अकोला : प्रतिनिधी महिला व बालक यांच्या सुरक्षा संबंधाने जनजागृती पर सप्ताह चे आयोजन पोलीस अधीक्षक संदीप घुगे यांच्या संकल्पनेतून, श्री अभय डोंगरे अपर पोलीस अधीक्षक अकोला यांच्या मार्गदर्शना खाली अकोला पोलीस लॉन येथे दुपारी ०३ वाजता कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले होते. सदर कार्यशाळा मध्ये व्हिडिओ दाखविण्यात आले, आणि नंतर प्रमुख मार्गदर्शक श्री संदीप घुगे पोलीस अधीक्षक, श्री संजय सेनगर सदस्य. बाल हक्क आयोग, महाराष्ट्र राज्य, श्री सुभाष दुधगावकर उपविभागीय पोलीस अधिकारी अकोला. श्रीमती उज्वला देवकर, पोलीस निरीक्षक, भरोसा सेल अकोला, सरकारी अभियोक्ता श्री अवतीरक, श्री अक्षय डोंगरे, श्री गोपाल मुकुंदे पोलीस हवालदार, स्थानिक गुन्हे शाखा, यांनी मुलांना कायद्याचे बारकावे…
Author: editor desk
नवी दिल्ली : वृत्तसंस्था देशभरात अनेक गुन्हेगारी घटना शेवटच्या टोकावर जात असल्याच्या घटना घडत असतान एक धक्कादायक घटना चेन्नईच्या क्रोमपेट परिसरातील एका हॉटेलमध्ये ही घटना घडली आहे. प्रेयसीची हत्या करुन प्रियकराने तिच्या मृतदेहाचे फोटो व्हॉट्सअॅप स्टेसला ठेवल्याची घटना समोर आली आहे. त्यांच्या एका मैत्रिणीने स्टेटस पाहिल्यानंतर पोलिसांना याबाबत माहिती दिली. या प्रकरणी पोलिसांनी आरोपी प्रियकराला अटक केली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, क्रोमपेटमधील एका हॉटेलमध्ये सकाळी १०.३० वाजता आशिक (२० वर्ष) आणि फौसिया (२० वर्ष) हे दोघे आले होते. हॉटेलमध्ये आल्यानंतर फौसिया आणि आशिक यांच्यात जोरदार भांडण सुरु झालं. फौसियाने आशिकच्या मोबाईलमध्ये असेलल्या महिलांच्या फोटोबाबत विचारणा केली. यावरुन आशिकने फौसियाने हॉटेलमध्ये…
भंडारा : वृत्तसंस्था राज्यातील अनेक ठिकाणी प्रेमप्रकरणातून अनेक गुन्हेगारी घटना सातत्याने उघडकीस येत असतांना नुकतेच भंडारा जिल्ह्यात युवकाच्या खून प्रकरणी तिघांना पाेलीसांनी अटक केली आहे. प्रेम प्रकरणातून युवकाचा खून झाल्याचे पाेलीस तपासात निष्पन्न झाले आहे. या प्रकरणाचा पाेलीस सखाेल तपास करीत आहेत. पाेलीसांनी दिलेल्या माहितीनूसार तीन दिवसांपूर्वी रात्री दहाच्या सुमारास नयन मुकेश खोडके हा १९ वर्षीय युवक घरी न सांगता निघून गेला होता. ३० नोव्हेंबरला कोरंभी-सालेबर्डी नाल्यात संशयितरीत्या ताे मृतावस्थेत पाेलीसांना आढळला. या घटनेनंतर पाेलीस अधीक्षक लोहित मतानी यांनी विविध ठिकाणी तपासाची पथके फिरवली. त्यानंतर पाेलीसांनी एका दिवसातच संशयिताचा छडा लावला. हा खून प्रेम प्रकरणातून झाल्याचे पाेलीस तपासात निष्पन्न झाल्याची…
जळगाव : प्रतिनिधी शहरातील रेल्वे स्थानकाजवळील बिग बाजार परिसरातून एका १५ वर्षीय अल्पवयीन मुलीस एकाने पळवून नेल्याप्रकरणी जळगाव शहर पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मिळालेल्या माहितीनुसार, जळगाव शहरातील एका परिसरात १५ वर्षीय अल्पवयीन मुलगी आपल्या परिवारासह वास्तव्यास असून दि.३० नोव्हेबर २०२३ रोजी दुपारी १२.३० वाजेच्या सुमारास शहरातील रेल्वे स्थानक रोडवरील बिग बाजार परिसरात आली असता याठीकानाहून एक अल्पवयीन संशयित आरोपीने तिला पळवून नेल्याप्रकरणी जळगाव शहर पोलिसात त्याच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास पोलीस निरीक्षक अनिल भवारी यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक सर्जेराव क्षीरसागर हे करीत आहेत.
