Author: editor desk

मुंबई : वृत्तसंस्था राज्यात काल गणरायाचे विसर्जन उत्साहपूर्ण वातावरणात करण्यात आले. गणरायाच्या विसर्जनानंतर आज पहाटेच्या सुमारास एक धक्कादायक घटना घडली असून पुणे-बंगळूर राष्ट्रीय महामार्गावर कराड तालुक्यातील वनवासमाची-वहागाव हद्दीत सर्व्हिस रस्त्यावर नाल्यामध्ये अर्धवट जळालेला पुरुषाचा मृतदेह आढळून आला आहे. या घटनेमुळे एकच खळबळ उडाली असून तळबीड पोलीस घटनास्थळी दाखल झाले आहेत. जळालेल्या अवस्थतेत मृतदेह आढळून आल्यामुळे घातपाताची शक्यता वर्तवली जात आहे. याबाबत घटनास्थळावरून मिळालेली अधिक माहिती अशी की, कराड तालुक्यातील तळबीड पोलीस ठाण्याच्या हद्दीत वनवासमाची-वहागाव, ता. कराड या गावच्या हद्दीत आज पहाटेच्या सुमारास काही ग्रामस्थांना अर्धवट जळालेल्या अवस्थेतील मृतदेह आढळून आला. त्यांनी याबाबतची माहिती तात्काळ तळबीड पोलिसांना दिली. दरम्यान या…

Read More

नवी दिल्ली : वृत्तसंस्था देशातील राजकारण गेल्या काही वर्षापासून गुन्हेगारीच्या विळख्यात अडकत असल्याचे चित्र नेहमीच दिसून येत असते. अशीच एक धक्कादायक घटना पश्चिम बंगालमध्ये भाजप कार्यकर्त्याच्या आईची हत्या झाल्याची खळबळजनक घटना समोर आली आहे. सत्ताधारी तृणमूल काँग्रेसच्या समर्थकांनी ही हत्या केल्याचा आरोप आहे. उत्तर 24 परगणा जिल्ह्यातील बनगाव भागात 27 सप्टेंबर रोजी ही घटना घडली आहे. कानन रॉय (६२) असे मृत महिलेचे नाव आहे. भाजपचे स्थानिक नेते जयंत रॉय यांच्या त्या आई आहेत. कुटुंबीयांनी हत्येचा आरोप केल्यानंतर पोलिसांनी स्थानिक टीएमसी नेते समीर मलिकला अटक केली आहे.समीर मलिक अनेकदा कानन रॉय यांच्या कुटुंबियांशी गैरवर्तन करत असे, असा स्थानिकांचा आरोप आहे.…

Read More

नांदेड : वृत्तसंस्था राज्यातील प्रत्येक जिल्ह्यात गणेश विसर्जनाचा उत्साह सुरु असतांना नांदेड जिल्ह्यातून एक धक्कादायक घटना घडली आहे. नांदेड जिल्ह्यातील बिलोली तालुक्यातील बामणी गावात एका पाझर तलावात बुडून ३ शाळकरी मुलांचा मृत्यू झाला आहे. तर गोदावरी नदीपात्रातील पाण्यात बुडून एका तरुणाचा मृत्यू झाल्याची घटना गुरुवारी २८ सप्टेंबर घडली आहे देवानंद पिराजी गायकवाड (वय १५ वर्ष), बालाजी पिराजी गायकवाड (वय १२ वर्ष) व वैभव पंढरी दुधारे (वय १५ वर्ष, सर्व रा. बामणी) असे मृतांची नावे आहेत. मृतांमध्ये दोन सख्ख्या भावांचा समावेश आहे. तसेच नांदेड शहरात गणपती बाप्पाचे विसर्जन करण्यासाठी गेलेल्या एका तरुणाचा गोदावरी नदीत बुडून मृत्यू झाल्याची माहिती आहे. परंतु…

