भुसावळ : प्रतिनिधी वरणगाव फॅक्टरी परिसरातील सुशील नगर सर्कलनजीक मित्रांमध्ये किरकोळ वादातील कुरापतीचा वाद वाढल्याने डोक्यात काठी मारताच मित्राचा मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना घडली आहे. हि घटना रविवारी सकाळी १० वाजेच्या सुमारास घडली. मिळालेल्या माहितीनुसार, वरणगाव शहरातील शिवाजीनगरातील रहिवासी प्रमोद ज्ञानेश्वर महाजन (वय ५८) हे मुक्ताईनगरातील ८१ गाव पाणीपुरवठा विभागात कर्मचारी आहे. हे एका मित्रासोबत वरणगाव फॅक्टरीतील सुशील नगर सर्कलवर आल्यानंतर त्यांची संशयित आरोपी तथा मित्र असलेल्या दीपक सिंग सोबत भेट झाली. यावेळी गप्पांमध्ये जुना वाद उकरून निघाल्यानंतर दोघांमध्ये बाचाबाची झाली व काहींनी मध्यस्थी केल्यानंतर वाद मिटला मात्र पुन्हा कुरापत निघाल्यानंतर संशयित दीपक सिंगने काठीचा फटका प्रमोद महाजन यांच्या डोक्यावर…
Author: editor desk
नवी दिल्ली : वृत्तसंस्था देशभरात अनेक लोकांना मोबाईलवर फोन येवून अभिनंदन करून मोठ मोठे गिफ्ट तुम्हाला मिळाले आहे. असे सांगत असतात अन याच घटनेला अनेक लोक बळी पडून मोठी फसवणूक होत असते. अशीच एक घटना उत्तर प्रदेशातील बांदा येथे सायबर घोटाळेबाजांनी एका पोलिसाची 82 हजार रुपयांची फसवणूक केली आहे. हताश झालेल्या पोलीस कर्मचाऱ्याने याबाबत पोलीस अधीक्षकांकडे तक्रार केली. त्यानंतर कलम 420/406 अन्वये चार जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलीस कर्मचाऱ्याच्या म्हणण्यानुसार, त्या लोकांनी मला फोन केला आणि माझ्या मुलाने एका स्पर्धेत सफारी कार जिंकली आहे असं सांगितलं. पोलीस कर्मचाऱ्याला त्यांनी आधार कार्ड आणि काही बँक तपशील पाठवण्यास सांगितले जेणेकरुन…
मुंबई : वृत्तसंस्था राज्यातील अनेक मोठ मोठ्या शहरात भरधाव चारचाकीत अत्याचारसह विनयभंगाच्या घटनेत वाढ होत आहे. नुकतेच नवी मुंबईहून कल्याणच्या दिशेने कॅबने प्रवास करणाऱ्या एका तरुणीचा कॅब चालकाने प्रवासादरम्यान विनयभंग केल्याची घटना कल्याण पूर्वेत घडली आहे. तरुणीने आरडाओरडा केल्याने कॅब चालक पळून गेला. या घटनेने परिसरात एकच खळबळ उडाली आहे. मिळालेल्या माहितीनुसार, नवी मुंबईहून कल्याणच्या दिशेने कॅबने प्रवास करणाऱ्या एका तरुणीचा कॅब चालकाने प्रवासादरम्यान विनयभंग केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. पीडित तरुणी ही नवी मुंबईमध्ये एका कंपनीमध्ये काम करते. शनिवारी १४, ऑक्टोंबर रात्रीच्या सुमारास काम आटोपून कॅबने घरी येत असताना हा प्रकार घडला. कॅब चालकाच्या कृत्यानंतर पीडित तरुणीने आरडा…
