Author: editor desk

जळगाव : प्रतिनिधी महाराष्ट्र राज्यात योग स्थापन करण्याच्या मागणीसह इतर मागण्यांसाठी महाराष्ट्र योग शिक्षक संघाच्या वतीने बुधवार ७ फेब्रुवारी रोजी दुपारी १२ वाजता जिल्हाधिकारी कार्यालयात जिल्हा प्रशासनाला निवेदन देण्यात आले आहे. महाराष्ट्र योग शिक्षक संघाच्या वतीने दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, महाराष्ट्र योग शिक्षक संघाच्या वतीने आजपर्यंत महाराष्ट्रातील सर्व आमदार, खासदार तसेच जिल्हाधिकारी यांना महाराष्ट्र योग शिक्षक संघाच्या वतीने शिक्षकांच्या हित संबंधाच्या विविध मागण्यांचे निवेदन देण्यात आलेले आहे. महाराष्ट्र राज्यात योग स्थापन व्हावा यासाठीची प्रमुख मागणी आहे. गुजरात, हरियाणा व राजस्थान या राज्याप्रमाणे महाराष्ट्र राज्यात देखील योग आयोग स्थापन करावा, अशी मागणी करण्यात आली आहे. यापूर्वी २८ ऑक्टोबर २०२३ रोजी…

Read More

लातूर : वृत्तसंस्था लातूरमधील गुन्हेगारी कमी व्हावी यासाठी पोलिसांनी बोकडाचा बळी दिल्याची चर्चा जिल्ह्यात सुरु आहे. पोलिसांनी मात्र सध्या सुरु असलेल्या चर्चांमध्ये तथ्य नसल्याचं सांगितलं आहे. याबाबतची काही फोटो देखील व्हायरल झाले आहेत. मिळालेल्या माहितीनुसार, लातूर जिल्ह्यातल्या उदगीर ग्रामीण पोलीस ठाण्याच्या गेटवर बकऱ्याचा बळी देतानाच एक फोटो सध्या व्हायरल होतो आहे. पोलीस ठाण्याच्या हद्दीत गुन्हेगारी वाढू नये म्हणून पोलिसांनीच ठाण्याच्या गेटवरच बकऱ्याचा बळी दिला असल्याची चर्चा सुरु झाली आहे. पोलीस अधिकारी मात्र ही बाब आम्हाला माहीतच नाही, असं सांगत आहेत. मात्र पोलीस खरं बोलत आहेत तर नेमका हा प्रकार कुणी आणि का केला असावा याबाबत तर्कवितर्क लावले जात आहेत. या…

Read More

मुंबई : वृत्तसंस्था केंद्रीय निवडणूक आयोगाकडून राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे नाव आणि चिन्हावर निकाल जाहीर करत मोठा आणि ऐतिहासिक असा निर्णय दिला आहे. निवडणूक आयोगाने उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या गटाला राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचं नाव आणि घड्याळ चिन्ह दिले आहे. याच निकालाच्या पार्श्वभूमीवर आता शरद पवार गटाचे नेते, जितेंद्र आव्हाडांनी काही ट्विट करत अजित पवारांवर निशाणा साधला आहे. ‘जो नाही झाला काकांचा, तो काय होणार लोकांचा’ असे पोस्ट करत आव्हाड यांनी अजित पवार यांच्यावर टीका केली आहे. दरम्यान दुसऱ्या ट्विटमध्ये जितेंद्र आव्हाड म्हणाले की, भीड में रहकर भी तनहा कौन है, ये तो झुठे से झुठा भी बतादेगा सच्चा कौन हैं |…

