Author: editor desk

नवी दिल्ली : वृत्तसंस्था पाकिस्तानी गुप्तचर संस्था आयएसआयसाठी कथित हेरगिरी करणाऱ्या रशियाची राजधानी मॉस्कोस्थित भारतीय दूतावासातील एका कर्मचाऱ्याला उत्तर प्रदेश पोलिसांच्या दहशतवादविरोधी पथकाने (एटीएस) अटक केली आहे. सतेंद्र सिवाल अशी कर्मचाऱ्याची ओळख पटवण्यात आली आहे. संरक्षण, परराष्ट्र मंत्रालय आणि भारतीय सैन्य ठिकाणांशी संबंधित गोपनीय माहिती पाकला पुरवल्याच्या आरोपाखाली त्याला अटक करण्यात आली आहे. याप्रकरणी तपास अधिकाऱ्यांसोबत काम केले जात असल्याची माहिती भारतीय परराष्ट्र मंत्रालयाने दिली. इलेक्ट्रॉनिक व प्रत्यक्ष पाळत ठेवत करण्यात आलेल्या तपासात सतेंद्र सिवाल हा आयएसआय संचालकाच्या नेटवर्कसोबत भारतविरोधी कारवायांत सहभागी असल्याचे आढळले. संरक्षण मंत्रालय, परराष्ट्र मंत्रालय आणि भारतीय सैन्य ठिकाणाच्या धोरणात्मक कारवाया व अन्य महत्त्वपूर्ण माहिती तो पाकला…

Read More

जळगाव : प्रतिनिधी शहरातील आहुजा नगर परिसरात एक ६४ वर्षीय सेवानिवृत्त कर्मचारी विजय विठ्ठल बेहरे हे कोणालाही काहीही न सांगता घरातून बाहेर पडलेले यांना रेल्वेची धडक लागून त्यांचा मृत्यू झाला. ही घटना रविवारी सकाळच्या सुमारास उघडकीस आली. या प्रकरणी तालुका पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. मिळालेल्या माहितीनुसार, शहरातील आहुजनगर परिसरात विजय बेहेरे हे सेवानिवृत्त कर्मचारी वास्तव्यास होते. शनिवारी ते घरात कोणालाही काहीही न सांगता घरातून निघून गेले. आज सकाळच्या सुमारास असोदा रेल्वेगेट परिसरात त्यांना धावत्या रेल्वेची धडक लागून त्यांचा मृत्यू झाला. ही घटना तालुका पोलीस ठाण्याचे कर्मचारी ज्ञानेश्वर कोळी, हरीश शिंपी, विलास शिंदे यांनी तात्काळ घटनास्थळी धाव…

Read More

जळगाव : प्रतिनिधी जळगाव जिल्ह्यात अनेक शहरासह ग्रामीण भागातून अल्पवयीन मुली, तरुणी पळवून नेल्याच्या अनेक घटना समोर येत असतांना नुकतेच जळगाव शहरातील रामानंद पोलिस ठाण्याच्या हद्दीतील एका अल्पवयीन मुलीला त्याच परिसरातील एका मुलीने फूस लावून पळवून नेले. ही घटना ३१ जानेवारी रोजी उघडकीस आली. याप्रकरणी पळवून नेणाऱ्या तरुणीविरुद्ध रामानंद नगर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. १४ वर्षीय अल्पवयीन मुलीला एका तरुणीने सोबत घेत किराणा दुकानावर जाऊन येतो, असे सांगून सोबत नेले; परंतु ती घरी न परतल्याने अल्पवयीन मुलीच्या कुटुंबीयांनी तिचा परिसरात शोध घेतला. मात्र, ती न सापडल्याने रामानंदनगर पोलिस ठाण्यात फिर्याद दिली. पळवून नेणाऱ्या त्यावरून तरुणीविरुद्ध गुन्हा दाखल…