धरणगाव : प्रतिनिधी धरणगाव शहरातील बसस्थानकाजवळ चारचाकी वाहनाने दिलेल्या धडकेत दुचाकीस्वार जखमी झाल्याची घटना घडली आहे. याप्रकरणी शनिवारी १४ ऑक्टोबर रोजी दुपारी २ वाजता धरणगाव पोलीस ठाण्यात एकावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. रा. बांभोरी ता.धरणगाव असे जखमी झालेल्या तरूणाचे नाव आहे. मिळालेल्या माहितीनुसार, धरणगाव तालुक्यातील बांभोरी येथील कैलास निंबा पाटील (वय-३९) हा बुधवारी ११ ऑक्टोबर रोजी रात्री ९ वाजेच्या सुमारास धरणगाव शहरात दुचाकीने जात असतांना धरणगाव शहरातील बसस्थानकाजवळ त्यांच्या दुचाकीला मागून येणाऱ्या एक चारचाकी वाहनाने जोरदार धडक दिली. या धडकेत कैलास पाटील हे गंभीर जखमी झाले. अपघात घडल्यानंतर चारचाकी वरील चालक विक्रम मिश्रालाल ठाकूर हा वाहन घेवून पसार झाला.…
जळगाव : प्रतिनिधी राज्यातील अनेक राजकीय नेते व उद्योजकांवर गेल्या काही वर्षापासून सक्तवसुली संचलनालय अर्थात ईडीची कारवाई सुरु असतांना आज माजी खासदार ईश्वरबाबूजी जैन आणि त्यांचे पुत्र माजी आमदार मनीष जैन यांच्या सुमारे ३१५ कोटी रूपये मूल्य असणार्या ७० मालमत्ता जप्त केल्याने जळगावात एकच खळबळ उडाली आहे. मिळालेल्या माहितीनुसार, जैन कुटुंबाने एसबीआयकडून घेतलेल्या कर्जाच्या संदर्भात अलीकडेच आर.एल. समूहावर ईडीने छापा टाकला होता. यात सखोल चौकशी करण्यात आली असून यानंतर मनीषदादा जैन आणि त्यांच्या कुटुंबियांची ईडीतर्फे चौकशी देखील करण्यात आली होती. यानंतर ईडीने आज मोठी कारवाई केली असून या संदर्भात आपल्या ट्विटर अकाऊंटवरून माहिती दिली आहे. सक्तवसुली संचलनालय अर्थात ईडीने राजमल…
वर्धा : वृत्तसंस्था राज्यात गेल्या काही वर्षापासून गुन्हेगारीच्या घटना सातत्याने वाढ होत आहे. यात अनेक परिवाराचे सुद्धा आयुष्य उधवस्त झाले आहे. अशातच एक धक्कादायक घटना वर्धा येथून समोर आली आहे. पतीने रागाच्याभरात आपल्या पत्नीची निर्घृणपणे हत्या केलीये. पोलीस या प्रकरणी अधिक तापस करत आहेत. मिळालेल्या अधिक माहितीनुसार, पुलगाव पोलीस स्टेशन हद्दीत ही घटना घडलीये. मंगला राजेश राजगत्ता (४५ रा. दखनी फैल, पुलगाव) असं मृत महिलेचं नाव आहे. तर राजेशसिंग राजदत्ता (५५) असं आरोपी पतीच नाव आहे. पोलिसांनी आरोपी पतीला ताब्यात घेतलं असून त्याची कसून चौकशी सुरू आहे. पती आणि पत्नीमध्ये काही दिवसांपासून सतत वाद सुरू होते. काल मजुरीच्या पैशांच्या कारणातून…
छत्रपती संभाजी नगर : वृत्तसंस्था देशभरात अनेक अपघात होत असतांना राज्यात देखील समृद्धी महामार्गावर गेल्या काही वर्षापासून अपघातांची मालिका सुरुच असून आज पुन्हा एकदा याच महामार्गावर छत्रपती संभाजीनगरजवळ भीषण अपघात झाला आहे. या अपघातात १२ जणांचा मृत्यू झाला आहे. तर २३ जण जखमी आहेत. मिळालेल्या माहितीनुसार, समृद्धी महामार्गावर वैजापूर येथील अगरसायगाव परिसरात रात्री 12.30 वाजेच्या सुमारास मिनी बस आणि ट्रकमध्ये हा भीषण अपघात झाला आहे. या अपघातात मिनी बसचा ड्रायव्हर थोडक्यात बचावला आहे. त्याच्या सध्या रुग्णालयात उपचार सुरू आहेत. अपघात नेमका कसा झाला, याचा शोध आता पोलीस घेत आहेत. समृद्धीवरील टोल नाक्याजवळ एक ट्रक अचानक समोर आला, अशी माहिती ड्रायव्हरने…