Read More

पारोळा : प्रतिनिधी राष्ट्रीय महामार्ग क्रमांक ६ वरील विचखेडा गावाजवळ महामार्गाचे काम सुरू असताना डंपरने अचानक ब्रेक मारल्याने त्यावर बस धडकली. बसच्या मागे मॅटेडोर व तिच्यामागे बस अशा चार गाड्यांचा विचित्र अपघात झाला. या अपघातात २० जण जखमी झाले. ही घटना ५ रोजी दुपारी १२ वाजेच्या सुमारास घडली. अपघातानंतर घटनास्थळी मोठी गर्दी जमा झाली होती. जखमींना पारोळा कुटीर रुग्णालयात दाखल करण्यात आले. मिळालेल्या माहितीनुसार, ५ रोजी दुपारी विचखेडे गावानजीक जळगाव- नवसारी बस (एमएच४०/एन९८३०) पुढे असलेल्या डंपर चालकाने अचानक ब्रेक मारल्याने मागून धडकली. त्यानंतर मागून येणारी मॅटेडोर (एमएच१५/एफव्ही५९८३) ही बसवर धडकली. मागून येणारी ठाणे भिवंडी बस (एमएच२०/बीएल१५४०) ही मॅटेडोरवर धडकली. खमींना…

Read More

नंदुबार : वृत्तसंस्था राज्यातील अनेक शहरात छोट्या मोठ्या कारणाने गुन्हेगारी वाढू लागली असतांना नुकतेच नंदुरबार जिल्ह्यात देखील एक घटना घडली आहे. आपल्या प्रेयसीसोबत बोलत असल्याच्या संशयातून एकाने रिक्षा चालकावर चाकूने हल्ला करून जखमी केले. पोहरा (ता. अक्कलकुवा) शिवारात ४ फेब्रुवारी रोजी सायंकाळी साडेसहा वाजता ही घटना घडली होती. जखमीवर जिल्हा रुग्णालयात उपचार सुरू आहेत. नितेश तुळशीदास तडवी (रा. पोहरा) असे हल्ला झालेल्या रिक्षाचालकाचे नाव आहे. मिळालेल्या माहितीनुसार, नितेश हा रविवारी सायंकाळी रिक्षा घेऊन अक्कलकुवा येथून पोहरा गावाकडे जात असताना रोशन सौंदऱ्या वसावे (२८) व वेच्या दिलवर तडवी (२७, दोघे रा. पोहरा, ता. अक्कलकुवा) यांनी त्यास अडवले होते. यावेळी रोशन वसावे…

Read More

धुळे : वृत्तसंस्था बैलाने शिंग मारल्याने गंभीर जखमी झालेल्या प्रौढाचा उपचार घेताना मृत्यू झाला. ही घटना धुळे तालुक्यातील मुकटी गावात २४ जानेवारी रोजी घडली होती. राजेंद्र भावराव सोमवंशी (वय ५७, रा. सवाई मुकटी, ता. शिंदखेडा) असे मयत व्यक्तीचे नाव आहे. मिळालेल्या माहितीनुसार, शिंदखेडा तालुक्यातील सवाई मुकटी गावात राजेंद्र भावराव सोमवंशी यांचे वास्तव्य आहे. गाव शिवारातच शेतात त्यांचे बैल आहेत. शेतीची कामे सुरू असताना अचानक बैलाने शिंग मारल्याने राजेंद्र सोमवंशी यांना दुखापत झाली. घटना घडताच परिसरात काम करणाऱ्यांनी धावत येत त्यांना बैलापासून सोडविले. गंभीर अवस्थेत त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले. अधिक उपचारासाठी त्यांना धुळ्यातील हिरे वैद्यकीय महाविद्यालयात दाखल करण्यात आले होते.…

Read More

जळगाव : प्रतिनिधी शहरातील अनेक परिसरात चोरीच्या घटना नेहमीच घडत असतांना दि.२५ रोजी हरीविठठल नगर परिसरातून २ बोकड व २ बकरी चोरी झाल्या होत्या. याप्रकरणी रामानंद नगर पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला होता. याबाबत पोलिसांनी तपासाची सूत्रे फिरवीत तीन बकरी चोरांना ताब्यात घेतले आहे. मिळालेल्या माहितीनुसार, जळगाव शहरातील हरीविठठल नगर परीसरात राहणारे विजयकुमार नंदलाल कुमावत यांचे राहते घरासमोरुन दि. २५/१०/२०२३ रोजी ०२ बोकड व ०२ बकरी असा एकुण ३९,०००/- रुपये किमतीचा मुददेमाल चोरुन नेला होता. सदर बाबत विजयकुमार कुमावत यांनी रामानंद नगर पोस्टेस गुन्हा दाखल करण्यात आले नंतर सपोनि विठठल पाटील, प्रभारी अधिकारी रामानंद नगर पो.स्टे. यांनी सदर उपविभागीय पोलीस…

