जळगाव : प्रतिनिधी पतीच्या कामाचे पैसे देण्याच्या बहाण्याने बोलावून महिलेचा विनयभंग केल्याची घटना उघडकीस आली आहे. याप्रकरणी नशिराबाद पोलिस ठाण्यात एकाविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मिळालेल्या माहितीनुसार, नशिराबाद पोलीस ठाण्याच्या हद्दीतील एका गावात विवाहिता वास्तव्यास आहे. त्या विवाहितेला एकाने तुझ्या पतीच्या कामाचे पैसे द्यायचे असल्याचे सांगितले. विवाहिता पैसे घेण्यासाठी गेली तीने पैसे घेण्यासाठी आपला हात पुढे केला. त्या वेळी तिचा हात पकडून तिला घरात ओढून विनयभंग केला. ही घटना दि. २५ जानेवारी रोजी तालुक्यातील एका गावात घडली. या प्रकरणी महिलेने नशिराबाद पोलिस ठाण्यात फिर्याद दिली. त्यावरून गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोउनि संजय जाधव करत आहेत.
Author: editor desk
जळगाव : प्रतिनिधी जळगाव शहरातील ६६ वर्षीय वृद्धाला नाशिक जिल्ह्यात दोन वेगवेगळ्या ठिकाणी फ्लॉट घेण्यासाठी टोकन व बुकिंग म्हणून दिलेले चार लाख ९५ हजार ३९० रुपये परत न देता खोटे दस्तऐवज देऊन गोपालसिंग भीमसिंग राजपूत यांची फसवणूक करण्यात आली. याप्रकरणी नाशिक येथील चार जणांविरुद्ध जळगाव शहर पोलिसात गुन्हा दाखल झाला आहे. मिळालेल्या माहितीनुसार, शहरातील पिंप्राळा परिसरातील सेवानिवृत्त असलेले गोपालसिंग राजपूत यांना प्लॉट घ्यायचा असल्याने त्यांनी ठाणगाव, ता. सिन्नर, जि. नाशिक येथील प्लॉटसाठी दोन हजार २०० रुपये टोकन म्हणून दिले. बुकिंगसाठी दोन लाख ४० हजार ३९० रुपये दिले. त्यानंतर दुसऱ्या भागातील प्लॉट घेण्यासाठी दोन लाख ५५ हजार रुपये दिले. असे एकूण…
जळगाव : प्रतिनिधी दुकानामध्ये झोपलेल्या कारागिरांना धमकावत दागिने घडवण्यासह सोने पॉलिशचे काम होणाऱ्या दुकानांमधून १४ लाख ५९ हजार ५२४ रुपये किमतीचे एकूण २५१.७८० ग्रॅम वजनाचे सोने चोरट्यांनी चोरून नेले, ही धाडसी चोरी २६ जानेवारी रोजी पहाटे मारुती पेठमध्ये उघडकीस आली. या प्रकरणी शनिपेठ पोलिसात अज्ञात चोरट्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मिळालेल्या माहितीनुसार, शहरातील मारुती पेठ भागात एका इमारतीच्या तिसऱ्या मजल्यावर सचिन प्रभाकर सोनार (३८, रा. रामपेठ) यांचे दागिने बनवण्याचे श्री अलंकार नावाचे दुकान असून, दुसऱ्या मजल्यावर शेख जोसीमोद्दीन बशीरोद्दीन यांचे नूर पॉलिश छिलाई सेंटर नावाचे सोने पॉलिशचे दुकान आहे. २२ जानेवारी रोजी, एका नामांकित सुवर्ण पेढीकडून सचिन सोनार यांच्याकडे…
