पुणे : वृत्तसंस्था राज्यातील अनेक जिल्ह्यात गुन्हेगारीच्या घटना सातत्याने घडत असतांना एक धक्कादायक घटना फलटण शहरातून समोर आली आहे. फलटण शहरातील मध्यवर्ती भागातील व अत्यंत वर्दळीच्या उघड्या मारुती परिसरातील हुतात्मा स्मारकासमोरील व्यापाऱ्यास खंडणीची मागणी करत कोयता व तलवारीचा धाक दाखवून दोघांनी लुटल्याची घटना घडली असून हल्लेखोरांनी दुकानातील पैशांचा गल्लाच उचलून नेला. यावेळी अटकाव करणाऱ्या व्यापाऱ्याच्या डोक्यावर कोयत्याने वार केला असता व्यापाऱ्याने तो चुकावला; परंतु खांद्याला वार घासून गेल्याने व्यापारी किरकोळ जखमी झाला. रविवारी बाजारादिवशी सायंकाळी पावणेसहाच्या सुमारास ही घटना घडल्याने खळबळ उडाली. अरिंजय दोशी (वय ७२) असे जखमी झालेल्या व्यापाऱ्याचे नाव आहे. शेजारील काही दुकानांतही कोयता आणि तलवारीचा…
Author: editor desk
मुंबई : वृत्तसंस्था गेल्या सहा महिन्याआधी पोलिसांनी ३ कोटीहून अधिक रोकड जप्त केल्यानंतर पुन्हा एकदा राजस्थान पोलिसांनी गुजरातला निघालेल्या एका कारमधून कोट्यवधीची रोकड जप्त केली आहे. या कारमध्ये २ युवक होते त्यांना देखील ताब्यात घेण्यात आले आहे. कोट्यवधी रुपये सिरोहीतून अहमदाबादला घेऊन जात होते. सध्या पोलीस या संपूर्ण प्रकरणाचा तपास करत आहेत. राजस्थानच्या सिरोही येथील ही घटना आहे. राज्यात काही महिन्यांवर विधानसभा निवडणुका आल्या आहेत. त्यामुळे पोलिसांनी शेजारील राज्यातून येणाऱ्या वाहनांवर बारकाईने लक्ष ठेवले आहे. पोलिसांनी २४ सप्टेंबरला मावळ येथे वाहनांची तपासणी सुरू होती. त्यावेळी ड्युटीवर तैनात असलेल्या प्रकाश कुमार आणि विजय सिंह यांची नजर सफेद रंगाच्या लग्झरी कारवर…
नवी दिल्ली : वृत्तसंस्था एका चोराने आधी सामान्य भक्ताप्रमाणे मंदिरात प्रवेश करून पूजेनंतर त्याने मूर्ती चोरली आणि तेथून पळ काढला. हि घटना उत्तर प्रदेशातील मेरठमध्ये घडली आहे. चोरट्याचं हे कृत्य मंदिरातील सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झालं आहे. परिसरातील नागरिकांमध्ये या घटनेनंतर खळबळ उडाली आहे. मिळालेल्या माहितीनुसार, हे प्रकरण मेरठच्या विहार कॉलनीतील आहे, जिथे खाटू श्याम मंदिरातून भगवान लड्डू गोपाल यांची मूर्ती चोरीला गेली. चोर सामान्य भक्ताप्रमाणे मंदिरात आला हे सीसीटीव्हीमध्ये दिसत आहे. चोरी करण्यापूर्वी त्याने आपल्या गुन्ह्यांबद्दल देवाकडे क्षमा मागितली. यानंतर मंदिरातून देवाची मूर्ती चोरीला गेली. राधा अष्टमीच्या आदल्या दिवशी मंदिरातून भगवान लड्डू गोपाल यांची मूर्ती चोरीला गेल्याने लोकांमध्ये प्रचंड…
