एरंडोल : प्रतिनिधी कासोदा येथील स्व. सौ.शोभाताई अशोकराव पाटील प्राथ. माध्य. व उच्च माध्यमिक विद्यालयाचे उपशिक्षक प्रवीण ज्ञानेश्वर मराठे सर यांना नुकताच राज्यस्तरीय महात्मा ज्योतिराव फुले शिक्षण परिषद महाराष्ट्र राज्य नाशिक विभाग यांच्यामार्फत महात्मा ज्योतिराव फुले आदर्श शिक्षक पुरस्कार प्रदान करण्यात आला. प्रवीण मराठे सर यांना हा पुरस्कार माजी खासदार तथा राष्ट्रीय सैनिक फेडरेशनचे अध्यक्ष ब्रिगेडियर सुधीर सावंत, जि.प.अध्यक्ष नामदार धरती ताई देवरे, पदवीधर मतदारसंघाचे आमदार डॉ. सत्यजित तांबे, प्रदेशाध्यक्ष व्यंकटराव जाधव महाराष्ट्र ज्योतिराव फुले शिक्षण परिषद महाराष्ट्र राज्य व जळगाव जिल्हाध्यक्ष प्रा. शिवाजीराव शिंदे यांच्या हस्ते सपत्नीक हा पुरस्कार राजश्री शाहू महाराज नाट्यगृह धुळे या ठिकाणी प्रदान करून सन्मानित…
Author: editor desk
जळगाव : प्रतिनिधी जिल्ह्यातील जामनेर येतील एका ३१ वर्षीय इसमाची टास्क पूर्ण करून त्यामध्ये गुंतवणूक केल्यास अधिकचा नफा मिळवून देण्याचे आमिष दाखवत ऑनलाइन फसवणूक करणाऱ्या गौरव गौतम बर्मन (२४, रा. राजरहाट, गोपालपपरा, कोलकाता) याला जळगाव सायबर पोलिस ठाण्याच्या अधिकारी, कर्मचाऱ्यांनी कोलकाता येथून अटक केली. त्याला न्यायालयात हजर केले असता त्याची न्यायालयीन कोठडीत रवानगी करण्यात आली. मिळालेल्या माहितीनुसार, चेतन कन्हैया फिरके (३१, रा. जामनेर) यांची आठ लाख ७५ हजार १७५ रुपयांची ऑनलाइन फसवणूक करण्यात आली होती. याप्रकरणी अनोळखी व्यक्तीविरुद्ध सायबर पोलिस ठाण्यात ९ सप्टेंबर २०२३ रोजी गुन्हा दाखल झाला. गौरव गौतम बर्मन याने हा गुन्हा केल्याचे समोर आले होते. त्यानुसार जळगाव…
जळगाव : प्रतिनिधी जळगाव येथील धनाजी नाना चौधरी विद्या प्रबोधिनी संचालित शिरीष मधुकरराव चौधरी महाविद्यालयात दिनांक 9 फेब्रुवारी 2024 रोजी संगणकशास्त्र विभागातर्फे राज्यस्तरीय iNOVA 2024 या स्पर्धेचे आयोजन करण्यात आले. सदर स्पर्धेमध्ये पोस्टर प्रेझेन्टेशन व ब्लाइंड कोडींग (C Language) या स्पर्धा पदवी व पदव्युत्तर गटातून घेण्यात आल्या. राज्यातील विविध महाविद्यालयातील विद्यार्थ्यांनी सहभाग नोंदविला. या स्पर्धेचे उद्घाटन श्री. पंकज अत्तरदे (CEO, Heuristic Technopark, Pune) यांच्या शुभहस्ते करण्यात आले. याप्रसंगी त्यांनी विद्यार्थ्यांना “लेटेस्ट टेक्नॉलॉजी इन आयटी इंडस्ट्रीज” या विषयावर मार्गदर्शन केले. सदर सेमिनार मध्ये त्यांनी विद्यार्थ्यांना सध्या वापरात असलेल्या क्लाऊड कॉम्प्युटिंग, क्वाँटम कॉम्प्युटिंग, डाटा सायन्स, इंडस्ट्री रेव्होल्युशन 1.0 ते 4.0 याबाबत सखोल…