Read More

नंदुरबार : वृत्तसंस्था भारतीय अन्न महामंडळाचा हाताळणी व वाहतुकीचा ठेका बंद करावा या कारणावरून एकास मारहाण करून मोबाइल फोडल्याच्या आरोपावरून माजी आमदार शिरीष चौधरी यांच्यासह सहा जणांविरुद्ध नंदुरबार तालुका – पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे. – शनिवारी सायंकाळी ही घटना घडली. दरम्यान, – दुसऱ्या गटातर्फेदेखील फिर्याद दाखल करण्याचे – काम उशिरापर्यंत सुरू होते. मिळालेल्या माहितीनुसार, वाहतूक व्यावसायिक दिनेश संजय चौधरी (३०, रा. धुळे) यांना ठेक्याच्या वादातून भारतीय अन्न महामंडळाच्या चौपाळे शिवारातील गोडाऊनजवळ गाठून सात जणांनी मारहाण केल्याचा आरोप आहे. मोबाइलमध्ये शूटिंग केल्याने ते नष्ट करण्यासाठी मोबाइल फोडला. त्यांच्या फिर्यादीवरून माजी आमदार शिरीष हिरालाल चौधरी (५२), विक्रांत दिलीप मोरे (४४),…

Read More

भुसावळ : प्रतिनिधी शहरातून एक धक्कादायक बातमी समोर आली आहे. एका प्रेमी युगलाने किरकोळ वादातून जीवन संपविल्याची धक्कादायक घटना घडली असून यामुळे परिसरातून हळहळ व्यक्त करण्यात येत आहे. मिळालेल्या माहितीनुसार, भुसावळ शहरातील टिंबर मार्केट परिसरातील राहूल नगर येथे वास्तव्यास असलेल्या कुणाल मनोज भालेराव ( वय २३) याचे काजल गौतम सपकाळे ( वय २० ) या तरूणीवर प्रेम होते. या दोघांनी एकमेकांच्या सोबतीने राहण्याचा निर्णय घेतला होता. लवकरच हे दोन्ही विवाह करणार होते. शनिवारी सकाळी किरकोळ वादातून काजल सपकाळे हिने विषारी द्रव प्राशन केला. तिला तातडीने खासगी रूग्णालयात दाखल करण्यात आले. तथापि, सायंकाळी सात वाजेच्या सुमारास तिचे निधन झाले. दरम्यान, काजलच्या…

Read More

मुंबई : वृत्तसंस्था राज्यातील अनेक शहरात अपघाताची मालिका सुरु असतांना नुकतेच पालघरमध्ये एक भीषण अपघाताची घटना समोर आली आहे. चारचाकी वाहन आणि बाईकमध्ये जोरदार धडक झाली आहे. सुदैवाने या अपघातात कोणतीही जीवितहानी झालेली नाही. तीन जखमी झाले असून सर्वांवर उपचार सुरु आहे. अपघाताची ही घटना कॅमेऱ्यात कैद झाली आहे. मिळालेल्या माहितीनुसार, पालघरच्या बोईसर चिल्हार एमआयडीसी मार्गावर गुंदलेजवळ हा अपघात झाला आहे. भरधाव चारचाकी वाहनाने बाईकला धडक दिली. अपघाताची घटना चारचाकी वाहनाच्या डेस्क बोर्डवर लावलेल्या कॅमेरात कैद झाली. व्हिडीओमध्ये दिसतंय त्यानुसार, चारचाकी वाहन वेगाने धावत असताना अचानक समोर बाईक आडवी येते. https://twitter.com/pravinwakchoure/status/1753992537537405116?ref_src=twsrc%5Etfw%7Ctwcamp%5Etweetembed%7Ctwterm%5E1753992537537405116%7Ctwgr%5E4cfde292d99434e18fd9bb2e5a961ee0b6e7a0be%7Ctwcon%5Es1_&ref_url=https%3A%2F%2Fsaamtv.esakal.com%2Fmumbai-pune%2Fpalghar-accident-video-car-hit-bike-video-viral-3-injures-pvw88 वाहन चालकाने वेग कमी करुन वाहन नियंत्रणात आणण्याचा प्रयत्न…

Read More

जळगाव : प्रतिनिधी जळगाव जिल्ह्यातील अनेक ठिकाणी खूनाचा प्रयत्न, दरोडा, जबरी चोरी, दंगल, सरकारी कर्मचाऱ्यावर हल्ला व जाळपोळ करणे असे २६ गंभीर गुन्हे दाखल असलेल्या तीन जणांच्या टोळीवर हद्दपारीची कारवाई करण्यात आली. यामध्ये टोळी प्रमुख मुकेश प्रकाश भालेराव (वय २७, रा. राहुलनगर याच्यासह भरत मधुकर महाजन (वय २७, रा. शिवपूर कन्हाळा रोड) व शामल शशिकांत सपकाळे (वय २७, रा. न्यू. सातारा, भुसावळ) यांना दोन वर्षांसाठी हद्दपार करण्यात आले आहे. मिळालेल्या माहितीनुसार, जिल्ह्यातील गुन्हेगारीला रोखण्यासाठी जिल्हा पोलीस दलाकडून कठोर कारवाईचे पाऊल उचलले जात आहे. रेकॉर्डवरील सराईत गुन्हेगारांसह टोळींवर देखील कारवाई केली जात आहे. दरम्यान, भुसावळातील टोळीने – गुन्हे करणाऱ्या टोळीवर भुसावळ शहरव…