वर्धा : वृत्तसंस्था राज्यातील अनेक जिल्ह्यात अपघाताच्या घटना घडत असतांना अशीच एक भीषण अपघाताच्या घटना वर्धा जिल्ह्यातून समोर आली आहे. शाळेत शिकणाऱ्या लहान बहिणीला भेटण्यासाठी स्कुटीवरून जाणाऱ्या मोठ्या बहिणीला ट्रकने धडक दिली. या अपघातात तिचा जागीच मृत्यू झाला आहे. काळजाचा ठोका चुकवणारी ही घटना शुक्रवारी आर्वी शहरातील एचडीएफसी बॅकेसमोर घडली. अपघातानंतर नागरिकांनी मोठी गर्दी करून ट्रकची तोडफोड केली.त्यामुळे दोन वाहतूक ठप्प झाली होती. अपघाताची माहिती मिळताच पोलिसांनी तातडीने घटनास्थळी धाव घेतली. त्यामुळे वाहतूक सुरळीत झाली. मिळालेल्या माहितीनुसार, या अपघातात प्रियाक्षी रमण लायचा (वय १९, रा. आर्वी) हिचा मृत्यू झाल आहे. प्रियाक्षी तंत्रनिकेतन पॉलिटेक्निक कॉलेजमध्ये द्वितीय वर्षाचे शिक्षण घेत होती. ती…
मुंबई : प्रतिनिधी राज्यातील अनेक जिल्ह्यात गेल्या पाच दिवसापासून गारपिटीसह अवकाळी पाऊस सुरु असतांना आता वातावरणात सुधारणा होत असतानाच राज्यात अचानक आलेल्या दाट धुक्यामुळे शेतकऱ्यांच्या चिंतेत अजून भर पडली. अरबी समुद्रावरून आलेले वारे आणि ढगाळ हवामानामुळे वाढलेली आर्द्रता याचा परिणाम म्हणून शुक्रवारी सकाळी राज्याच्या काही भागात दाट धुक्याची लहर पसरली होती. त्यामुळे १५ ते २० फूट अंतरावरील दिसत नव्हते. आगामी दोन दिवस असेच वातावरण राहिल, त्यानंतर धुके कमी होण्याची शक्यता असल्याचा अंदाज हवामानतज्ज्ञ माणिकराव खुळे यांनी वर्तविला आहे. धुक्यामुळे गारपीटीच्या तडाख्यातून उरलेल्या पिकांवर रोगराई पसरण्याची चिंता निर्माण झाली आहे. दरम्यान, पावसाळी वातावरण हळूहळू निवळत असून उत्तर महाराष्ट्र, पश्चिम महाराष्ट्र, मराठवाडा…
मुक्ताईनगर : प्रतिनिधी शहरातील प्रवर्तन चौकाजवळ तीन दुकानांना अचानक आग लागली. या आगीत बूट, चप्पल व गोळ्या बिस्किटांचे दुकान खाक झाले तर किराणा दुकानाला मोठा फटका बसला आहे. सुमारे सात लाख रुपयांचे साहित्य जळून खाक झाल्याचा अंदाज आहे. ही घटना गुरुवारी रात्री ११ वाजेच्या सुमारास घडली. शहरातील मध्यवर्ती ठिकाणी लागलेल्या या आगीचे कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही. आगीच्या कारणावरून शहरात वेगवेगळे तर्कवितर्क लावले जात आहेत. या दुकानांमधून आगीचे लोळ उठताना दिसताच परिसरातील नागरिकांनी धाव घेत आग विझविण्याचे प्रयत्न सुरू केले. बूट व चप्पलचे दुकान तसेच गोळी-बिस्किट पान मसाल्याचे दुकान या आगीत जळून खाक झाले. मुख्य चौकातील या घटनेमुळे प्रचंड गोंधळ…