छत्रपती संभाजी नगर : वृत्तसंस्था राज्यातील समृद्धी महामार्ग नेहमीच अपघाताच्या माध्यमातून चर्चेत येत असतांना नुकतेच समृद्धी महामार्गावर कारचा भीषण अपघात झाला आहे. भरधाव वेगात असलेली कार अज्ञात वाहनांला धडकल्याने तिघांचा जागीच मृत्यू झाला. दुर्देवी बाब म्हणजे कारमधील एअरबँग उघडून फाटल्या, पण कुणाचाही जीव वाचला नाही. राहुल आनंद निकम (वय ४७), शिवाजी वामनराव थोरात (वय ५८) आणि अण्णा रामराव मालोदे (वय ७१) अशी मृतांची नावं आहेत. मृत व्यक्ती छत्रपती संभाजीनगरचे रहिवासी असल्याची माहिती आहे. या घटनेमुळे मोठी हळहळ व्यक्त होत आहे. मिळालेल्या माहितीनुसार, अपघाग्रस्त व्यक्ती छत्रपती संभाजीनगर येथून नाशिकच्या दिशेने जात होते. शनिवारी (१० फेब्रुवारी) रात्री ११ वाजेच्या सुमारास त्यांची कार…
जळगाव : प्रतिनिधी शहरातील स्वातंत्र्य चौक परिसरात चौघांकडे गावठी कट्टा आढळून आल्याप्रकरणी, तसेच पोलिसांना धक्काबुक्की केल्याप्रकरणात चौघांना सुनावण्यात आलेल्या पोलिस कोठडीची मुदत संपल्याने त्यांची न्यायालयीन कोठडीत रवानगी करण्यात आली. मिळालेल्या माहितीनुसार, चेतन रमेश सुशीर (१९, रा. पिंप्राळा हुडको), लखन दिलीप मराठे (३०, रा. शिवाजीनगर हुडको), सोनू उर्फ ललित गणेश चौधरी (२९, रा. ईश्वर कॉलनी), अतुल क्रिष्णा शिंदे (२५, रा. रामेश्वर कॉलनी) यांचा समावेश आहे.स्वातंत्र्य चौक परिसरात गुरुवार, ८ फेब्रुवारी रोजी चार जण वाद घालत असताना पोलिस त्या ठिकाणी पोहचले होते. त्या वेळी पोलिसांना चौघांनी धक्काबुक्की करत धमकी दिली होती. त्या वेळी त्यांच्याकडे गावठी कट्टा आढळून आला होता.
जळगाव : प्रतिनिधी जिल्ह्यातील अनेक ठिकाणी छोटे मोठे अपघाताच्या घटना नियमित होत आहे. नुकतेच शेतात जाण्यासाठी दुचाकीस्वाराला हात देऊन दुचाकीवर जात असताना तोल जाऊन खाली पडल्याने अनिता आनंदा ब्राह्मणे (३५, रा. जळके, ता. जळगाव) जखमी झाल्या. उपचार सुरू असताना शनिवार, १० रोजी त्यांचा मृत्यू झाला. या प्रकरणी एमआयडीसी पोलिस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद आहे. मिळालेल्या माहितीनुसार, जळके गावातील रहिवासी अनिता ब्राह्मणे या शेतात मजुरी काम करतात. ८ फेब्रुवारी रोजी सकाळी त्या शेतात जात असताना एका दुचाकीस्वाराला त्यांनी हात देऊन शेतापर्यंत सोडून देण्याची विनंती केली. त्यानुसार दुचाकीस्वाराने त्यांना दुचाकीवर बसवून तो वराड गावाच्या दिशेने जात असताना दुचाकीवरून तोल गेल्याने त्या दुचाकीवरून…
जळगाव : प्रतिनिधी भाजपाचे नेते तथा केंद्रीय गृहमंत्री अमित शाह गुरुवारी जळगाव जिल्हा दौऱ्यावर येत आहेत. जळगावात त्यांच्या उपस्थितीत युवा संमेलनाचे आयोजन करण्यात आले आहे. त्यांच्या दौऱ्याच्या नियोजनासाठी रविवारी जामनेरात बैठकीचे आयोजन केले असल्याची माहिती मिळाली आहे. १५ फेब्रुवारी रोजी अमित शहा महाराष्ट्र दौऱ्यावर येणार असून, जळगावसह अकोला व छत्रपती संभाजीनगर या ठिकाणी ते विविध कार्यक्रमांना हजेरी लावणार असल्याची माहिती गिरीश महाजन यांनी दिली. अमित शाह यांच्या उपस्थितीत जळगावात मोठे युवा संमेलन घेण्यात येणार आहे. या संमेलनातून ते जिल्ह्यातील युवकांशी संवाद साधणार आहेत. अमित शाह यांचा दौरा, तसेच संमेलनाच्या नियोजनासाठी रविवारी जामनेरात महत्वाची बैठक आयोजित करण्यात आली आहे.
