उल्हासनगर : वृत्तसंस्था राज्यातील अनेक जिल्ह्यात खुनाच्या घटना नेहमीच घडत असतांना उल्हासनगर मध्ये आज गुरुवार पहाटे एका युवकाची निर्घृण हत्या झाल्याची घटना समाेर आली आहे. प्राथमिक माहितीनूसार डोळ्यात मिरचीचा स्प्रे मारून युवकास मारहाण करण्यात आली. त्यानंतर त्याच्या डोक्यात कडप्पा लादी घालून त्याची हत्या करण्यात आली. राहुल महेंद्र जयस्वाल (वय 25) असे मृत युवकाचे नाव असल्याचे पाेलिसांनी सांगितले. ही घटना उल्हासनगर कॅम्प क्रमांक तीन भागात असलेल्या इमलीपाडा परिसरात आज पहाटेच्या सुमारास घडली. राहुल जयस्वाल हा इमलीपाडा परिसरात आला हाेता. त्यावेळी काही तरुणांनी त्याला घेरले आणि त्याच्या डोळ्यात मिरची स्प्रे मारून त्याला मारहाण केली. तरुणांनी त्याच्या डोक्यात कडप्पा लादी घालून त्याची निर्घृण…
Author: editor desk
अमळनेर : प्रतिनिधी तालुक्यातील एका गावात शुल्लक कारणाच्या संशयावरून एका तरूणाला धारदार चाकूने वार करून दुखापत केली. तर घरातील साहित्य तोडून तरूणाच्या पत्नीच्या गळ्यातील सोन्याचे पोत तोडून नुकसान केल्याची घटना मुंगसे गावात मंगळवार ६ फेब्रुवारी रोजी रात्री १० वाजता घडली आहे. याप्रकरणी अमळनेर पोलीस ठाण्यात ६ जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मिळालेल्या महितीनुसार, तालुक्यातील मुंगसे गावातील रहिवासी प्रदीप मच्छिंद्र कोळी (वय-३४) आपल्या परिवारासह वास्तव्याला आहे. प्रदीप कोळी हा गावात जागेबाबत अर्जफाटे करत असल्याच्या किरकोळ करणाच्या संशयावरून मंगळवार ६ फेब्रुवारी रोजी रात्री १० वाजता गावात राहणारे भरत मोतीलाल कोळी, मोतीलाल आधार कोळी, चुनीलाल आधार कोळी, प्रवीण भाऊलाल कोळी, गोपाल प्रकाश…
नाशिक : वृत्तसंस्था मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील आता महाराष्ट्र दौऱ्यावर बाहेर पडले आहे. आज मंत्री छगन भुजबळ यांच्या नाशिक या बालेकिल्ल्यात त्यांची तोफ धडाडणार आहे. नाशिक जिल्ह्यातील दिंडोरी, कळवण, बागलाण, मालेगाव, नांदगाव येथे ते भेट देणार आहेत. यावेळी मराठा समाजाकडून ठिकठिकाणी त्यांचे जल्लोषात स्वागत केले जाण्याची शक्यता आहे. याशिवाय जरांगे साडेतीन शक्तीपीठांपैकी आद्यपीठ असलेल्या सप्तशृंगी देवीचे दर्शनही घेणार आहेत. मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावरून गेल्या काही दिवसांपासून छगन भुजबळ आणि मनोज जरांगे यांच्यात संघर्ष निर्माण झाला आहे. दोन्ही नेते एकमेकांवर टीका करत असल्याचे पाहायला मिळत आहे. विशेष म्हणजे मनोज जरांगे यांच्या मागण्या मान्य करत सरकराने काढलेल्या अध्यादेशाला देखील भुजबळ यांनी विरोध…