नवी दिल्ली : वृत्तसंस्था प्रत्येक नववधू आणि नवरदेवाला वाटत असतं की त्यांची लग्नातील एन्ट्री अशी व्हावी की सगळे पहाताच रहावे. हल्ली लग्नात ग्रँड एन्ट्रीचा क्रेज वाढतच चालला आहे. तसेच ती सर्वांच्या लक्षात रहावी. यासाठी लोक खूप विचार करुन गाण्याची निवड करतात. काही लोक डान्स करत एन्ट्री करतात. तर काही लोक एन्ट्रीवर खूप पैसे खर्च करतात. कधी ही एन्ट्री जेसीबीवर होते. तर कधी बाईकवर, तर कधी आकाशातून पाळण्यावर. तुम्ही यासंबंधीतचे अनेक व्हिडीओ सोशल मीडियावर पाहिले असणार. ही अशी एन्ट्री पाहायला खूप भारी वाटते. पण कधीकधी ते जीवघेणं देखील ठरते. लग्नातील एन्ट्री फेल झाल्याचे तुम्ही अनेक व्हिडीओ ही पाहिले असणार. सध्या…
नवी दिल्ली : वृत्तसंस्था देशभरातील अनेक महामार्गावर अपघात मोठ्या प्रमाणात होत असतांना एक भीषण अपघात केरळ राज्यातून समोर आला आहे. केरळच्या कासरगोड जिल्ह्यात सोमवार २५, सप्टेंबर रात्री स्कूल बस आणि ऑटोरिक्षा यांच्यात झालेल्या भीषण अपघात झाला. या दुर्घटनेत पाच महिलांचा मृत्यू झाला. घटनेने परिसरात एकच खळबळ उडाली आहे. मिळालेल्या माहितीनुसार, केरळमधील कासारगोड जिल्ह्यात सोमवारी संध्याकाळी स्कूल बस आणि ऑटोरिक्षा यांच्यात भीषण अपघात झाला. हा अपघात इतका भयंकर होता की यामध्ये चार महिलांचा जागीच मृत्यू झाला तर एकाचा रुग्णालयात नेताना मृत्यू झाला. अपघाताबाबत पोलिस स्टेशनच्या अधिकाऱ्याने सांगितले की, प्राथमिक तपासानुसार बसचा वेग जास्त होता आणि चुकीच्या दिशेने येत असल्याने हा…
छत्रपती संभाजीनगर : वृत्तसंस्था वॉचमन कुलूप लावून निघून गेला आणि शाळेच्या वर्गखोलीत चिमुकली अडकली. अखेर नागरिकांनी कुलूप तोडून मुलीची सुटका करत तिला आई-वडिलांच्या स्वाधीन केले. ही घटना सोमवारी मनपाच्या रोजाबाग शाळेत घडली. छत्रपती संभाजीनगरातील रोजाबाग येथील शाळा सकाळच्या सत्रात भरते. सकाळी आठ वाजता मुले शाळेत येतात. साडेबारा वाजता शाळा सुटल्यावर घरी जातात. सोमवारी शाळा सुटल्यानंतर वॉचमन विठ्ठल बमने याने शाळेच्या खोल्यांना कुलूप लावले आणि तो निघून गेला. परंतु एका वर्गात चिमुकली अडकली. पहिल्या वर्गात शिकणारी ही चिमुकली दार ठोठावून रडकुंडीला आली. दार उघडले जात नाही असे लक्षात आल्यावर ती रडू लागली. शाळा सुटली तरी मुलगी घरी आली नाही,…
जळगाव : प्रतिनिधी बांधकामाच्या ठिकाणी खेळत असलेल्या सात वर्षाची राधिका दीपक पावरा या चिमुकलीचा पाण्याच्या टाकीत बुडून मृत्यू झाला. ही घटना रविवारी सायंकाळच्या सुमारास गांधी नगरात घडली. याप्रकरणी पोलिसात कुठलीही नोंद करण्यात आलेली नव्हती. मिळालेल्या माहितीनुसार, शहरातील गांधी नगर भागात एका इमारतीचे बांधकाम सुरू आहे. याठिकाणी राहणारे दीपक पावरा हे वॉचमन म्हणून काम करतात. त्यांना चार मुली असून रविवारी त्यांनी मुलींसोबत जेवण केले. त्यानंतर मुली बाहेर खेळण्यासाठी गेल्या होत्या. बांधकामाच्या ठिकाणी खेळत असतांना राधिका ही सापडत नसल्याने त्यांनी तिचा शोध सुरू केला. बराच वेळ होऊनही ती कोठेच न सापडल्याने त्यांनी पाण्याच्या टाकीत पाहिले असता, राधिकाचा पाण्यात बुडून मृत्यू झाला…