पाचोरा : प्रतिनिधी तालुक्यातील नगरदेवळाजवळील निपाणे येथील शेतकरी हिरमण दीपचंद पाटील यांच्या शेतात ऊसतोड सुरू असताना मजूर महिलेवर बिबट्याने हल्ला केला. मात्र महिलेने आणि मजुरांनी आरडाओरड करताच बिबट्याने धूम ठोकली. ही घटना दि. १ रोजी सकाळी आठ वाजेच्या सुमारास घडली. पावलांच्या ठशांवरून हा बिबट्याच असल्याची पुष्टी वनविभागाने केली आहे. निपाणे सरपंच रोशन पाटील व गावातील युवकांनी पुढाकार घेत बराच वेळ बिबट्याला शोधण्याचा प्रयत्न केला वनविभागाचे कर्मचाऱ्यांना पाचारण केले. त्यांनी पावलांच्या ठशांवरून हा बिबट्याच असल्याचे स्पष्ट केले आणि वनपाल प्रकाश देवरे यांनी शेतकऱ्यांना सतर्कतेचा इशारा दिला आहे. याआधी दि. १२ नोव्हेंबर रोजी सीताराम पाटील यांच्या शेतातील सात वासरांचा फडशा बिबट्याने पाडला…
मेष : आर्थिक स्थिती खराब होऊ शकते. सहकुटूंब सामाजिक कार्य केल्याने प्रत्येकजण आनंद आणि निवांत राहील. त्रयस्थ व्यक्तीचा हस्तक्षेप तुम्ही आणि तुमच्या प्रिय व्यक्तीमध्ये संघर्ष निर्माण करू शकतो. एकांतात वेळ घालवाल. वृषभ : आर्थिक खर्च वाढतील. जवळचे मित्र व कुटुंबातील सदस्यांमध्ये राहून आनंदाचा काळ घालवा. शुभकार्याचे सोहळे घरीच करा. तुमच्या व्यस्त दिनचर्येमुळे तुमच्या जोडीदाराला कमी महत्त्व दिल्यासारखे वाटेल. मिथुन : सांपत्तिक स्थिती सुधारेल. नव्याने मैत्रीपूर्ण वाटचाल करा. स्त्रिया शुक्रावरच्या असतात आणि पुरुष मंगळावरचे, पण आजच्या दिवशी शुक्र आणि मंगळ एक होणार आहेत. कुणी जवळच्या आणि जुन्या मित्राला भेटून आज तुम्ही अतीतच्या दिवसात व्यग्र होऊ शकतात. कर्क : शेअर बाजार आणि…
जळगाव : प्रतिनिधी जळगाव शहरातील मुख्य बाजार पेठ असलेल्या नवीपेठ परिसरात आज लक्ष्मी गोल्डन हाऊस या ज्वेलर्स दुकानाचे लाकडी दरवाजाला अडकवलेली लोखंडी पट्टीचे हुक तोडून दुकानातील तिजोरी तोडण्याचा प्रयत्न चोरट्यांकडून करण्यात आल्याची घटना आज सकाळी उघडकीस आली. मिळालेल्या माहितीनुसार, गुरुवारी सायंकाळी झालेल्या मुसळधार पावसाने नवीपेठ भागातील वीज गेली होती. या अंधाराचा फायदा घेऊन चोरटयांनी तिजोरी फोडण्याचा प्रयत्न केला असून एक चोरटा सीसीटीव्ही कॅमेऱ्यात आज १ डिसेंबरच्या मध्यरात्री दीड वाजेच्या सुमाराला चोरटे आले असून १ वाजून ५३ मिनिटाला तो बाजूच्या दुकानाच्या सीसीटीव्ही मध्ये कैद झाला आहे. या चोरट्याने दुकानातील सीसीटीव्हीच्या वायरी कापून टाकल्याचे आणि बाजूच्या इंडिया फर्निशिंग दुकानाचा सीसीटीव्ही कॅमेरा वाकविल्याचे…