Read More

जळगाव : प्रतिनिधी  जळगाव शहरातील गणेश विसर्जन मिरवणूकीच्या रांगेत नंबर लावण्याच्या किरकोळ वादातून झालेल्या मारहाणी प्रकरणी जळगाव शहर पोलिस स्टेशनला सात जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या घटनेत हुज्जतबाजीसह आपापसात लाथाबुक्क्यांनी मारहाणीचा प्रकार घडला. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, जळगाव शहरातील कोर्ट चौक परिसरापासून गणपती विसर्जन मिरवणूकीला सुरुवात होण्याच्या वेळी दोन गटात हा वाद झाला. आयुष गांधी, कैलास नारायण सोनवणे, कल्पेश कैलस सोनवणे, गौरव साखला, गोविंद पंडीत, अजय गांधी, सागर भिमराव सोनवणे (पहेलवान) अशा सात जणांविरुद्ध रितसर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. महिला सहायक फौजदार संगिता खांडरे या गुन्ह्याचा तपास करतआहेत.

Read More

नाशिक : वृत्तसंस्था नाशिक जिल्ह्यातील अनेक तालुक्यात बाप्पांची विसर्जन मिरवणूक सुरु असतांना एक भीषण अपघात घडल्याची बातमी समोर आली आहे. सिन्नर-घोटी महामार्गावर सिन्नर तालुक्यातील पांढुर्ली शिवारात कारच्या अपघातात एकाचा मृत्यू तर दोघे गंभीर जखमी झाल्याची घटना घडली आहे. मिळालेल्या माहितीनुसार, सिन्नर तालुक्यातील गावठा येथील पवन सुनिल भाटजिरे असे मृत तरुणाचे नाव आहे. पवन व त्याचे दोघे मित्र सोपान विष्णू लोंढे व अक्षय राजेंद्र लोंढे हे आपली कार (एम. एच. ४८ बी.एच. ७१९२) ने सिन्नरहून घोटीकडे जात होते. यावेळी पांढुर्ली शिवारातील गीता पेट्रोलपंपाजवळ कार आली असता समोरून येणारी वॅगनार (एम. एच. ०४ एल. क्यू. २४८५) ने ओव्हरटेक करताना त्यांच्या कारला…

Read More

नवी दिल्ली : वृत्तसंस्था देशभरातील अनेक राज्यातील गुन्हेगारीच्या घटना घडत असताना एक धक्कादायक घटना उत्तर प्रदेशातील आग्रा जिल्ह्यातून समोर आली आहे. शेजारी राहणाऱ्या एका व्यक्तीने 6 वर्षांच्या मुलीची हत्या केली आहे. हत्येचं कारण तर तितकच संतापजनक आहे. पोलिसांना आरोपीला अटक केली आहे. आरोपीने चिमुकलीला पान मसाला आणण्यासाठी दुकानात पाठवलं होतं. मात्र मुलीने पान मसाला आणण्याऐवजी चिप्स विकत घेतले. याचा आरोपीला राग आल्याने त्याने मुलीची हत्या केली. मुलीची हत्या केल्यानंतर आरोपी मृतदेहाची विल्हेवाट लावण्याच्या तयारीत होता. मात्र त्याआधीच पोलिसांनी मृतदेह ताब्यात घेतला. मृतदेह पोस्टमॉर्टमसाठी पाठवण्यात आला आहे. दरम्यान, आरोपीच्या दोन भावांना देखील चौकशीसाठी ताब्यात घेण्यात आले आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार,…

Read More

उज्जैन : वृत्तसंस्था एका १२ वर्षीय मुलीवर बलात्कार झाल्याची घटना समोर आली आहे. सोमवारी सायंकाळी दांडी आश्रमाजवळ ही मुलगी अर्धवट कपड्यांमध्ये आणि रक्तबंबाळ अवस्थेत आढळून आली. तिचे कपडे रक्ताने माखले होते. ती सुमारे संवरखेडी सिंहस्थ बायपासच्या वसाहतींमध्ये अडीच तास भटकत राहिली. सीसीटीव्ही फुटेजमध्ये ती ८ किलोमीटर चालल्याने दिसत आहे. हि घटना उज्जैनमध्ये घडली आहे. आईसोबतही चुकीचे कृत्य झाले असा दावा ती करते; पण तिची आई कुठे आहे आणि ती उज्जैनला कशी पोहोचली, याबाबत तिला काही सांगता येत नाही. अतिरक्तस्रावामुळे मुलीला इंदूरच्या रुग्णालयात दाखल करावे लागले. डॉक्टरांनी बलात्कार झाल्याला दुजोरा दिला आहे. तिच्या बोलण्यावरून मुलगी प्रयागराजची रहिवासी असावी, असा…

