Author: editor desk

पुणे : वृत्तसंस्था राज्यातील प्रत्येक घरोघरी गणपती बाप्पांचे आगमन झाले आहे तर अनेकानी घरगुती बाप्पाचे देखील आकर्षक सजावट करून स्थापना करण्यात आली आहे. परंतु गणपतीसाठी केलेल्या आरासच्या लाईटिंगमध्ये शॉर्टसर्किट होऊन आग लागल्याने तरुणाचा झोपेतच मृत्यू झाला. ही हृदयद्रावक घटना पुणे जिल्ह्यातील खेड तालुक्यातील खरपुडी बुद्रुक येथे घडली आहे. मिळालेल्या माहितीनुसार, गणेशोत्सवात लाडक्या बाप्पाच्या आगमनानंतर घरगुती गणपतीला आकर्षक सजावट केली जात आहे. या सजावटीमध्ये विद्युत लाईट, प्लास्टिक फुले, कपड्यांचा वापर अधिक वाढलाय. यावेळी विद्युत लाईनची कुठलीही सुरक्षा लक्षात घेतली जात नाही. यातुनच हा प्रकार घडल्याचा अंदाज व्यक्त करण्यात आला. वैभव गरुड असे मृत तरुणाचे नाव आहे. वैभव गरुड यांच्या…

Read More

जळगाव : प्रतिनिधी  जळगाव शहरातील ९ गंभीर गुन्हे दाखल असलेल्या सराईत गुन्हेगाराला हद्दपारीचे आदेश काढल्याचा राग आल्याने त्या गुन्हेगाराने उपविभागीय दंडाधिकाऱ्यांना फोनवरुन जाब विचारला. त्यानंतर सायंकाळी थेट प्रांतधिकाऱ्यांच्या शासकीय निवासस्थानी जावून त्यांची उर्मट भाषेत बोलत माझ्यावर काय कारवाई केली. तुमच्या घराचा दरवाजा उघडा ठेवा, मी परत येईल अशी धमकी दिल्याची घटना शुक्रवारी सायंकाळच्या सुमारास घडली. याप्रकरणी प्रांतधिकाऱ्यांनी रामानंद नगर पोलीस ठाण्यात तक्रार दिली आहे. पोलीस ठाण्यात गंभीर गुन्हे दाखल असलेला सराईत गुन्हेगार भूषण रघुनाथ सपकाळे (वय ३२, रा. खेडी खुर्द, ता. जळगाव) याच्या हद्दपारीचा प्रस्ताव तालुका पोलीस ठाण्याचे तत्कालीन पोलीस निरिक्षक रामकृष्ण कुंभार यांनी पोलीस अधिक्षकांकडे सादर केला होता.…

Read More

नांदेड : वृत्तसंस्था प्रत्येक महिला असो वा पुरुष प्रत्येकाला रस्तावर लावलेली पाणीपुरीची दुकान दिसली कि लागलीच पाय दुकानाकडे वळत असतात. पण हीच पाणीपुरी धोकादायक ठरली आहे. नांदेडमध्ये पाणीपुरी विकणाऱ्या इसमाने असं मोठं कांड केलंय जे ऐकून तुमची भीतीने गाळणच उडेल. एक साधासुधा, पाणीपुरी विकणारा माणूस अट्टल गुन्हेगार निघाला. पाणीपुरी व्यवसायाच्या नावाखाली तो चक्क गावठी कट्टा म्हणजे पिस्तुल विकत होता की ओ ! हो, हे अगदी खरं आहे आणि त्या भामट्याला पोलिसांनी अटक केल्यानंतर त्याचा खरा चेहरा उघड झाला. पोलिसांनी त्याच्याकडून दोन गावठी कट्टे आणि पाच जिवंत काडतूस जप्त केले आहेत. संजय परिहार अस अटक करण्यात आलेल्या आरोपीचे…

