अहमदनगर : प्रतिनिधी राज्यातील गुन्हेगारीचे जाळे मोठ्या प्रमाणात विणत असतांना एक धक्कादायक बातमी शिर्डीमधून समोर आली आहे. याठिकाणी एकाच कुटुंबातील तिघांची निर्घृण हत्या करण्यात आली आहे. ही घटना बुधवारी रात्रीच्या सुमारास घडली आहे. या घटनेतील संशयितास पाेलीसांनी ताब्यात घेतले आहे. शिर्डी पाेलीस घटनेचा कसून तपास करीत आहेत. पाेलीसांकडून मिळालेल्या माहितीनूसार शिर्डी जवळील सावळीविहीर गावात ही घटना घडली. प्राथमिक माहितीनूसार जावयाने पत्नीची, मेव्हण्याची आणि आजे सासूची धारदार शस्राने वार करुन निर्घृण हत्या केली. या घटनेत संशयिताची सासू, सासरे आणि मेव्हणी गंभीर जखमी झाले आहेत. त्यांच्यावर शिर्डी येथील साईबाबा हॉस्पिटलमध्ये सुरू आहेत. या घटनेत वर्षा सुरेश निकम (संशयिताची पत्नी, वय २४), रोहित…
Author: editor desk
नवी दिल्ली : वृत्तसंस्था देशातील गुन्हेगारीची सुरुवात अनेकदा प्रेम प्रकरणातून होत आहे. अशीच एक धक्कादायक घटना झारखंडमध्ये घडली आहे. एका महिलेने तिच्या प्रियकराच्या प्रायव्हेट पार्टवर ब्लेडने वार केले. या हल्ल्यात प्रियकर बेशुद्ध झाल्यानंतर ती स्वत:च पोलिसांकडे गेली आणि आपण प्रियकरावर हल्ला केल्याचे सांगत आत्मसमर्पण केले. तिची ही कबुली ऐकून पोलिसही हादरले. मात्र त्यानंतर त्यांनी आरोपी महिलेला तत्काळ ताब्यात घेतले. पोलिसांनी घटनास्थळ गाठून त्या महिलेच्या जखमी प्रियकराला रुग्णालयात दाखल केले. मात्र त्याची प्रकृती अद्याप चिंताजनक असल्याचे समजते. झारखंडमधील गिरिडीह जिल्ह्यातील एका गावात ही धक्कादायक घटना घडली आहे. पोलिसांच्या चौकशीत त्या महिलेने कृत्याची कबूली देत सर्व गोष्टी कथन केल्या. सदर महिला…
मुंबई : वृत्तसंस्था मुंबई शहरातून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. एक स्वयंपाक करणारा इसम, कूक नाराज होता, कारण त्याची मालकीण त्याला छोट्याशा गोष्टीवरून ओरडली होती. मात्र या गोष्टीचा बदला घेण्यासाठी त्याने तिला अतिशय क्रूर शिक्षा दिली. त्या कूकने त्याच्या मालकिणीला थेट वीजेच्याच तारेने करंट दिल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे.पीडित महिला जेव्हा झोपली होती, तेव्हा तो कूक वीजेची तार घेऊन तिथेच उभा होता. तिला जाग येताच त्याने तिला वीजेच्या तारेने झटके दिले. पीडित महिला शिक्षिका असल्याचे समजते. दरम्यान या अमानुष कृत्यानंतर आरोपी फरार झाला आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, अंधेरी येथील एका इमारतीत रविवारी दुपारी ही संपूर्ण धक्कादायक घटना…
