नाशिक : वृत्तसंस्था जमीन खरेदी-विक्रीत गुंतवणूक करणे एका चांगलेच महागात पडले आहे. दाम्पत्याने एकास तब्बल ९० लाख रुपयांना गंडविल्याचा प्रकार समोर आला असून, खरेदी-विक्रीचा व्यवहार पूर्ण न झाल्याने गुंतवणूकदाराने पोलिसांत धाव घेतली आहे. याप्रकरणी गंगापूर पोलीस ठाण्यात फसवणुकीसह विविध कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मिळालेल्या माहितीनुसार, पद्माकर घुमरे व सुनीता घुमरे – भंडारे असे या व्यवहारात गंडा घालणाऱ्या संशयित दाम्पत्याचे नाव आहे. जेम्स प्रसाद वरसाला ( वय३६, रा. आनंदनगर, नाशिकरोड) यांनी याप्रकरणी तक्रार दाखल केली आहे. तक्रारदार वरसाला व घुमरे दाम्पत्य एकमेकांचे परिचीत असून, त्यांच्यात सन २०१४ मध्ये हा व्यवहार झाला होता. घुमरे दाम्पत्याने वरसाला यांचा विश्वास संपादन…
Author: editor desk
जळगाव : प्रतिनिधी उधार दिलेले पैसे परत मागितल्याचा राग आल्याने रुकेश सुनील इंगळे (वय ३०, रा. तरसोद ) या तरुणाला दोन जणांनी जबर मारहाण केली. या मारहाणीत एकाने तरुणाच्या डोक्यात लोखंडी रॉड मारुन गंभीर जखमी केले. याप्रकरणी दोघांविरुद्ध नशिराबाद पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मिळालेल्या माहितीनुसार, जळगाव तालुक्यातील तरसोद येथे रुकेश इंगळे हे वास्तव्यास असू त्यांनी गावातीलच दोन जणांना पैसे उधार दिलेले होते. १२ सप्टेंबर रोजी ते दोघे रुकेश इंगळे यांना दिसले. त्यावेळी इंगळे यांनी त्यांना उधार दिलेले पैसे परत मागितले. त्याचा त्यांना राग आल्याने दमदाटी करीत शिवीगाळ केली. शिवीगाळ का करतात, असे त्यांना विचारले असता एका…
भुसावळ : प्रतिनिधी शहरातील आझाद नगरातील नाजीश शेख नासीर (वय ३१) या जीम ट्रेनरची उधारीचे पैसे मागितल्याच्या वादातून दोघांनी हत्या केल्याची घटना रविवारी सकाळच्या सुमारास केशव नगरात घडली होती. याप्रकरणी तिघा संशयितांना पोलिसांनी अटक केली. असून त्यांना अतिरिक्त सत्र न्यायालयाने तीन दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे. भुसावळ शहरातील खडका रोड परीसरातील आझाद नगरात नाजीश शेख नासीर या तरुणाने नात्याने मामी असलेल्या सुलतानाबी मुबारक खान (स्वामी विवेकानंद शाळेजवळ, केशव नगर, भुसावळ) यांना मुलीच्या लग्नासाठी साडेतीन लाख रुपये दिले होते. पैसे परत मागितल्यानंतर सुलतानाबी यांचा नाजीशसोबत शनिवारी रात्री ११ वाजता जोरदार वाद झाला होता. या वादात महिलेच्या भावासह भाच्याने उडी घेत…
जळगाव : प्रतिनिधी जळगाव शहरापासून नजीक असलेल्या भादली बुद्रुक येथे राहत्या घरात विष प्राशन केलेल्या चुडामण रमेश नारखेडे (वय ३९) यांचा उपचार सुरू असताना मृत्यू झाला. या प्रकरणी नशिराबाद पोलिस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. जळगाव तालुक्यातील भादली बुद्रुक येथे चुडामण नारखेडे हे वास्तव्यास असून त्यांनी दि. २१ सप्टेंबर रोजी राहत्या घरात विष प्राशन केले होते. त्यानंतर त्यांना शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. उपचार सुरू असताना त्यांचा दि. २८ सप्टेंबर रोजी मृत्यू झाला. या प्रकरणी नशिराबाद पोलिस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. पुढील तपास पोउनि संजय जाधव करीत आहेत.