नवी दिल्ली : वृत्तसंस्था बहुतेक लोकांना साप या शब्दाचा उल्लेख जरी कानावर पडला तर भीती वाटते. मग एखादा साप आपल्या अंगावर कळत- नकळतपणे चढला आणि तोही किंग कोब्रा असेल तर काळजाचा ठोका चुकला नाही तर नवलच! कारण कोब्रा हा सर्वात विषारी सापांपैकी एक म्हणून ओळखला जातो. याचा एक दंश मानवासह अनेक प्राणिमात्राच्या मृत्यूस कारणीभूत ठरतो. असाच एक भला मोठा किंग कोब्रा झाडाखाली बसलेल्या एका तरुणाच्या शर्टात शिरल्याचा व्हिडीओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल झाला आहे. हा व्हिडीओ पाहणाऱ्यांची तर भीतीने गाळण उडालीच, पण ज्या युवकाला या जीवघेण्या प्रसंगाला सामोरे जावे लागले त्याची अवस्था काय झाली असेल, याची कल्पना करूनच आपल्यालाही…
जळगाव : प्रतिनिधी जळगाव जिल्ह्यातून दोन वर्षांसाठी हद्दपार केलेले असतानादेखील संदीप भास्कर ढोके (२४, रा. गेंदालाल मिल) हा सुरा घेऊन फिरताना आढळून आल्याने त्याच्याविरुद्ध शहर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. मिळालेल्या माहितीनुसार, मार्च महिन्यात त्याला हद्दपार केले होते, मात्र साडेसहा महिने होत नाही तोच हा तरुण शहरात फिरताना आढळून आला. वेगवेगळे गुन्हे दाखल असलेल्या संदीप ढोके याला पोलिस अधीक्षकांनी दि. ३ मार्च २०२३ रोजी जिल्ह्यातून दोन वर्षांसाठी हद्दपार करण्याचे आदेश दिले होते. मात्र हा तरुण गेंदालाल मिल भागात असल्याची माहिती शहर पोलिसांना मिळाली. त्यावेळी पोलिस तेथे पोहोचले असता तो सरा घेऊन फिरताना आढळला याप्रकरणी पो. कॉ. रतनहरी गिते यांनी…
जळगाव : प्रतिनिधी घरात कोणीच नसताना वैशाली विजय सोनार (वय २८) या विवाहितेने गळफास घेवून आत्महत्या केली. घटना सोमवारी संध्याकाळी उघडकीस आली. आत्महत्येचे कारण समजू शकले नाही. याप्रकरणी शनिपेठ पोलिस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. मिळालेल्या माहितीनुसार, जुना खेडी रोड परिसरातील श्रीराम कॉलनीत विजय सोनार हे त्यांच्या चहा विक्रीच्या दुकानावर असताना घरी एकट्याच असलेल्या त्यांची पत्नी वैशाली सोनार यांनी गळफास घेवून आपली जीवनयात्रा संपविली. त्यांचे पती सायंकाळी साडेसात वाजेच्या सुमारास घरी आले व घराचा दरवाजा उघडताच त्यांना पत्नी गळफास घेतलेल्या अवस्थेत दिसून आली. परिसरातील नागरिकांनी घटनास्थळी पोहचले. घटनेची माहिती मिळताच शनिपेठ पोलिस ठाण्याचे पोलिस निरीक्षक रंगनाथ…

