नागपूर : वृत्तसंस्था राज्यातील अनेक शहरात तरुण व तरुणी आत्महत्या होत असल्याच्या घटना नेहमीच घडत आहे. नुकतेच नागपूरमध्ये पोलीस उपनिरीक्षकाने गळफास लावून आत्महत्या केल्याची घटना समोर आली आहे. गोपाळ गोळे असं 34 वर्षीय मृतक पोलीस अधिकाऱ्याचं नाव आहे. मानसिक तणावातून जीवन संपवलं असल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे. गिट्टीखदान पोलीस स्टेशनच्या हद्दीत पोलीस वसाहतीत ही घटना घडली आहे. गोपाल गोळे मागील तीन दिवसांपासून कार्यरत असलेल्या यशोधरानगर पोलीस ठाण्यात सुद्धा गेले नव्हते, अशी माहिती देखील समोर आली आहे. गोपाल गोळे यांच्या पत्नी मागील काही दिवसांपासून घरी नव्हत्या. मात्र मागील तीन दिवसांपासून गोळे यांचा फोन बंद असल्याने पत्नीला संशय आला. त्यानंतर गोळे…
Author: editor desk
जालना : वृत्तसंस्था राज्यातील मराठा समाजाच्या आंदोलनामुळे देशभर नाव झालेले मनोज जरांगे पाटील पुन्हा एकदा आजपासून दौऱ्यावर बाहेर पडले आहे. पुणे, मुंबई, आणि नाशिकमध्ये बैठका घेणार आहेत. आज दुपारी 12 वाजता आंतरवाली सराटीहून जरांगेंच्या दौऱ्याला सुरूवात होणार आहे. मनोज जरांगे पाटील आजपासून मुंबई, पुणे, नाशिकच्या दौऱ्यावर असणार आहेत. आज मनोज जरांगे आंतरवाली सराटीमधून निघतील. त्यांचा आळंदी देवाचीमध्ये मुक्काम असणार आहे. 7 फेब्रुवारीला नवी मुंबईतल्या कामोठेमध्ये सकाळी त्यांचा कार्यक्रम असेल. तर संध्याकाळी दादरमधल्या शिवाजी मंदिरातल्या कार्यक्रमाला जरांगे उपस्थित राहणार आहेत. 8 फेब्रुवारीला सटाण्यात तर 9 फेब्रुवारीला बीडमध्ये जरांगेंचा दौरा असणार आहे. 10 फेब्रुवारीला अंतरवाली सराटीमध्ये सकाळी 10 वाजता मराठ्यांची बैठक घेऊन…
जळगाव : प्रतिनिधी शहरातील तांबापुरा परिसरातील खदानीजवळ चॉपर घेऊन दहशत माजविणाऱ्या दोघांपैकी पळून गेलेल्या मोहम्मद शोएब शेख सलीम उर्फ रफत हा शहरात येताच सोमवार, दि. ५ फेब्रुवारी रोजी एमआयडीसी पोलिसांनी त्याच्या तांबापुरा परिसरातून मुसक्या आवळल्या. मिळालेल्या माहितीनुसार, एमआयडीसी पोलिसांनी रईस शेख रशिद याला चॉपरसह ताब्यात घेतले होते. त्याचा साथीदार मोहम्मद शोएब शेख हा फरार झाला होता. तो सोमवार, दि. ५ फेब्रुवारी रोजी तांबापुरा परिसरात आला असल्याची माहिती पोलिस निरीक्षक बबन आव्हाड यांना मिळाली. सहायक फौजदार अतुल वंजारी, पोलिस नाईक सचिन पाटील, किशोर पाटील, ललित नारखेडे यांनी पहाटे ५ वाजेच्या सुमारास मोहम्मद शोएब शेख सलीम उर्फ रफत याला अटक केली. रफत…
