जालना : वृत्तसंस्था नाशिक दौऱ्यावर असताना माझ्यासोबत घातपाताचा प्रकार करण्याचा प्रयत्न झाला. तसेच अंगावर गाडी घालण्याचा प्रयत्नही करण्यात आला, पण सुदैवाने आम्ही वाचलो, असा मोठा गौप्यस्फोट मराठा आरक्षणासाठी लढा देणारे मनोज जरांगे पाटील यांनी केला आहे. अंतरवाली सराटी येथे घेतलेल्या पत्रकारपरिषदेत ते बोलत होते. राज्य सरकारने सगेसोयरे अध्यादेशाचे तातडीने कायद्यात रुपांतर करावे, या मागणीसाठी मनोज जरांगे पाटील यांनी अंतरवाली सराटी येथे शनिवारपासून (१० फेब्रुवारी) पुन्हा आमरण उपोषण सुरू केलं. उपोषणाला बसण्याआधी त्यांनी माध्यमांशी संवाद साधला. राज्य सरकारने तातडीने विशेष अधिवेशन बोलवावं अन् सग्या-सोयऱ्यांच्या कायद्याची अंमलबजावणी करावी, अशी मागणी जरांगे पाटील यांनी केली. जोपर्यंत राजपत्रित अध्यादेशाची अंमलबजावणी होत नाही, तोपर्यंत आपण…
Author: editor desk
जळगाव : प्रतिनिधी शहरातून अनेक परिसरातून लाखो रुपये किंमतीच्या महागड्या सायकली चोरणारा सराईत रेकॉर्डवरील चोरटा जयेश अशोक राजपूत (वय १९, रा. मयुर कॉलनी) याला त्याच्या राहत्या घरातून अटक केली आहे. त्याच्याकडून चोरीच्या ७ सायकल हस्तगत करण्यात आल्या आहेत. मिळालेल्या माहितीनुसार, जळगाव शहरातील मायादेवी नगरात राहणारे योगेश बडगुजर यांची स्कॉट कंपनीची स्पीड स्टार सायकल त्यांच्या घराच्या कंपाऊंटमधून २४ जानेवारी रोजी चोरुन नेल्याची घटना घडली होती. याप्रकरणी रामानंद नगर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता. या गुन्ह्याचा तपास करीत असतांना ही सायकल पिंप्राळा परिसरातील मयूर कॉलनी येथील सराईत चोरटा जयेश राजपुत याच्याकडे असल्याची माहिती रामानंद नगर पोलीस ठाण्याचे प्रभारी सहाय्यक पोलीस…
जालना : वृत्तसंस्था राज्यात गेल्या काही महिन्यापासून मराठा समाजाला आरक्षण मिळावे यासाठी मनोज जरांगे पाटील आक्रमक झाले होते. त्यानंतर आजपासून १० फेब्रुवारी जालना जिल्ह्यातील अंतरवाली सराटी येथे आमरण उपोषणाला बसणार आहे. राज्य सरकारने सगेसोयरे अध्यादेशाची तातडीने अंमलबजावणी करावी, अशी मागणी जरांगे यांनी केली होती. यासाठी त्यांनी सरकारला ९ फेब्रुवारीपर्यंतची डेडलाईन दिली होती. मात्र, सरकारकडून अध्यादेशाची अंमलबजावणी झाली नसल्याने मनोज जरांगे यांनी आजपासून पुन्हा उपोषणाचं हत्यार उपसलं आहे. मुंबईत मराठा आंदोलक धडकण्याआधीच राज्य सरकारने तातडीने अध्यादेश काढून मराठा समाजाला कुणबी प्रमाणपत्र देण्याचे जाहीर केले होते. सगेसोयऱ्यांचा अध्यादेश निघाल्यानंतर जरांगे यांनी आपले आंदोलन मागे घेतले होते. मात्र, सरकारने जरांगे यांच्यासह मराठा समाजाची…
