मुंबई : वृत्तसंस्था राज्यातील अनेक तरुण नोकरीच्या शोधात आहेत. त्या तरूणासाठी महत्वाची बातमी समोर आली आहे. तब्बल 10 हजारापेक्षा जास्त नोकऱ्या देण्यासाठी नमो महारोजगार मेळावा आयोजित करण्यात आला आहे. यासाठी पात्र उमेदवारांनी ऑनलाइन पद्धतीने नोंदणी करायची असून मेळाव्यासाठी खाली दिलेल्या पत्त्यावर हजर रहायचे आहे. मेळाव्याची तारीख 09 आणि 10 डिसेंबर 2023 आहे. नाव – नमो महारोजगार मेळावा कोणकोणत्या पदांसाठी होणार मेळावा – फील्ड सेल्स एक्झिक्युटिव्ह, सेल्स एक्झिक्युटिव्ह, क्रेडिट असिस्टंट, फिटर, टर्नर, मशीनिस्ट, पेंटर, कारपेंटर, वेल्डर, ड्राफ्ट्समन, इलेक्ट्रिशियन, ट्रेनी, डाटा एन्ट्री ऑपरेटर, इंजिनिअर आणि इतर पदे पद संख्या – 10,000+ आवश्यक शैक्षणिक पात्रता – 10वी/12वी उत्तीर्ण/ITI/D.Pharm/MBA/पदवीधर/ डिप्लोमाधारक/पदव्युत्तर पदवी मेळाव्याची तारीख –…
Author: editor desk
नवी दिल्ली : वृत्तसंस्था देशातील राजस्थान राज्यात विधानसभा निवडणुकीचे निकाल हाती लागले असून दर पाच वर्षांनी सरकार बदलण्याचा ट्रेंड आता राजस्थानात कायम दिसला आहे. यंदा विधानसभा निवडणुकीत भाजपची बहुमताच्या दिशेने वाटचाल होताना दिसत आहे. निवडणूक आयोगाच्या म्हणण्यानुसार, भाजप 105 जागांवर आणि काँग्रेस 73 जागांवर पुढे आहे, तर इतर उमेदवार 14 जागांवर पुढे आहेत. आतापर्यंत भाजपने 12, काँग्रेसने 3, भारतीय आदिवासी पक्षाने एक आणि इतरांना एक जागा जिंकली आहे. दरम्यान, काँग्रेसने आपला पराभव मान्य केला आहे. मुख्यमंत्री अशोक गहलोत आज संध्याकाळी राजभवनात जाऊन राजीनामा देणार आहेत. विधानसभा अध्यक्ष डॉ.सी.पी.जोशी यांचा पराभव झाला आहे. त्यामुळे परसादीलाल मीना, प्रताप सिंह खाचरियासह काँग्रेसच्या 25…
मुंबई : वृत्तसंस्था देशातील तीन राज्यात भाजपने सत्ता खेचून आणली असून तेलंगणा एबीव्हीपीचा कार्यकर्ता काँग्रेसने खेचला अन्यथा तेलंगणाचं चित्रही वेगळं दिसलं असते. आमचा निर्णय काहींना आवडला नव्हता पण देशात मोदींशिवाय पर्याय नाही हे आता स्पष्ट झालं, भाजपच्या विजयानंतर उपमुख्यमंत्री अजित पवारांनी प्रतिक्रिया दिली आहे. भाजपचा चेहरा नरेंद्र मोदी हेच त्रिवार सत्य आहे, असे देखील अजित पवार या वेळी म्हणाले, अजित पवार म्हणाले, मोदींमुळे देशाची प्रतिमा उंचावली आहे. निकाल चांगला येणार हे मी आधीच बोललो होतो. मोदींच्या नेतृत्वाखाली देशाची प्रगती होत आहे. इंडिया, इंडियावाले आता ईव्हीएमबाबत बोलतील. ईव्हीएम घोटाळा हा रडीचा डाव आहे. मोंदींसमोर कोण उमेदवार असणार आहे हे सुद्धा विरोधकांचं…