जळगाव : प्रतिनिधी शहरापासून नजीक असलेल्या गावात पती कामावर गेलेला असताना घरात एकटीच असलेल्या मनीषा लहू मोरे (२५) या विवाहितेने गळफास घेऊन आत्महत्या केली. घराचा दरवाजा उघडाच असल्याने शेजारच्या मंडळींना विवाहितेचा मृतदेह दिसला. त्यावेळी तिच्या पतीला माहिती देत मृतदेह शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात नेण्यात आला. ही घटना सोमवार, ५ फेब्रुवारी दुपारी साडेबारा वाजता उघडकीस आली. या प्रकरणी तालुका पोलिस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. मिळालेल्या माहितीनुसार, तालुक्यातील आव्हाणे येथे मजुरी करणारे लहू मोरे हे पत्नी मनीषा व तीन वर्षीय मुलीसह राहतात. सोमवार, ५ फेब्रुवारी रोजी सकाळी ते कामावर गेले होते. त्यावेळी घरात एकटीच असलेल्या मनीषा मोरे या…
भुसावळ : प्रतिनिधी यावल-भुसावळ रस्त्यावर घोडेपीर बाबांच्या दग्र्याजवळ रविवारी सायंकाळी गुजरात राज्याच्या अमली पदार्थविरोधी पथकाने (एनसीबी) ड्रग तस्कर तरुणाला पकडले, हा तरुण कारव्दारे आला होता. त्याच्यासोबतचे तीन साथीदार पसार झाले. त्यांच्याकडून एक पिस्तूलसह इतर काही साहित्य हस्तगत करण्यात आले. मिळालेल्या माहितीनुसार, सुरत येथील मोबीन शाह हा कारने (जी. जे.०५ /आर. एम.८४८०) आला होता. आपल्या मित्रांसोबत तो दर्याबाहेर बसला होता. त्याच्या मागावर गुजरात राज्याचे अमली पदार्थविरोधी पथक होते. रविवारी सायंकाळी साडेपाच वाजता हे पथक येथे दाखल झाले आणि त्यांना पाहून मोबीन शाह पळून जाण्याच्या प्रयत्नात होत होता. मात्र पोलिसांनी त्याच्यावर पिस्तूल रोखले आणि त्यास ताब्यात घेतले. शाह याच्याकडून पोलिसांच्या पथकाने एक…
मुंबई : वृत्तसंस्था राज्यातील शिंदे, फडणवीस व पवार सरकारच्या मंत्रिमंडळाची महत्त्वाची बैठक आज मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली पार पडली. या बैठकीच जनहिताचे तब्बल २० निर्णय घेण्यात आले आहेत. मुंबईकरांना यामध्ये खूशखबर मिळाली आहे. मुंबईकरांना यावर्षी सुद्धा मालमत्ता कर वाढ नाही. याशिवाय शेतकरी आणि वयोवृद्धांसाठीदेखील महत्त्वाचे निर्णय घेण्यात आले आहे. मंत्रिमंडळात कोणते निर्णय घेण्यात आले यावर एक नजर टाकूया. मुंबईकरांना यावर्षी सुद्धा मालमत्ता कर वाढ नाही. (नगरविकास विभाग) राज्यात नमो महारोजगार मेळावे आयोजित करणार. 2 लाख रोजगार, स्वयंरोजगार निर्माण करणार. (कौशल्य विकास विभाग) ज्येष्ठ नागरिकांसाठी शासन संवेदनशील. मुख्यमंत्री वयोश्री योजनेतून 65 वर्षावरील नागरिकांना लाभ देणार. (सामाजिक न्याय विभाग) राज्यातील सर्व…
धुळे : वृत्तसंस्था महाराष्ट्र राज्यात प्रतिबंधित असलेला गुटखा व पण मसाल्याचा मोठा साथ शिरपूर पोलिसांनी हस्तगत केला आहे. अवैधपणे गुटख्याची वाहतूक करणाऱ्या वाहनांमधून कोट्यवधींचा गुटखा जप्त करत आरोपींच्या पोलिसांनी मुसक्या आवळल्या आहे. या माहितीच्या आधारे सापळा रचत पोलिसांनी कारवाई केली. जवळपास वीस लाखांचा गुटखा व पानमसाला पोलिसांनी जप्त केला आहे. या कारवाईत दोघाच्या मुसक्या पोलिसांनी आवळल्या आहेत. दोन कोटी चोपन्न लाख रुपयांचा गुटखा व पानसुपारी सुपारी शिरपूर पोलिसांनी जप्त केली आहे. यात पहिल्या कारवाईत इंदोरकडून धुळ्याकडे येणाऱ्या वाहनातून गुटखा व पान मसाल्याची अवैध वाहतूक होत असल्याची गुप्त माहिती पोलिसांना मिळाली होती. या माहितीच्या आधारे सापळा रचत पोलिसांनी कारवाई केली. जवळपास…