चाळीसगाव : प्रतिनिधी जळगाव जिल्ह्यात चाळीसगाव येथे गोळीबार प्रकरणात गंभीर जखमी झालेले भाजपचे माजी नगरसेवक महेंद्र मोरे यांचा मृत्यू झाला आहे. उपचारादरम्यान महेंद्र मोरे यांनी मध्यरात्री अखेरचा श्वास घेतला. सुरुवातीला महेंद्र मोरे यांना चाळीसगाव येथील रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं. पण ते उपचारांना साथ देत नव्हते. म्हणून त्यांना नाशिकच्या अशोक हॉस्पिटलमध्ये हलवण्यात आलं होतं. तिथे त्यांच्यावर उपचार सुरु असताना प्राणज्योत मालवली. 7 फेब्रुवारीला महेंद्र मोरे हे आपल्या कार्यालयामध्ये बसलेले असताना त्यांच्यावर अंदाधुंद गोळीबार करण्यात आला होता. या गोळीबारात महेंद्र मोरे हे गंभीरित्या जखमी झाले होते. चाळीसगाव शहरातील हनुमान वाडी या ठिकाणी हा गोळीबार झाला होता. या प्रकरणात चाळीसगाव शहर पोलिसांनी…
जळगाव : प्रतिनिधी येथील शिरसोली रस्त्यावर असणाऱ्या रायसोनी इन्स्टिट्यूटच्या महाविद्यलयातील काही विद्यार्थिनींचे फोटो काढत असल्याच्या संशयावरून एका रिक्षाचालकाला तरुणांनी बेदम चोप दिल्याची घटना शुक्रवारी ९ फेब्रुवारी रोजी दुपारी २ वाजेच्या सुमारास घडली आहे. यावेळी संतप्त तरुणांनी रिक्षाची तोडफोड करीत रिक्षा उलटवून दिली. याप्रकरणी एमआयडीसी पोलीसानी घटनास्थळी धाव घेत परिस्थिती – नियंत्रणात आणली. रिक्षाचालकाला पोलीस स्टेशनला नेण्यात आले आहे. मिळालेल्या माहितीनुसार, रायसोनी इन्स्टिट्यूटची विविध महाविद्यालये शिरसोली रस्त्यावर आहे. या महाविद्यालयात शेकडो मुले मुली प्रवेशित आहेत. दरम्यान गेल्या दीड वर्षांपासून मुले-मुलींसाठी महाविद्यालयाची बस – नसल्याने विद्यार्थ्यांचे मोठे हाल होत आहेत. बसअभावी विद्यार्थ्यांना रिक्षाचाच पर्याय आहे. याचाच एका तांबापुरा येथील रिक्षाचालकाने गैरफायदा घेत…
यावल : प्रतिनिधी तालुक्यातील दहिगाव येथे दंगल उसळली होती. डीवायएसपी व त्यांच्या पथकाला धक्काबुक्की करण्यात आली. यात दोन्ही गटांतील तब्बल ५० ते ६० जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पाच ते सहा जणांना ताब्यात घेण्यात आले आहे. गावात ४८ तासांसाठी संचारबंदी लागू करण्यात आली आहे. मिळालेल्या माहितीनुसार, दहिगाव येथे बुधवारी रात्री मिरवणूक काढण्यात आली होती. या मिरवणुकीची सांगता झाल्यानंतर फलक विटंबनेच्या संशयावरून दोन गटात वाद झाला. यावर अपर पोलिस अधीक्षक अशोक नखाते, फैजपूरच्या डीवायएसपी अन्नपर्णा सिंग. पोलिस निरीक्षक राकेश माणगावकर यांनी जमावाला शांत केले. या प्रकरणात निष्पाप तरुणांना पोलिसांनी ताब्यात घेतल्याच्या निषेधार्थ गुरुवारी एका गटातील महिला व पुरुषांनी पोलिस ठाण्यासमोर…
चाळीसगाव : प्रतिनिधी तालुक्यातील गणेशपूर येथील जिल्हा बँक शाखेचे मॅनेजर व कर्मचाऱ्याला खेळण्यातील बंदुकीचा धाक दाखवून त्यांच्याकडील १५ हजार रुपयांची रोकड दोन अज्ञातांनी हिसकावून नेली. ही घटना शुक्रवारी सकाळी १०:३० वाजेच्या सुमारास खडके पुलानजीक घडली. यावेळी मॅनेजर यांना लोखंडी रॉडने मारहाण करण्यात आली. त्यात ते जखमी झाले. मिळालेल्या माहितीनुसार, जिल्हा बँक शाखेचे मॅनेजर किसन विश्वनाथ भवर व कर्मचारी महेश दत्तात्रय पाटील हे खडकी येथून मोटारसायकलने गणेशपूर शाखेवर जात होते. खडकीजवळील पुलाचे काम चालू असल्याने वळण रस्त्यावरील निर्जन ठिकाणी मोटारसायकलवर तोंडावर पट्टी बांधलेल्या दोन अज्ञात युवकांनी त्यांना खेळण्यातील बंदुकीचा धाक दाखविला. त्यांच्याजवळील बॅग हिसकावण्याचा प्रयत्न केला. बँक मॅनेजर भवर हे बॅग…