धरणगाव : प्रतिनिधी तालुक्यातील दोनगाव येथील माजी ग्रां.पं.सदस्य श्री. वसंत सिताराम जळके यांच्या सौभाग्यवती स्व. सरलाबाई वसंत जळके (अंगणवाडी सेविका) दोनगांव बु. यांचं वयाच्या ५२ व्या वर्षी दीर्घ आजाराने दि.१० रोजी संध्या. ६.४५ वा.निधन झाले. त्यांची अंत्ययात्रा आज ११ रविवारी सकाळी ११ वाजता दोनगाव बु. येथुन त्यांच्या राहत्या घरापासून निघेल. त्या श्री. सतीश वसंत जळके व श्री. निलेश वसंत जळके यांच्या आई होतं.त्यांच्या पश्यात पती, दोन मुलं, सुना, नातवंडं असा मोठा परिवार आहे. ताईच्या आत्मांस चिर शांती लाभो ही प्रभु परमेश्वर चरणी प्रार्थना
जळगाव : प्रतिनिधी शहरातील अनेक ठिकाणी गुन्हेगारी घटना घडत आहे. गेल्या दोन वर्षांसाठी हद्दपार असतानाही शहरात तलवार घेऊन फिरणाऱ्या विशाल मुरलीधर दाभाडे (रा. रामेश्वर कॉलनी) याला एमआयडीसी पोलिसांनी ताब्यात घेतले. त्याच्या जवळ एक तलवार सापडली असून, ती जप्त करण्यात आली आहे. मिळालेल्या माहितीनुसार, एमआयडीसी पोलिस ठाण्यात पाच, तर रामानंदनगर पोलिस ठाण्यात दोन गुन्हे दाखल असलेल्या विशाल दाभाडे याला जळगाव जिल्ह्यातून दोन वर्षांकरिता हद्दपार करण्यात आले आहे. तरीदेखील तो शहरात फिरत असल्याची माहिती एमआयडीसी पोलिस ठाण्याचे निरीक्षक बबन आव्हाड यांना मिळाली. त्यावरून त्यांनी कारवाईच्या सूचना दिल्या. त्यानुसार सहायक फौजदार अतुल वंजारी, पोहेकों, गणेश शिरसाळे, पोलिस नाईक योगेश बारी, सुधीर सावळे, पोकॉ.…
जळगाव : प्रतिनिधी सामाजिक कार्यात अग्रेसर असलेल्या विजया केसरी प्रतिष्ठानच्या वतीने विविध सामाजिक उपक्रम राबविण्यात येत आहेत. याचाच एक भाग म्हणून ‘मंदिर आमची श्रद्धा… स्वच्छता आमचा ध्यास’ हे अभियान राबविण्यात येणार असल्याची माहिती प्रतिष्ठानचे अध्यक्ष तथा उद्योजक अविनाश पाटील-जाधव यांनी शनिवारी येथे आयोजित पत्रकार परिषदेत दिली. विजया केसरी प्रतिष्ठानतर्फे सामाजिक क्षेत्रात विविध कामे करण्यात येत आहेत. जिल्ह्यातील विविध भागात हे कार्यक्रम घेण्यात येत आहेत. यात प्रामुख्याने प्रसिद्ध कीर्तनकारांची कीर्तने, प्रसिद्ध वक्ते राहूल सोलापूरकर यांची व्याख्याने, आरोग्य शिबिर असे कार्यक्रम होणार आहेत. तसेच देशाचे लाडके पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या आवाहनानुसार ‘मंदिर आमची श्रद्धा… स्वच्छता आमचा ध्यास… हे अभियान राबविण्यात येणार आहे.…