धरणगाव : प्रतिनिधी शहरातील एका सामाजिक कार्यकर्ते वैभव बोरसे यांनी आपल्या मुलीचा प्रथम वाढदिवस सामाजिक बांधिलकी जोपासत शहरातील एका मूकबधिर शाळा अन्नदान करून साजरा केल्याने परिसरात या उपक्रमाचे मोठे कौतुक होत आहे. मिळालेल्या माहितीनुसार, शहरातील वैभव बोरसे यांनी आज दिनांक 3 डिसेंबर रोजी मुलगी स्वरा बोरसे हिचा प्रथम वाढदिवसाच्या अवचित्त साधून आपल्या धरणगाव शहरातील लहान मुलांची मूकबधिर शाळा आहे.त्या शाळेमध्ये प्रथम वाढदिवस साजरा करण्यात आला व तेथील खरोखरच गोरगरीब गरजूवंत तेही आपल्यातलेच आहेत या संकल्पनेतून अन्नदान करण्याचा कार्यक्रम घेतला त्या कार्यक्रमाला वैभव बोरसे यांच्या सर्व मित्र परिवार उपस्थित होता
वर्धा : वृत्तसंस्था राज्यातील अनेक ठिकाणी चुकीच्या घटना घडत असतांना अशीच एक धक्कादायक घटना वर्धा येथील सावंगी मेघे परिसरात असलेल्या वैद्यकीय महाविद्यालयाच्या विद्यार्थिनींच्या वसतिगृहाच्या शौचालयात अर्भक मृतावस्थेत आढळून आले आहे. याप्रकरणी वसतिगृहातील महिला कर्मचाऱ्याने पोलिसांत तक्रार दिलीय. सावंगी पोलिसांनी अज्ञात आरोपीविरुद्ध गुन्हा दाखल केल्याची माहिती आहे. मिळालेल्या माहितीनुसार, वैद्यकीय महाविद्यालय परिसराला लागून असलेल्या सरस्वती वसतिगृह आहे. या वस्तीगृहाच्या ग्राउंड फ्लोरवर असलेल्या शौचालयाच्या खड्ड्यात अज्ञाताने मृत अर्भक फेकलं होतं. याची माहिती वसतिगृहात काम करणाऱ्या महिलेला मिळताच त्यांनी पाहणी केली. याबाबतची तक्रार त्यांनी तत्काळ सावंगी पोलिसांत दिली. पोलिसांनी तत्काळ वसतिगृह गाठून तपासणी केली असता अर्भक मृतावस्थेत असल्याचे समजले. अज्ञातांनी मृतदेहाची गुप्तपणे विल्हेवाट…
जळगाव : प्रतिनिधी मुक्ताईनगर तालुक्यातील कुऱ्हा काकोडा येथील शेतात बकऱ्या चारण्यासाठी गेलेल्या पिंप्राळा येथील तरुणावर बिबट्याने अचानक हल्ला करून त्याला जखमी केले. मात्र सुदैवाने तो तरुण बिबट्याच्या तावडीतून सुटला. आणि त्याचे प्राण वाचले. मिळालेल्या माहितीनुसार, पिंप्राळा येथील गणेश गणपत झाल्टे (वय ३२) हा दिव्यांग आहे. तो धुपेश्वर रस्त्यावरील शेतात बकऱ्या चारण्यासाठी गेला होता. दुपारी दीड ते दोन वाजेच्या सुमारास जंगलात दबा धरून बसलेल्या बिबट्याने त्याच्यावर झडप घातली. गणेश याने आरडाओरडा करत रस्त्याकडे धाव घेतली. त्यानंतर बिबट्याने पलायन केले. यात गणेशच्या खांदा आणि हाताला जखमा झाल्या आहेत. त्याला कुन्हा येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात दाखल करण्यात आले. वढोदा वनक्षेत्र कार्यालयाचे वनपाल धुडगुंडे,…