नागपूर : वृत्तसंस्था राज्यात गुन्हेगारीचे जाळे मोठ्या प्रमाणात विणले जात असतांना एक धक्कादायक घटना समोर आली आहे. नकली वस्तूंची विक्री करून फसवणूक करण्याचे अनेक प्रकार समोर आले आहेत. शिवाय खरे सोन्याचे दागिने असल्याचे भासवत नकली दागिने विक्री करत आहेत. असाच प्रकार गोंदिया जिल्ह्यात समोर आला असून यातून नकली सोने विक्री करणाऱ्या तरुणाचा खून झाल्याचे समोर आले आहे. गोंदिया जिल्ह्यात नकली साहित्य विक्री करणारे गावोगावी फिरत आहेत. यातच तिन लोक सोन्याचे नकली झुंबर घेउन गावात फिरत होते. याची माहिती गावकऱ्याना मिळाली होती. त्यासाठी गावकऱ्यांनी तिघांना अडवत आम्हाला नकली सोने विक्री करून फसवणूक करता; असे म्हणत तिघा तरुणांना बेदम मारहाण करण्यात…
मुंबई : वृत्तसंस्था सध्या राज्यातील अनेक भागात पाऊस सुरु असल्याने अनेक लोक पर्यटन करण्यासाठी वेगवेगळ्या ठिकाणी जात असतांना अशाच एका पर्यटणठिकाणाहून धक्कादायक बातमी समोर आली आहे. मालवण तारकर्ली येथील समुद्रकिनाऱ्यावर पर्यटनासाठी आलेला युवक समुद्रात बुडाल्याची घटना मंगळवारी घडली. सुफयान दिलदार शेख (वय 23) असे युवकाचे नाव असल्याची माहिती पाेलीसांकडून प्राप्त झाली. सुफयान दिलदार शेख हा मित्रांसोबत पर्यटनासाठी आला होता. समुद्रातील पाण्याचा अंदाज न आल्याने तो बुडाल्याची प्राथमिक माहिती प्राप्त झाली आहे. या घटनेनंतर त्याच्या समवेत असलेल्या मित्राला मालवण उपजिल्हा रुग्णालयात उपचारार्थ दाखल करण्यात आले. सुफयान हा कणकवली तालुक्यातील साकेडी मुस्लिमवाडी येथील रहिवासी आहे. ताे समुद्रात बुडाल्याची माहिती त्याच्या…
जालना : वृत्तसंस्था जालना शहरातील साडेपाच वर्षांच्या मुलीचे अपहरण करणाऱ्या पित्याला कदीम जालना पोलिसांनी अकोला शहरातून मंगळवारी ताब्यात घेतले आहे. मिळालेल्या माहितीनुसार, शहरातील कांचननगर भागातील एका ३७ वर्षीय महिलेचा विवाह काही वर्षांपूर्वी अकोला येथील योगेश नरेंद्र परमार याच्यासोबत झाला. लग्नानंतर त्यांना एक मुलगी झाली असीम, ती सध्या साडेपाच वर्षांची आहे. या पती-पत्नीत वाद होत असल्याने त्यांनी न्यायालयामार्फत घटस्फोट घेतला. घटस्फोट मंजूर करताना न्यायालयाने मुलीचा ताबा आईकडे दिला आहे. वडिलांना दरमहिन्याच्या तिसऱ्या शनिवारी दुपारी ३ ते ५ या वेळेत कौटुंबिक न्यायालयाच्या आवारात मुलीला भेटण्याची परवानगी दिलेली आहे. सदर मुलगी सोमवारी दुपारी १ वाजेच्या सुमारास शाळा सुटल्यानंतर घरी व्हॅनमधून नेहमीप्रमाणे येत होती.…
अमरावती : वृत्तसंस्था गेल्या काही महिन्यापासून राज्यातील समृद्धी महामार्ग अनेक अपघातामुळे नेहमीच चर्चेत येत असतांना नुकताच जंगली प्राणी गाडीला आडवा आल्याने भीषण अपघात झाल्याची घटना समोर आली आहे. वाशिम जिल्ह्यातील लोकेशन १९६ जवळ हा अपघात झाला. या घटनेत कार मधील एका महिलेचा मृत्यू झाला असून तीन जण गंभीर जखमी झाले आहेत. याबाबत सविस्तर माहिती अशी की, पुण्यावरून अमरावतीकडे जाणाऱ्या कारचा समृद्धी महामार्गावर वाशिम जिल्ह्यातील लोकेशन १९६ जवळ अपघात झाला. कारच्या समोर अचानक जंगली प्राणी आल्याने त्याला वाचवण्याच्या नादात कारणे तीन पलट्या मारल्या. या घटनेत कारमधील दोघे गंभीर जखमी झाले असून एकाला किरकोळ दुखापत झाली आहे. यामधील एका महिलेचा उपचारादरम्यान दुर्देवी…