भुसावळ : प्रतिनिधी सोयाबीन रिफाईंड ऑईलचा टँकर नागपूरकडे निघाल्यानंतर फेकरी टोल नाक्याजवळ १६ जून रोजी दुपारी ४ वाजेच्या सुमारास चारचाकी वाहन चालकाला वाचवण्याच्या प्रयत्न त उलटला होता. या अपघातात त्यावेळी वाहतूक संपूर्ण ऑईल वाहून गेले. तर नागरिकांनी वाहनाच्या टँकरमधील ऑईल लांबवल्याने सुमारे 39 लाखांचे नुकसान झाले होते. याप्रकरणी तब्बल दोन महिन्यानंतर भुसावळ तालुका पोलिसात अज्ञातांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. गुजरातच्या हजरा येथून नागपूरकडे टँकर (जीजे १२, बीएक्स – ९३२५ ) मधून सोयाबिन रिफाईंड ऑईल घेवून चालक दुर्गाराम गोगाराम जाट ( वय ४७, खडीन, रामनगर, बाडमेर, राजस्थान) हा नागपूरच्या दिशेने निघाला होता. मात्र जुन्या फेकरी टोल नाक्याजवळ चारचाकी वाहन समोर…
जळगाव : प्रतिनिधी जळगाव जिल्ह्यातील सहकारमहर्षी स्व.प्रल्हादभाऊ यांचा पुण्यतिथीनिमित्त आज जळगाव जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या आवारात असलेल्या स्व.प्रल्हादभाऊंचा पुतळ्याला पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले. जळगांव जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या आवारात असलेल्या सहकारमहर्षी स्व.प्रल्हादभाऊ पाटील यांच्या पुण्यतिथीनिमित्त स्व.प्रल्हादभाऊंचा पुतळ्याला जळगांव जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे उपाध्यक्ष अमोलदादा पाटील यांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करून वंदन करत अभिवादन करण्यात आले. याप्रसंगी जिल्हा बँकेचे कार्यकारी संचालक जितेंद्रजी देशमुख, एरंडोल शिवसेनेचे तालुकाप्रमुख बबलु पाटील यांचेसह अधिकारी, कर्मचारी उपस्थित होते.
नवी दिल्ली : वृत्तसंस्था मंगळवार ३ ऑक्टोंबर रोजी देशाची राजधानी असलेल्या दिल्लीत भूकंपाच्या धक्क्याने हादरुन गेली. दिल्ली-एनसीआरमध्ये भूकंपाचे जोरदार धक्के जाणवले. नॅशनल सेंटर फॉर सिस्मॉलॉजीनुसार, भूकंपाची तीव्रता 6.2 एवढी होती. ज्याचे केंद्र नेपाळमध्ये होते. मिळालेल्या माहितीनुसार, राजधानी दिल्ली, नोएडा आणि आसपासच्या परिसरात आज दुपारी भूकंपाचे जोरदार धक्के जाणवले. लखनौ, उत्तराखंड आणि नेपाळमध्येही भूकंपाचे धक्के जाणवले. राष्ट्रीय भूकंप विज्ञान केंद्राकडून सांगण्यात आले की, दुपारी २.५१ वाजता झालेल्या भूकंपाची तीव्रता रिश्टर स्केलवर ६.२ एवढी होती. या भूकंपाचा केंद्रबिंदू नेपाळमध्ये असल्याचे सांगण्यात येत आहे. या भुकंपात अद्याप कोणतीही जीवित किंवा वित्तहानी झाल्याचे वृत्त नाही. डेहराडून, उत्तराखंडमध्येही भूकंपाचे धक्के जाणवले. दरम्यान, या प्रकाराने…
