पाचोरा : प्रतिनिधी तालुक्यातील भोजे येथे एका ३५ वर्षीय तरुण शेतकऱ्याने गळफास लावून आत्महत्या केल्याचे घटना उघडकीस आली आहे. घटनेप्रकरणी पिंपळगाव (हरेश्वर) पोलिस स्टेशनमध्ये अकस्मात मृत्युची नोंद करण्यात आली आहे. मिळालेल्या माहितीनुसार, तालुक्यातील भोजे येथील संदिप श्रीकृष्ण पवार (वय ३५) यांचा १० मार्च रोजी सायंकाळी ८ वाजेच्या सुमारास नविन प्लॉट मधील शेडमध्ये गळफास घेतलेल्या अवस्थेत मृतदेह आढळून आला. संदिप पवार यांना तात्काळ ग्रामस्थांच्या मदतीने पाचोरा ग्रामीण रुग्णालयात दाखल केले असता वैद्यकीय अधिकारी यांनी संदिप पवार यांना मृत घोषित केले. घटनेप्रकरणी पिंपळगाव (हरेश्वर) पोलिस स्टेशनमध्ये अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली असून मयत संदिप पवार यांच्या पाश्चात्य आई, वडील, पत्नी, दोन मुलं,…
Author: editor desk
जळगाव : प्रतिनिधी चारा घेऊन येत असताना शेताच्या बंधाऱ्यावरून अचानक बैलगाडी उलटल्याने कठड्याला लावलेला लोखंडी विळा डोक्यात घुसल्याने १३ वर्षीय मुलाचा जागीच मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना सोमवारी दुपारी अडीच वाजता जळगाव तालुक्यातील वाकडी गावानजीक घडली आहे. याप्रकरणी एमआयडीसी पोलिसांत अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. गौरव आनंदा पाटील असे मयत झालेल्या मुलाचे नाव आहे. मिळालेल्या माहितीनुसार, जळगाव तालुक्यातील वाकडी येथे गौरव हा आई-वडील, भाऊ आणि बहीण यांच्यासोबत वास्तव्याला होता. तो म्हसावद गावातील थेपडे विद्यालयात सातवीच्या वर्गात शिकत होता. सोमवारी दुपारी चारा आणण्यासाठी शेतात बैलगाडीने गेला. शेतात चारा घेऊन येत असताना दुपारी अडीच वाजता बैलगाडीने शेताच्या बांधावरून येत असताना अचानक बैलगाडी…
रावेर : प्रतिनिधी राज्य परिवहन महामंडळाच्या धुळे ब-हाणपूर बसला समोरून येणाऱ्या ट्रकने जोरदार धडक दिली. या अपघातात एकूण १२ प्रवासी जखमी झाले, यातील पाचजण गंभीर जखमी असून, त्यांच्यावर जिल्हा रुग्णालयात उपचार सुरू आहेत. हा अपघात सोमवारी सकाळी पावणेदहा वाजेच्या सुमारास विवरे गावाजवळ घडला, याप्रकरणी निंभोरा पोलिसांत ट्रकचालकाविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मिळालेल्या माहितीनुसार, धुळे – ब-हाणपूर बस (क्र. एमएच ४० वाय १८७) ही ४१ प्रवासी घेऊन विवरे बुद्रुकहून रावेरकडे येत असताना स्मशानभूमीजवळील वळणावर समोरून येणाऱ्या भरधाव ट्रकने (एचआर ५५ एक्स २९८३) जोरदार धडक दिली. या अपघातात बसचालकाच्या मागील बाजूच्या पाच ते सहा खिडक्यांसह बसचा पत्रा चिरला आणि बस रस्त्याच्याखाली उतरली.…