Read More

भडगाव : प्रतिनिधी मालवाहतूक वाहन अमळनेर तालुक्यातील बेटावद गावानजीक उलटल्याने गाडीतील दोनजण जखमी झाले आहेत तर गाडीचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे. मिळालेल्या माहितीनुसार, कजगाव येथील रहिवासी सुरेश चिंधा मांडोळे व संजय किसन मोरे हे आयशर गाडीने (एम.एच.१९/झेड५५६८) कजगाव येथून कापूस भरून सकाळच्या सुमारास गुजरातला जाण्यासाठी निघाले. मात्ररस्त्यातच चालकाचे गाडीवरील नियंत्रण सुटल्याने गाडी अमळनेर तालुक्यातील बेटावद गावानजीक उलटली, यात गाडीतील दोघांना मोठ्या प्रमाणावर दुखापत झाली आहे. सुदैवाने जीवितहानी झाली नाही. गाडीचे मात्र मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे. यावेळी बेटावद व त्या परिसरातील नागरिकांनी व वाहनधारकांनी जखमी दोघांना अपघातग्रस्त गाडीतून बाहेर काढले व रुग्णालयात दाखल केले.

Read More

जळगाव : प्रतिनिधी जळगाव जिल्ह्यातील विविध पोलिस ठाण्यासह नाशिक जिल्ह्यात वेगवेगळ्या प्रकारचे गंभीर गुन्हे असलेल्या दाखल रवी उर्फ माया महादेव तायडे (२५, रा. मुक्ताईनगर, जि. जळगाव) याच्यावर एमपीडीए अंतर्गत कारवाई करत स्थानबद्ध करण्यात आले. तसे आदेश जिल्हाधिकारी आयुष प्रसाद यांनी दिले. मिळालेल्या माहितीनुसार, भुसावळ बाजारपेठ, शहर, मुक्ताईनगर पोलिस ठाण्यासह नाशिक जिल्ह्यातील इगतपुरी पोलिस ठाण्यात रवी तायडे याच्यावर वेगवेगळ्या प्रकारचे ११ गंभीर गन्द्रे दाखल आहेत. मुक्ताईनगर पोलिस ठाण्याचे पोलिस निरीक्षक नागेश मोहिते यांनी त्याच्या हद्दपारीचा प्रस्ताव पाठवला. पोलिस अधीक्षक एम. राजकुमार यांच्या मार्गदर्शनाखाली प्रस्तावाचे कामकाज स्थानिक गुन्हे शाखेचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक किसन नजन पाटील, सहायक फौजदार युनूस शेख ईब्राहीम, पोहेकॉ सुनील…

Read More

चाळीसगाव : प्रतिनिधी शहरातील मालेगावरोडवरील बायपास परिसरातील एका हॉटेलमध्ये १५ वर्षीय अल्पवयीन मुलीला काम देण्याच्या बहाण्याने हॉटेल मालक व त्याच्या मित्राने तिला धमकी देत बलात्कार केल्याची घटना शनिवारी उघडकीस आली आहे. याप्रकरणी शनिवारी सायंकाळी महिलेसह तिघांना ताब्यात घेतले आहे. मिळालेल्या माहितीनुसार, परिसरातील एका अल्पवयीन मुलीला हॉटेलमध्ये काम देण्याच्या बहाण्याने बोलावून घेतले होते. त्यावेळी हॉटेलमालक आणि त्याठिकाणी उपस्थित असलेला त्याचा मित्र यांनी तिच्यावर जबरदस्ती केली. ही अल्पवयीन मुलगी एका महिलेच्या मदतीने हॉटेलवर बोलावण्यात आल्याचे पोलिस सुत्रांनी सांगितले. दरम्यान, या घटनेने तालुक्यात एकच खळबळ उडाली असून दिवसभर याच घटनेची सर्वत्र चर्चा होती. घटनेची माहिती माहिती मिळताच पोलीस उपअधिक्षक अभयसिंह देशमुख यांनी शहर…

Read More