जळगाव : प्रतिनिधी जिल्ह्यातील पोलीस अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनी मला एक दिलाने साथ दिल्यामुळे आणि कर्तव्यासाठी त्यांनी दिलेली समर्पणाची भावना हेच माझ्या जळगाव पोलीस दलाच्या यशाचे गमक असल्याचे प्रतिपादन मावळते पोलीस अधीक्षक एम राजकुमार यांनी दि.४ रोजी जळगावात केले. मावळते पोलीस अधीक्षक एम राजकुमार यांना निरोप देण्यात येऊन त्यांची सपत्नीक मिरवणूक काढण्यात आली जिल्हा पोलीस अधीक्षक कार्यालयात आयोजित निरोप समारंभात बोलताना एम राजकुमार म्हणाले की जिल्ह्यात एम पी डी एफ सारख्या ५६ कारवाया झाल्यावर दंगली सारख्या प्रसंगांना वेळीस नियंत्रणात आणता आले असे मनोगत एम राजकुमार यांनी व्यक्त करून जळगाव जिल्हा पोलीस दलाचे कौतुक केले त्यांची सोलापूरचे पोलीस आयुक्त म्हणून पदोन्नतीने बदली…
वर्धा : वृत्तसंस्था राज्यातील अनेक शहरात प्रेमियुगुलांच्या अनेक घटना घडत असतांना एक धक्कादायक घटना वर्धा जिल्ह्यातून आली आहे. पारडी गावातील घटना कारंजा तालुक्यातील पारडी गाव सध्या सुन्न झालंय. कारण गावात एक धक्कादायक घटना घडली आहे. वर्धा जिल्ह्यातील कारंजा (घाडगे) तालुक्यातील पारडी येथील प्रेमीयुगुलाने काही दिवसांपूर्वी पलायन केलं होतं. याप्रकरणी मुलीच्या पालकांनी तळेगाव पोलिसांत तक्रार दाखल केली होती. त्या दोघांचेही मृतदेह शेतातील विहिरीत कुजलेल्या अवस्थेत आढळून आले आहेत. त्यामुळे परिसरात एकच खळबळ उडाली आहे. पारडी येथील रहिवासी हर्षल बाबा वाघाडे (२२) याने गावातीलच एका १७ वर्षीय मुलीला २२ जानेवारीला फुस लावून पळवून नेलं होतं. मुलीच्या कुटुंबीयांनी एक दिवस सर्वत्र शोध घेतला.…
यवतमाळ : वृत्तसंस्था राज्यातील यवतमाळ जिल्ह्यातील पुसद तालुक्यातून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. क्रिकेटचे पीच तयार करण्यासाठी आणलेल्या सिमेंटचा पाईपखाली दबून चौथीत शिकणाऱ्या विद्यार्थ्याचा मृत्यू झाल्याची दुर्देवी घटना घडली. यात आर्यन जयेश चव्हाण (वय १०) असे मृत विद्यार्थ्याचे नाव आहे. या घटनेमुळे मोठी हळहळ व्यक्त होत आहे. मिळालेल्या माहितीनुसार, वडसद येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेत चौथीच्या वर्गात शिक्षण घेणाऱ्या आर्यन हा त्याचे वडील इंदापूर येथील रहिवासी असून आई-वडील ऊस तोडीवर गेले असता त्यांनी मुलाला आपल्या आजी-आजोबाकडे शिक्षणासाठी ठेवले होते. शनिवारी (३ फेब्रुवारी) शाळा सुटल्यानंतर आर्यन आपल्या मित्रांसोबत खेळण्यासाठी शेतशिवारात गेला. त्याठिकाणी काही तरुणांनी क्रिकेटची पीच तयार करण्यासाठी मोठा सिमेंटचा…

