अमळनेर : प्रतिनिधी लग्नाचे आमिष दाखवून अल्पवयीन मुलीस घरातून पळवून नेणाऱ्या अविनाश सुरेश धनगर (२२ रा. भावेर ता. शिरपूर) यास १० वर्षाची शिक्षा सुनावण्यात आली आहे. अमळनेर येथील जिल्हा सत्र न्यायाधीश२पी. आर. चौधरी यांनी सोमवारी हा निकाल दिला. मिळालेल्या माहितीनुसार, चोपडा तालुक्यातील एका अल्पवयीन मुलीस अविनाश धनगर याने लग्नाचे आमिष दाखवून पळवून नेले होते. याबाबत तिच्या वडिलांनी दिलेल्या फिर्यादीवरून चोपडा पोलिसात अज्ञात व्यक्तीविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला होता. तपास अधिकारी सहायक पोलिस निरीक्षक अजित साबळे व पोहेकॉ प्रदीप राजपूत यांनी २२ डिसेंबर २०२१ रोजी आरोपी व पीडित मुलीला ओंकारेश्वर (मध्य प्रदेश) येथून ताब्यात घेतले. आरोपीने या अल्पवयीन मुलीस रोहिणी मानपूर,…
Author: editor desk
जळगाव : प्रतिनिधी जळगाव – छत्रपती संभाजी नगर महामार्गावरील रेमंड चौफुली परिसरात भरधाव वेगाने जाणाऱ्या कारने दुचाकीला कट मारल्याने दुचाकीचा अपघात झाला. यामध्ये दोघे दुचाकीस्वार रस्त्यावर पडल्याने त्यांना गंभीर दुखापत झाल्याची घटना रविवारी सायंकाळी ५ वाजेच्या सुमारास घडली. याप्रकरणी एमआयडीसी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मिळालेल्या माहितीनुसार, जळगाव शहरातील मकरंद कॉलनीत हर्षल शिरीष भंडारी (वय ३९) हे वास्तव्यास आहे. ते त्यांचा मित्र संजय नामदेव साठे यांच्यासोबत राष्ट्रीय महामार्गावरील रेमंड चौफुलीजवळून (एमएच १२, एफएच ४४४९) क्रमांकाच्या दुचाकीने जात होते. भरधाव वेगाने जाणाऱ्या (एमएच २८, बीडब्ल्यू ०२७३ ) क्रमांकाच्या कारने भंडारी यांच्या दुचाकीला कट मारला. त्यात दुचाकी खाली पडली व…
जळगाव : प्रतिनिधी एका ५२ वर्षीय प्रौधास जुन्या भांडणाच्या कारणावरून चार जणांनी मारहाण करीत जिवंत सोडू नका, अशी दमदाटी केली. या प्रकरणी तालुका पोलिस ठाण्यात चौघांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मिळालेल्य माहितीनुसार, जळगाव तालुक्यातील फेसर्डी येथे नगीन भिमराव पाटील (वय ५२) हे वास्तव्यास आहे. त्यांचे गावातील चार जणांमध्ये जुने भांडण आहे. या जुन्या भांडणाची कुरापत काढत चौघांनी पाटील यांना शिवीगाळ करीत मारहाण केली. याला जिवंत सोडू नका, असे म्हणत दमदाटीही केली. या प्रकरणी पाटील यांनी तालुका पोलिस ठाण्यात फिर्याद दिली. त्यावरून मारहाण करणाऱ्या चौघांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोहेकॉ संदीप पाटील करीत आहेत.
जामनेर : प्रतिनिधी तालुक्यातील एका गावात महिलेच्या शेतात जावून विळ्याने मारहाण करीत एकाने विनयभंग केल्याची घटना घडली आहे. याप्रकरणी एका विरोधात जामनेर पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मिळालेल्या माहितीनुसार, जामनेर तालुक्यातील एका गावात २८ वर्षीय विवाहिता आपल्या परिवारासह वास्तव्यास असून दि.५ रोजी दुपारी १.३० वाजेच्या सुमारास महिला शेतात काम करीत असतांना एक संशयित आरोपी या ठिकाणी येत त्याने महिलेला शेताच्या बांधावर नेवून विनयभंग करीत तिला हातातील लोखंडी विड्याने डोक्यावर व हातावर मारून दुखापत करीत तिच्या गळ्यातील सोन्याची पोत देखील तोडून नुकसान केले याप्रकरणी महिलेच्या फिर्यादीवरून जामनेर पोलिसात एका विरोधात विनयभंग केल्याचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोलीस…
नाशिक : वृत्तसंस्था राज्यातील अनेकांना एका चुकीमुळे आपला जीव गमवावा लागत असल्याच्या घटना सातत्याने घडत असतांना अशीच एक धक्कादायक घटना घडली आहे. विहीतगाव भागात तंबाखूच्या पिचकारीमुळे एका ४० वर्षीय व्यक्तीचा जीव गेला. छतावरून पडल्याने ही दुर्घटना घडली आहे. रत्नाकर मदन बोराडे असे मृत व्यक्तीचे नाव आहे. याप्रकरणी उपनगर पोलिस ठाण्यात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. बोराडे गेल्या १७ ऑक्टोबर रोजी पहाटेच्या सुमारास आपल्या घराच्या छतावर शतपावली करीत असतांना ही दुर्घटना घडली. तंबाखूचे सेवन करून ते शतपावली करीत असतांना पिचकारी मारण्यासाठी ते वाकले असता अचानक इमारतीवरून पडले होते. या घटनेत त्यांच्या पाठीस व मानेस दुखापत झाली. त्यानंतर भाऊ विनोद बोराडे यांनी…
नवी दिल्ली : वृत्तसंस्था दोन दिवसाआधी नेपाळमध्ये भूकंपामुळे जनजीवन विस्कळीत झाले होते. त्यानंतर आज दिल्ली-एनसीआरमध्ये पुन्हा एकदा भूकंपाचे धक्के जाणवले आहेत. 5.8 इतकी त्याची तीव्रता नोंदवण्यात आली. सोमवारी संध्याकाळी 4.16 वाजता हे धक्के जाणवले. भूकंपाचा केंद्रबिंदू पुन्हा एकदा नेपाळ होता. यापूर्वी, 4 नोव्हेंबर रोजी रात्री 11:32 वाजता नेपाळमध्ये 6.4 तीव्रतेचा भूकंप झाला होता. यामध्ये 157 लोकांचा मृत्यू झाला होता. त्या भूकंपाचा परिणाम भारतातही दिसून आला. दिल्ली-एनसीआर व्यतिरिक्त उत्तर प्रदेश, मध्य प्रदेश, राजस्थान, हरियाणा, पंजाब आणि बिहारची राजधानी पाटणा येथे भूकंपाचे धक्के जाणवले. मात्र, भारतात कोणतीही जीवित किंवा वित्तहानी झाली नाही.