चंद्रपूर : वृत्तसंस्था ठाकरे गटाच्या युवासेना शहर प्रमुखाची निर्घृण हत्या झाल्याची धक्कादायक घटना चंद्रपुरातील सरकारनगर परिसरमधून समोर आली आहे. अज्ञातांनी युवासेना शहर प्रमुख शिवा वझरकर याची हत्या करण्यात आली आहे. 30 वर्षीय शिवा वझरकर याचा मृतदेह त्यांच्याच एका मित्राच्या कार्यालयाजवळच आढळल्याने परिसरात खळबळ उडाली. मिळालेल्या माहितीनुसार, युवासेना शहर प्रमुख शिवा वझरकर यांच्या हत्येनंतर समर्थकांनी संशयित आरोपीच्या जेसीबी आणि इतर वाहनांची तोडफोड केली. पोलीस विभाग प्रजासत्ताक दिनाच्या निमित्ताने हाय अलर्टवर असतानाच घडलेल्या या घटनेनंतर शहरातील पोलीस बंदोबस्तात मोठी वाढ करण्यात आली आहे. हत्येच्या घटनेनंतर वरीष्ठ पोलीस अधिकारी घटनास्थळी दाखल झाले. वझरकर याचा मृतदेह जिल्हा सामान्य रुग्णालयातील शव चिकित्सा कक्षात पाठवण्यात आला…
मुंबई : वृत्तसंस्था गेल्या अनेक महिन्यापासून मराठा समाजाला आरक्षण मिळावे यासाठी मनोज जरांगे पाटील आपला लढा देत होते. आज अखेर त्यांच्या सर्वच मागण्या सरकारने मान्य केल्या आहे. सरकारने मध्यरात्रीच याबाबतचे अध्यादेश देखील काढले आहेत. त्यामुळे मनोज जरांगे पाटील यांच्या आंदोलनाला मोठं यश मिळालं आहे. राज्य सरकारने जरांगेंच्या सर्व मागण्या मान्य करताच नवी मुंबईत मराठा आंदोलकांनी मध्यरात्रीच जल्लोष सुरू केला होता. मराठा समाजाला सरसकट कुणबी प्रमाणपत्र मिळावं, तसेच आंदोलकांवरील गुन्हे तातडीने मागे घेण्यात यावेत, यासाठी मनोज जरांगे पाटील गेल्या ५ महिन्यांपासून आंदोलन करीत होते. त्यांच्या आंदोलनाची सुरुवात जालना जिल्ह्यातील अंतरवाली सराटी येथून झाली. मराठा समाजाच्या मागण्या मान्य करण्यासाठी राज्य सरकारने जरांगे…
जळगाव : प्रतिनिधी तालुक्यातील एका गावात २७ वर्षीय महिलेचा एकाने घरात घुसून विनयभंग केल्याची घटना घडली असून याप्रकरणी नशिराबाद पोलिसांनी एकाला अटक करण्यात आली आहे. मिळालेल्या माहितीनुसार, नशिराबाद येथे एका परिसरात राहणाऱ्या २७ वर्षे महिलेला तिच्या घरी जाऊन आरोपी नामदेव फकीरा माळी रा. नशिराबाद याने महिलेच्या घरात घुसून दरवाजा बंद करून घे असे बोलून तिच्या मनात लज्जा उत्पन्न होईल येईल असे कृत्य केल्याप्रकरणी पीडित महिलेने नशिराबाद पोलिसात धाव घेऊन तक्रार दिल्यावरून आरोपी नामदेव फकीरा माळी यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला असून त्याला अटक करण्यात आली आहे. तपास पोलीस उपनिरीक्षक संजय जाधव करीत आहे.