जळगाव : प्रतिनिधी जळगाव शहरात बेकायदेशीरित्या गावठी हातभट्टीची दारू विक्री करण्यासह वेगवेगळे सात गंभीर गुन्हे दाखल असलेल्या गणेश उर्फ नाना गंगाराम कोळी (३७, रा. पिंप्राळा, जळगाव) याच्यावर रामानंद नगर पोलिसांनी एमपीडीए कायद्यांतर्गत कारवाई करीत त्याची ठाणे कारागृहात रवानगी केली. मिळालेल्या माहितीनुसार, रामानंद नगर पोलिस हद्दीत बेकायदेशीरित्या गावठी हातभट्टीची दारू विक्री करणारा गणेश कोळी त्यांच्यावर रामानंद नगर पोलिस ठाण्यात गंभीर स्वरूपाचे वेगवेगळे सात गुन्हे दाखल आहेत. तरीदेखील त्याच्यात कोणतीही सुधारणा न झाल्याने रामानंद नगर पोलिस ठाण्याच्या पोलिस निरीक्षक शिल्पा पाटील यांनी कोळी याच्यावर एमपीडीएची कारवाईचा प्रस्ताव जिल्हा पोलिस अधीक्षक एम. राजकुमार यांच्याकडे पाठविला होता. त्यानुसार त्याला स्थानबध्द केले.
मुंबई : वृत्तसंस्था राज्यातील गुन्हेगारीच्या घटनेत सातत्याने वाढ होत असतांना एक धक्कादायक घटना भिवंडी शहरातून समोर आली आहे. कल्याण सीमेवर असलेल्या कोनगाव गावातील शामबाग येथे असलेल्या येथे एका इमारतीच्या तळमजल्यावर भाड्याच्या खोलीत राहणाऱ्या महिलेची हत्या झाल्याची खळबळजनक घटना सोमवारी रात्री समोर आली आहे. रात्री खोलीतून दुर्गंध येत असल्याने आजूबाजूच्या नागरिकांनी कोनगाव पोलोसांना याबाबत माहिती दिली. त्यांनतर पोलीस घटनास्थळी दाखल होत खोलीचा दरवाजा उघडला असता आतमध्ये एका ३० ते ३५ वर्षीय महिलेची धारधार हत्याराने हत्या केल्याचे समोर आले. घटनास्थळावरून पोलिसांनी एक पेपर कटर जप्त केला आहे. पोलिसांनी घटनास्थळाचा पंचनामा करून मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी शहरातील उपजिल्हा रुग्णालयात पाठविले आहे. या खोलीत…
नवी दिल्ली : वृत्तसंस्था श्रीगंगानगर जिल्ह्यातील पदमपूर भागात एक धक्कादायक घटना घडली आहे. येथे एका शिक्षकाने गुरू-शिष्य परंपरेचा अवमान करत असे कृत्य केले ज्यामुळे ग्रामस्थ संतप्त झाले. शिक्षकावर एका विद्यार्थिनीला फेसबुकवर फ्रेंड रिक्वेस्ट पाठवल्याचा आरोप आहे. तो विद्यार्थिनीला वारंवार मेसेज करून त्रास देत होता. त्यामुळे संतप्त झालेल्या ग्रामस्थांनी आरोपी शिक्षकाला पकडून तोंडाला काळं फासलं आणि नंतर बेदम मारहाण केली. याप्रकरणी शिक्षकाविरुद्ध पोलिसांत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. शिक्षिकाने विद्यार्थ्याच्या कुटुंबीयांवर मारहाणीचा गुन्हाही दाखल केला आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, हे प्रकरण श्रीगंगानगर जिल्ह्यातील पदमपूर उपविभागातील 7DD गावातील आहे. तेथील सरकारी शाळेचे शिक्षक राजेश कुमार यांना सोमवारी गावकऱ्यांनी बेदम मारहाण केली.…