मेष आजचा दिवस तुमच्यासाठी चांगला जाईल. तुम्ही तुमच्या कामाच्या ठिकाणी चांगले काम करण्याचा प्रयत्न कराल. एखाद्या कार्यक्रमात सहभागी होण्याची संधी मिळू शकते. कठोर परिश्रमाने तुम्हाला कामात यश मिळू शकते. या राशीच्या महाविद्यालयीन विद्यार्थ्यांना नवीन उपक्रमांमध्ये सहभागी होण्याची संधी मिळू शकते. वजबाबदारी चोख पार पाडाल. मित्रांचा सल्ला आज तुम्हाला खूप उपयोगी पडेल. प्रगतीचे नवे मार्ग उघडतील. वृषभ आजचा दिवस चांगला जाईल. आरोग्य चांगल राहील. तुमच्या मेहनतीचे फळ तुम्हाला नक्कीच मिळेल. तुमचे नाव काही रचनात्मक कार्यात असेल. प्रसिद्धी मिळेल. तुमच्या मनातील इच्छा पूर्ण होईल. आर्थिक बाबतीत लाभ होईल. तुमचे भविष्य सुधारण्यासाठी तुम्ही नवीन पावले उचलाल, ज्यामध्ये तुम्ही यशस्वी देखील व्हाल. सकारात्मक विचारांचा…
जळगाव : प्रतिनिधी देवझिरी वनक्षेत्रातील बोरमळी परिमंडळ, नियतक्षेत्र मेलाणे मध्ये राखीव वनात राजेंद्र डोकाऱ्या पावरा राहणार मेलाणे हा अवैधरित्या साग वृक्ष २७ व इतर प्रजातीचे वृक्ष ३१ असे एकुण ५८ वृक्षांची कत्तल करत असतांना सदर इसमा विरुध्द महिला वनरक्षक यांनी वनअपराध अन्वये वनगुन्हा नोंदविला आहे. अशी माहिती सहा. वनसंरक्षक (वनीकरण व वन्यजीव) प्रथमेश वि. हाडपे, चोपडा यावल वनविभाग, जळगांव यांनी दिली आहे. मिळालेल्या माहितीनुसार, चोपडा तालुक्यातील देवझिरी वनक्षेत्रातील बोरमळी परिमंडळ, नियतक्षेत्र मेलाणे मधील राखीव वनात राजेंद्र डोका-या पावरा याने अपप्रवेश करुन अवैधरित्या एकुण ५८ वृक्षांची कत्तल करत असतांना महिला वनरक्षक यांनी त्यांस मनाई केली असता सदर इसमाने महिला वनरक्षक यांच्या…
नवी दिल्ली : वृत्तसंस्था ऑस्ट्रेलियात हैदराबाद येथील एका 36 वर्षीय महिलेची हत्या झाल्याची घटना समोर आली आहे. या महिलेच्या पतीवर हत्या केल्याचा संशय व्यक्त केला जात आहे. मिळालेल्या माहितीनुसार, शनिवारी बकले येथे एका महिलेचा मृतदेह रस्त्याच्या कडेला चाकं असलेल्या कचऱ्याच्या डब्यात सापडला होता. त्यानंतर पोलिसांना ही महिला भारतीय असल्याची ओळख पटली. चैथन्या मधगनी असं मृत महिलेचं नाव आहे. ही महिला पती आणि मुलासोबत ऑस्ट्रेलियात राहत होती. माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळ गाठून मृतदेह ताब्यात घेतला. व्हिक्टोरिया पोलिसांनी याबाबत प्रसिद्ध केलेल्या निवेदनात म्हटलं आहे की, 9 मार्च रोजी दुपारी विन्चेल्सीजवळील बकले येथे एक महिला मृतावस्थेत आढळून आली आहे. या घटनेचा तपास होमिसाईड…
मुंबई : वृत्तसंस्था राज्य मंत्रिमंडळाची महत्त्वाची बैठक आज मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली पार पडली. आजच्या बैठकीत अनेक महत्त्वाचे निर्णय घेण्यात आले आहे. यामध्ये शासकीय कागदपत्रांवर आता आईचे नाव बंधनकारक असणार असा निर्णय मंत्रिमंडळ बैठकीत घेण्यात आला आहे. याशिवाय रेसकोर्सवरील ३२० एकरावर जागतिक दर्जाचं थीम पार्क उभारण्याचा सरकारचा मानस आहे. कोस्टल रोडची रिक्लेम केलेली २०० एकर जमीन आणि रेसकोर्सची १२० एकर जमीन अशा ३२० एकर जमिनीवरचं जागतिक दर्जाचं सेंट्रल पार्क विकसित केलं जाणार असल्याबाबत मंत्रिमंडळ बैठकीत चर्चा झाली. आजच्या मंत्रिमंडळ बैठकीत एकूण १८ निर्णय घेण्यात आले आहे. बीडीडी गाळेधारक व झोपडीधारक यांच्या करारनाम्यावर लागणारे मुद्रांक शुल्क कमी करणार (गृहनिर्माण विभाग) बंद…