मुंबई : वृत्तसंस्था राज्यातील मराठा आरक्षणासाठी मनोज जरांगे पाटील यांनी वातावरण तापविले आहे. मराठा समाजाचा मोर्चा मुंबईत दाखल होताच या मोर्चाची सरकारने दखल घेतली असून आता सरकार मधील मंत्री दीपक केसरकर यांनी मनोज जरांगे यांच्या सर्वच मागण्या मान्य करण्यात आल्याची घोषणा केली आहे. सरकारच्या शिष्टमंडळाची आज मनोज जरांगे यांच्याशी चर्चा झाली. ही चर्चा अत्यंत सकारात्मक झाली. त्यात त्यांच्या सर्वच मागण्या मान्य करण्यात आल्या. आता त्याची विहित नियमांत अंमलबजावणी होईल, असे केसरकर यांनी सांगितले आहे. मंत्री दीपक केसरकर माध्यमांशी बोलताना म्हणाले की,मनोज जरांगे यांच्या सर्व मागण्या मान्य करण्यात आल्या आहेत. मनोज जरांगे पाटील हे संवेदनशील आहेत. ते महाराष्ट्राच्या हिताचा विचार करतील.…
नवी दिल्ली : वृत्तसंस्था देशभरात आज ७५ वा प्रजासत्ताक दिन मोठ्या उत्साहात साजरा केला जात असून अनेक ठिकठिकाणी ध्वजारोहन करून राष्ट्रध्वजाला मानवंदना दिली जात आहे. यानिमित्ताने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी संपूर्ण देशवासियांना शुभेच्छा दिल्या आहेत. तसेच पद्म पुरस्कार विजेत्यांचेही अभिनंदन केलं आहे. मोदींनी आपल्या अधिकृत X अकाउंटवरून (पूर्वीचे ट्विटर) ट्वीट करत आपल्य ा भावना व्यक्त केल्या आहेत. काय म्हणाले PM नरेंद्र मोदी? “देशातील आपल्या सर्व कुटुंबियांना प्रजासत्ताक दिनाच्या खूप खूप शुभेच्छा. जय हिंद”, अशी पोस्ट पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केली आहे. तसेच त्यांनी प्रजासत्ताक दिनाच्या पूर्वसंध्येला जाहीर झालेल्या पद्म पुरस्कारांच्या मान्यवरांचंही अभिनंदन केलं आहे. “पद्म पुरस्कारानं सन्मानित झालेल्या सर्वांचे अभिनंदन.…
मुंबई : वृत्तसंस्था मनोज जरांगे पाटील हजारो मराठा आंदोलकांसह तब्बल ६ दिवसांच्या पायी यात्रेनंतर आज अखेर मुंबईच्या वेशीवर येऊन धडकले आहेत. जरांगेंना पाठिंबा देण्यासाठी नवी मुंबईतील एपीएमसी मार्केटमध्ये मोठ्या संख्येने मराठा बांधव जमले आहेत. सकाळी ९ वाजेच्या सुमारास जरांगे यांची जाहीर सभा होणार आहे. या सभेनंतर असून सकाळी ११ वाजेनंतर ते आझाद मैदानाच्या दिशेने कूच करणार आहे. दरम्यान, मनोज जरांगे यांनी एपीएमसी मार्केटमध्ये झेंडावंदन केले. यानंतर त्यांनी पत्रकारपरिषद घेत आपली भूमिका स्पष्ट केली आहे. सरकारच्या शिष्टमंडळाशी चर्चा अद्याप झालेली नाही. थोड्या वेळात चर्चा होईल. बैठकीत तोडगा निघाला नाही तर आझाद मैदानावर जाणार आहे, असे मनोज जरांगे यांनी सांगितलं. मनोज जरांगे…
जळगाव : प्रतिनिधी शहरातील काही भागात नियमित चोरीच्या घटना घडत असतांना नुकतेच दि. २२ जानेवारी रोजी सकाळच्या सुमारास रिंगरोडवरील फॉरेस्ट कॉलनीत देखील चोरीची घटना घडली. याप्रकरणी अज्ञात चोरट्याविरुद्ध जिल्हापेठ पोलीसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मिळालेल्या माहितीनुसार, शहरातील फॉरेस्ट कॉलनीतील तृष्णा अपार्टमेंटमध्ये रुपाली मुकेश पुर्णपात्रे या वास्तव्यास असून दि. २१ जानेवारी रोजी सकाळच्या सुमारास त्यांना मंदिरात जायचे असल्याने त्यांनी देवघरात ठेवलेल्या डब्यातून पैसे घेवून त्या मंदिरात गेल्या. त्यानंतर रात्री साडेअकरा वाजेच्या सुमारास त्या घरी परतल्या. दुसऱ्या दिवशी सकाळी नेहमीप्रमाणे रुपाली पुर्णपात्रे या देवघर स्वच्छ करीत होत्या. यावेळी त्या त्यांच्या पतीने दिलेले पैसे ठेवण्यासाठी त्या डबा शोधत असतांना त्यांना देवघरात ठेवलेला…