Read More

जळगाव : प्रतिनिधी भाजपाचे आमदार गणपत गायकवाड यांनी दिवसाढवळ्या पोलीस स्टेशनमध्ये गोळीबार केला असे असताना सुद्धा राज्य सरकार त्यांना पाठीशी घालत असून कोणतीच कारवाई केली नसल्यामुळे युवा सेना जळगाव तर्फे आमदार गायकवाड व राज्य शासनाचा निदर्शने करून जाहीर निषेध करण्यात आला. भारतीय जनता पार्टीच्या आमदार पदाधिकारी यांनी दिवसाढवळ्या चालवलेल्या गुंडगिरी विरोधात सरकार फक्त बघ्याची भूमिका घेत असून कुठलीच कारवाई करत नसल्यामुळे हा महाराष्ट्र आहे की बिहार असा प्रश्न सर्वसामान्यांना पडतो याचा निषेध करण्यासाठी युवा सेना जळगाव तर्फे राज्य शासनाचा तीव्र शब्दात निषेध करण्यात आला. यावेळी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी नैतिकतेच्या आधारावर राजीनामा द्यावा अशी भूमिका मांडण्यात…

Read More

जळगाव : प्रतिनिधी शहरातील एका खूनाच्या गुन्ह्यात संशयित म्हणून जिल्हा कारागृहात असलेल्या एका कैद्याचा शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात उपचारादरम्यान मृत्यू झाल्याची घटना घडली आहे. याप्रकरणी जिल्हापेठ पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. यात भीमा उर्फ पंकज अशोक वाणी (वय-४०) असे मयत झालेल्या तरूणाचे नाव आहे. मिळालेल्या माहितीनुसार, जळगाव शहरातील शनीमंदीर परीसरातील एका पत्त्याच्या क्लबमध्ये दि.१८ एप्रिल २०१७ रोजी प्रविण उर्फ नितीन सुरेश माळी या तरूणाच्या डोक्यात दगड टाकून हत्या करण्यात आली होती. प्रकरणात पंकज वाणी हा मुख्य संशयित आरोपी म्हणून जिल्हा कारागृहात बंदीवान कैदी होता. या प्रकरणात संशयित म्हणून पंकज वाणी आणि राहूल सपकाळे यांना अटक करण्यात आली होती.…

Read More

मुंबई : वृत्तसंस्था राज्यातील भाजप आमदाराने शिंदे गटाच्या नेत्यावर गोळीबार केल्याची घटना ताजी असतांना आता ठाकरे गटाचे संजय राऊत यांनी अनेक आरोप सरकारवर केले आहे तर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा पुण्यातील एका गुंडासोबतचा फोटो समोर आला आहे. ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी हा फोटो ट्विट करून महाराष्ट्रात गुंडा राज सुरू असल्याचा हल्लाबोल केला आहे. संजय राऊत यांचे ट्विट नेमके काय? संजय राऊतांनी ट्वीट करत लिहिलं आहे की, ‘महाराष्ट्रात गुंडा राज! गुंड आणि दरोडेखोरांनी गुंडांसाठी चालविलेले राज्य! हे महाशय कोण आहेत? त्यांचे नेमके कर्तुत्व काय याचा खुलासा गृहमंत्री आणि पुणे पोलीस आयुक्तांनी करावा.कायद्याचे राज्य असे असते काय? पुणे संस्कृती आणि…

Read More