बुलढाणा : वृत्तसंस्था बुलढाण्यासह परिसरात रविवारपासून गजानन महाराजांच्या वेशात आलेल्या व्यक्तीची सोशल मीडियावर जोरदार चर्चा रंगली आहे. बुलढाण्यातील अशोक सातव यांच्या घरी ती व्यक्ती अचानक गजानन महाराजांच्या वेशात येऊन बसला होता. या बाबाला पाहण्यासाठी आणि दर्शन घेण्यासाठी लोकांनी मोठी गर्दी केली होती. आता हा बाबा नेमका कोण आहे? त्याबाबत माहिती समोर आलीये. मिळालेल्या माहितीनुसार, या बाबांचे नाव शेषेराव बिराजदार असून बाबाने शासनाच्या निराधार योजनेचा लाभ घेतलाय. या बाबाजवळ ओळखपत्र सापडलं असून तो लातूरचा असल्याचं समजलंय. न्यूज स्टेट या वृत्तवाहिनीने या बाबाची मुलाखत घेतली आहे. मुलाखतीत बाबाने बऱ्याच गोष्टींचा खुलासा केलाय. “शेगावातल्या आनंदसागरमध्ये माझी गादी आहे. येथे मी लोकांची सेवा…
हिंगोली : वृत्तसंस्था राज्यातील शासकीय शालेय विध्यार्थींना शाळेत मध्यान्ह भोजन दिले जाते. त्यानुसार आता बांधकाम मजुरांना देखील माध्यान्ह भोजन देण्याची योजना शासनाने सुरु केली आहे. परंतु या माध्यान्ह भोजनाबाबत तक्रार येणे सुरूच आहे. निकृष्ट दर्जाचे हे भोजन असल्याचे अनेकवेळा समोर आले आहे. यात आता भोजनात किडे आढळून आल्याचा प्रकार हिंगोलीत समोर आला आहे. हि घटना हिंगोलीत घडली आहे. मिळालेल्या माहितीनुसार, राज्य शासनाच्या कामगार विभागा मार्फत बांधकाम मजुरांना देण्यात येणाऱ्या माध्यान्ह भोजनात विषारी किडे निघाल्याचा धक्कादायक प्रकार हिंगोलीत उघडकीस आला आहे. हिंगोलीच्या सेनगाव तालुक्यातील जवळा पळशी गावात तुरीच्या डाळीमध्ये नाकतोडा नावाचा किडा आढळला असल्याचा ग्रामस्थांनी आरोप केला आहे. सदर प्रकारानंतर या…
सातारा : वृत्तसंस्था राज्यात गेल्या काही महिन्याआधीच राष्ट्रवादीत मोठी फुट पडल्यानंतर अजून देखील अनेक नेते अजित पवारांच्या गटात जाणार असल्याची चर्चा सुरु असतांना आता शरद पवारांच्या गटातील एका खासदाराची जोरदार चर्चा सुरु होती. सोमवारी अमोल कोल्हे एका कार्यक्रमानिमित्त साताऱ्यात आले होते. यावेळी पारितोषिक वितरण समारंभादरम्यान एक चिमुकला त्यांच्याजवळ आला. पारितोषिक स्वीकारल्यानंतर या चिमुकल्याने खासदार अमोल कोल्हे यांच्या कानात “पवार साहेबांची साथ सोडू नका”. असं सांगितलं. हर्षवर्धन पाटील असं अमोल कोल्हे यांना साद घालणाऱ्या चिमुकल्याचं नाव आहे. हर्षवर्धनच्या तोंडातून हे उद्गार ऐकल्यानंतर खासदार अमोल कोल्हे थक्क झाले होते. त्यांनी या चिमुकल्याचं तोंडभरून कौतुक केलं. या कार्यक्रमातील भाषणात हर्षवर्धनने…