Read More

लातूर : वृत्तसंस्था लातूर येथील गांधी चौक पोलिस ठाण्यातील कोठडीसमोर पहारा देत असताना शुक्रवारी रात्री उशिरा एका पोलिस कर्मचाऱ्याने स्वत:वरच गोळी झाडून घेतली. शुक्रवारी रात्री साडेदहाच्या सुमारास हा प्रकार घडला असून गंभीर जखमी पोलिसास खासगी रुग्णालयात दाखल आहे. पोलिस कर्मचारी पांडुरंग शंकरराव पिटले (वय ५०, रा. मंठाळेनगर, लातूर) हे लातूर शहरातील विवेकानंद चौक पोलिस ठाण्यात कार्यरत आहेत. पांडुरंग पिटले हे शुक्रवारी रात्री कर्तव्यावर होते. दरम्यान, अचानकपणे १०:१५ वाजेच्या सुमारास बंदुकीतून गोळी सुटण्याचा आवाज आल्याने ठाण्यात असलेल्या इतर पोलिसांनी कोठडीकडे धाव घेतली. त्यावेळी पिटले हे गंभीर जखमी झाल्याचे आढळून आले. त्यांना तातडीने शासकीय रुग्णालयात दाखल केले. तेथील डॉक्टरांनी प्रकृती…

Read More

जळगाव : प्रतिनिधी  जून्या भांडणाच्या कारणावरुन कुरापत काढून तरुणाला शिवीगाळ करीत त्याला लोखंडी कडे मारुन जखमी केले. तसेच त्याच्या आई-वडिलांनाही धक्काबुक्की करीत जीवे ठार मारण्याची धमकी दिल्याची घटना शुक्रवारी मध्यरात्रीच्या सुमारास नशिराबाद गावात घडली. याप्रकरणी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसानी दिलेल्या माहितीनुसार, जळगाव तालुक्यातील नशिराबाद येथील खालची आळी परिसरात कमलाकर प्रभाकर महाजन (वय ३३) हा तरुण वास्तव्यास आहे. शुक्रवारी (दि. २२) मध्यरात्री १.३० वाजेच्या सुमारास कमलाकर महाजन हा गावातील बसस्टँड जवळील दुकानासमोरील पायरीवर बसलेला होता. त्यावेळी गावात राहणारा जयेश रमेश महाजन हा तिथे आला. जुन्या वादातून जयेश महाजन याने कमलाकर महाजन याला शिवीगाळ करण्यास सुरुवात केल्याने…

Read More

जळगाव : प्रतिनिधी  चाळीसगाव शहरात टोळीने गुन्हे करणारे इसमांविरुध्द मुं.पो. का. क. ५५ प्रमाणे हद्दपार प्रस्ताव मा. पोलीस अधीक्षक सो. जळगाव यांचे कडेस आल्यानंतर सदर प्रस्तावाची मा. श्री अभयसिंह देशमुख, उपविभागीय पोलीस अधिकारी चाळीसगांव यांचे कडून चौकशी करुन ते खरोखर जिल्हयांतुन हद्दपार करण्याचे किंवा वारंवार गुन्हे करण्याचे सवयीचे आहेत असे चौकशीत निष्पन्न झाल्याने त्यांना जळगांव जिल्हयातुन हददपार करण्यात आले आहेत. चाळीसगाव शहर पो.स्टे. कडील हद्दपार प्रस्ताव क्र. 07/2023 प्रमाणे सामनेवाले १) भुपेश ऊर्फ भुप्या यशवंत सानेवणे वय २३ रा भडगांव रोड आर. के. लॉन्स जवळ चाळीसगांव, (२) अभय उर्फ अभ्या हिम्मत लोहार वय १९ रा प्लॉट एरीया चाळीसगांव, (३) धनंजय…

Read More

मुंबई : वृत्तसंस्था प्रत्येक परिवारातील नवरा व बायको मध्ये सुरु असलेले वाद हे कधीच मिटत नसतात तर हे वाद अनेकदा हसून मागे पडत असतात तर काही बायका याच वादातून नवऱ्याला नेहमीच धमकावत असतात. अशाच एका नवविवाहितेने नवऱ्याला भीती दाखवन्याच्या उद्देशाने गळफास लावून घेण्याचा प्रयत्न केला. त्यातच तिचा मृत्यू झाल्याची घटना नुकतीच घडली. हि घटना जिंतूर तालुक्यातील कावी येथे घडली आहे. बामणी पोलिसांनी दाेन्ही कुटुंबियांच्या माहितीनंतर अकस्मात मृत्यूची नोंद केली. मिळालेल्या माहितीनुसार, बामणी पोलीस स्टेशन अंतर्गत असलेल्या कावी येथील लक्ष्मण रामभाऊ काठमोरे व त्यांची पत्नी सायली (वय 19 वर्षे) हे नवविवाहित जोडपे पुणे येथे कामानिमित्ताने राहात होते. ते महालक्ष्मी सणासाठी…