Read More

चंद्रपूर : वृत्तसंस्था राज्यातील अनेक महामार्गावरून अपघाताची मालिका सुरु असतांना चंद्रपूर जिल्ह्यामधून भीषण अपघाताची घटना समोर आली आहे. भरधाव ट्रक एका ऑटोरिक्षावर उलटल्यामुळे हा भीषण अपघात झाला आहे. या भाषण अपघातामध्ये रिक्षाचालकासह चार जणांचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे. तर चार जण जखमी आहेत. जखमींना उपचारांसाठी शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे. हा काल (बुधवार) अपघात रात्री साडेसात वाजण्याच्या सुमारास घडला आहे. चंद्रपूर शहरातील बल्लारपूर बायपास मार्गावर रात्री साडेसात वाजण्याच्या सुमारास हा अपघात झाला. भरधाव ट्रक ऑटोरिक्षावर उलटली त्यामुळे हा भीषण अपघात झाला आहे.तर यामध्ये चार जणांचा मृत्यू झाला आहे. तर चार जण जखमी झाले आहेत. मृतांमध्ये दोन महिला आणि…

Read More

अहमदनगर : वृत्तसंस्था अहमदनगर जिल्ह्यातील संगमनेर येथे पंधरा वर्षीय मुलीचा खून करून मृतदेह नाशिक-पुणे महामार्गावरील जुन्या चंदनापुरी घाटात फेकून दिल्याचे रविवारी समोर आले होते. याप्रकरणी एकाला पोलिसांनी अटक केली आहे. १९ सप्टेंबरला त्याने दारूच्या नशेत मुलीचा खून केला होता, तसेच त्याने त्याच्या आईचाही खून केल्याचे सांगितले, अशी माहिती उपविभागीय पोलिस अधिकारी सोमनाथ वाघचौरे यांनी दिली. पोलिसांनी खून प्रकरणात तिघांना संशयित म्हणून ताब्यात घेतले होते. त्यांच्या चौकशीत तुषार विठ्ठल वाळुंज याचे नाव समोर आले. त्याला घरातून ताब्यात घेतले. तपासात त्याने खून केल्याची कबुली दिली. तो मुलीला घेऊन फिरण्यासाठी डोंगर परिसरात गेला होता. तेथेच त्याने जुन्या चंदनापुरी घाटात दारूच्या नशेत तिचा…

Read More

जळगाव : प्रतिनिधी  विजेची वायर कट केल्याचा जाब विचारल्याच्या कारणावरून महिलेसह दीराला मारहाण करुन धारदार शस्त्राने वार करुन गंभीर जखमी केले. ही घटना शहरातील समता नगरात मंगळवारी रात्री साडेआठ वाजेच्या सुमारास घडली. याप्रकरणी रामानंद नगर पोलीस ठाण्यात एकावर गुन्हा दाखल करण्यात आला. मिळालेल्या माहितीनुसार, शहरातील समता नगरात राणी सलीम शेख (वय ३०) या आपल्या परिवारासह वास्तव्याला आहे. मंगळवारी दि. २६ सप्टेंबर रोजी रात्री ८.३० वाजेच्या सुमारास त्याच्या घराची वीजेची वायर कट केल्याचे विद्यूत प्रवाह खंडीत झाला होत. त्यावेळी राणी शेख यांचा दीर तन्वीर शेख हा घराबाहेर आला. त्यावेळी संशयित अनवर शेखइब्राहिम शेख याच्यासह इतर दोन ते तीन जण बसलेले…

Read More