पुणे : वृत्तसंस्था पुणे शहरात आगीच्या घटना गेल्या काही महिन्यांपासून सातत्याने घडत आहे. पुणे शहरातील वाघोलीत येथील गोडाऊनला जून महिन्यात मोठी आग लागली होती. आगीत ४ सिलेंडर फुटले होते. या भीषण आगीत तीन जणांचा दुर्देवी मृत्यू झाल्याची घटना घडली होती. त्यानंतर काहीच दिवसांना पुणे शहरातील टिंबर मार्केटमध्येही आग लागली होती. त्या आगीत मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले. जुलै महिन्यात कोंढवा बुद्रुकमधील येवलेवाडी येथील गोडाऊनला भीषण आग लागली होती. आता मंगळवारी सकाळी सिंहगड रस्त्यावर असणाऱ्या एका दुचाकीच्या शोरुमला आग लागली. या आगीत अनेक वाहनांचे नुकसान झाले आहे. आग विझवण्यासाठी अग्नीशमन दलाचे पाच बंब घटनास्थळी दाखल झाले. त्यानंतर आगीवर नियंत्रण मिळवण्यात यश…
Author: editor desk
मुंबई : वृत्तसंस्था जगभरातील अनेक व्हिडीओ सोशल मिडीयावर धुमाकूळ घालत असतांना राज्यातील एका व्हिडीओने सोशल मिडीयावर मोठी खळबळ उडविली आहे. मुंबईतल्या दादर येथील महात्मा गांधी तरण तलाव परिसरातील जलतरण तलावात मंगळवारी ३ ऑक्टोबर मगरीचे पिल्लू आढळून आले. या संपूर्ण प्रकारामुळे एकच खळबळ उडाली. वनविभागाने तातडीने घटनास्थळी धाव घेत मगरीच्या पिल्लाला रेस्कू करत ताब्यात घेतलं. दरम्यान, हे पिल्लू नेमके कुठून आले, याचे सीसीटीव्ही फुटेज समोर आले आहे. शेजारीच असलेल्या प्राणीसंग्रहालयातून हे मगरीचं पिल्लू जलतरण तलावात आल्याचं सीसीटीव्ही फुटेजमधून दिसून येत आहे. या प्राणीसंग्रालयात प्राण्यांच्या तस्करीचे रॅकेट सुरू आहे. हे रॅकेट उध्वस्त केलं पाहिजे, जे दोषी आहेत त्यांच्यावर कारवाई केली पाहिजे,…
नवी दिल्ली : वृत्तसंस्था उत्तर प्रदेशच्या ज्योती मौर्य प्रकरणाशी साधर्म्य असलेली घटना झारखंडच्या गोड्डा जिल्ह्यात घडली. पिझ्झा डिलिव्हरी बॉय टिंकू यादव याने पत्नी प्रियाला नर्सिंगचा कोर्स करता यावा, यासाठी अडीच लाखांचे कर्ज काढले. परंतु नर्स होताच पत्नी प्रियकरासह पळून गेली आणि दिल्लीत जाऊन लग्नही केले. लग्नाचे फोटो पत्नीने सोशल मीडियावर टाकल्यानंतर टिंकूला याबाबत कळाले. टिंकूने आता पत्नी व तिच्या प्रियकराविरुद्ध पोलिसांत तक्रार दाखल केली आहे. २०२० मध्ये टिंकू आणि प्रिया कुमारीचे लग्न झाले. लग्नानंतर पत्नीने पुढे शिक्षणाची इच्छा व्यक्त केली आणि नर्सिंग कोर्स करायचा असल्याचे सांगितले. ती अभ्यासूही होती, त्यामुळे टिंकूने आर्थिक परिस्थिती नसतानाही २.५ लाखांचे कर्ज काढून पत्नीला…