जळगाव : प्रतिनिधी नाशिक येथे पतीवर उपचार करून रावेर येथे गावी परतत असताना कार खांबावर धडकल्याने सावित्री सुनील हसकर (५०, रा. रावेर) या जागीच ठार झाल्या. या अपघातात तीन जण जखमी झाले आहेत. हा अपघात शनिवार, २ डिसेंबर रोजी पहाटे राष्ट्रीय महामार्ग क्रमांक सहावर जळगाव ते नशिराबाद दरम्यान टोल नाक्यानजीक झाला. मिळालेल्या माहितीनुसार, पोलिस भरतीचे प्रशिक्षण देणारे सुनील हसकर यांच्यावर नाशिक येथे उपचार सुरू आहेत त्यासाठी ते अधून-मधून तेथे जात असतात. शुक्रवारी उपचार घेऊन रात्री नाशिक येथून रावेर येथे ते कारने परतत होते. यावेळी त्यांच्यासोबत त्यांच्या पत्नी सावित्री हसकर, अन्य एक महिला व मित्र होते. कार नशिराबाद टोलनाक्यानजीक पोहोचली. त्यावेळी…
चोपडा : प्रतिनिधी चोपडा शहरात पशुधनाची अवैध वाहतूक करणाऱ्यांवर कारवाई केल्याने १० ते १५ जणांनी चोपडा येथील सपोनि अजित सावळे, हेकॉ संतोष पारधी यांना मारहाण करून ठार मारण्याची धमकी दिली. ही घटना जुन्या यावल रोडवर शुक्रवारी रात्री ११ वाजेच्या सुमारास घडली. याप्रकरणी सात जणांना अटक करण्यात आली आहे. मिळालेल्या माहितीनुसार, पशुधनाची अवैध वाहतूक करणाऱ्यांवर पोलिसांनी शुक्रवारी कारवाई केली होती. यानंतर साने गुरुजी वसाहतीमधील १० ते १५ जण पोलिस ठाण्यात आले. कारवाई केल्याबाबत विचारणा करू लागले. पोलिसांनी त्यांना तिथून हाकलून लावले. यानंतर सावळे व पारधी हे रात्री ११ वाजता पेट्रोलिंग करीत असताना यावल रोडवर उभ्या असलेल्या जमावाने त्यांना अडवले तसेच लोखंडी…
मेष – राशीच्या लोकांसाठी आजचा दिवस चांगला राहील. जर आपण काम करणार्या लोकांबद्दल बोललो तर आज तुमच्या कार्यक्षेत्रात काही तणाव असेल, ज्यामुळे तुम्हाला थोडी काळजी वाटू शकते. कोणाशीही वाईट शब्द बोलू नका आणि रागावू नका, अन्यथा प्रकरण आणखी बिघडू शकते. तुमच्या बोलण्यावर नियंत्रण ठेवा आणि समोरच्या व्यक्तीशी बोलताना आवाजाची पातळी नीट ठेवा. शिक्षण व्यवस्थेशी संबंधित लोकांसाठी, आज चांगले काम केल्याने अर्थपूर्ण परिणाम मिळू शकतात ज्यामुळे तुमचे मन खूप आनंदी होईल. वृषभ – राशीच्या लोकांसाठी आजचा दिवस मध्यम राहील. जर आपण व्यवसाय करणाऱ्या लोकांबद्दल बोललो तर तुम्हाला व्यवसायात अडचणींचा सामना करावा लागू शकतो. एखादा मोठा प्रकल्प तुमच्या हातून निसटू शकतो, ज्यामुळे…
नाशिक : वृत्तसंस्था राज्यातील अनेक जिल्ह्यात राज्य उत्पादन शुल्क विभाग मोठी कारवाई करीत असतांना नुकतेच नाशिक जिल्ह्यातील निफाड तालुक्यातील भरवस फाटा येथे राज्य उत्पादन शुल्क विभागाने छापा टाकून भरवस फाट्यावर दमण येथील दारू घेऊन जाणारा कंटेनर पकडत त्यातील सुमारे 14 हजार दारू बाटल्यांसह 80 लाख70 हजारांचा ऐवज हस्तगत केला. या कारवाईत उत्तर प्रदेशातील एकाला ताब्यात घेण्यात आले आहे. रमजान खान सलमान खान (वय 27, नसीरपूर, पृथ्वीगंज, जि. प्रतापगड) असे संशयिताचे नाव आहे. त्याच्या ताब्यातील सहाचाकी कंटेनर (एमएच 04 आरबी 4868) यासह 17 हजार 232 दारूच्या बाटल्यांचे 501 बॉक्सही हस्तगत करण्यात आले. दादरा नगर हवेली आणि दमण दीव येथे उत्पादित होणारी;…