जळगाव : प्रतिनिधी मूळजी जेठा महाविद्यालयाचे वार्षिक स्नेहसंमेलन चैतन्य २०२४ चे आयोजन दिनांक ९ व १० फेब्रुवारी या दरम्यान करण्यात आलेले आहे. या स्नेहसंमेलनात विविध कला प्रकारांसाठी 22 समित्या स्थापन करण्यात आलेल्या आहेत. दि. ६ ते ८ फेब्रुवारी दरम्यान विविध वेशभूषा समितीच्या वतीने विद्यार्थ्यांसह शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांसाठी दि. ६ रोजी पारंपरिक वेशभूषेसह महाविद्यालयातील बहुसंख्य विद्यार्थी व विद्यार्थिनी हे सावित्रीबाई फुले,महात्मा फुले, डॉ.आनंदीबाई जोशी, रमाबाई आंबेडकर, लोकमान्य टिळक, राजमाता जिजाऊ, छत्रपती शिवाजी महाराज, भगतसिंग, राजगुरू, सुखदेव, आदिवासी समाजातील वेशभूषेसह महाविद्यालयीन परिसरात समाज सुधारकांच्या वेशभूषेत उपस्थित होते. या तीनदिवसीय स्पर्धेत ३८० विद्यार्थी, ७८ शिक्षक व ४० शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी सहभाग नोंदवला आहे.…
वरणगाव : प्रतिनिधी शहरातील अक्सा नगर परिसरातील मोकळ्या जागेत लहान मुले खेळत असताना मागून येणाऱ्या चारचाकी गाडीने जोरदार धडक दिल्याने १४ वर्षीय मुलाचा मृत्यू झाल्याची घटना घडली आहे. मिळालेल्या माहितीनुसार, गुरुवार दि ८ रोजी सायकाळच्या सुमारास शहरातील अक्सा नगर परिसरातील रहिवाशी असलेला नुमान आशिक बेग ( १४ ) हा घराच्या शेजारीच असलेल्या मोकळ्या पटांगणावर त्याच्या मित्रा सोबत सायकल चालवत असतांना त्याच ठिकाणी चारचाकी मालवाहु (क्र एम एच ०४ इ एल ८३०२ )या गाडीचे दुरुस्तीचे काम सुरू होते. काम झाल्या नंतर गाडी चालवून पाहताना नुमानच्या सायकलीला चारचाकी गाडीने जोरदार धडक दिल्याने तो खाली कोसळल्याने त्याच्या डोक्याला जबर मार लागला . त्याला…
चाळीसगाव : प्रतिनिधी गेल्या काही दिवसापूर्वी चाळीसगाव शहरातील पोलिस शुभम आगोणे खून प्रकरणातील आतापर्यंत फरार असलेल्या, आरोपी सिद्धांत आनंदा कोळी यास चाळीसगाव शहर पोलिस स्टेशनचे पोलीस निरीक्षक संदीप पाटील यांनी अटक केली आहे. संदीप पाटील यांना मिळालेल्या गुप्त माहितीवरून धुळे येथून आरोपीस अटक करून चाळीसगाव येथे आणण्यात आले आहे. या गुन्हेतील आता पर्यंत सौरभ आंनदा कोळी, वसंत बच्छाव, पृथ्वी कुमावत, चित्रा मोरे, जय मोरे, विष्णू नेवरे, अमोल सिताराम कोळी, राहुल नारायण कोळी या आरोपींना अटक करण्यात आली आहे. तर या घटनेतील मुख्य आरोपी आनंदा उर्फ अण्णा कोळी अजूनही फरार आहे. या गुन्हेगारांचा एलसीबी जळगावसह चाळीसगाव शहर पोलिस स्टेशनचे चार तुकड्या…