जळगाव : प्रतिनिधी धरणगाव येथून गोंदिया येथे काळ्या बाजारात विक्रीसाठी घेवून जात असलेला ८ लाख ३० हजार रुपये किंमतीचा २९ हजार किलो रेशनचा तांदूळाचा ट्रक मंगळवारी नशिराबाद पोलिसांनी सापळा रचून पकडला. याप्रकरणी नशिराबाद पोलिसांत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मिळालेल्या माहितीनुसार, धरणगावातून गोंदीयाकडे रेशनचा तांदूळ ट्रकमधून काळ्या बाजारात विक्रीसाठी जात असल्याची माहिती भुसावळ विभागाचे पोलिस उपअधीक्षक कृष्णांत पिंगळे यांना मिळाली. त्यानुसार त्यांनी लागलीच पथक तयार करुन कारवाई करण्याच्या सूचना दिल्या. नशिराबाद पोलीस ठाण्याचे सहायक निरीक्षक रामकृष्ण मोताळे यांच्या मार्गदर्शनाखाली भुसावळ पोलिस उपअधीक्षक कार्यालयाचे पोहेकॉ. सूरज पाटील यांनी नशिराबादपासून (एमएच १८, बीझेड १०३९) क्रमांकाच्या ट्रकचा पाठलाग केला. काही अंतरापर्यंत पाठलाग…
जळगाव : प्रतिनिधी मला अभ्यासाचा लोड झेपत नाही, त्यामुळे मरायला जातो आहे अशी सुसाईड नोट लिहून तन्मय गजेंद्र पाटील (वय- १४, रा. गणेश कॉलनी) या दहावीच्या विद्यार्थ्याने गळफास घेवून आत्महत्या केली. ही घटना मंगळवारी रात्री ११.१५ वाजेच्या सुमारास उघडकीस आली. पोलिसांनी सुसाईट नोट जप्त केली असून याप्रकरणी जिल्हापेठ पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. शहरातील ए. टी. झांबरे विद्यालयात दहावीच्या वर्गात शिक्षण घेत असेला तन्मय हा गणेश कॉलनीत वडील अॅड. गजेंद्र पाटील, आई व मोठ्या भावासह वास्तव्यास होता. मंगळवारी रात्री त्याने कुटुंबासोबत जेवण केले आणि त्यानंतर सर्व जण झोपले. त्यानंतर रात्री सव्वा अकरा वाजेच्या सुमारास कुटुंबिय गाढ…
सांगली : वृत्तसंस्था राज्यातील अनेक शहरात वाढती गुन्हेगारी आज देखील तशीच सुरु आहे. एक धक्कादायक घटना सांगली जिल्ह्यातील कडेगाव तालुक्यातील वांगी येथून समोर आली आहे. घराला करंट देऊन संपूर्ण कुटुंब जीवे मारण्याचा प्रयत्न केला गेल्याची तक्रार अशोकराव शंकरराव निकम यांनी चिंचणी वांगी पोलीस ठाण्यात केली. निकम यांनी अज्ञातांविरोधात ही तक्रार दिली आहे. मिळालेल्या माहितीनुसार, स्वातंत्र्यशाहिर (कै.) शंकरराव निकम यांचे मोठे सुपूत्र अशोकराव निकम वांगीच्या उत्तरेस शिवणी रोडलगत वास्तव्यास आहेत. मध्यरात्री बारा ते दीडच्या सुमारास निकम कुटूंबीय झोपी गेल्यानंतर अज्ञातांनी जवळच असलेल्या उच्च दाबाच्या ट्रान्सफर्मरमधून केबल जोडून घराच्या मागच्या व पुढच्या दोन्ही दरवाजांना करंट देण्याचा प्रयत्न केला असे त्यांनी तक्रारीत…
जळगाव : प्रतिनिधी जामनेर तालुक्यातील १९ वर्षीय तरुणीला माझ्या सोबत पळून जावून लग्न कर जर तु आली नाही तर तुझ्या भावाला मारून टाकेल अशी धमकी व ‘लिव्ह अँण्ड रिलेशनशिप’च्या नोटरीवर तरुणीची जबरदस्ती सही घेत अत्याचार केल्या प्रकरणी एका तरूणाविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. हि घटना जामनेर तालुक्यातील एका गावात घडल्याने एकच खळबळ उडाली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, जामनेर तालुक्यातील एका गावात १९ वर्षीय तरुणी आपल्या परिवारासोबत रहिवासास असून तरुणीला एकाने दि.१ सप्टेंबर ते ३ सप्टेंबर तसेच दि. ६ सप्टेंबरपासून १५ दिवस वेळोवेळी जळगाव येथील वकिलाच्या घरी आणि गावातील त्याच्या घरी तू जर माझ्या सोबत पळून जावुन लग्न…