चाळीसगाव : प्रतिनिधी तालुक्यातील एका गावातीली २४ वर्षीय तरुणाने गळफास घेत आपली जीवनयात्रा संपविल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. याप्रकरणी मेहुणबारे पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. मिळालेल्या माहितीनुसार, चाळीसगाव तालुक्यातील पिलखोड गावात प्रशांत भगवान पाटील (वय-२४) हा आपल्या परिवारासह वास्तव्याला असून आपले लग्न होत नाही. शेतकरी असल्याने आपल्याला मुलगी कुणी देत नाही, असा विचार करून हे आपले जीवन जगून काही उपायोग नाही. असे आपल्या मेहुणे योगेश यांना बोलून दाखविले होते. या विवंचनेतून प्रशांत पाटील याने उपखेड शिवारातील गिरणा नदी पात्राजवळील झाडाला गळफास घेवून आत्महत्या केली. दरम्यान हा प्रकार लक्षात आल्यानंतर नातेवाईकांनी घटनास्थळी धाव घेवून तातडीने चाळीसगाव ग्रामीण…
मुंबई : वृत्तसंस्था राज्यातील अनेक तरुणांना सरकारी नोकरी करण्याचे स्वप्न असते पण अनेकांचे हे स्वप्न सहजा सहजी पूर्ण होत नसते, पण सध्या राज्यातील अनेक महानगरपालिकेत नोकरी करण्याची तुम्हाला संधी मिळणार आहे. त्यातील एक म्हणजे मीरा भाईंदर महानगरपालिका येथे विविध रिक्त पदे भरण्यासाठी जाहिरात निघाली आहे. या भरतीच्या माध्यमातून वैद्यकीय अधिकारी, कर्मचारी परिचारिका आणि MPW पदांच्या एकूण 45 जागा भरल्या जाणार आहेत. या भरतीसाठी इच्छुक उमेदवारांनी खाली दिलेल्या पत्यावर ऑफलाईन पद्धतीने अर्ज करायचा आहे. अर्ज सादर करण्याची शेवटची तारीख 08 नोव्हेंबर 2023 आहे. संस्था – मीरा भाईंदर महानगरपालिका भरली जाणारी पदे – 1. वैद्यकीय अधिकारी (पूर्णवेळ) – 15 पदे 2. परिचारिका…
मुंबई : वृत्तसंस्था राज्यातील राष्ट्रवादीचे नेते आ.एकनाथ खडसे यांची रविवारी दुपारी अचानक तब्येत खराब झाल्यानंतर त्यांना डॉक्टरांच्या सुचनेनुसार त्यांना पुढील उपचारासाठी रात्री उशिरा मुंबई येथील रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. जळगावातील एका खासगी रुग्णालयात दाखल झाले होते. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना माहिती मिळाल्यानंतर त्यांनी खडसेंसाठी तातडीने एअर ॲम्ब्युलन्स उपलब्ध करून दिली. त्यामुळे खडसेंना उपचारासाठी मुंबईत हलवण्यात आले आहे. मात्र, आता त्यांची प्रकृती बरी असल्याची माहिती त्यांच्यावर उपचार करणाऱ्या डॉक्टरांनी दिली आहे. दरम्यान राष्ट्रवादी काँग्रेसच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी रुग्णालयात जात एकनाथ खडसे यांच्या प्रकृतीची चौकशी केली.
जळगाव : प्रतिनिधी जळगाव जिल्हाधिकारी पदाचा आयुष प्रसाद यांनी कार्यभार घेतल्यानंतर जिल्ह्यातील अवैध मद्य विक्रीवर मोहीम राबविण्याच्या उत्पादन शुल्क विभागास सूचना दिल्या. या सूचनांनुसार उत्पादन शुल्क विभागाने जिल्ह्यात धडाडीने काम करत एप्रिल ते ऑक्टोबर २०२३ या सात महिन्यात १३१८ गुन्हे नोंदवत २ कोटी २५ लाख ८० हजार २३५ रूपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे. मागील वर्षाच्या सात महिन्याच्या तुलनेत गुन्हे दाखल करण्याच्या प्रमाणात २२ टक्के वाढ झाली आहे. राज्य उत्पादन शुल्क विभागाचे जिल्हा अधीक्षक व्ही.टी.भुकन यांच्या नेतृत्वाखाली उत्पादन शुल्क विभागाने ही कामगिरी केली आहे. उत्पादन शुल्क विभागाने मागील वर्षी एप्रिल २०२२ ते ऑक्टोबर २०२२ या सात महिन्याच्या कालावधीत १०८३ गुन्हे नोंदवत…