नांदेड : वृत्तसंस्था जिल्ह्यातील लोहा तालुक्यातील कोष्टवाडी येथे बाळूमामाच्या मेंढ्या गावात आल्या असताना गावकऱ्यांच्या वतीने महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले होते. ६ फेब्रुवारी रोजी रात्री आरतीनंतर दहा वाजता एकादशीनिमित्त महाप्रसादात उपवासाच्या भगरीसोबत शेंगदाणे, आलूची कढी खाल्ल्यामुळे दोन ते अडीच हजार भाविकांना विषबाधा झाल्याची घटना घडली आहे. बाळूमामाच्या पालखीचा प्रसाद घेऊन घरी परतल्यावर रात्री एकच्या सुमारास अनेकांना चक्कर येणे, उलट्या, अंगात थरथर होणे सुरू झाले. सावरगाव, मस्की, माळाकोळी, हरणवाडी, रिसनगाव, हुलेवाडी, करेवाडी, आष्टुर, मुरंबी व परिसरातील गावातून भेटेल त्या वाहनाने अनेक रुग्ण उपजिल्हा रुग्णालय लोहा येथे दाखल झाले. मात्र, रुग्णालयाची एवढ्या बेडची क्षमता नसल्यामुळे पोलिस तसेच स्थानिक प्रशासनाची धावपळ झाली. यातील काही…
धुळे : वृत्तसंस्था तालुक्यातील वडणे (बुरझड) गावात मंगळवारची रात्र एका कुटुंबासाठी काळरात्र ठरली. मध्यरात्री साडेबाराच्या सुमारास घराचे छत कोसळून झालेल्या दुर्घटनेत प्रवीण भगवान पाटील (वय ४५) व मुलगा गणेश (वय १३) या पिता-पुत्रांना प्राण गमवावे लागले. तर प्रेरणा पाटील (४१) यांच्यासह मुलगी भूमी (१७) व हेमांगी (१५) या जखमी झाल्या असून, त्यांच्यावर उपचार सुरू आहे. धुळे तालुक्यातील वडणे येथील प्रवीण पाटील हे मंगळवारी कुटुंबीयांसोबत घरात झोपले होते. मध्यरात्रीच्या सुमारास मातीचे छत कोसळले. त्यामुळे संपूर्ण पाटील परिवार मातीच्या ढिगाऱ्याखाली दाबला गेला. छत पडल्याचा आवाज आल्याने, ग्रामस्थ मदतीला धावले, सर्वांना खासगी वाहनांनी धुळे येथील खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले. तपासणी करणाऱ्या वैद्यकीय…
मुंबई : वृत्तसंस्था मुंबई-गोवा महामार्गावर महाडनजीक मंगळवारी रात्री दीड-दोनच्या सुमारास सर्व प्रवासी निद्राधीन असताना अचानक धावत्या बसच्या टावरला आग लागली. एका विद्यार्थ्याने दाखवलेल्या प्रसंगावधानामुळे १९ प्रवाशांसह २२ जणांचे प्राण वाचल्याची घटना घडली. या तरुणाच्या लक्षात येताच त्याने चालकाला त्याची कल्पना दिली. बस थांबवण्यास भाग पाडले आणि बसमध्ये झोपलेल्या प्रवाशांना उठवून खाली उतरवले. तेवढ्यात आगीचा भडका उडाला आणि अवघी बस आगीच्या भक्ष्यस्थानी पडली. या विद्यार्थ्यांचे नाव आर्यन भाटकर असे असून, त्याने समयसूचकता दाखवली नसती, तर काय झाले असते, याची कल्पनाही काळजाचे ठोके चुकवणारी आहे. मिळालेल्या माहितीनुसार, ही प्रवासी बस रत्नागिरी येथील हरिश्चंद्र चव्हाण यांच्या ‘औदुंबर छाया ट्रॅव्हल्स’ची असून, ती त्यांनी गौरव…
जळगाव : प्रतिनिधी अजित पवार यांच्या गटाला निवडणुक आयोगाने राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष आणि चिन्ह मिळाल्याचा निषेध करण्यासाठी शरद पवार गटाकडून आंदोलन करण्यात आले. यावेळी त्यांनी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याविषयी आक्षेपार्ह वक्तव्य केल्याप्रकरणी जिल्हाध्यक्ष अॅड. रविंद्र पाटील यांच्यासह कार्यकर्त्यांविरुद्ध रामानंद नगर पोलिसात अदखपात्र गुन्हा दाखल करण्यात आला आहे. निवडणूक आयोगाने राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष आणि पक्षाचे चिन्ह हे अजित पवार यांच्या मालकीचा असल्याचा निर्णय दिला आहे. निवडणूक आयोगाने दिलेल्या निर्णयाच्या विरोधात राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाच्या वतीने निषेध व्यक्त करण्यात आला. शरद पवार गटाचे जिल्हाध्यक्ष रवींद्र भैय्या पाटील यांच्या नेतृत्वात आकाशवाणी चौकातील राष्ट्रवादी कार्यालयासमोरील प्रांगणात बुधवारी दुपारी १२ वाजता निषेध आंदोलन करण्यात…
चाळीसगाव : प्रतिनिधी चारचाकीतून आलेल्या पाच जणांनी भाजपचे माजी नगरसेवक बाळासाहेब मोरे यांच्यावर अंदाधुंद गोळीबार केल्याची धक्कादायक घटना बुधवार दि. ७ जानेवारी रोजी सायंकाळी पाच वाजेच्या सुमारास हनुमानवाडी परिसरात घडली. यामध्ये बाळासाहेब मोरे हे गंभीर जखमी झाले असून त्यांना उपचारार्थ नाशिक येथे हलविण्यात आले आहे. या घटनेमुळे चाळीसगावात खळबळ माजली असून ही संपुर्ण घटना सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाली आहे. मिळालेल्या माहितीनुसार, शहरातील भाजपचे माजी नगरसेवक बाळासाहेब मोरे हे त्यांच्या रेल्वे स्थानकाजवळील हनुमानवाडीतील कार्यालयात नेहमीप्रमाणे बसले होते. सायंकाळी पाच वाजेच्या सुमारास चारचाकी वाहनाने पाच जण कार्यालयाच्या बाहेर आले. गाडीतून उतरताच ते श्री. मोरे यांच्या कार्यालयात शिरले आणि समोर बसलेल्या मोरे यांच्यावर…
प्रेमियुगुलाना नेहमी आकर्षण असलेले दिवस म्हणजेच ‘व्हॅलेंटाईन वीक’ हा आठवडा गेल्या ७ फेब्रुवारी पासून रोज डे म्हणून साजरा होत असतो. या आठवड्याचा दुसरा दिवस प्रपोज डे म्हणून साजरा केला जातो. नावाप्रमाणेच, या दिवशी जोडपे एकमेकांबद्दल त्यांच्या भावना किंवा प्रेम व्यक्त करतात. तुमच्या आवडत्या व्यक्तीला तुमच्या आयुष्याचा महत्त्वाचा भाग बनवण्याचा हा एक खास प्रसंग आहे. प्रेम, आपुलकी आणि कौतुक व्यक्त करण्याची ही एक उत्तम संधी आहे. या विशेष दिवसाद्वारे, लोक त्यांच्या नात्यात पुढील पाऊल टाकण्यासाठी पुढे जातात. ज्या व्यक्तीला ते आपला जोडीदार बनवू इच्छितात त्यासमोर ते आपल्या भावना एका खास पद्धतीने व्यक्त करण्याचा प्रयत्न करतात. असे काही लोकं आहेत जे बऱ्याच…
जळगाव : प्रतिनिधी काथार (क) वाणी समाज सेवासंघ आयोजीत वाणी प्रिमियर लीग (पर्व-१) २०२४ क्रीकेट स्पर्धेचे आयोजन समाज अध्यक्ष श्री योगेश गोविंद वाणी, जीतेंद्र वाणी, गौरव वाणी, हितेश वाणी, दिपक दाळवाले यांच्या वतीने घेण्यात आल्या. या स्पर्धांच्या कालावधी २६ जाने ते २८ जानेवरी असून या स्पर्धेचे प्रमुख पाहुणे म्हणुन आमदार श्री. राजुमामा भोळे यांनी स्पर्धेचे उदघाटन केले तसेच क्रिकेट स्पर्धेत पुरूष गटात यंगर्स क्रिकेट कलब या संघाने विजयपद मिळविले तर जय ११यां संघाने उपविजेतेपद मिळवले व पुरूष विजेता संघाला ११००० रू रोख पारितोषीक व ट्रॉफी तसेच उपविजेत्या संघाला ७०००/- रू रोख पारितोषीक व ट्रॉफी. त्याचप्रमाणे महिला विजेत्या संघाला ४०००/- रू…