Read More

नवी दिल्ली : वृत्तसंस्था देशात अनेकदा ऑनलाईन स्कॅम मोठ्या संख्येने वाढत असून लोकांचा पैसा लुटण्यासाठी स्कॅमर्स अनेक मार्ग शोधत आहेत. असेच एक प्रकरण समोर आले आहे ज्यात रमनदीप एम ग्रेवाल यांची स्कॅमर्सने 57 लाख रुपयांची फसवणूक केली आहे. या व्यक्तीने एका छोट्या गोष्टीकडे दुर्लक्ष केलं आणि ऑनलाईन फसवणूक झाली. सिम डिस्कनेक्ट झाल्यानंतर ती व्यक्ती आपला फोन नंबर बँकेत अपडेट करायला विसरली होती. एका रिपोर्टनुसार, लुधियानात नुकतीच ऑनलाईन फसवणूक करणाऱ्या चार जणांना अटक केली आहे. त्यामध्ये एचडीएफसी बँकेत रिलेशनशिप मॅनेजर म्हणून काम करणारा सुखजित सिंह, बिहारचा लव कुमार, गाझीपूरचा नीलेश पांडे आणि दिल्लीचा अभिषेक यांचा समावेश होता. या स्कॅमर्सनी…

Read More

मुंबई : वृत्तसंस्था देशासह राज्यातील अनेक ठिकाणी सध्या सर्वत्र गणेशोत्सवाची धूम सुरू आहे. घरगुती गणपतींसोबतच अनेक ठिकाणी सार्वजनिक गणेश मंडळांमध्ये देखील सणाचा उत्साह दिसत आहे. मात्र या सणाला गालबोट लावणारी एक घटना विरारमध्ये घडली आहे. मध्यरात्री काही जण गणेश मंडळासमोर बसून पत्ते खेळत होते, अचानक पोलिसांनी टाकलेल्या छाप्यामुळे एकच पळापळ झाली. त्यामध्ये एका तरूणाचा मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना घडली आहे.विरार पश्चिमेकडे असलेल्या एका गावात ही दुर्दैवी घटना घडली. विरार पश्चिम आगाशी-कोल्हापूर या गावात मध्येरात्री पावणे तीनच्या सुमारास कोल्हापूर ग्रामस्थ मंडळात ही घटना घडली आहे. गणेश मंडळाच्या समोर काही गणेश भक्त पत्ते खेळत बसले होते. ही माहिती मिळताच मध्यरात्री पावणेतीनच्या सुमारास…

Read More

जळगाव : प्रतिनिधी  जळगाव तालुक्यातील फुपनगरी गावातून एकाच वेळी दोन शाळकरी मुलींचे अनोळखी इसमाकडून अपहरण केल्याची धक्कादायक घटना बुधवारी २० सप्टेंबर रोजी सकाळी सडे नऊ वाजेच्या सुमारास घडली आहे. याप्रकरणी गुरुवारी दि. २१ सप्टेंबर रोजी दुपारी ३ वाजता तालुका पोलीस ठाण्यात अनोळखी इसमाविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मिळालेल्या माहितीनुसार, जळगाव तालुक्यातील फुपनगरी गावात वास्तव्यास असलेल्या दोन मुली अल्पवयीन बुधवारी दि. २० सप्टेंबर रोजी सकाळी साडेनऊ वाजेच्या सुमारास शाळेत जाऊन येतो असे सांगून गेल्या. दोघी मुली रात्री उशिरापर्यंत घरी न आल्याने त्यांच्या नातेवाईकांनी दोघांचा सर्वत्र शोध घेतला परुंतु दोन्ही मुलींबाबत कोबतीही माहिती मिळाली नाही. दोन्ही मुलींना काही तरी आमिष…

Read More