतिनिधी जळगाव शहरात साथीच्या आजाराने थैमान घातले असून, डेंग्यू सदृश्य आजारांचे अनेक रुग्ण आढळून आले आहेत. यात जळगावपासुन जवळच असलेल्या शिरसोली गावात देखील डेंग्युने थैमान घातले असून, एका १९ वर्षीय तरुणाचा मृत्यु झाला आहे. याशिवाय गावात डेंग्यू पॉझिटिव्ह आणखी रुग्ण आहेत. जळगाव शिरसोली प्र. वो. येथील बारी नगरात तालुक्यातील देवेंद्र बारी हा तरुण आपल्या कुटुंबियांसह वास्तव्यास आहे. तो आयटीआयचे शिक्षण घेत होता. गेल्या काही दिवसांपासून तो आजारी असल्यामुळे त्याला खाजगी रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. तपासणीअंती त्याला डेंग्यू आजार झाल्याचे निष्पन्न झाले होते. त्यानुसार त्याला अतिदक्षता विभागामध्ये दाखल करण्यात आले होते. तेथे उपचार सुरू असताना गुरुवारी पहाटे…