मुंबई : वृत्तसंस्था गेल्या काही दिवसांपासून अजित पवार हे नाराज असल्याचं दिसत होतं. आज शिंदे-फडणवीस सरकारनं त्यांची ही नाराजी दूर केलीय.परंतु त्याचवेळी अजित पवार यांचे दबाव तंत्र यशस्वी झाल्याची चर्चा राजकीय वर्तुळात सुरू झालीय. पालकमंत्रीपद आणि रडखडलेल्या मंत्रिमंडळ विस्तारावरून राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार महायुती सरकारवर नाराज होते. राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीला न जाणं गणेशोत्सवात वर्षा बंगल्यावर न जाणं या गोष्टींतून अजित पवारांची नाराजी सहज दिसून येत होती. अजित पवारचं पुण्याचे दादा असल्याचं पुन्हा एकदा सिद्ध झालंय. चंद्रकात पाटील यांची उचलबांगडी करत अजित पवार यांना पुणे जिल्ह्याचं पालकमंत्री बनवण्यात आलंय. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी राज्यातील १२ जिल्ह्यांच्या पालकमंत्र्यांची सुधारीत यादी आज…
सिक्किम : वृत्तसंस्था देशातील काही राज्यात सुरु असलेल्या पावसामुळे सिक्किमध्ये मंगळवारी रात्री ढगफुटीसदृश्य पाऊस झाला. त्यामुळे तीस्ता नदीला महापूर आला असून या महापुरात भारतीय लष्कराचे 23 जवान वाहून गेल्याची भीती व्यक्त केली जात आहे. प्रशासनाकडून या जवानांचा शोध घेतला जात आहे. या महापुराचा थरारक व्हिडीओ देखील समोर आला आहे. एएनआय या वृत्तसंस्थेनं याबाबतचं वृत्त दिलं आहे. एएनआयच्या वृत्तानुसार, गेल्या दोन ते तीन दिवसांपासून सिक्किममध्ये मुसळधार पाऊस सुरू आहे. मंगळवारी (३ ऑक्टोबर) रात्री या पावसाने अचानक जोर पकडला. परिस्थिती इतकी गंभीर झाली, की अचानक ढगफुटी झाली. त्यामुळे तीस्ता नदीला महापूर आला. या महापुरात फटका लष्कराच्या आस्थापनांना बसला. लष्कराची अनेक वाहने…
जालना : वृत्तसंस्था राज्यात गेल्या काही महिन्यापासून मराठा आरक्षणासाठी तीव्र आंदोलन सुरु असतांना आरक्षण मिळावे यासाठी आज एका व्यक्तीने थेट मोबाईट टॉवरवर चढून शोले स्टाईल आंदोलन केलं आहे. गेल्या तासाभरापासून ही व्यक्ती या टॉवरवर आंदोलन करत आहेत. यामुळे गावात एकच खळबळ उडालीये. मराठा आरक्षणाच्या मागणीचे लोन आता गावागावात पसरायला सुरुवात झाली आहे. मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी अंतरवाली सराटी गावात आमरण उपोषण करणाऱ्या मनोज पाटील जरांगे यांना पाठिंबा देण्यासाठी वेगवेगळ्या जिल्ह्यांतून आंदोलन सुरू आहे. मराठ्यांना आरक्षण मिळावे या मागणीसाठी भोकरदन तालुक्यातील गोकुळ गावातील 50 वर्षीय तुळशीराम श्रीपत शेळके यांनी आंदोलनाला सुरूवात केलीये. सकाळी नऊ वाजल्यापासून गावातील मोबाईल टावरवर चढून बसले आहेत.…