पारोळा : प्रतिनिधी जळगाव-धुळे महामार्गावरील टोल नाका अज्ञात तोंड बांधून आलेल्या टोळक्यांनी तोडफोड करून पेटवून दिला. या घटनेनंतर परिसरात खळबळ उडाली असून, हा सर्व प्रकार सीसीटीव्हीत कैद झाला आहे. घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. हा टोल नाका आजपासून सुरु होणार होता. मिळालेल्या माहितीनुसार, अज्ञात बुरखाधारी तरुण काल मध्यरात्रीच्या सुमारास जळगाव-धुळे महामार्गावर चार चाकी वाहनातून येत सब गव्हाण येथील टोलनाका तोडफोड करून पेटून दिल्यानंतर हे तरुण पसार झाले. या घटनेने खळबळ उडाली आहे. हा टोल नाका जळगाव जिल्ह्यातील पारोळा तालुक्यातील सब गव्हाण गावातील अग्रोह इन्फ्रास्ट्रक्चर कंपनीचा होता. पारोळा तालुक्यातील सबगव्हाण गावातील टोल नाका आजपासून सुरु होणार असल्याने आज उद्घाटन…
जळगाव : प्रतिनिधी जळगाव जिल्ह्यातील चोपडा आणि चाळीसगाव पोलीसांच्या सतर्कतेने गावठी पिस्तूलांसह जिवंत काडतूस बाळगणाऱ्या वेगवेगळ्या दोन गुन्ह्यात सहा जणांना अटक करण्यात यश आले आहे. यात चाळीसगाव पोलीसांनी केलेल्या कारवाईत चार गावठी पिस्तूल, ५ मॅगझीर, १० जिवंत काडतूसासह १ जणांना अटक केली तर चोपडा पोलीसांनी केलेल्या कारवाईत ९ गावठी पिस्तूल, २ मॅगझीन, २० जिवंत काडतूसासह ४ जणांना अटक करण्यात आली आहे. अशी माहिती जिल्हा पेालीस अधिक्षक डॉ. महेश्वर रेड्डी यांनी दिली आहे. मिळालेल्या माहितीनुसार, चोपडा ते मध्यप्रदेश बॉर्डर असलेल्या उमर्टी येथील येथून अवैधरित्या गावठी पिस्तूल विक्री करत असल्याची माहिती चोपडा ग्रामीण पोलीस ठाण्याचे पोलीस कर्मचाऱ्यांनी मिळाली. त्यानुसार पथकाने कृष्णापुर ते…
मुंबई : वृत्तसंस्था लोकसभा निवडणुकीपूर्वी राज्याच्या राजकारणातून एक मोठी बातमी समोर आली आहे. राष्ट्रवादी अजित पवार गटाला मोठा धक्का बसला आहे. पारनेर विधानसभा मतदारसंघाचे आमदार निलेश लंके पुन्हा शरद पवार गटात प्रवेश करणार आहे. लंके सध्या पवारांच्या भेटीला पोहचले असून आज ते पक्षात प्रवेश करणार, असल्याची खात्रीलायक वृत्त आहे. लोकसभा निवडणुकीचे पडघम वाजू लागले असून निवडणुकीच्या तारखा कधीही जाहीर होऊ शकतात. यापार्श्वभूमीवर इच्छुकांनी जोरदार मोर्चेबांधणी सुरू केली असून मतदारसंघावर आपला दावा सांगण्यास सुरुवात केली आहे. अशातच अहमदनगर दक्षिण लोकसभा मतदारसंघातून आमदार निलेश लंके निवडणूक लढवणार असल्याची चर्चा आहे. अहमदनगरमध्ये सध्या निलेश लंके यांच्या वाढदिवसाचे बॅनर्स लागले असून यावर लंके यांचा…