जळगाव : प्रतिनिधी घरामागे राहणाऱ्या कुटुंबियांनी काहीही कारण नसतांना दुसऱ्या घरावर दगडफेक करीत त्या कुटुंबातील तीन जणांना बेदम मारहाण केली. ही घटना शुक्रवारी रात्री साडेदहा वाजेच्या सुमारास कानळदा रोडवरील गजानन नगरात घडली. याप्रकरणी शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मिळालेल्या माहितीनुसार, शहरातील कानळदा रोड परिसरातील गजानन नगरात अशोक किसन ठोसर (वय – ५७) दोन मुलांसह वास्तव्यास असून ते फुटवेअरचे दुकान चालवून उदरनिर्वाह करतात. शुक्रवारी रात्री साडेदहा वाजता अशोक ठोसर हे जेवण झाल्यानंतर घराच्या बाहेर पाणी पिण्यासाठी आले. त्यावेळी त्यांच्या घराच्या मागे राहणारे अजय इंगळे, विजय इंगळे, रूपाली इंगळे आणि सरूबाई इंगळे हे काहीही कारण नसतांना अशोक ठोसर यांच्या…
भुसावळ : प्रतिनिधी राष्ट्रीय महामार्गावरील साकरी फाट्याजवळ इंडियन ऑइल कंपनी पेट्रोल पंपाच्या मागे एका ४५ वर्षीय अनोळखी व्यक्तीचा मृतदेह शुक्रवारी संध्याकाळी आढळून आला. मृतदेहाची माहिती मिळतात बाजारपेठ पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक बबन आव्हाड आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी घटनास्थळी जाऊन पाहणी केली. मिळालेल्या माहितीनुसार, गेल्या २ ते ३ दिवसापासून हा मृतदेह तेथे पडला असावा, असा पोलिसांचा अंदाज आहे. हा मृतदेह कुजलेल्या स्थितीत असून अंगावर कोठेही जखमा नसल्याचे पोलीस सूत्रांनी सांगितले. शनिवारी मृतदेहाचे विच्छेदन होणार आहे. अनोळखी व्यक्तीच्या मृतदेहाविषयी कुणालाही माहिती असल्यास पोलिसांना माहिती द्यावी, असे आवाहन पोलीस निरीक्षक बबन आव्हाड यांनी केले आहे. या प्रकरणी बाजारपेठ पोलीस ठाण्यात अकस्मात मत्यची नोंद केली…
जळगाव : प्रतिनिधी जळगाव शहरातील आर.एल.ज्वेलर्सचे शोरूम असलेल्या चौथ्या मजल्यावरील एका कॅबीनला दि.१४ रोजी शनिवारी सायंकाळी ६ वाजेच्या सुमारास अचानक आग लागल्याची घटना घडली. या आगीत आगीत त्याठिकाणावरील फाईल्स व कॉम्युटर खाक झाले. महापालिकेच्या अग्निशमन विभागाच्या बंबाने आग आटोक्यात आणली. मिळालेल्या माहितीनुसार, शहरातील रथ चौकात आर. एल. ज्वेलर्सचे शोरुम आहे. शनिवारी सायंकाळी सहा वाजेच्या सुमारास शो-रुममधील चौथ्या मजल्यावर असलेल्या अकाऊंट विभागाजवळील एका रुममधील कॉम्प्युटर ठेवलेल्या ठिकाणी शॉर्ट सर्कीट होवून अचानक आग लागली. या आगीने काही वेळातच रौद्ररुप धारण करीत त्याठिकाणी ठेवलेल्या महत्वाच्या फाईल्स व कॉम्युटर आगीच्या विळख्यात घेतले.यामध्ये ते जळून खाक झाले. या आगीची माहिती जळून मिळतच महापालिकेच्या अग्निशमन विभागाचा…

